(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • कुसुमाग्रजांच्या आठवणी

    ज्ञानपीठविजेत्या कुसुमाग्रजांचा जन्म पुण्यातील आहे, खुद्द कुसुमाग्रजांनाही माहिती नव्हती. पण त्यांच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या (कै.) निळकंठ बापू गोडबोले यांनी ते शोधून काढले. एवढेच नव्हे तर कुसुमाग्रजांना येथे आणून त्यांचा सत्कारही केला. २२ वर्षांपूर्वीचा हा प्रसंग अद्याप आपल्याला आठवतो आहे,'' असे गोडबोले यांचे चिरंजीव अरविंद गोडबोले सांगतात. ते म्हणतात, ""माझे वडील सराफी व्यवसाय करीत होते. बी.ए.पर्यंत शिकलेल्या वडिलांना लेखनाचीही आवड होती. त्यांचे लेखन तपासण्यासाठी ते कुसुमाग्रजांकडे पाठवून देत. त्यातून त्यांचा चांगलाच परिचय झाला होता. कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर छापून आलेल्या बातमीत, त्यांचा जन्म पुण्यात झाल्याचा उल्लेख होता. यातून माझ्या वडिलांना उत्सुकता निर्माण झाली. याबद्दल त्यांनी कुसुमाग्रजांकडेही चौकशी केली. मात्र, त्यांनाही जन्मस्थान नेमके माहिती नव्हते. त्या ठिकाणी राहणाऱ्या जुन्या लोकांची नावे शोधून काढली. त्यांना प्रत्यक्ष भेटून अधिक माहिती घेतली. तेव्हा सदाशिव पेठेतील घर नंबर १२६४ हेच कुसुमाग्रजांचे जन्मस्थान असल्याचे सबळ पुरावे त्यांच्या हाती लागले. पूर्वी तेथे लिमये वाडा होता. नंतर बळवंत सदन झाले. सध्या शुभम नावाची इमारत तेथे उभी आहे. जन्मस्थानाचा शोध लागल्यावर भारावून गेलेल्या माझ्या वडिलांनी कुसुमाग्रजांना याची माहिती देऊन त्यांना येथे बोलावून घेतले. जुलै १९८९ मध्ये कुसुमाग्रज येथे आले. परिसरातील लोकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. ते पाहून कुसुमाग्रजही भारावून गेले होते.''

    नाशिकला तात्यासाहेबचे राहते घर दुरुस्तीसाठी पाडण्यात आले तेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांना राहायला स्वतंत्र बंगला दिला होता. सोबत एक मोटारगाडीही होती. तात्यासाहेब संध्याकाळी गाडीतून एक फेरफटका मारून येत. मोटारीने प्रवास करणे आवडे ; कारण निसर्गाचे दर्शन घडते. असे ऐकले होते की यशवंतराव चव्हाणांनी तात्यासाहेबांना एकदा दिल्लीचे निमंत्रण दिले विमानाचे तिकीट पाठवणार असल्याचे कळवले. तात्काळ तात्यासाहेबांनी उत्तर दिले, ” विमानाचे तिकीट नको. आम्ही मोटारीने येऊ. ” तात्यासाहेबांनी भारतभर प्रवास केला तो मोटारीतूनच. प्रेक्षणीय स्थळांपेक्षा तेथली माणसे, बाजारहाट, तेथली माती, झाडे, पक्षी यांचे आकर्षण अधिक वाटे. त्यांची वस्ती असायची डाकबंगल्यात. कारण कुणाच्या घरी राहणे म्हणजे बांधिलकी आणि हॉटेलात राहाणे म्हणजे कृत्रिम आतिथ्य व येणा-या जाणा-यांची सतत वर्दळ.

    एक गोष्ट कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याला दिली.
    ती म्हणजे अलौकिक भाषासौंदर्य. मराठी भाषेचे इतके सुंदर रूप क्वचित पाहायला मिळते. अशा पातळीला भाषा सांभाळून निसर्गातील कोणतीही सूक्ष्मातिसूक्ष्म वा भव्यातिभव्य घटना सादर करणे हे शक्य असल्याचे त्यांनीच दाखवून दिले.
    कुसुमाग्रज हे त्यामुळेच मराठीभाषेच्या साहित्यप्रवासातील एक अद्वितीय हिल स्टेशन म्हणावे लागेल, जेथे पोचल्यावर अथवा जेथून पुढे जाताना आपले मन सुंदर झालेले असते.
    हे एका माणसाने एका भाषेला दिलेले दान!

    सेवामहर्षी बाबा आमटेंवर मा.कुसुमाग्रजानी केलेली कविता
    अरे, आम्ही आहोत असे करंटे
    की आमच्या पेठेत लागतात पताका
    फक्त मंत्री आले तर
    आणि तुझ्यासारखे संत
    ऐहिकाच्या प्रपंचातील ईश्वरी अंशाचे रखवालदार
    निघून जातात गस्त घालीत
    अंधारात
    उद्ध्वस्त मनाच्या मोहल्ल्यातून
    आसवांच्या दलदलीतून दुःखाने उसवलेल्या दुनियेवर
    अमृताचं सिंचन करीत

    एकदा मा.पुलं ना वाढदिवसाच्या शुभेच्छा कुसुमाग्रजानी पाठवल्या. ते शब्द असे :

    “शत शरदांचे सुभग चांदणे पसरो वाटेवर
    लाभो संसारातिल सारे सुखदायी सुंदर II “

    संकलन
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    संदर्भ - इंटरनेटवरुन

  • गोडधोड खा, पण विचाराने

    दिवाळीसाठी विविध वस्तूंच्या खरेदीबरोबर तयार मिठाईला मागणी असते. शिवाय गोडधोड पदार्थ आवर्जून बनवले जातात. साहजिकच दूध, दही, चक्का, खवा यालाही मोठी मागणी असते. या परिस्थितीचा गैरफायदा उठवत बाजारात भेसळयुक्त खवा बाजारात आणला जात आहे. राज्यात आतापर्यंत भेसळयुक्त खव्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला. त्यामुळे यावेळी दिवाळीचे गोडधोड पदार्थ खाताना जरा विचारच करायला हवा.

  • रांगोळी

    rangoli-01

  • राशी व त्यांचे स्वभाव – मिथुन

    राशी :- मिथुन
    स्वामी :- बुध
    देवता :- केशव
    जप मंत्र :- ॐ क्रीं केशवाय नमः
    उपास्यदेव :- श्री कुबेर
    रत्न :- पाचू

    जन्माक्षर :- क कृ का कि की कु कू घघृ घा ड छ छा के कौ ह हा ह् मिथुन राशीवर बुध (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही वायुतत्वाची रास आहे. या राशीत उत्तम ग्रहणशक्ती आढळते. अभ्यासु वृत्ती, तरल बुध्दी, हास्य विनोदी, खेळकर असा स्वभाव दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती हे दोन महत्त्वाचे गूण या राशीत आढळतात.

  • स्वरभास्कराचे अपरिचित जीवन

    जगाच्या कानाकोपऱ्यात ज्या भारतीय कलावंतांना ओळखले जाते, जगभरातील रसिकांवर ज्यांच्या कलाविष्काराची मोहिनी आहे त्यामध्ये स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मात्र, थोर कलावंत हाही अखेरीस माणूसच असतो, त्याच्या हातूनही अक्षम्य प्रमाद घडू शकतात, याची प्रचिती या पुस्तकातून येते.

    पंडितजींचे थोरले पुत्र राघवेंद्र यांच्या मराठी पुस्तकाचा हा नेटका अनुवाद आहे. पंडितजींनी केलेल्या दुसऱ्या लग्नामुळे आपल्या आईची कशी फसवणूक, आबाळ झाली, दुसऱ्या संसारात रमलेल्या पंडितजींनी दोन पत्नींमध्ये, मुलांमध्ये कसा पक्षपात केला याचे प्रसंगानुरूप दाखले राघवेंद्र यांनी दिले आहेत.

    राघवेंद्र यांची आई सुनंदा व पंडितजी ही आते-मामे भावंडं. सुनंदासारख्या गृहकृत्यदक्ष व प्रेमळ पत्नीमुळे भीमूची संगीतसाधना बहरली, त्याला स्थैर्य लाभले, अशी मोहोर पंडितजींच्या वडिलांनीच उमटवली होती. जोशींच्या घरी सोवळेओवळे कटाक्षाने पाळले जात असल्याने पंडितजींच्या पत्नीला विहीरीवरून ओलेत्याने पाणी भरावे लागत असे. घरात शिष्यांचा वावर असल्याने पंडितजींना हे खटकले. त्यांनी वडिलांना सांगितले की, माझी पत्नी हे सर्व करणार नाही, तुम्ही दुसरी व्यवस्था करा...

    स्वतंत्र, बंडखोर विचारांचे पंडितजी नामोहरम झाले ते दुसऱ्या लग्नामुळे. एका नाटकाच्या निमित्ताने आयुष्यात आलेल्या वत्सला मुधोळकर यांच्यासह त्यांनी दुसरा संसार थाटला, तोही पहिल्या पत्नीला अंधारात ठेऊन. विशेष म्हणजे, मी केवळ त्यांच्याकडे गाणे शिकायला आले आहे. माझ्या मनात दुसरा हेतू नाही, असे या बाईंनी सुनंदाबाईंच्या पाया पडून सांगितले होते. कालांतराने पंडितजींची दोन्ही कुटुंबे पुण्यात स्थायिक झाली. तरीही, दुसरे कुटुंब ऐश्वर्यात व पहिले कुटुंब जुनाट वाड्यातील एका खोलीत अशी तफावत होती. पहिल्या पत्नीवर व मुलांवर आपण फार मोठा अन्याय केला आहे, याचा गंड मनात असल्याने पंडितजी पहिल्या कुटुंबाला जमेल तशी मदत, हौसमौज करत असत.

    राघवेंद्र यांनी एकलव्यी बाण्याने वडिलांचं गाणं आत्मसात केलं. पंडितजींना ते ठाऊकही होतं. परंतु बाईंची खप्पामर्जी स्वीकारून आपल्याला गाणं शिकवण्याचं धाडस ते करू शकले नाहीत. दुसऱ्या संसारात पंडितजींना खरं प्रेम लाभलं नाही. मानसिक अस्थैर्यामुळे त्यांचं व्यसन वाढलं. अचानक गायब होण्याचे प्रकार सुरू झाले. ते कलाकार आहेत, त्यामुळे त्यांनी घरीच मदिरापान केल्यास हरकत नसावी, असे राघवेंद्र यांनी वत्सलाबाईंना सुचवून पाहिले. परंतु, कला वगैरे काही नाही, हा केवळ धंदा आहे, असे धक्कादायक उत्तर त्यांच्याकडून मिळाले. प्रत्येक मैफलीनंतर मिळणारे मानधनाचे पाकिट ही मंडळी काढून घेत असत. एवढंच नाही, तर सत्तरीनंतरही पंडितजींना मैफली कराव्या लागल्या, ते कुटुंबीयांच्या हव्यासापायीच. मी गायलो नाही तर ही मंडळी मला डॉबरमॅनसारखं बांधून ठेवतील, अशी व्यथा पंडितजींनीच सहकाऱ्यांजवळ बोलून दाखवली होती.

    अर्थात, या धक्कादायक चित्रणाव्यतिरिक्त पंडितजींचं लखलखतं व्यक्तिमत्त्वही या पुस्तकातून समोर येतं. लहानपणी सायकलच्या हँडलला जिवंत विंचवांची माळ लावून फिरणारा तसेच अंथरुणात जिवंत साप पडल्यानंतरही न डगमगणारा भीमू, ऐन तारुण्यात हाताने लोखंडी कांब वाकवणारा, उपद्रवी हुप्याचा पाठलाग करून त्याला चोप देणारा बलदंड भीमण्णा, ताटभर लाडू फस्त करणारा खवय्या, सुनंदाबाईंना ‘अलबेला’तील नृत्य हुबेहूब करून दाखवणारा, पं. बिरजू महाराजांसह भान हरपून कथ्थक नृत्य करणारा उपजत नर्तक, कुठेही न शिकता कारची दुरुस्ती करणारा, मैफलींसाठी हजारो किमी.चे ड्रायव्हिंग स्वत: करणारा स्वरभास्कर आणि ऐन सत्तरीतही खड्ड्यात अडकलेले कारचे चाक ताकद लावून बाहेर काढणारा अवलिया... ही पंडितजींची रूपे थक्क करतात.

    हा अवलिया मोहाच्या एका क्षणी परतीचे दोर कापून बसला. ‘कसा मला टाकूनी गेला राम’ हा आपणच गायलेला अभंग कदाचित अखेरपर्यंत त्यांचा पाठलाग करत असेल, असं वाटून जातं.

    - अनिरुद्ध भातखंडे

    भीमसेन जोशीः माय फादर, लेः राघवेंद्र जोशी, अनुवादः शिरीष चिंधडे, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, पानेः २१९, किंमतः ५५० रु.

    WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित.

  • जिवनकलेची साधना – खरा देव

    हा लेख परमपूज्य सदगुरू श्री समर्थ हंबीर बाबा यांच्या जीवन कलेची साधना या ग्रंथातून घेतलेले आहे. ख -या देवाची प्राप्ती करण्यासाठी किंवा होण्यासाठी केवळ मूर्तीपूजा किंवा व्यक्ती पूजा श्रेष्ठ नसून तो केवळ एक न संपणारा मार्ग आहे. ध्येय धरून निराकाराला किंवा निर्गुणाला आकारात किंवा सगुणात कसे आणता येईल ? एक निराकार त्या निराकाराला जणू शकतो. त्यासाठी स्वतः ला जो पर्यंत निराकारा ची आत्मा नु भूती येत नाही तो पर्यंत ह्या मार्गाचे अनुकरण म्हणजे दिशाहीन होय.

  • मन शुध्द तुझं

    १९३७ साली प्रदर्शित झालेल्या प्रभातच्या कुंकू या चित्रपटातील हे गाणे स्वत: मास्टर परशुराम यांनी गायले. या गाण्याचे संगीत होतं केशवराव भोळे यांचं. हे सुप्रसिध्द गाणे लिहिले होते ‘प्रभात’कालीन उत्कृष्ट गीतकार, कवी, उत्तम लेखक, अभ्यासक व यशस्वी चित्रपट दिग्दर्शक शांताराम आठवले यांनी.

  • राम जन्मभूमी ( अयोध्या ) संक्षिप्त घटना क्रम

    ही माहिती संग्रहित करून देण्या मागचा उद्देश हा कि नुकतीच आलेली बातमी कि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेशाद्वारे स्थगिती दिली.

  • मराठी चित्रपटांच्या पायरसीची आता कोटीची उड्डाणे !

    एके काळी हिंदी-इंग्रजी चित्रपटांच्या होत असलेल्या पायरसीचे लोण आता आपल्या मराठी चित्रपटांपर्यंतही पोहोचलेले आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांची झोप उडाली आहे.

  • २०१३ चा रुपेरी वेध

    “२०१३ या वर्षाची सुरुवात झाली मराठी चित्रपटांसाठी एका सुखावणार्‍या बातमीने. ‘बी.पी.’ हा बहुचर्चित सिनेमा रिलीज झाला अन् बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई झाली. अर्थात कोटीची उड्डाणे या वर्षी अनेक चित्रपटांनी घेतली. विषयांमध्ये विविधता, प्रगल्भता आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादासोबत सतत ‘आपला सिनेमा’ प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय देखील ठरला.