सर्वप्रथम या संस्थेला मी मनापासुन मानाचा मुजरा आणि लाख-लाख धन्यवाद देतो कारण;’कास्प’ ही एक अमेरिकान संस्था आहे आणि भारतातील गरीब गरजु मुलांच्या शिक्षणासाठी ही मदत करते.
संगीतामधे शब्दामधून अर्थ समजतात तर सुरांमधुन भावना प्रकट होतात. सुरांच्या अंगाने शब्द गुंफले तर शब्दाच्या अर्थछटा सुस्पष्ट सुरांच्या साथीने संगीत प्रगल्भ होते. तस्सच, फरसाणाच्या अर्थपूर्ण शब्दांमधे तर्रीच्या झणझणीत भावना जुळून आल्या की मग काय विच्चारता!
इतर देशांच्या राष्ट्रध्वजांबरोबर ध्वज फडकावयाचा असेल, तर त्यासाठी असणाऱ्या खास नियमांचे पालन करावे लागते. नॉन नॅशनल फ्लॅग्ज म्हणजे कॉपोर्रेट फ्लॅग किंवा ॲडव्हर्टायझिंग बॅनरबरोबर ध्वज फडकावयाचा असल्यास राष्ट्रध्वज मध्यभागीच असायला हवा.
आपण एखाद्या व्यक्तीला मदत केली. याचा अर्थ आपण मोठे होत नाही. आपण फक्त माध्यम असतो. कर्ता करविता तोच आहे. त्याने मनात आणले तर तो काहीही करू शकतो. कारण तो साक्षात परमेश्वर असतो. त्याची इच्छा नसेल तर या भूतलावर झाडाचे एक पान पण हलू शकत नाही.
अश्विन अमावस्येला प्रदोष काळी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीची पूजा करून प्रार्थना करतात. काही ठिकाणी वहीपूजन लक्ष्मीपूजनाचे दिवशी करण्याची प्रथा आहे.
फार पूर्वीच्या काळी बार्टर पध्दत होती. गव्हाच्या बदल्यात कापूस किंवा तांदूळाच्या बदल्यात मातीची भांडी अशी वस्तूंची देवाणघेवाण होत असे. पण किती गहू देऊन किती कापूस घ्यायचा हे त्या वस्तूंचा ढीग लावून त्यांच्या आकारामानावरुन ठरवणं चुकीचं ठरत असे.
वैभव फळणीकर मेमोरियल फौंडेशन या संस्थेतर्फे आपलं घर या नावाने पुण्यातील वारजे येथे अनाथ विद्यार्थी गृह चालवले जाते. स्व. वैभव फळणीकर या गुणी व हुशार मुलाचे २००१ साली अचानक कॅन्सरने निधन झाले.या धक्क्यातून सावरून श्री. विजय फळणीकर यांनी हा ट्रस्ट स्थापन करून एक सामाजिक आदर्श निर्माण केला आहे. यात त्यांना सौ. फळणीकर आणि इतर काही सहकार्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
आदौ कर्मप्रसड्गात् कलयति कलुषं मातृकुक्षौ स्थितं मां विण्मूत्रामेध्यमध्ये क्वथयति नितरां जाठरो जातवेदाः ।
यद्यद् वै तत्र दुःखं व्यथयति नितरां शक्यते केन वक्तुं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥१॥
मानवी जीवनामध्ये कर्म अनिवार्य आहेत. कर्म करायचे म्हटले की त्यात दोष येणारच. काही ना काही चूक घडणारच. त्याच्या परिणामस्वरूप फळांपासून आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पश्चात्तापापासून वाचायचे असेल तर क्षमायाचना अत्यंत महत्त्वाची कृती ठरते.
प्रस्तुत स्तोत्रात गतजन्मीच्या अयोग्य कृतींपासून आचार्य आरंभ करीत आहेत. ते म्हणतात,
आदौ कर्मप्रसड्गात् कलयति कलुषं मातृकुक्षौ स्थितं मां- पूर्वीच्या जन्मात केलेल्या कर्मांचा फळा नुसार त्यातील वाईट कर्मांनी मला मातेच्या गर्भात आणून टाकले. विण्मूत्रामेध्यमध्ये क्वथयति नितरां जाठरो जातवेदाः -
तेथे रक्त, मांस,मलमूत्र या सगळ्या घाणीत मी पडलेलो होतो.
मातेच्या उदरातील जठराग्नी मला सतत जाळत होता.
यद्यद् वै तत्र दुःखं व्यथयति नितरां शक्यते केन वक्तुं- तेथे ज्या ज्या प्रकारची अत्यंत भयानक दुःखे आहेत त्यांचे पूर्णपणे कथन कोण करू शकेल?
या सगळ्यातून सुटण्याचा मला एकच मार्ग दिसत आहे. हे भगवान शंकरा मी आपल्या चरणी शरण आलो आहे. आपणास प्रार्थना करीत आहे ,
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - श्री महादेव शंभो माझ्या अपराधांना क्षमा करा. आपण परमपवित्र आहात आपल्या चरणाशी मला पवित्र करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
फक्त १२ दिवस…
Copyright © 2025 | Marathisrushti