(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • रक्त आणि रोग निदान

    एक दिवस मी एका लहान मुलाला तपासत होतो. त्याला चांगलाच ताप भरला होता. खोकलत होता. बेचैन होता. तगमग करीत होता. …..

  • हा छंद जीवाला लावी पिसे !

    माणसाला जीवनात आवश्यक असलेले छंद !! .. माझा लेख -आजच्या "नवाकाळ"मध्ये ! माणसाला जीवनात आवश्यक असलेल्या छंदांसंबंधी माझा एक छोटेखानी लेख,आजच्या "नवाकाळ"मध्ये छापून आला आहे. आपल्या सर्वांसाठी हा लेख खाली देत आहे. आपला अभिप्राय जरूर कळवा . तसेच आपलेही काही वेगळे अनुभव आहेत का ?1

    असे म्हणतात की शिक्षणावाचून माणूस म्हणजे अर्धाच .. पण अलीकडे असे दिसते की कसलाही छंद नसलेला निवृत्तीनंतरचा माणूसही असा अर्धाच राहतो. अचानक बी पेरून लावलेले झाड जशी लगेच फळे देत नाही तसाच छंदही निवृत्तीनंतर नव्याने लावून घेता येत नाही.
    आधीपासून त्याचे पिसे लागलेले असेल तर निवृत्तीनंतरचे आयुष्य खूप छान जाते. तो निवृत्तीच्या आधीही जपला असेल तर रोजच्या नोकरी व्यवसायात असलेल्याचीही मानसिक स्थिती उत्तम राखतो.

    गरीब माणसाला अपचनाचा त्रास होत नाही. तसा बहुतेक प्रत्येक संग्राहक हा आपल्या संग्रहाबाबत तरी गरीबच असतो. कधीच संतुष्ट नसतो. आपल्या संग्रहात अजून अमुक नाही--तमुक नाही असे म्हणत तो सदैव शोधातच असतो. त्यामुळे विविध प्रकारचे संग्रह करणाऱ्या, माझ्या बरोबरच्या सुमारे १५ /२० विविध वयाच्या मित्रांना रक्तदाब, मधुमेह, कोलॅस्ट्रॉल असले काहीच त्रास नाहीत. खरोखरच्या गरिबांची क्षमा मागून असे म्हणता येईल की जमविलेल्या वस्तूंच्या बाबतीत तरी तो सदैव दारिद्र्य रेषेच्या खालीच असतो. कुणाचा द्वेष, हेवा, मत्सर करायला मन रिकामंच राहत नाही. हे छंदामुळे घडते काय हा प्रश्न मी एका खूप मोठ्या विद्वान डॉक्टरांना विचारला तेव्हा
    त्यांनी होकारात्मक उत्तर दिले.

    माझे एक असेच वयाची ८० वर्षे ओलांडलेले छांदिष्ट मित्र एक दिवस खूप खिन्न होते. त्यांना बरं वाटत नव्हतं हे उघड होतं .मी त्यांना विचारले, काय झाले? ..बरं नाही का ? डॉक्टरांकडे जायचंय का? त्यांनी एक दीर्घ सुस्कारा घेऊन सांगितले की तसे नाही हो. एकाने मला " रशियाचे ३ कोपेकचे दोन्ही बाजूंना छापलेले आणि नाणे म्हणूनही वापरले गेलेले टपाल तिकीट " देतो म्हणून कबूल केले होते आणि दुसऱ्या कुणी तरी ५० रुपये जास्त दिले म्हणून त्याला विकून टाकले. आता बोला. ... म्हणजे " हे " त्यांचे आजारपणाचे कारण होते तर ! ... मी ही "दुःख:द " बातमी आमच्या सर्व छांदिष्टांना सांगितली. त्यामुळे " ते दु:ख " लगेच वाटले गेले. सर्वच जण कामाला लागले. कुणी मित्रांकडे विचारणा सुरू केली, विदेशात मेल गेले. इ- शोध सुरू झाले. आणि आठवड्याच्या आत ते (तसेच) तिकीट या अतिज्येष्ठ छांदिष्टांपर्यंत पोचले. खुश झालेल्या या गृहस्थांनी आम्हा सर्वांनाच आग्रहाने घरी बोलावून चहा पाजला.आता या एकाच घटनेत किती चांगल्या गोष्टी दडल्या आहेत त्याचा हिशेब न मांडलेला बरा.

    छंदांमुळे उच्चनीचतेची भावनाही कमी होते. एका चर्मकाराच्या दुकानातील संत रोहिदासांच्या चित्राशेजारी लावलेल्या एका वेगळ्याच दिव्याची चौकशी मी रस्त्यात त्याच्या शेजारी बसून करत होतो. शेजारून जाणाऱ्या माझ्या ऑफिसातील एका सेवानिवृत्त जनरल मॅनेजरला हे खटकले पण माझ्या ते लक्षातही आले नाही. पितळी ओतकाम, वेल्डिंग, पॉलिशिंग अशा गोष्टींमुळे होणारे कुंभारवाड्यातील प्रचंड प्रदूषण मला जाणवत नाही आणि त्याचा मला कधी त्रासही होत नाही.

    रात्री झोपतांना , उद्या आपल्याला केवढी कामे करायची आहेत याचा केलेला विचार ,मला जगण्याची उमेद, आत्मविश्वास,सकारात्मक दृष्टी अशा गोष्टी देतोच पण हा विचार करता करता झोप कधी लागते ते कळतही नाही. .. मग कसली गोळी घेताय राव .... आणि कशाला ?
    आज १० / १२ वर्षांच्या मुलांनासुद्धा निराशा ग्रासते. या वयाची मुले आत्महत्या करतात. काय भयंकर आहे हे ? पूर्वी दिवसातून एकदा जेवायला मिळणं ही सुद्धा चैन वाटावी अशा परिस्थितीत जगणारी लाखो मुले होती. फाटके कपडे, पडझडीचे घर, घरात वीज-पाणी नाही,
    अभ्यासाला वह्या- पुस्तके नाही, अनवाणी / छत्रीशिवाय कित्येक मैल चालत शाळा गाठायची, अभ्यासाला वेळ आणि जागाच नसायची. तरीही मुले आत्महत्या करीत नव्हती. अशा दयनीय परिस्थितीतही त्यांचे आपले असे एक छोटेसे विश्व असे. अशा मुलांकडेही स्वतः:चे असे काहीतरी "जमवलेले" असे. गावाकडची मुले गुंजा , दगड गोटे, पक्ष्यांची पिसे, रंगीबेरंगी दगड, बिट्टी- पारिंगा अशा कुठल्यातरी बिया,सागरगोटे, पिंपळाची जाळीदार पाने तर शहरात मुले बसची तिकिटे,टपाल तिकिटे, चॉकलेटच्या चांद्या, नाणी, पत्ते , बांगडीच्या
    रंगीबेरंगी काचा, क्रिकेटपटूंचे पेपरात आलेले फोटो,मोरपिसे, पिंपळाची जाळीदार पाने,शंख-कवड्या ,काड्यापेटीवरील चित्रे,सिगारेटची पाकिटे ( त्यावेळी या पाकिटांवर वैधानिक इशारा नव्हता तरीही केवळ पाकिटे जमवतो म्हणून ही मुले धुम्रपानाकडे वळत नसत.) ...... असे काय काय जमवीत असत. अहो तेव्हा त्यांना हा केवढा प्रचंड खजिना वाटत असे. कुठल्याही आर्थिक परिस्थितीतील ही मुले या
    आघाडीवर तरी श्रीमंत असत.

    आज सामान्य आर्थिक परिस्थितीतील पालकांना सुद्धा मुलांना ८-१० हजारांचा मोबाईल घेऊन द्यावा लागतो. नवे युनिफॉर्म्स, पुस्तके, वह्या, अत्यंत आकर्षक अशी दप्तरे, पेन्सिल-पेन-खोड रबर-वॉटर बॅग - रेनकोट- छत्र्या-बूट- चपला , स्कूल बस, पॉकेट मनी, वाढदिवसाचे खर्च, पिकनिकचे खर्च अशा अनेक खर्चिक गोष्टींसाठी, ऐपत असो नसो, पालक प्रचंड पैसा खर्च करतात. तरीही मुले आणि त्यामुळे पालक सुखी नाहीत. प्रचंड पैसा खर्चूनही ही मुले मनाने श्रीमंत होत नाहीत. कार्यानुभव म्हणून अनेक गोष्टी ही मुले आणि पालक सक्तीने करतात --मार्कांसाठी करतात पण आनंदासाठी नाही. या मुलांना पुन्हा छंदांकडे वळविले तर ?

    " हा छंद जीवाला लावी पिसे" असे कुणी म्हटले तरी मी मात्र " घेई छंद मकरंद" असेच म्हणणार !

    --मकरंद करंदीकर. अंधेरी पूर्व, मुंबई.

  • किल्ले माणिकगड

    चंद्रपूर हा विदर्भामधील जिल्हा असून धनसंपदेमुळे निसर्गसंपन्न झालेला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या नैऋत्य बाजूला राजुरा तालुका आहे. या तालुक्यामधे माणिकगडाचा वनदुर्ग आहे.

  • आणीबाणीचा २१ महिन्यांचा कालखंड

    इंदिरा गांधी यांनी २५ जून रोजी देशात आणीबाणी लागू केली त्या घटनेला ४२ वर्षे होत आहेत. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ हा आणीबाणीचा २१ महिन्यांचा कालखंड तमोयुग म्हणून ओळखला जातो. १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. जगमोहनलाल सिन्हा यांनी निवडणुकीतील गैरव्यवहारप्रकरणी राजनारायण यांनी दाखल केलेल्या खटल्यात इंदिरा गांधी यांना दोषी ठरवून त्यांची खासदारकी रद्द केली. तसेच त्यांना पुढील सहा वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले.

    इंदिरा गांधींनी या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे सुटीच्या काळातील न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्ण अय्यर यांनी २४ जून रोजी इंदिरा गांधींच्या याचिकेनुसार निकालास स्थगिती देण्यास नकार दिला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत त्या पंतप्रधानपदी राहू शकतात; पण त्यांना संसदेत मतदानाचा अधिकार राहणार नाही, असा निर्णय त्यांनी दिला. हा निर्णय इंदिरा गांधींचे पंतप्रधानपद धोक्यात आणणारा होता.

    बिथरलेल्या इंदिरा गांधींनी आपली सत्ता टिकवण्यासाठी २५ जून १९७५ रोजी देशात अंतर्गत आणीबाणी लागू केली. तत्पूर्वी १९७१ च्या बांगलादेश मुक्तीयुद्धापासून देशात बाह्य़ आणीबाणी लागू होतीच. तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी घटनेच्या ३५२ (१) कलमानुसार २५ जूनच्या रात्री आणीबाणीच्या मसुद्यावर स्वाक्षरी केली आणि आणीबाणी लागू झाली. त्यामुळे इंदिरा गांधी यांच्या हाती अर्निबध सत्ता एकवटली. विरोधकांच्या धरपकडीची योजना आधीपासूनच तयार होती. त्यानुसार विरोधी नेत्यांना अटक झाली. प्रसारमाध्यमांची सेन्सॉरशिपच्या माध्यमातून मुस्कटदाबी सुरू झाली. लोकशाही अधिकारांचा संकोच झाला. ‘मेन्टेनन्स ऑफ इंटर्नल सिक्युरिटी अॅक्ट’ (मिसा) या दमनकारी कायद्यानुसार कोणालाही नुसत्या संशयावरून काहीही पुरावा न देता अटक करता येऊ लागले.

    सक्तीची नसबंदी आणि झोपडपट्टी हटवून शहरे सुशोभित करण्याच्या मोहिमेत लोकांवर जुलुम-जबरदस्ती होऊ लागली. खुली माहिती मिळणे दुरापास्त झाले. ‘इंदिरा इज इंडिया अँड इंडिया इज इंदिरा’ अशीच तेव्हा परिस्थिती होती. त्यास विरोध करताना दुसरा स्वातंत्र्यलढा असल्यासारखी एकजूट जनतेने दाखवली. हजारोंच्या संख्येने आंदोलकांनी तुरुंगवास पत्करला. परिणामी लोकांमध्ये भीती व संशयाचे वातावरण निर्माण झाले. सुरुवातीच्या या संभ्रमावस्थेतून बाहेर येत हळूहळू काही विरोधाचे सूरही उमटू लागले. त्यांना यथावकाश संघटित रूप येऊ लागले. सरकारविरोधी प्रतिकारात नेते, कार्यकर्ते, सामान्यजन, कलाकार, बुद्धिवादी असे सारेच सामील होऊ लागले. एक चळवळ उभी राहू लागली. सर्व स्तरांतून आणीबाणीला विरोध होऊ लागला. भूमिगत नेत्यांकडून विरोधाच्या योजना आखल्या जाऊ लागल्या. केवळ सरकारविरोधी पत्रके वाटणे, त्यातून जनजागृती आणि सत्याग्रह करणे यावरच विसंबून न राहता अधिक प्रखर प्रतिकाराचे बेत आखले जाऊ लागले.

    आज जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारतीय लोकशाहीचा गौरव केला जातो. साधारण आपल्याबरोबरच स्वतंत्र झालेल्या आशियातील अन्य शेजारी देशांत आज लोकशाहीची जी अवस्था आहे ती पाहता भारतातील परिस्थिती आलबेल नसली तरी निश्चितच चांगली आहे. पाकिस्तान या शेजारी देशात त्याच्या स्वातंत्र्यानंतर साधारण अर्धा काळ लष्करी हुकूमशाही होती. भारताने त्या दिशेची वाटचाल अगदीच अनुभवली नाही असेही नाही. भारतात परत आणीबाणी येणार नाही अशी आजच्या दिवशी आशा बाळगू.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • कोजागरी – कोण जागे आहे?

    पोर्णिमा’ ही समस्त जगातील प्रतिभावंतांची आदिम प्रेरणा झाली आहे. त्या एकमेवाद्वीतीय चंद्राच्या शीतल प्रकाशबिंदूंनी जणू प्रतिभेच्या कमळाला फुलण्याची अंतःप्रेरणा मिळते. ते शतदलकमल मग फुलून येतं मनस्वीपणे, चंद्रासारखंच!

  • संगणकीय लेखन – सोयी आणि गैरसोयी

    आता स्वत:च्या लेखनासाठीही संगणकाचा किंवा आयपॅड, आयफोन किंवा तत्सम सुविधांचा वापर करावा लागतो. संगणकावर किंवा त्या त्या अुपकरणांवर जे फॉन्टस् बसविलेले असतात, त्यानुसारच लेखन करावं लागतं. त्यामुळे शुध्दलेखनाचे बाबतीत बर्याच तडजोडी करणं अपरिहार्य असतं. फॉन्टसाठी लागणारं सॉफ्टवेअर घडविणारे तज्ज्ञ आर्थिक गणितही मांडतात. जे खपतं, विकलं जातं किंवा ज्याला जास्त मागणी असतं, असंच सॉफ्टवेअर बाजारात येतं. शुध्द अशुध्द असं ते जाणीत नाहीत किंवा या बाबतीत त्यांचं फारसं देणंघेणं नसतं.

    त्यामुळं संगणकीय लेखनात काही गैरसोयी झाल्या आहेत त्याबरोबरच काही सोयीही झाल्या आहेत. ‘रवी’ आणि ‘खी’ हे निराळे ओळखता येतात. वानखेडे हे वानरवेडे असं वाचलं जात नाही. पद्धत किंवा शुद्ध या शब्दात, अुच्चारानुसार ‘द’ अर्धा आणि ‘ध’ पूर्ण असायला हवा पण तो तसा टाअीप करायला गेलात तर तो...पद्धत किंवा शुद्ध असाच टाअीप केला जातो. लिहीतांनाही आपण पद्धत आणि शुद्ध असंच लिहीतो. ‘ध’ हलंत (अर्धा) आणि ‘द’ पूर्ण असं टाअीप केलं तर कसं टाअीप केलं जातं ते पहा....पध्दत, शुध्द..

    विश्व या शब्दात ‘श्’ चं रूप बदलून ते अुलट्या ४ सारखं होतं तर ‘व’ अर्धा होतो. काही संगणकात ‘श’ अर्धा होतो (अुलटा ४ होत नाही) आणि ‘व’ पूर्ण राहतो.

    शुध्द कशाला म्हणावं आणि अशुध्द कशाला म्हणावं हेही काही वेळा समजत नाही. ‘होतं’ हे शुध्द तर ‘व्हतं’ हे अशुध्द..पण ‘नहोतं’ हे अशुध्द तर ‘नव्हतं’ हे मात्र शुध्द...हे कसं?

    टाअीप केलेला हा मजकूर, माझ्या संगणकात असलेल्या सॉफ्टवेअरनुसार टाअीप झाला आहे. आता मराठी भाषेची आणि लिपीची शुध्दाशुध्दता, अक्षररूप (फॉन्ट) तज्ज्ञ आणि मराठी सॉफ्टवेअर घडविणारे तज्ज्ञ यांच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. टाअीप केलेल्या मजकूराचा आशय समजला म्हणजे फॉन्ट सॉफ्टवेअर यशस्वी झालं असं मानावं.

    अक्षररूप, फॉन्ट तज्ज्ञांना काही सूचना कराव्याशा वाटतात. मागील लेखांत .... मी सुचविलेले ... शिफारस केलेले स्वर :: अ ची बाराखडी :: अ अॅ आ ऑ अि अी अु अू अे अै ओ औ

    यापैकी अ आ ओ औ या स्वरांना स्वतंत्र कळा आहेत. इ ई उ ऊ ए ऐ या पारंपारिक स्वरांनाही स्वतंत्र कळा आहेत. या ६ कळांना अि अी अु अू अे अै या कळा दिल्या तर इ ई उ ऊ ए ऐ हे स्वर गाळले जातील आणि त्यांच्या जागी अि अी अु अू अे अै हे स्वर सहज टाअीप करता येतील. अॅ ऑ हे स्वर दोन कळा वापरून सहज टाअीप करता येतात. ञ आणि ङ अैवजी दुसर्या कोणत्यातरी अक्षरांना किंवा अक्षरखुणांना या कळा द्याव्यात. ऋ ची स्वतंत्र कळ आहे, ती दुसर्या कोणत्यातरी अक्षराला द्यावी. ॐ ची कळ मात्र हवीच.

  • महाराष्ट्रीयत्त्व म्हणजे काय रे भाऊ?

    महाराष्ट्रीयत्त्व म्हणजे काय रे भाऊ? असं कोणी वाचारलंय का कधी. मग त्याला उत्तर एकच...

    महाराष्ट्रात राहून जो मराठी बोलतो... इथली संस्कृती पाळतो आणि तिचा मान राखतो तोच महाराष्ट्रीयन.

  • मेंढ्याचा गणपती

    भंडारा शहरात असलेला भृशुंड गणेश “मेंढ्याचा गणपती” म्हणून स्थानिक लोकांत प्रसिद्ध आहे. या गणपतीच्या मूर्तीला लांब दाढी आणि मिश्या आहेत.

  • आज शिखरावर पोहोचायचंच!

    "दमलास? चल परत जाऊ. आज इतकं पुरे. पुन्हा कधीतरी जाता येईलच.

    ""नाही गुरुजी. मी दमलोय; पण आपण इतके वर आलोय, आज शिखरावर पोहोचायचंच! कधी एकदा पोहोचतोय आणि मग तुम्ही ते सत्य सांगताय, असं झालंय मला.''

    ""माझं वचन नीट आठव. ही मोहीम पुरी होईपर्यंत, जर माझी आज्ञा तू निरपवादपणे पाळलीस, तर ते सत्य सांगेन' असं म्हणालो होतो मी.''

    ""होय गुरुजी. पण आता शिखर जवळ आलं असेल. इतकं वर आल्यावर सोडून द्यायचं म्हणजे..''

    ""कितीही वर आलो असू! तरी मी सांगतो म्हणून, हे सगळे कष्ट वाया जाऊ द्यायला तू तयार आहेस का नाही?''

    ""ठीक आहे गुरुजी. मी आजची सगळी धडपड वाया जाऊ द्यायला तयार आहे. म्हणत असाल तर परत जाऊ या.''

    ""शाबास! आता मी तुला ते सत्य सांगतो''.

    ""पण शिखर न येताच?''

    ""तसं नव्हे. तू परतीला तयार झालास म्हणून! ते सत्य हे आहे, की शिखर असं नाहीच. ही अंतहीन चढण आहे आणि ज्या तळापासून आपण निघालो ना, तेच खरं पोचण्याचं स्थान होतं! तू उत्तीर्ण झालास. चल आता तिथं जाऊ, जिथं आपण असतोच; फक्त "पोहोचलो' असं वाटत नसतं इतकंच!

    -- दीपक गायकवाड

  • आपल्यासारख्या सामान्यांची लायकी काय?

    आनंद लिमये

    या टोलसंस्कृतीची सुरुवात ज्यांनी केली तेच आता बोंबा मारतायत. मजाच आहे.

    आपण नुस्तं बघत बसायचं. हातावर हात चोळत बसायचं.... जमलंच तर चार शिव्या हासडायच्या.. अगदिच पेटलो तर टोलनाक्यावरच्या माणसाला एक पेटवून द्यायची

    आणि बाजूने एखाद्या VIP ची गाडी टोल न भरता सूसाट जाताना बघायची.

    हीच आहे आपल्यासारख्या सामान्य माणसाची लायकी

    आनंद लिमये