न्यायालयाने निकाल दिला
जे तिथे आधी होते..
कविवर्य भा.रा.तांबे अंथरुणास खिळले होते तेंव्हाची काव्य जन्माची एक कथा आहे…
आपण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आलो असल्याचे त्याना जाणवत होते त्यावेळी त्यांचे एक स्नेही जवळ येऊन त्यांच्यापाशी कविता लिहिण्याचे आर्जव करू लागले. तांबेंनी आयुष्याच्या अंतिम वाटेवर काही तरी बोलावे किंवा लिहावे अशी विनवणीही त्यांनी जाता जाता केली….
काही दिवसांनी त्या संपादक महोदयांचे कविता पाठविण्यासाठीचे आठवण वजा विनंती करणारे पत्र तांबेंना मिळाले. त्यांच्या त्या विनंतीस उत्तर म्हणून भा.रा. तांबेंनी या प्रसंगावर त्यांना सुचलेली एक कविता पोस्टकार्डावर लिहून त्या संपादक मित्रास पाठवली होती....
तांबेंनी लिहिलेली ती कविता म्हणजे मृत्यूकडे केलेली एक तक्रारवजा कैफियत आहे ! अंथरुणाला खिळलेल्या तांबेंनी आपल्या मित्राची विनंती पुरी करताना आर्त शब्दात स्वतःच्या वेदना भावबद्ध केल्या अन एक अजरामर कविता जन्मास आली ती म्हणजे, 'मधु मागसी माझ्या …"
मधु मागसी माझ्या सख्या, परि
मधुघटचि रिकामे पडति घरी !
आजवरी कमळाच्या द्रोणीं
मधू पाजिला तुला भरोनी,
सेवा ही पूर्विची स्मरोनी
करि न रोष सख्या, दया करी.
नैवेद्याची एकच वाटी
अता दुधाची माझ्या गाठीं;
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणीं कशी तरी.
तरुण-तरुणिंची सलज्ज कुजबुज,
वृक्षझर्यांचे गूढ मधुर गुज,
संसाराचे मर्म हवे तुज,
मधु पिळण्या परि बळ न करीं !
ढळला रे ढळला दिन सखया !
संध्याछाया भिवविति हृदया,
आता मधुचे नाव कासया ?
लागले नेत्र हे पैलतिरीं.
जो काव्यमधु तू मागत आहेस त्याचे कित्येक मधुघट रिते होऊन घरी पडून आहेत ज्याकडे बघायला आता फुरसत राहिली नाही. आता मात्र नव्याने हे मधुघट माझ्याकडे सहजतेने निर्मिले जावेत अशी माझी शारीरिक अवस्था राहिलेली नाही अशी दिनवाणी कबुली या कवितेच्या सुरुवातीस कवींनी दिली आहे.
जेंव्हा माझी गात्रे शिथिल नव्हती, स्मृती सक्षम होत्या अन शरीर साथ देत होते तेंव्हा माझ्या मनातली फुलपाखरे हा काव्यमधु अगदी लीलया निर्मित होती. अगदी कमळाच्या विशाल द्रोणी भरून मी हा शब्दरस तुझ्या स्वाधीन करत होतो. तेंव्हा मला साधनांची कमतरता भासत नव्हती. मनातली उर्मी दाटून आली की ती शब्दबद्ध व्हायची पण आता तशी परिस्थिती उरली नाही. तुला देण्याजोगे माझ्याकडे काही नुरले तरी माझी पूर्वीची ही काव्यसेवा ध्यानात घेऊन तू आता माझ्यावर रागावू नकोस. तू मला माफ कर अन माझ्यावर थोडासा दयाभाव दाखव अशी विनंती कवी आपल्या 'त्या' मित्रास करतात.
माझा हा अखेरचा प्रवास सुरु आहे, हा प्रवास कधी अन कसा संपेल हे मलाही माहिती नाही. मात्र शेवटच्या काळात मला त्या परमात्म्याचे परमेश्वराचे आराधन करायचे आहे. त्याचे स्तवन करायचे आहे, त्याच्या पूजनासाठी माझ्या प्रतिभेचे उरले सुरले चार शब्द मी जपून ठेवले आहेत, या भावनेचे अगदी हळवे वर्णन करताना भा.रा.तांबेंनी जो उपमा अलंकार वापरला आहे तो अगदी अद्भुत अन विलक्षण परिणामकारी असा आहे. ते म्हणतात की दुधाच्या नैवेदयाची एकच वाटी माझ्या गाठी आहे अन देवपुजेस्तव एकच काटेरी फुलझाड (कोरांटी) मी कसेबसे माझ्या अंगणी तग धरून राखिली आहे ! उरले सुरले काव्यस्फुरण फक्त प्रभूचरणी अर्पण करण्यासाठी राखून ठेवल्याने आता तुला देण्यासाठी माझ्याकडे मधुघट राहिले नाहीत याची मला खूप खंत वाटते आहे असे कवी इथे सुचवतात.
आपल्या मित्रास किंवा आपल्या रसिक वाचक- चाहत्यांना आपल्याकडून काय लिहिले जावे याची मर्मभेदी जाणीव तांबेंना आहे. युवा मनाची स्पंदने ज्या प्रेमभावनेत कैद असतात, ती प्रेमभावना युवामनाची भाषा असते अन त्यांचे श्वास हीच त्यांची कुजबुज असते. प्रतिभावंत साहित्यिक या श्वासांना शब्दात परावर्तित करतात अन या कुजबुजीला कवितेचे प्रारूप मिळवून देतात. हे प्रेमकाव्य आपल्या नवनावोन्मेशशाली प्रतिभासामर्थ्याने कवी जिवंत करतात अन वाचक त्या काव्यास आपल्या हृदयात अढळ स्थान देतात. याहीपुढे जाऊन काहींना जगण्याचे ध्येय हवे असते तर काहींना जगण्याचा खरा अर्थ शोधायचा असतो त्यासाठी ते अविरतपणे संसारसुखाचे मर्म शोधत असतात. कवी मात्र फुलांचे परागकणदेखील न दुखावता त्यातून अलगद मधुर मधुकण शोषून घ्यावे इतक्या सहजतेने जीवनातील मर्म हलकेच समोर मांडत जातात. त्यातला अर्थ बघून आपण दिग्मूढ होऊन हरखून जातो. कवी म्हणतात की आता अशा भावना, असे विचार शब्दबद्ध करावे इतके भान माझ्याकडे उरले नाही. माझ्या अंगी तितके बळही राहिले नाही.तेंव्हा तू त्याविषयीची आर्जवे मला करू नकोस !
शेवटच्या कडव्यात कवी अगदी आर्ततेने ह्रदयाला पीळ पडतील अशा शब्दात आपली व्यथा मांडतात. 'आता अंतःकाळ जवळ आला आहे, ज्याप्रमाणे पूर्वेस रम्य प्रभातीस उगवलेला सूर्य निरव सांजेला मावळतो हा निसर्गनियम आहे त्याप्रमाणे जन्माला आलेल्या प्रत्येकास मृत्यू अटळ असतो. या निसर्ग नियमास आपण कसे अपवाद असू शकू ? आता माझा श्वाससूर्य ढळणार आहे, ही सांजवेळ मला काहीशी कातरवेळ वाटते आहे अन त्यामुळे थोडीशी घबराट देखील माझ्या मनात दाटून आली आहे असे प्रामाणिक कथन ते इथे करतात. अशा या बिकट प्रसंगी काव्यमधुचे स्फुरण होईल तरी कसे असा सवाल कारतानाच ते म्हणतात की आता माझे चित्त कशातच गुरफटले नसून माझे नेत्र केवळ आणि केवळ पैलतीरावरच्या आत्मीय ज्योतीत लीन झाले आहेत. तेंव्हा माझ्या सख्या आता मला तू ह्या काव्यमधुचा आग्रह करू नकोस असे म्हणत म्हणत साश्रूपूर्ण शब्दांची ओंजळ ते आपल्या मित्राच्या ओंजळीत रिती करतात.
कविवर्य भा.रा.तांबे यांची ही कविता म्हणजे अंथरुणाला खिळलेल्या जर्जर माणसाने मृत्यूशी केलेली गुजगोष्टच आहे.
-- संगीत.. या WhatsApp ग्रुपवरुन..
इथे आख्खा महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. माणसांना प्यायला पाणी नाही. जनावरं पाण्यावाचून तडफडतायत. मुंबई-ठाण्यासारख्या पाण्याची ददात न भासणार्या भागातही दिवस-दिवस पाणी गायब होतेय. दुष्काळग्रस्त भागातील जनता एकेक थेंब पाण्यासाठी तहानलेली आहे. गावंच्या गावं स्थलांतर करतायत. आपण ही परिस्थिती रोजच विविध वाहिन्यावर पहातच आहोत.
या भीषण दुष्काळी परिस्थितीत शेजारच्या राज्यातून एक “बापू” येतो आणि आपल्या करणीने त्याच राज्यात जन्म घेतलेल्या दुसर्या महात्मा बनलेल्या“बापूं”चं नाव धुळीला मिळवतो. स्वयंघोषित “संत आसाराम बापू” यांचे हे कर्तृत्व. दुष्काळाने अवघा महाराष्ट्र होरपळत असताना आसाराम बापू यांनी अध्यात्माची गोळी दाढेखाली ठेवून होळीच्या नावाखाली लाखो लिटर्स पाण्याची नासाडी केली. केवळ एकदाच नाही तर दोनदा.
प्राणायाम करण्यापूर्वी शरीर एकदा ताजेतवाने करून घेण्यासाठी चाललेले शरीर संचालन करताना … शरीराचे सर्व अवयव सांध्यातून हलवताना ..माझ्या सांध्यामध्ये थोड्या वेदना होत असल्याचे जाणवले ..तसेच सर्व स्नायू आखडून गेल्याने त्यांची हालचाल करताना त्यावर ताण येत होता ..
मार्कंडे्य हा किल्ला देखील इतिहास व अध्यात्माची साक्ष देणारा किल्ला असल्यामुळे पर्यटक तसंच ट्रेकर्सच्या दृष्टीने देखील आकर्षणाचं केंद्र आहे.मार्कंडे्य किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचताच आपल्याला शंकराच्या सुबक मूर्तीचे दर्शन घडते. शेजारीच असलेल्या पायर्या गडाच्या दिशेने मार्गक्रमण करतात. १३३६ फुट उंची आसलेला या किल्ल्याला दगडातून कोरलेल्या पायार्यांमधून तर कधी कातळ खडगावरुन वाट काढावी लागते.
मित्रांनो प्राचीन काळी ऋषींनी संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी अनेक गोष्टी सांगून, करून ठेवल्या आहेत. आज आपण त्यापैकी गायत्री मंत्र आणि तो “संध्या” करण्या बरोबर का जोडला गेला आहे ते पाहू या….
काही काही माणसं बहूदा जन्मताच बंडखोर असतात. सर्वमान्य प्रचलीत रिती परंपंरा वा चौकटीबद्ध आचरण त्यांच्या स्वभावातच नसते. लोक काहीही म्हणोत ते आपला मार्ग सोडत नाहीत. मात्र स्त्रियांच्या बाबतीत तर असे आभावानेच आढळते. विशेषत: स्वातंत्र्यपूर्व काळात एखाद्या रूढीवादी कुटूंबात जर असे कोणी वागत असेल तर महा कठीण…..उत्तर प्रदेशातील साहिबज़ादी ज़ोहरा बेगम मुमताज़ उल्लाह खान हीचा जन्म झाला तोच मुळी कट्टर रूढी परंपंरा पाळणाऱ्या मुस्लिम घरात. एकूण सात अपत्यातील ती तिसरी. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी एका डोळ्यात मोती बिंदू झाला आणि डाव्या डोळ्याची दृष्टी गेली. घरात परदा पद्धत अत्यंत कडक. मोजकेच पुरूष स्त्रियांशी बोलू शकत. स्वभाव जन्मत:च विद्रोही त्यात मोठ्या बहिणाचा अशयस्वी विवाह बघून तिने निश्चय केला की लग्ना सारख्या फालतू भानगडीत न पडता फक्त करीअर करायचे.
आई तरूणपणीच गेल्या नंतर आईच्या नात्यातील काका तिला युरोपला घेऊन गेले. तिथे तिच्या काकूने “मॅरी विगमॅन्स” यांच्या बॅले नृत्य संस्थेत नांव नोंदवले. या संस्थेत प्रवेश मिळवणारी ती पहिला भारतीय ठरली. पूढे भारतातील युरोपच्या दौऱ्यावर आलेल्या उदय शंकर यांच्या बॅलेचा कार्यक्रम तिच्या बघण्यात आला आणि तिने निश्चय केला बस्स….आता नृत्यातच करीअर करायचे आणि ती उदय शंकर यांच्या ग्रूपमध्ये सामील झाली. १९३५ ते ४० या काळात ती उदय शंकरच्या ग्रूप मधील महत्वाची नर्तिका होती व विदेशी दौरे गाजवत होती. १९४० ला उदय शंकर परत भारतात आले व जोहरा त्यांच्या ग्रूप मधील नृत्य शिक्षिका म्हणून काम बघू लागली. याच ठिकाणी तिला कामेश्वर सेगल हा तिच्यापेक्षा ८ वर्षांनी लहान असलेला शास्त्रज्ञ, चित्रकार आणि नृत्यकार तरूण भेटला जो नंतर तिचा पती झाला. भारतात यावेळी तिची धाकटी बहिण अझरा बट्ट पृथ्वी थिएटर मध्ये सामील झालेली होती. पृथ्वीराज कपूरची ही संस्था त्या काळी एक मात्तब्बर नाटक संस्था होती. मग जोहराही त्यात ४०० रूपये प्रतिमाह वेतनावर अभिनेत्री म्हणून रूजू झाली.
इप्टा या संस्थेच्या “धरती के लाल” या चित्रपटा पासून जोहरा सैगलचा चित्रपट प्रवास सुरू झाला पण नाटक हे तिचे पहिले प्रेम. देव आनंदच्या “बाजी” चित्रपटात ती नृत्य दिग्दर्शीका होती तर तर राजकपूरच्या “आवारा” मधील सूप्रसिद्ध स्वप्न गीत घर आया मेरा परदेसी….याचे नृत्य दिग्दर्शन जोहराने केले. त्यावेळी तिचे पती कामेश्वर कला दिग्दर्शनात आपले नशीब अजमावत होते. १९५९ मध्ये कामेश्वर सेगल यांचे निधन झाले आणि जोहरा सेगला दिल्लीला आल्या आणि त्यावेळी नुकत्याच स्थापन झालेल्या नाट्य अकादमीच्या संचालक झाल्या. पूढे १९६२ मध्ये त्यांना लंडनमध्ये नाट्य अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली व त्या तिकडे गेल्या. तिथे त्यांना बीबीसी वाहिनीवर काम करतानां आपला ठसा उमटवला. बीबीसीच्या २६ एपिसोडच्या त्या मूख्य निवेदिका होत्या.
१९८२ मध्ये त्यांच्या आयुष्यात पुन्हा एक वळण आले. जेम्स आयव्होरी यांच्या “ज्वेल इन द क्राऊन” या चित्रपटाद्वारे त्या परत चित्रपट क्षेत्राशी जोडल्या गेल्या. तिथे अनेक चित्रपटात भूमिका करून पुन्हा १९९० च्या मध्यात भारतात परत आल्या. इथे आल्यावर नाटक, मालिका, चित्रपट, काव्य वाचन यात सतत बिझी असत. १९९६ मध्ये त्यांचा हिंदी चित्रपटातील आजीचा प्रवास सुरू झाली. नवीन पिढीला ही आजी चांगलीच ठावूक आहे. कारण ८४ वर्षांच्या या आजीचा सळसळता उत्साह तरूणींनाही लाजवेल असाच होता. दिलसे, हम दिल दे चूके सनम, वीर झारा, सावरीयाँ, चिनी कम या चित्रपटातील ही म्हातारी आठवून बघा..या वयातले तिचे हास्य, तिचे लाजणे, तिच्या नृत्याच्या स्टेप्स सर्व कसे मोहक वाटते. २००२ मधला “चलो इष्क लडाए” हा गोविंदाचा चित्रपट जोहराने स्विकारला तेव्हा ती ९० वर्षांची होती व त्यातील मध्यवर्ती भूमिकेत तिच होती. तिला कसे मारता येईल यासाठी नवनवीन क्लृप्त्या लढवणाऱ्या नातवाची भूमिका गोंविदाने केली आहे. यात जोहराने चक्क सायकल चालविली आहे आणि गुंडाशी फायटिंग पण केली आहे…..
तर अशी ही चिर तरूण जोहरा सेगल. कर्मठ मुस्लिम परीवारातील जोहराने हिंदू कामेश्वरशी लग्न करून धर्म बदलला पण नाव मात्र कधीच नाही बदलले. त्याकाळी प्रचंड विरोध असतानां हे लग्न झाले. स्वत: पंतप्रधान पं. नेहरू या लग्न सोहळ्यास हजर होते. किरण आणि पवन ही दोन मुले या दापंत्याला झाली. पैकी किरण WHO या संस्थेचे काम करतो तर पवन हा उत्कृष्ट ओडिशी नर्तक आहे. १० जुलै २०१४ रोजी त्यांचे निधन झाले. तब्बल १०२ वर्षांचे आयुष्य जोहरा सेगल जगल्या. सहारनपूर ते अर्धे जग पालथे घालून प्रवास करत जीवनाचा मनोसोक्त आनंद घेत राहिल्या. शेवट पर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य कधीच लोपले नाही. त्यांच्या तरूणपणी त्या किती सुंदर होत्या माहित नाही पण नव्वदीतल्या जोहराकडे बघून मना पासून Love you & hatsoff you असेच म्हणावेसे वाटते.
दासू भगत (१० जूलै २०१७)
लेखक व जाती व्यवस्थापनाचे अभ्यासक डॉ. आशिष नंदी यांचे भ्रष्टाचाराबाबतचे वादग्रस्त विधान हे अतिशय क्लेशकारक व निंदनियच आहे. दहशतवादी, भ्रष्टाचारी किंवा कोणत्याही गुन्हेगारांचे वर्गीकरण विशिष्ट …..
Copyright © 2025 | Marathisrushti