(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • धर्मांतर

    प्रत्येक धर्म आणि धर्माची शिकवण पवित्र असते. धर्म हा व्यक्तिगत असतो. त्यामागे त्या व्यक्तीची श्रद्धा आणि विश्वास असतो. समधर्मीय व्यक्तींना एकत्रित आणण्याचा तो एक धागा असतो. धर्म मानणे, धर्माचे संस्कार मानणे, ती शिकवण व्यवहारात पाळणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. ही एक खोलवर जपलेली श्रद्धा आहे.

  • थांब ना आई

    पालकांनी ही कविता जरुर वाचावी

  • ४ फेब्रुवारी – फेसबुकचा स्थापना दिवस

    इंटरनेटच्या प्रसारामुळे ‘हे विश्वची माझे घर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आली असली तरी या जगाला एका कुटुंबाप्रमाणे बनवण्याचे श्रेय जाते ते फेसबुकला. या सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करणा-यांची संख्या १८० कोटींहून अधिक असल्याने फेसुबक म्हणजे १८० कोटींहून अधिक लोकांचे एक कुटुंबच बनले आहे.

    आज ४ फेब्रुवारी रोजी या सोशल नेटवर्किंग साइटला १३ वर्षे पूर्ण होत असताना फेसबुक वापरणारे त्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असतात. कोणाला ते विरंगुळ्याचे साधन वाटते तर कोणाला ते जास्तीत जास्त लोक जोडणारे आणि काळाच्या ओघात विसर पडलेल्या मित्रमैत्रिणींना पुन्हा जवळ आणणारे साधन वाटते. मार्क झुकरबर्ग हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कने आपले वर्गमित्र डस्टिन मोस्कोविट्ज, एड्युअर्डो सार्विन आणि ख्रिस ह्युजेस यांच्या सोबत फेसबुकची स्थापना केली. ४ फेब्रुवारी २००४ रोजी आपल्या हार्वर्ड वसतीगृह खोलीत झुकेरबर्ग, फेसबुक सुरू केली आहे. विशेष म्हणजे मार्क झुकरबर्ग हा हार्वर्ड विद्यापीठाचा ड्रॉप आउट आहे. पण या फेसबुकची ताकद ओळखून मार्क झुकरबर्गने त्यामध्ये वेळोवेळी कल्पक बदल केले आणि त्यामुळे या सोशल नेटवर्किंग साइटची लोकप्रियता वाढतच गेली. इंटरनेटमुळे जग ख-या अर्थाने जवळ आले असले तरी फेसबुकमुळे जग घट्ट जोडले गेले हे मान्य करावेच लागेल. गेल्या काही वर्षात या सोशल नेटवर्किंग साइटने जी लोकप्रियता मिळवली, तशी लोकप्रियता दुस-या कोणत्याही नेटवर्किंग साइटला मिळालेली नाही. सध्या फेसबुकला ट्विटर आणि तशाच प्रकारच्या इतर नेटवर्किंग साइट्सकडून स्पर्धा निर्माण झाली असली आणि फेसबुकच्या आधीही तशा प्रकारच्या वेबसाइट्स निर्माण झाल्या असल्या तरीही सोशल नेटवर्किंग ही संकल्पना लोकांमध्ये इतक्या जास्त प्रमाणात रुजवणारी फेसबुक ही पहिली वेबसाइट आहे आणि या वेबसाइटची वाटचाल थक्क करणारी आहे. एकुण १२ देशात फेसबुकची कार्यालयं आहेत. फेसबुकला मिळणाऱ्या जहिरातींमुळे फेसबुकला विनामुल्य सेवा देणं शक्य झालं आहे. झुकरबर्ग चा साधेपणाच हे त्याचे वैशिष्ट्य ठरले आहे. १८ मे २०१२ ला फेसबुकने सामान्य माणसाठी फेसबुकचे शेअर्स काढले आणि या शेअर्स नी बाजारात धुमाकूळ घातला. या शेअर्स मुळे फेसबुकला करोडोचा फायदा झाला. फेसबुकच्या कर्मचाऱ्यांची संख्या स्थापना झाली तेव्हा ४ होती आता ती १२ हजार ६०० च्या वर आहे.

    कॅलिफोर्नियातल्या ‘मेन्लो पार्क’ इथं फेसबुकचं मुख्य कार्यालय आहे. गेल्या दोन वर्षात , फेसबुकने प्रचंड प्रतिष्ठा प्राप्त केले आहे. असा सामान्यातला असामान्य मार्क झुकरबर्ग आजच्या तरुण पिढीसाठी खराखुरा आयडल आहे. कंपनीत मार्क झुकेरबर्गची भागीदारी २४ टक्के, एसेल पार्टनरची १० टक्के, डिजिटल स्काय टेक्नॉलॉजीची १० टक्के, डस्टिन मोस्कोव्हिट्झची ६ टक्के, इडुअर्डो सॅव्हेरिनची ५ टक्के, सिएन पार्करची 4 टक्के, पीटर थिएलची ३ टक्के, ग्रेलॉक पार्टनर्सची १ ते २ टक्के, मायक्रोसॉफ्टची १.३ टक्के, ली का शिंगची ०.७५ टक्के व इंटरपब्लिक ग्रुपची ०.५ टक्के भागीदारी आहे. २४ ऑक्टोबर २००७ रोजी बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने फेसबुकमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी फेसबुकचे १.६ टक्के समभाग २४ कोटी डॉलरला विकत घेतले. याशिवाय माजी कर्मचारी व सेलेब्रिटिजचीही भागीदारी आहे. फेसबुकला सर्वाधिक महसूल जाहिरातींद्वारे मिळतो. मायक्रोसॉफ्ट फेसबुकची एक्क्लुसिव्ह पार्टनर असून ती कंपनीसाठी बॅनर अॅ डव्हर्टायझिंग करते. २००६ मध्ये कंपनीचा महसूल जवळपास ५२ अब्ज डॉलर होता. पुढील वर्षी १८८ टक्के वाढीसह तो १५० अब्ज डॉलरवर पोहोचला. २०१६ मध्ये महसूल २७६ अब्ज डॉलर आहे. २००८ साली इंग्लंडमधील १०२ वर्षे वयाच्या इव्ही बिन यांनी फेसबुकवर अकाउंट उघडले होते. त्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी फेसबुकवर अकाउंट उघडले. बिन या ट्विटरच्या सर्वाधिक वयाच्या उपयोगकर्ता होत्या. फेसबुकवर त्यांचे ४ हजार ९६२ मित्र, तर ट्विटरवर ५६ हजारांहून अधिक पाठीराखे होते. जुलै २०१० मध्ये त्यांचा मृत्यू झाला. फेसबुकवर त्यांच्या सन्मानार्थ अनेक फॅन पेजेस बनवण्यात आले.

    फेसबुकवर एका उपयोगकर्त्याचे सरासरी १३० मित्र असतात आणि तो दर महिन्यास किमान ८ लोकांना मैत्रीचे आवाहन करतो.

    १ ऑक्टोबर २०१० रोजी डेव्हिड फिन्चर दिग्दर्शित ‘द सोशल नेटवर्क’ चित्रपट प्रदर्शित झाला. तो मार्क झुकेरबर्ग व फेसबुकवर आधारित आहे.

    २२ फेब्रुवारी २०११ रोजी इजिप्तमध्ये एका मुलाचे नाव फेसबुक ठेवण्यात आले, कारण इजिप्तच्या क्रांतीत फेसबुकचा महत्त्वाचा वाटा होता.

    -- संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • आत्मभान जागवणार्‍या यशोगाथा – अदान अॅण्ड ईव्हा, कटिग फ्री आणि इराणमधून सुटका

    ‘अदान अॅण्ड ईव्हा’, ‘कटिग फ्री’ आणि ‘इराणमधून सुटका’ हे तीन दर्जेदार अनुवाद प्रकाशित केले आहेत. उज्ज्वला गोखले, सुप्रिया वकिल, विदुला टोकेकर यांनी केलेले अनुवाद वाचकांच्या मनाचा ताबा घेतातच; पण एका विदारक वास्तवाचे दर्शन घडवतात. तिनही आत्मकथने महिलांच्या जीवनलढ्याच्या कहाण्या आहेत. हा लढा त्यांनी धिरोदात्तपणे देऊन स्त्री शक्तीची ओळख करून दिली आहे.

  • मंगेश पाडगावकरांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांचे कवितावाचन…

    कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला. आज त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कवितांचं वाचन त्यांच्याच आवाजात ऐकूया.

    https://www.youtube.com/watch?v=VmhjVAiICzU

    मंगेश पाडगावकरांचा जीवनपट वाचण्यासाठी क्लिक करा...

  • भारतमातेच्या वीरांगना – ३० – दुकडीबाला देवी

    इंग्रज क्रांतिकारकांच्या मागावर नेहमीच असत. असेच एकदा ते तपास करत करत दुकडीबाला ह्यांच्या घरी पोचले. तिथे त्यांना काही शस्त्र सापडलीत आणि दुकडीबाला देवी ह्यांना अटक करण्यात आली.

    त्यांना प्रचंड यातना दिल्या गेल्या जेणेकरून त्या आपल्या अन्य साथीदारांची नावं सांगतील, पण दुकडीबाला इंग्रजांच्या जाचापुढे बधल्या नाहीत. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही, की एकही माहिती फुटू दिली नाही. त्यांना अडीच वर्षांचा सश्रम कारावास देण्यात आला.कारावासात असतांना सुद्धा त्यांनी कधीही तक्रार केली नाही. त्यांच्या वाटेला नेहमीच इतरांपेक्षा जास्त कठीण कामं येत गेली आणि त्या करत गेल्या.

  • ‘अस्सं माहेर’ सुरेख बाई …..

    मागच्‍या पिढीतील ताई-भाऊ, काकू-बापू आणि आमच्‍या आई-वडिलांचे आदर्श संस्कार आमच्‍या सर्व बहीण भावंडांवर झालेले. रोज रात्री आम्‍ही सर्वजण बसून ‘रामरक्षा’ म्‍हटली. ‘मानसिक शांती’ हीच जमेची बाजू. माझे माहेर गिरगावांत आंग्रेवाडीत. तिथे आम्‍ही लहान असताना गाववाले विष्णू साठे, रघू आगाशे वगैरे मंडळी तासनतास येत व गप्पा मारीत. ती अशी कां येत असत? हयाच उत्तर कोकणात आल्‍यावर त्‍यांची बाजूचीच घरे पाहून मिळालं. कोकणातून मुंबईत आल्‍यावरसुद्धा एकमेकांना भेटण्याची ओढ आणि आपलेपणा.

  • लोकसंगीताचा अर्क – मांड

    डिसेंबर मधील राजस्थानातील गारठवणारी रात्र. अवकाशात फक्त चांदण्यांचा प्रकाश, दूर कुठेतरी, कुणीतरी शेकोटी पेटवलेली दिसते परंतु आसमंत सगळाच काळा/निळा. कुठेच कसल्याच हालचालीची जाणीव नाही की आवाज देखील नाही. वाऱ्याने देखील आपले अस्तित्व लपवून ठेवलेले!! एखाद्या निर्वात पोकळीत फक्त स्वत:चेच अस्तित्व असावे, तरीही आजूबाजूला पसरलेल्या मूक वाळूची तितकीच मूक साथ. अशा वेळी वाळवंट देखील आपल्याशी संवाद साधू पहात असते, तसाच मूक संवाद!!
    "अजून नाही जागी राधा,
    अजून नाही जागें गोकुळ;
    अशा अवेळी पैलतिरावर
    आज घुमे कां पावा मंजुळ.
    मावळतीवर चंद्र केशरी;
    पहाटवारा भवती भणभण;
    अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
    तिथेच टाकून अपुले तनमन.
    मराठीतील "कुब्जा" कविता म्हणजे अप्रतिम लेणे आहे. पुराणातील व्यक्तिरेखा घेऊन, त्यांची संपूर्ण ओळख नव्याने करून देण्याची असामान्य ताकद या कैतेने दाखवून दिली. भावकवितेचे सगळे निकष पूर्ण करणारी ही कविता. ही कविता वाचताना, मला "मांड" रागाची आठवण येते. विशेषत: " मावळतीवर चंद्र केशरी, पहाटवारा भवती भणभण;" या ओळीवर तर सारखे थबकायला लावणारी ही कविता आणि तो केशरी चंद्र आणि पहाटवारा, सगळे कसे आपल्याला पुन्हा, पुन्हा वाळवंटाची आठवण करून देणारी.
    "मांड" रागाची मांडणी बघताना, रागात सगळे स्वर शुद्ध लागतात आणि रागाची जाती, ही "संपूर्ण/संपूर्ण" अशी आहे. वेगळ्या शब्दात, या रागात कुठलेच स्वर वर्ज्य नाहीत आणि सगळे स्वर शुद्ध स्वरुपात लागतात. "बिलावल" थाटातील या रागात, वादी/संवादी स्वर - षडज/पंचम आहेत. आपल्या भारतीय संगीतात, "षडज - पंचम" भावाला निरतिशय महत्व आहे. रागाचे समय हा ग्रंथांनुसार रात्रीचा दुसरा प्रहर आहे. परत, परत मला वरील कवितेतील त्याच ओळी इथे आठवतात." मावळतीवर चंद्र केशरी, पहाटवारा भवती भणभण." रागातील प्रमुख स्वरसंहती बघायला गेल्यास, "ग म प ध सा","म प म म ग","सा रे ग सा रे सा".
    प्रथम शास्त्रीय रागदारी गायन आणि नंतर बांसुरी वादन असा अफलातून प्रवास घडला, तो पंडित रोणू मजुमदार, या असामान्य कलाकाराचा. पंडित लक्ष्मण प्रसाद जयपुरवाले यांच्या कडे रागदारी गायनाची दीक्षा आणि नंतर पंडित विजय राघव राव, यांच्याकडे शागिर्दी, याचच परिणाम,वादनातील विचक्षण दृष्टी आणि सतत अनोखे प्रयोग करण्याची उर्मी. पंडित रोणू मजुमदार यांची कारकीर्द जवळून बघताना, वादनात केवळ पारंपारिक आविष्कार न दिसता, संगीतातील अनेक आविष्कारांचा प्रवास दिसतो. त्यामुळे, त्यांचे वादन अधिक विविधरंगी आणि आकर्षक होते. अर्थात, ही दृष्टी त्यांना, त्यांचेच गुरु, पंडित विजय राघव राव, यांच्याकडून मिळाली, असे म्हणायला वाव आहे.
    "मांड" रागाच्या वादनात, आपल्याला वरील विवेचनाची प्रचीती यायला हरकत नाही. एका बाजूला "गायकी" अंग तर दुसऱ्या बाजूने, प्रयोगशीलता, असे दोन बंध ऐकायला मिळतील. याचा अर्थ असा नव्हे, "गायकी" अंगात प्रयोगशीलता नसते पण, इथे पारंपारिक गायकी अंग ऐकायला मिळते. वादन थोडे "धून" या सदरात घेता येईल. सगळे सूर अगदी स्वच्छ ऐकायला येतात. खरतर, राजस्थानी लोकसंगीतातील धून आहे पण तिला रागदारी स्वरूप दिले आहे. आपल्याकडे, अशा अनेक रागांची "निर्मिती" किंवा त्यांचे "मूळ" हे लोकसंगीतात सापडते आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणून या वादनाचा निर्देश करता येईल.
    वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर वाजणारे संतूर वाद्याचे सुरवातीचे सूर, आपल्याला सांगतात, हा "मांड" राग आहे. वास्तविक आपण वरती या रागाची स्वरावली बघितली तर या रागात सगळे स्वर शुद्ध स्वरूपात लागतात पण, इथे गाण्याच्या सुरवातीलाच "तीव्र मध्यम" आणि "कोमल गंधार" लागलेला दिसतो. याचा वेगळा अर्थ इतकाच घेता येतो, राग तोच आहे पण, त्याला राजस्थानी लोकसंगीताची जोड दिली आहे. राजस्थानी लोकसंगीत जर का थोडे बारकाईने ऐकले तर लगेच ध्यानात येईल, या लोकसंगीतात, सारंगी वाद्याचा उपयोग प्रामुख्याने केलेला असतो. वास्तविक गाण्याच्या चित्रीकरणात वाळवंट आहे पण, रात्रीचा समय, प्रियकराला भेटण्याची अनिवार ओढ, या भावनेचा परिपोष करण्यासाठी, जयदेव यांनी संतूर वाद्याचा फारच परिणामकारक उपयोग केलेला आहे आणि ते करताना, त्या सुरांच्या लयीत, सारंगी देखील किती अप्रतिमरीत्या मिसळली आहे. गाण्याचा ताल, साधा, सरळ असा दादरा आहे पण, गाण्यात घेतलेली प्रत्येक मात्रा आणि त्या मात्रेशी जोडलेली वाद्ये आणि अर्थात लताबाईंचा असामान्य आवाज, या त्रयींनी, ही गाणे अजरामर झाले आहे. वास्तविक कुठलेही गीत हे १००% परिपूर्णतेच्या कसोटीवर उतरणे, अत्यंत अवघड किंवा जवळपास नाही, असेच म्हणावे लागते. विधान जरा धाडसी आहे पण पूर्ण विचारांती केले आहे. त्याच्या जवळपास, हे गाणे नक्की जाते. गाण्यात, जरा नीट बघितले तर काही "टप्पे" आहेत आणि त्यानुसार गाण्यातली लय बदलते. संगीतकार किती कुशाग्र बुद्धिमत्तेचा असू शकतो, हे समजून घेण्यासाठी, हे गाणे ऐकावे आणि गाण्याची लय जरी बदलली असली तरी समेच्या मात्रेवर येताना,तोच "मूळ" स्वर घेतला जातो. गाणे बुद्धीगामी होते, ते असे.
    "तू चंदा मैं चांदनी, तू तरुवर मैं शाख रे;
    तू बादल मैं बिजुरी, तू पंछी मैं पात रे".
    गाण्याची चाल, रसिकांच्या मनाची "नाळ" जोडणारी हवी, असा एक मतप्रवाह अनेक वर्षे प्रचलित आहे, विशेषत: गाण्याचा "मुखडा" जितका आकर्षक असेल तितके ते गाणे, रसिकांच्या पसंतीला उतरते. गाण्याचा "मुखडा" आकर्षक असणे, आवश्यक आहे पण त्याच बरोबर त्याच्या नंतरची "बांधणी" देखील तितकीच आकर्षक असणे, अत्यावश्यक असते अन्यथा, सुरवातीला मनावर घडलेला असर, हळूहळू पिछाडीला पडतो आणि गाणे निरस होण्याची शक्यता बळावते. जयदेव यांच्या बहुतेक सगळ्या रचना अनुभवताना, याचे प्रत्यंतर नेहमी येते. प्रस्तुत गाण्यात देखील, सुरवातीला संतूर वाद्याच्या सुरावटीच्या नादात, आपण गुंगून जातो आणि त्या लयीत गुंतलेले असताना, एक क्षण सगळेच थांबते आणि लताबाईंचा तार सप्तकातला आवाज कानावर येतो. इथे बघा, संतूर वाद्याचे स्वर आणि त्यानंतर येणारा, मानवी गळा. थोडी तुलना केली म्हणजे माझे म्हणणे ध्यानात येईल.
    "केसरिया बालमा" ही रचना देखील तशी पारंपारिक रचना आणि असे देखील मांडता येइल. ही रचना म्हणजे राजस्थानी लोकसंगीताचे अर्क किंवा व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल. एकतर, राजस्थानी संस्कृतीत. "केसरिया" आणि त्याच्या जोडीने येणारा "कुसुंबी" रंग, याचे अनन्यसाधारण महत्व आहे. "लेकिन" चित्रपटात, हीच रचना, अधिक पातळ करून घेतली आहे, अर्थात रचनाकार हृदयनाथ मंगेशकर असल्याने, त्यात देखील बऱ्याच ठिकाणी, खास मंगेशकरी "छटा" दिसतात आणि तसे "दिसणे" अत्यावश्यक असते. अन्यथा रचनाकार म्हणून, तुमची सिद्धता, कशी सिद्ध होणार? दादरा तालात, ही रचना आहे. या रचनेबाबत असे देखील म्हणता येईल, "मांड" रागाची ओळख करून घ्यायची झाल्यास, ही रचना अभ्यासायला हरकत, इतकी ही रचना, या रागाशी जुळलेली आहे.
    "केसरिया बालमा, मोसे बांवरी बोले लोग;
    ना मैं जिवती ना मरीयो मैं, बिरह मारो लोग".
    अशा सारखी रचना गायला, केवळ लताबाईंचाच गळा हवा. गाण्याची सुरवातच, अगदी टिपेच्या सुराने होते. सर्वसाधारणपणे, असे दिसते, कुठलेही गाणे गायचे असेल तर, मंद्र किंवा शुद्ध स्वरी सप्तकातून सुरवात होते आणि आणि हळूहळू स्वर उंचावला जातो. मानवी गळ्याची तशी ठेवण आहे पण गाण्याच्या सुरवातीलाच, तार स्वर लावणे, ही एक प्रकारची सिद्धता आहे आणि ती सगळ्या गायकांना जमतेच असे नाही. गाण्यातील शब्द आणि एकूणच गाण्यातील लय, या दृष्टीने हे गाणे लक्षणीय आहे.
    चित्रपट "अभिमान" मध्ये, "अब तो है तुम से हर ख़ुशी अपनी" हे गाणे आपल्याला "मांड" रागाची ओळख करून देते. तसे बघितले हे गाणे केवळ "मांड" रागाला केवळ स्पर्श करते. अर्थात ही किमया संगीतकार एस.डी.बर्मन यांची.
    "अब तो है तुम से, हर ख़ुशी अपनी;
    तुम पे मरना है जिंदगी अपनी".
    शायर मजरुह सुलतानपुरी यांची ही रचना आहे. हिंदी गाण्यांत गेयताबद्ध काव्य कसे मांडावे, या बाबत मजरुह सुलतानपुरी हे आदर्श म्हणून म्हणता येईल. काव्यात जराही गूढता न आणता देखील कविता आशय संपृक्त कशी करता येते, या साठी हे गाणे सुरेख उदाहरण ठरावे. गाण्यात तसा आधुनिक पेहरावाचा वाद्यमेळ वापरला आहे आणि त्यानुरूप कवितेतील शब्दांचे उच्चार आहेत. याचा परिणाम असा झाला, आजही हे गाणे रसिकांच्या मनात ठाण मांडून बसले आहे.
    -- अनिल गोविलकर
  • प्रभावी नेतृत्त्व की अपरिहार्यता ?

    सोनिया गांधी चौथ्यांदा काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या. यात त्यांचे मोठेपण सामावल्याचे पक्षातील अनेक नेतेमंडळी सांगतात. पण, त्या मोठ्या सामाजिक कार्यातून किवा राजकीय परंपरेतून पुढे आलेल्या अभ्यासू नेत्या नाहीत. शिवाय आता नेहरू घराण्याची परंपरा सांगण्याशिवाय कोणताही जमेचा मुद्दा उरला नसल्याने काँग्रेसला सोनियाजींच्या आधारावरच मते मागता येणार आहे. त्यामुळे सोनियांची मक्तेदारी निर्माण होत आहे.

  • आई

    आई……………………