ग्लास भर whisky थेंबभर पाणी
असे ग्लास मी सात-आठ ‘हाणी’
त्यानंतर झाले आजार
डॉक्टरने केले बेजार
हे खा, ते घ्या, हे नको
कंटाळून गेली बायको
तरी अजुन मी भरतो पेला
ग्लासभर पाणी, थेंबभर हाला .
-
(हाला - मदिरा ‘हाणणें’ - भरपूर खाणें-पिणें )
सुभाष स. नाईक
साहित्य उपेक्षितांचे दीपावली विशेषांक 2015 संपादकाच्या नजरेतून वाचकांसाठी...
आमचा साहित्य उपेक्षिताचे दीपावली विशेषांक 2015 अवघ्या 52 पृष्ठांचा आहे. त्या 52 पृष्ठात आंम्ही सर्व वसाहित्य उपेक्षितांचे दीपावली विशेषांक 2015 संपादकाच्या नजरेतून वाचकांसाठी...
आमचा साहित्य उपेक्षिताचे दीपावली विशेषांक 2015 अवघ्या 52 पृष्ठांचा आहे. त्या 52 पृष्ठात आंम्ही सर्व वयोगटातील वाचकांचा त्यांच्या आवडीचा विचार करुन साहित्याची निवड केलेली आहे.
आमच्या दीपावली विशेषांक 2015 च्या मुखपृष्ठावर डॉ.शांताराम कारंडे यांचे छायाचित्र आहे ते पाह्ताच वाचकांच्या भुवया उंचावतील विशेषता स्त्री वाचकांच्या कारण दीपावली विशेषांक म्ह्टला की त्यावर सुंदर दिसणार्याभ स्त्रियांचे छायाचित्र पाह्ण्याची आमच्या वाचकांना सवयच जडलेय ! असे म्हंटले तर ते वावगे ठरणार नाही. डॉ.शांताराम कारंडे हे एक उत्तम साहित्यिक आहेत त्यासोबत साहित्यिकांचे सच्चे मित्रही आहेत. मला व्यक्तीशः नेहमी वाटायचं की दीपावली विशेषांकाच्या मुखपृष्ठावर साहित्यिकांचे छायाचित्र का नसतात ? कदाचित ते दिसायला सुंदर नसतात हे कारण असेलही. पण डॉ.शांताराम कारंडे त्याला अपवाद आहेत हे मी खात्रीने सांगू शकतो. कदाचित दीवाळी अंकांच्या संपादकाना लेखकांच्या चेह्र्याआतील सौंदर्य कधी दिसलेच नसावे. डॉ.शांताराम कारंडे आमचे मित्र, मार्गदर्शक आणि प्रसंगी गुरु असले तरी आमच्या दीपावली विशेषांकाच्या मुखपृष्ठावर त्यांचे छायाचित्र असावे ही कल्पना माझ्याच सुपिक डोक्यातून बाहेर आली होती. कारण मला व्यक्तीशः कोणत्याही मासिकांच्या मुखपृष्ठांवर साहित्यिकांची छायाचित्रे पाहायला आवडेल कारण त्यामुळे सामान्य वाचकही लेखकांना चेहर्यापने ओळखू लागतील.
आमच्या दीपावली विशेषांकाची सुरुवात माझी संपादकीय सोडली तर डॉ.शांताराम कारंडे यांच्या मॅरेथॉन मुलाखतीने झालेय पण माझ्या एका पत्रकार मित्राने ती मुलाखत मॅरेथॉन कशी नाही हे मला पटवून देण्याचा प्रयत्न केला जो योग्यही होता. पण मी साहित्याची निर्मिती अतीशय सामान्य वाचकांसाठी करतो हे ही त्याला मान्य करावे लागेल. मला लेखकांचा लेखक व्हायचं नाही तर मला सामान्य वाचकांचा लेखक व्हायचंय. आमचा दीपावली विशेषांक सामन्य वाचकालाही वाचायला आवडेल याची आंम्हाला खात्री आहे.
आमच्या दीपावली विशेषांकात डॉ.शांताराम कारंडे यांची ‘आत्मह्त्या’, अशोक कुमावत यांची ‘वनदेवीची कृपा’, वर्षा किडे – कुळकर्णी यांची ‘मनिनी’ आणि माझी ‘एक रुपया’ हया चार कथा वाचकांना काहीतरी संदेश देताना दिसतील याची आंम्हाला खात्री आहे. डॉ.शांताराम कारंडे यांचे लेख वाचकांना मार्गदर्शन करतील तर सहभागी कविंच्या कविता वाचकांच्या मनावर हळुवार फुंकर घालतील. जयेश मेस्त्री यांची ‘टर्निंग पॉईंट’ ही एकांकीका फक्त तरुणांनीच वाचावी अशी आमची अपेक्षा आहे.
आमचा हा साहित्य उपेक्षितांचे दीपावली विशेषांक 2015 लहान मुलांपासून जेष्ठांपर्यत सर्व वाचकांचा विचार करून तयार केलेला आहे. विकत घेऊन वाचलात तर आनंद आहे आणि नाही वाचलात तरी तो आपल्या पर्यंत मोफत पोहचविण्याची आमची तयारी आहे कारण वाचनसंस्कृती जपणे हेच आमचे स्वप्न आहे....
मला आजही लख्खं आठवतंय, आजीचं एक पालूपद …. तुला “अनुभव” येईल नं तेव्हां कळेल. मी म्हणायची, ‘आजी कुठून ग येईल तो अनुभव ?’
‘अगं, तो काही असा सांगून येत नाही वेडाबाई. तुझं तुलाच जाणवेल हो.’
एका शिस्तबध्द जीवनाला सुरुवात झाली होती. जानेवारी-१९८२ मध्ये प्रशिक्षण संपवून मी पुन्हा ठाणे जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून हजर झालो.
आयुष्य हे अष्टकोनी आहे असे गृहीत धरले तर माझी आजी, हिंदी सिनेमा,क्रिकेट, जयवंत दळवी,(महाराष्ट्र टाईम्ससहीत) विवि करमरकर, शिरीष कणेकर,मेधा (त्यासोबत मुलगी अक्षता हा कोटीकोन आणि नातू ईवान हा लघुकोन आलाच) आणि आनंदची मैत्री हे माझ्या आयुष्याचे आठ कोन आहेत. मराठेसरांची भूमिती काहीही म्हणो पण हे आठही कोन माझ्यासाठी विशालकोनच आहेत. यांतील एकही कोन जर माझ्या आयुष्यात डोकावला नसता तर माझ्या सप्तपदीचे (त्याला रतन खत्रीच्या मटक्याच्या भाषेत लंगडा म्हणतात) काही खरं नव्हते अशीच माझी पक्की धारणा आहे.
आनंदच्या काही सद्गुणांचा मला कायम हेवा वाटत आलेला आहे. लहानसे उदाहरण द्यायचे तर बघा, तो शक्यतो कोणाच्याही वाढदिवसाला संदेश पाठवून शुभेच्छा देण्यापेक्षा त्या व्यक्तीला फोन करुन प्रत्यक्ष शुभेच्छा देणे जास्त पसंत करतो. आता एखाददोन अपवाद वगळा. उदा.त्याला राजश्री गोखलेला तिच्या वाढदिवशी फोन करण्याची प्रबळ इच्छा होती. मात्र सुजाता नाडकर्णीने जपानी लिपीतील राजश्रीचा फोननंबर, त्याने जंगजंग पछाडूनही जाम त्याच्या हाती लागू दिला नाही.
अर्थातच हा अपवाद आहे.नियम नव्हे. त्याच्या दोन (की तीन,की किम ?) साउथ कोरियन मैत्रिणी वाढदिवसाला त्याचा फोन आल्याशिवाय वाईनच्या ग्लासाला ओठ लावीत नाहीत असे मला एकदा त्याची बायको सुजाताच (कोरडा आवंढा गिळून) सांगत होती. पुरूषस्य भाग्यम्, दुसरे काय ?
तो कमालीचा मित्रव्यसनी आहे.त्याची प्रचंड मित्रसंपदा हा खरेतर एखाद्या प्रबंधाचा (आणि असुयेचा) विषय आहे.
त्याचे शाळेतील मित्र, हाजीअली कॉलनीतील मित्र, विल्सन आणि चेतना कॉलेजमधील मित्र,जुन्या सोसायटीतील मित्र (उदा.पुष्कर चव्हाण), सिंगापूरचे मित्र, व्यवसायानिमित्त झालेले मित्र (उदा.कुमार केतकर), नोकरीनिमित्त झालेले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मित्र आणि काही तर कारणाशिवाय झालेले मित्र असा त्याच्या मित्रमंडळींचा अजस्त्र गोतावळा आहे.
ठाण्याहून टिटवाळ्याच्या गणपतीला जावे त्या सहजतेने तो या मित्रांना भेटायला भरतभेटीच्या ओढीने वारंवार सिंगापूरहून मुंबईला येतो.
त्याच्याकडे दोन आसनांच्या मधे उभे रहाण्याचा किंवा हवाईसुंदरीच्या आसनावर बसण्याचा मासिक पास असावा. (“मग हवाईसुंदरी कुठे बसत असेल ?” सतिश दामजी चौहानची पुणेरी खोचक शंका.) आम्ही माहीमला डॉ.नाडकर्ण्यांच्या फ्लॅटवरून (ज्यावर सध्या वसंतचा अवैध कब्जा आहे) स्टेटस हॉटेलला आमच्या गेटटूगेदरसाठी निघण्याची तयारी करत असताना आनंद त्याची ती सुप्रसिद्ध चंदेरी रंगाची बॅग घेऊन दारात दत्त म्हणून उभा राहिला. त्या बॅगेत एक दिवस ते एक महिन्याच्या मुक्कामापर्यंत कितीही दिवसांचे (पांढरा लेंगा व झब्ब्यासकट) कपडे व इतर सामान राहू शकते.
तो अक्षताच्या लग्नाला येणार असे आम्ही गृहीत धरलेले असताना तो आठवडाभर आधीच्या “संगीत”लाच थेट डान्सफ्लोअरवर आला आणि माझ्या मावसबहिणीच्या कमरेला विळखा घालून सालसा नृत्य करु लागला. तिचा सालस नवरा बिचारा हॉलच्या एका कोपऱ्यात आइस्क्रीम चोखत उभा होता. गरीब माणूस.
अगदी गेल्या महिन्यातील गोष्ट. आमची साठी साजरी करण्यासाठी अलिबागला जाताना आम्ही रोरोची वाट पहात भाऊच्या धक्क्यावर उभे होतो. तर एखाद्या ट्रॉलरमधून देवमासा व जलपरी पाण्यावर यावी तसे आनंद व सुजाता स्वागतसमितीच्या सदस्यांप्रमाणे रोरोच्या मुखाशी आमचे स्वागत करायला सुहास्य वदनाने उभे होते. तेव्हा आम्हाला बसलेल्या धक्क्यापुढे भाऊचा धक्का काहीच नाही.
एकदा शेवटची कर्जत लोकल चुकावी तसे शेवटचे विमान चुकल्यावर तो प्रफुल्लच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांची शिकवणी घेण्यासाठी IIM त्रिचीला थेट सिंगापूरच्या परराष्ट्रमंत्र्यांचे खाजगी विमान घेऊन आला होता. विमानात परराष्ट्रमंत्र्यांचे खाजगी कुटुंब होते की नाही याची मात्र (प्रफुल्लने आणि) इतिहासाने नोंद ठेवलेली नाही.
कस्टम्समधे (सासूबाईंच्या नावाने) काहीतरी सेटिंग करुन तो मैत्रीचा उपकर किंवा अधिभार म्हणून सिंगापूरहून येताना १७ ते २१ बाटल्या मद्य घेऊन येतो. मग दोन दिवस माझे घर अबकारी खात्याने धाड मारलेल्या भिवंडीतील गोदामासारखे दिसू लागते. मी विश्वासास पात्र नसल्यामुळे त्या मद्याच्या वितरणाची जबाबदारी तो मोठ्या मनाने मेधावर सोपवितो. परवलीच्या शब्दांची देवाणघेवाण होते.मग एकेक जण येऊन (त्यात आनंदच्या पुण्याच्या मामेबहिणीचा मानलेला आतेभाऊही आला) मेधाने दिलेले कडक बुंदीलाडू (प्रत्येकी २ नग) खाऊन आपापली हक्काची बाटली घेऊन जातात.
इतिहासाचा पेपर सोडवून झाल्यावर शेवटाला नागरिकशास्त्राचे दोन प्रश्न रहावेत तशा, कोणालाच नको असलेल्या दोन बाटल्या अनिल व माझ्यासाठी तळाशी शिल्लक रहातात. (साईड इफेक्ट्स…..आमच्या दाराशी ड्युटी फ्री प्लॅस्टिकबॅग्सचा ढीग पाहून समोरच्या सोज्वळ व धार्मिक उषावहिनी माझ्या व्यसनमुक्तीसाठी शारदामठात २१ दिवसांचे अनुष्ठान ठेवतात.)
चित्रपट स्विकारण्यापेक्षा चित्रपट नाकारून दिलिपकुमार महान नट झाला असे गमतीत म्हंटले जाते. आनंदचे मात्र अगदी याउलट आहे. जो समोर येईल त्याच्याशी मैत्र करीतच तो लहानाचा मोठा झालेला आहे.
त्याचे पाचसहा सही केलेले चेक्स कायम माझ्याकडे वस्तीला असतात.(शॉर्टटर्म लोनसाठी इच्छुकांनी मेधाशी संपर्क साधावा.) मधेच त्याला ससा चावल्यागत तो भलत्या वेळेस काकुळतीने मला विचारतो…
“तुझ्याकडे माझा एखादा चेक आहे का ? बिर्ला इन्शुरन्सला द्यायचा आहे.” त्याच्या आवाजात इतकी अजीजी असते की जणू कुमारमंगलम बिर्लाच्या घरी पुढच्या दोन महिन्यांचे रेशन भरण्याची जबाबदारी याच्याच शिरावर आहे. मी मोठ्या उदार मनाने बिर्लाच्या खात्यात (आनंदचा) चेक भरतो.मग जणू कुमारमंगलमच्या घरी कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यागत मला तीनदा आनंदचा आभाराचा मेसेज येतो.
माझ्या बहुतांश लिखाणाचा तो पहिला वाचक आहे. मी काळवेळ न पाहता त्याला दर दोनपाच मिनिटांनी लिखाणाचा कच्चा खर्डा पाठवीत असतो. तो विश्वामित्री एकाग्रतेने डोक्यावर बर्फ ठेऊन त्यात मौलिक सुधारणा सुचवीत रहातो. कधीकधी हा सिलसिला रात्रभर सुरू असतो.
आता त्याच्यात अगदीच काही दोष नाहीत असे नाही. कधीकधी त्याच्या अंगात भिनलेली कॉर्पोरेट संस्कृती मैत्रभावनेवर मात करते.
काही तातडीचे बोलायचे असल्यास तो मेसेज करतो.
“कॉल करू का ?” अथवा
“पाच मिनिटांनी बोलूया का ?”
आता लेका, मी फोन पाहणार तेव्हा ना तुझा मेसेज वाचणार.
मनात आले तर उचल फोन आणि कर की.
फारफार तर मी सांगेन की बाबा आत्ता लसूण सोलतो आहे किंवा कांदा चिरतो आहे. तेव्हा (वरणाला फोडणी दिल्या) नंतर बोलू.
पण नाही.
मात्र त्याने आता स्वेच्छानिवृत्ती घेतली असल्याने हळूहळू त्याचा कॉर्पोरेटी सुसंस्कृतपणाचा मुखवटा गळून पडेल याची मला खात्री आहे. पण त्याच्याशी बोलले अथवा तो भेटला की मनावर पसरलेले दाट मळभ दूर झाल्यासारखे वाटते.
जगात आजूबाजूला काहीच चांगले घडत नाहीए ( “Everything in this world is Bogus,including Dilipkumar and Madhubala” असे थोर पत्रकार बीएसव्ही राव म्हणाला असता.) अशी दृढ होत चाललेली भावना काहीशी विरळ होऊ लागते. अन् मला माझ्यासाठी इतके पुरेसे आहे.
आता हे लिखाण वाचल्यावर त्याचा मेसेज येईलच…
“संदीप,वेळ आहे का ?
कॉल करू ?”
आणि मग त्याच्या कॉलची वाट पहात मी फोनपाशी बसून राहीन.
संदीप सामंत.
१३ डिसेंबर २०२३
भारताला स्वतंत्र्य मिळून ६५ वर्षे झाली पण पिण्याच्या पाण्या सारखा मुलभुत प्रश्न आम्ही सोडवु शकलो नाहीत तर असे स्वातंत्र्य मिळुन काय उपयोग झाला
कलीयुगात लग्नाच्या संकल्पना बदलत असतांना लग्न करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रमुख गोष्टींची आदलाबदल करून लग्न केली जात आहेत. त्यात गे लग्न, समलिंगी विवाह, लिंग बदलून विवाह अश्या अ-नैसर्गिक विवाहांना काही तरुणांमध्ये प्रचंड आकर्षण आहे.
जीवनाच्या रगाड्यातून –
मानसिक तणाव (क्रमशः पुढे ५ वर चालू)
00
जीवनाचे एक महान सत्य …..
अनेकदा झालेले बदल हे सभासदांपर्यंत पोहचत नाहीत. अपूर्ण माहिती असल्याने व सोसायटीचा कारभार चुकीच्या पद्धतीने चालवत असल्याने, सदस्याना त्याचा त्रास होत असतो. यावर सेक्रेटरी चेअरमन आणि उपनिबंधक सहकारी गृहनिर्माण कार्यालयाकडून उलट-सुलट दिली जाणारी उत्तरे यावरून अनेक नागरिक हैराण परेशान असतात.
Copyright © 2025 | Marathisrushti