चंद्रपूर हा विदर्भामधील जिल्हा असून धनसंपदेमुळे निसर्गसंपन्न झालेला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या नैऋत्य बाजूला राजुरा तालुका आहे. या तालुक्यामधे माणिकगडाचा वनदुर्ग आहे.
BGHA MAZEE SWACcHTA KASHEE AAHE
मागे पुण्याच्या बाहेर एका कार्यक्रमाला जायचा योग आला त्यावेळी त्या आयोजकांनी मेनू विषयी मत मागितलं ...त्यावेळी त्यांना दिलेले हे उत्तर...
मेनू साधारण असा असावा-
वरण- भात, तूप, मीठ, लिंबू - त्याबरोबर शक्य असल्यास चमचाभर पूरण.
मसाले भात, पण त्यावर ताज्या ओल्या नारळाचं किसलेलं खोबरं आवश्यक...
पुऱ्या, अळुची शेंगदाणे-खोबरे घालून केलेली भाजी,
सुकी बटाटा भाजी, गोड-आंबट आमटी.
पापड-कुरडई. कोथिंबीर वडी किंवा घोसाळ्याची भजी.
ओल्या नारळाची कोथिंबीरीची चटणी, काकड़ी मोजक्या प्रमाणात दाण्याचा कूट व दही घातलेली कोशिंबीर.
चवी पुरतं पंचामृमत.
गोडात श्रीखंड किंवा बासुंदी.
मठ्ठा.
आता काही सूचना....लक्षपूर्वक वाचा..
आम्ही अंमळ तिखट कमी खातो तेंव्हा भरमसाठ मसाल्याचा मारा नको.
तेलात आंम्हास पोहावयाचे नाही, तेंव्हा तवंगाचा तलाव नको.
श्रीखंड असेल तर वाटी चमचा हवाच, उगाच श्रीखंड बचकन पानात वाढू नये...
आम्ही बोटाने चाटत श्रीखंड खात नाही...श्रीखंडाशी अशी प्रतारणा आम्हास मान्य नाही...
उगीचच गळेपडू आग्रह नसावा ( विनाकारण आग्रह करून वाढल्यास अपमान करण्यात येईल ) .
अळुच्या भाजीतील शेंगदाणे आख्खे असावेत, उगाच तुकडे तुकडे टाकू नयेत...
तसेच खोबरे देखील पाउण इंचा पेक्षा जास्त लांबीचे नको.
मठ्ठा हा प्रमाणशीर थंड असावा. त्यातील मीठ, साखर, ताक-पाण्याचे प्रमाण, आलं, कोथिंबीर योग्य प्रमाणातच हवी, त्यात मिरचीचे तुकडे घालणार असाल ते 5 ते 6 मी.मी. पेक्षा जास्त लांबीचे नकोत.
वरणाची डाळ एक-पात्रीच हवी, नाहीतर चव बदलते.
पापड-कुरडई मरतुकडे नको....त्याच्यातला कुरकुरीतपणा निघुन गेल्यास आमची कुरकुर सुरु होईल...
गोडात सुधारस ठेवल्यास तो एक तारीच असावा, लिंबू योग्य प्रमाणात असावे.
ताटातली भजी आणि भाजी ही चमचमीत हवी ...तिखट नको...
त्यामुळे उगाच गुलाल उधळल्यासारख तिखट त्यात उधळू नये...
आता पान वाढावयाच्या सूचना -
पाट मांडून त्यासमोर छान (आटोपशीर) रांगोळी घालावी.. रांगोळी स्पर्धा असल्यासारखे वागू नये.
पानाच्या डाव्या बाजूला लोटी भांडे ठेवावे...
पान समोर ठेवून अगदी पुढचा भाग शून्य अंश पकडून मिठ वाढावे आणि
त्याच्या उणे पाच अंशावर लिंबू अन मग क्रमाने पाच-पाच अंशावर चटणी, पंचामृत, कोशिंबीर, लोणचे
वाढावे...
उणे 90 अंशावर पापड़, त्याखाली पूरी वाढावी.
मध्यभागी भाताची मुद असावी व सगळं वरण भसकन वाढू नये... वरणाचा ओघळ अजिबात येता कामा नये...
मुदाचा आकार प्रमाणशीर असावा...भसाडा नको...
वरण-भाता खाली मसाले भात वाढावा.
मसालाभाताच्या उजव्या बाजुलाच भाजी वाढलेली असावी..
आणि त्याच्या बरोबर वर आमटीची वाटी असावी.
उजव्या हाताला वरच्या साइडला 45 अंशावर गोडाची वाटी असावी व त्याच्या वर मठ्ठा वाटी असावी.
आमटी व भाजी गोडाच्या खाली असावी.
वर नमूद केलेल्यात काही त्रुटि असल्यास दुरुस्त कराव्यात, उगाच आमच्या चुका आंम्हाला दाखवू नये.
बस ऐवढेच अपेक्षित आहे. सूचना संपल्या असे समजू नये. प्रत्यक्ष जेवताना असतीलच.
आपला , ( नम्र वगैरे म्हणून मान खाली घालणे आवश्यक नाही )
"काटेकोर" पुणेकर
आपल्याकडे दरवर्षी नेमके पावसात किंवा पावसाच्या आधी रस्ते खराब होत असतात. खड्डे पडतात. प्रवासाला निघतांना आपण म्हणतो “ पावसाचे दिवस आहेत, रस्ते खराब झाले असणार – लवकर निघूया.“ अशी मानसिकता आपल्यात का आली? आपण मान्य करून घेतले कि पावसात रस्ते खराब असायलाच हवेत. परदेशी पण बर्यापैकी पाऊस पडतो तेथे का नाही रस्ते खराब होत?
खराब होणारे रस्ते पाहून मला पडलेले काही प्रश्न
– रस्ते प्रत्येक वर्षी खड्ड्यात का जातात?
– एवढे खड्डे रस्त्याला का पडतात?
– रस्त्यात खड्डे असतात कि खड्ड्यात रस्ते?
– बोटीत बसत नाहीत एवढे धक्के आणि हेलकावे ह्या रस्त्यावरून जातांना का बसतात?
– खड्ड्यामुळे इंधन आणि वेळ जास्त लागतो आणि गाडी खराब होते ह्याला जबाबदार कोण?
– खड्ड्यांमुळे अपघात होतात, लोक जखमी होतात आणि कधी कधी काही लोक जीव गमावतात, त्याला जबाबदार कोण?
– मंत्री आणि संत्री ह्या रस्त्याने प्रवास करतात का? की त्यांना सचिव सांगतात “साहेब रस्ता खराब आहे, हेलिकॉप्टर ने जा“
– रस्ते असे दरवर्षी खराब होऊ नये म्हणून सरकारतर्फे काय उपाययोजना केली जाते? ती व्हावी म्हणून स्थानिक संस्थाकडून आणि जनतेकडून सरकारची काय अपेक्षा आहे?
– रस्ते खराब झाल्यास ठेकेदारांकडून पेनल्टी घेण्याची काय तरतूद आहे? अशी तरतूद आहे का?
– जनतेकडून रोड टॅक्स, टोल घेतला जातो, नोकरदार आयकर भरतात त्याबदल्यात चांगल्या रस्त्यांची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे का ?
– जर पावसात रस्ते खराब होतात तर पावसाच्या आधी मार्च एप्रिल मध्ये हे सगळे रस्ते टकाटक का केले जात नाहीत? भर पावसात, रहदारी चालू असतांना खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रकार का केला जातो?
– खराब रस्त्यामुळे साधन संपत्तीचा किती अपव्यय होतो ह्याचा हिशोब कधी कोणी ठेवलाय का ?
अशा रस्त्यावरून परदेशी प्रवाशी प्रवास करताय तेव्हा ते राष्ट्रीय महामार्गावरून जात आहेत ह्यावर विश्वास ठेवत नाहीत. ज्या देशात दळणवळण करणारे महामार्ग असे आहेत तो देश महासत्ता कसा आणि कधी होणार?
प्रकाश दिगंबर सावंत, पुणे
९०४९००८५०३
शिक्षण असो वा नोकरी-व्यवसाय, प्रत्येक ठिकाणी सतत कोणत्या ना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासते. काही कागदपत्रे तर आयुष्यात सतत उपयोगी ठरतात. त्यामुळे अशा कागदपत्रांची सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची ठरते. पण, याकडे गांभीर्याने लक्ष न देणार्यांचीच संख्या अधिक आहे. मग योग्य कागदपत्रां अभावी नुकसान सहन करावे लागल्यास पश्चात्ताप करण्याशिवाय हातात काही उरत नाही.
कॉलेजमध्ये असताना अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या वेळी हमखास ऐकावं लागायचं – पारलौकिक जीवनाला अतिमहत्त्व दिल्यामुळे भारतातील लोक ऐहिक उन्नती करू शकत नाहीत. भारत अविकसित राहण्याचं हे एक कारण मानलं जातं. अनिच्छेनं हे लिहावं लागायचं, पण मन हे स्वीकारायचं नाही.
तरुणांना आपली कला सादर करण्यासाठी आता उत्तमोत्तम व्यासपीठ मिळत आहेत. त्याचप्रमाणे डिजिटल व्यासपीठाचा विचार करता फेसबुक, युटयूबसारखे सामाजिक माध्यमं आपल्यासमोर येतात. तरुणाई या सोशल मीडियाचा व्यासपीठ म्हणून कसा वापर करते यावर थोडीशी नजर टाकू या.
गेल्या अनेक वर्षात मनोरंजनाची साधने बदलत गेली आहेत. चित्रपट, मालिका, नाटके आदी साच्यातून बाहेर येऊन आता वेब सिरीज प्रचलित झाली. यू टयूबच्या उदयानंतर वेब सिरीजने मनोरंजन क्षेत्रात उडी मारलेली पाहायला मिळते. विविध विषय ज्यामध्ये कोणत्याही सेन्सॉरचा आक्षेप नसतो, भाषाशैलीला मर्यादा नसतात, असे कोणतेही अटी नसलेले वेब सिरीज सध्या प्रचंड हिट होतायत. हे वेब सिरीज पाहण्यामध्ये तरुणाई अधिक पुढाकार घेताना दिसते. संध्याकाळी ६ ते १०.३० पर्यंत महिलांनी मालिका विश्वात आपलं अढळ स्थान केलं आहे; त्यामुळे या फावल्या वेळात आपण काय करायचं? हा प्रश्न उपस्थित होत असतानाच तरुणांना वेब सिरीजचं उत्तर मिळालं आहे.
१९९५ साली दि स्पॉट ही पहिली वेब सिरीज प्रसिद्ध झाली. मात्र वेब सिरीजला प्रचंड प्रतिसाद २०१४ पासून सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. कलाकार मंडळींनाही यू टयूब हे उत्तम माध्यम वाटत असल्याने तेही वेब सिरीजला महत्त्व देताना देसतात. मात्र आजकाल या यू टयूब चॅनेलचा किंवा या वेब सिरीजचा तरुणाई जरा हटके पद्धतीने विचार करताना दिसते.
कवितेचे गाणं होताना ही वेब सिरीज तुम्हाला माहीत असेलच. सलील कुलकर्णी दर रविवारी यू टयूबवर त्यांचा हा वेबिसोड अपलोड करतात. त्यात त्यांच्या प्रत्येक कवितेविषयी आत्मितयेने बोलताना दिसतात. त्याचप्रमाणे आपल्या तरुण वर्गातही कविता लिहिणारे कमी नाहीत.
पूर्वी कवितांचा संच तयार करून त्याचं पुस्तक रूपात प्रकाशन केलं जायचं. नाहीतर आपली एखादी कविता कोणत्याही प्रकाशनात किंवा अगदी दिवाळी अंकातही छापून यावी अशी माफक अपेक्षा काही नवकवींची असायची. मात्र आपल्या कवितांना प्रसिद्धी मिळण्यासाठी या नवकवींना आयता प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे तो म्हणजे यू टयूबच्या माध्यमातून.
एखादी स्वरचित कविता व्हीडिओ रूपात सादर करून ती यू टयूबवर टाकायची आणि त्या यू टयूबची लिंक सर्वत्र पसरवायची. हा ट्रेंड आता बराच रुळला आहे. यू टयूबवर अशा कविताकारांचे अनेक व्हीडिओ सहज आपल्याला पाहायला मिळतील. फेब्रुवारी महिन्यात साज-या करण्यात येणा-या व्हॅलेंटाईननिमित्ताने अनेक नवकवींनी या संधीचं सोनं केलं. स्वरचित प्रेम कविता व्हीडिओ रूपात सादर करून त्या यू टयूबवर अपलोड केल्या. त्याचप्रमाणे महिला दिनादिवशीही महिलांसाठी त्यांचं गौरव करणारे त्यांना सन्मानित करणा-या कविता यू टयूबवर पाहायला मिळाल्या.
सतत कवितेच्या धुंदीत असणारा कवी मल्हार (मनोज गुंड) म्हणतो की, कविता करणं हे माझ्या आयुष्यातील फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या कलेला प्रसिद्धी मिळावी, असं प्रत्येकालाच वाटते. त्यामुळेच आम्ही सोशल मीडियाचा वापर करतो. यू टयूबच्या माध्यमातून आम्हाला लोकांपर्यंत पोहोचणं सोपं जातं. या यू टयूबमुळे आमच्या कवितांना प्रचंड लाईक्सही मिळतात.
पूजा भंडागे नावाची तरुण कवियीत्रीही फेसबुकवर चारोळ्या पोस्ट करत असते. तिची सावळबाधा ही कविता यू टयूबवर फार प्रसिद्ध झाली आहे. त्याचप्रमाणे तिने अनेक कविता यू टयूबच्या माध्यमातून लोकांसमोर आणल्या आहेत. मनोज किंवा पूजा याप्रमाणेच अनेकांच्या कविता आपल्याला यू टयूबच्या माध्यमातून वाचायला, ऐकायला मिळतील. महिला दिनानिमित्त शिल्पा देशपांडे आणि राधिका फराटे यांची कविताही प्रचंड गाजली.
पूर्वी कवितांची मैफल भरवली जायची. आजही कविताप्रेमी ऑनलाईन एकत्र येतात आणि मैफल रंगवतात. फेसबुक लाईव्ह चॅटमध्येही ही कविता मैफल भरवलेली पाहायला मिळते. तरुणांनी त्यांच्या कलेसाठी सोशल मीडियाचा केलेला हा वापर स्तुत्यच आहे. त्यामुळे त्यांच्या कलेला भरभरून दाद द्यायला तुम्हीही कधीतरी त्यांच्या यू टयूब चॅनलला भेट द्या.
-- स्नेहा कोलते
त्यामुळे आंघोळीचे खालील प्रकार वापरता येतील.
1 - काकड स्नान - या स्नानात पाण्याच्या थेंबांना आपल्यावर शिंपडून स्नान केले जाऊ शकते.
2 - नळ नमस्कार स्नान - यात तुम्ही नळाला नमस्कार करण्याने आंघोळ झाली असे समजण्यात येईल.
3 - स्पर्शानुभूती स्नान - या प्रकारात आंघोळ केलेल्या व्यक्तीला स्पर्श करून
"त्वं स्नानम् मम् स्नानम्" बोलल्याने आंघोळ झाली असे मानण्यात येईल॥
4. जल स्मरण स्नान - हे उच्च कोटीचे स्नान असून अंथरूणात राहूनच पाण्याने आंघोळ करतोय या स्मरणानेच आंघोळ झाली असे होईल..... हे स्नान सुट्टी च्या दिवशी केल्याने विशेष लाभ मिळतो असे अनेकांचे मानने आहे ....
२६ जुलै १६७७ ः शिवरायांनी दक्षिण दिग्विजय मोहीमेत जिंजीचा किल्ला जिंकला.
२६ जुलै १६८० : कर्नाटकातील कारवारला बजाजी पंडीत हा इंग्रजांना तहात ठरल्यापेक्षा स्वतासाठी जास्त होन मागायचा.मात्र इंग्रजांनी ते देण्याचे नाकारले आणि संभाजी महाराजांच्या कानावर ही तक्रार घालण्याची योजना इंग्रजांनी आखली.
विजय दिन - भारत (कारगिल युद्धाची समाप्ती).
घडामोडी
१९६५ - मालदीवला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
२००५ - मुंबई व परिसरात २४ तासात जवळजवळ १ मीटर (९९५ मिलीमीटर) पाउस. महापूरात शेकडो मृत्युमुखी.
२०११ - मोरोक्कोमध्ये सी.१३० प्रकारचे विमान कोसळले. ७८ ठार.
जन्म
१८७४ - शाहू महाराज, समाज सुधारक.
१९२७ - जी.एस. रामचंद, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९४३ - मिक जॅगर, इंग्लिश संगीतकार, गायक.
१९४९ - थक्शिन शिनावत्र, थायलंडचा पंतप्रधान.
मृत्यू
१८६७ - ओट्टो, ग्रीसचा राजा.
१९५२ - एव्हा पेरोन, आर्जेन्टिनाची गायिका.
२००९ - भास्कर चंदावरकर, मराठी संगीतकार.
एकदा गौतम बुध्दांकडे काही व्यापारी लोक जातात आणि त्यांना म्हणतात की हे तथागत आम्ही तिर्थयात्रेस जात आहे आम्हाला आशिर्वाद द्या. त्यावेळी बुध्द त्यांच्याकडे एक एक कडुनिंबाची काडी देतात आणि त्यांना सांगतात की, जिथे जिथे तुम्ही तिर्थस्नान कराल तिथे तिथे या कडुनिंबाच्या काडीलासुध्दा आंघोळ घाला आणि शेवटी माझ्याकडे घेवून या. बुध्दांनी सांगीतल्या प्रमाणे स्वता तिर्थस्नान केल्यानंतर काडीला स्नान घातले आणि शेवटी बुध्दांकडे गेले. बुध्दांनी त्यांना विचारले की कशी झाली तिर्थयात्रा त्यावर सर्वांना आपआपला अनुभव सांगीतला आणि सर्वांना खुप चांगले वाटले सर्वजण प्रसन्न वाटले . सर्वांचा अनुभव ऐकल्यांनंतर बुध्दांनी त्यांना ती काडी चावण्यास सांगीतले. सर्वांनी सांगीतल्याप्रमाणे ती काडी चावली तर सर्वांची चेहरे पाहण्या लायक होते .काडीचा कडुपणा त्यांच्या चेहऱ्यावर दिसु लागला . सर्वांच्या तिरकस नजरा बुध्दांकडे होत्या. त्यावर बुध्दांनी त्यांना सांगीतले की, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तिर्थस्नान केले त्या त्या ठिकाणी या काडीने सुध्दा तिर्थस्नान केले . जसे तुम्ही पापमुक्त झालात तसेच ही काडीसुध्दा पापमुक्त व्हायला पाहीजे होती . तिर्थस्नानचा परिणाम या काडीवर सुध्दा व्हायला पाहीजे होता. त्यामुळे ही काडी गोड व्हायला पाहिजे होती परंतू तसे झाले नाही ती काडी कडुच राहीली . त्याप्रमाणे आपणाला सुध्दा शरीरशुध्दी करायची असेल तर ती आतुन करणे योग्य . बाहेरुन जरी तुम्ही आंघोळ केली तरी आतुन विचारांनी समृध्द होणे गरजेचे. आतुन मनाची शुध्दी करणे गरजेचे आहे. मनाच्या समृध्द विचारांनी केलेली कृती कल्याणकारी असते.
बोध :- मनाची शुध्दी ही वरवर नसुन आतुन करावी लागते
Copyright © 2025 | Marathisrushti