संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुख सहा अंगांपैकी ‘आंतरराष्ट्रीय न्यायालय’ हे “न्यायविषयक” अंग आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात (इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस-ICJ) प्रामुख्याने राष्ट्रांमधील वाद ऐकले जातात. आंतरराष्ट्रीय न्यायालय हा संयुक्त राष्ट्रांच्या व्यवस्थेचा एक भाग आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय ही स्वायत्त संस्था आहे. ती कधीही बरखास्त होत नाही.
डोंबिवली हे शहर खूप पुरातन आहे असे म्हणतात. मात्र इतिहासात तसा डोंबिवली शहराचा फारसा उल्लेख सापडत नाही.
इ. स. ८४३ मध्ये कोंकणचे राज्य शिलाहारास मिळाले. शिलाहारांनी पुढील ४५० वर्षे या प्रदेशावे सुखनैव राज्य केले. इ. स. १२६५ च्या सुमारास यादवांनी शिलाहार राजवटीचे उच्चाटन केले.
अलाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर यादवांची सत्ता खिळखिळी झाली. त्यानंतर उदयास आलेल्या सुलतानांच्या अंकित सरदारांची राजवटी शिलालेख सापडले आहेत. त्यात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो. तुर्भे बंदरानजीकच्या माहूल गांवात इ. स. ११५६ चा एक शिलालेख सापडला आहे. त्यात ’डोंबल वाटिका’ असा उल्लेख आढळतो. परंतू त्याबाबत अनेक मतभेद आहेत.
सन १८८७ साली डोंबिवली स्टेशनची स्थापना झाली. त्यानंतर ब्रिटीशांनी सन १९२० मध्ये मॅरहॅम वसाहतीची स्थापना केली आणि पांढरपेशा वर्गाला या नव्या वसाहतीत राहण्यासाठी उद्युक्त केले. कदाचित त्यामुळे आजच्या पश्चिम भागाला जुनी डोंबिवली तर पूर्व भागाला नवी डोंबिवली असे म्हटले जाऊ लागले. स्वच्छ हवामान ही येथील जमेची बाजू या विकासाला पोषक ठरली आणि वाढत्या संख्येने येथे कायमच्या वास्तव्यासाठी लोक येऊ लागले.
सध्या मुंबईतून मराठी माणूस बाहेर पडून लांबलांबच्या ठिकाणी स्थायिक होताना दिसतो. निवासाच्या जागांची स्वस्तात उपलब्धता हेच याचे कारण आहे. दादर-गिरगावमधल्या एक-दोन खोल्यांच्या बदल्यात डोंबिवली-कल्याण-बदलापूरला प्रशस्त फ्लॅट मिळतो हे गणित. त्यामुळे अगदी अलिकडच्या काळात मुंबईतून हजारो कुटुंबे डोंबिवलीला स्थलांतरित झाली.
डोंबिवलीने स्वत:ची एक खास ओळख मात्र जपून ठेवलेली आहे. डोंबिवली शहर खरोखर शांतताप्रिय समाजाचं प्रतिक. डोंबिवलीकरांनी आपल्या संस्कृतीचा वारसा आजतागायत जपलेला आहे. डोंबिवलीकर मराठी असो की दाक्षिणात्य, सांस्कृतिकदृष्ट्या त्याची अभिरुची उच्च असते. अनेकविध प्रांतातले लोक इथे नांदत असले तरीही ते इथल्या मूळ मराठी संस्कृतीशी समरस झालेले दिसतात.
दंगली, मारामारी, खून, दरोडे यांपासून डोंबिवलीकर अलिप्तच दिसतो. कदाचित अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजात गुंतल्यामुळे या बाहेरच्या गोष्टी करायला त्याच्याकडे वेळच नसावा. अर्थात मुलातच सुसंस्कृत असल्याने त्याला यात रसही नसावा. कुठे खुट्ट झालं की ठाणे बंद, महाराष्ट्र बंदची हाक दिली जाते तशी डोंबिवली पूर्ण बंद असलेली कधी ऐकलीच नाही.
डोंबिवलीकर हा अत्यंत शिस्तप्रिय असल्याचे लक्षात येते ते एकाच गोष्टीवरुन. वेळ ही तासात किंवा मिनिटातच मोजतात असे नाही तर ती सेकंदातही मोजावी आणि पाळावी लागते हे डोंबिवलीकरांनी जाणून घेतलेय. त्यामुळेच सकाळ-संध्याकाळच्या रेल्वेगाड्यांचं टाईमटेबल बहुतेकांना पाठ असतं आणि तेही ८.५७, ९.०३ अशा अगदी तास आणि मिनिटानुसार. डोंबिवलीकर “साडेआठची गाडी” असं म्हणणारच नाही. “आठ एकतीसची दादर फास्ट” हे त्याच्या सहजपणे तोंडावर येतं.
पुलंसहित अनेक साहित्यिकांच्या लेखणीतून डोंबिवलीचा उल्लेख आला आहे. पुलंचे डोंबिवली प्रेम तर जगजाहिर आहे. शन्ना नवरे तर येथेच वास्तव्याला होते. अनेक राजकीय नेते इथेच उदयाला आले आणि मोठेही झाले. काहींना प्रेमळ सासरही डोंबिवलीतच मिळालं.
कलाकार, खेळाडू, साहित्यिक अशा सर्वच क्षेत्रात डोंबिवलीकर पुढेच आहेत आणि त्यांची ही वाटचाल अशीच सुरु रहाणार आहे.
-- निनाद अरविंद प्रधान
(महाराष्ट्रातील शहरांची ओळख करुन देणारी ही लेखमाला नियमितपणे प्रसिद्ध होईल. आपल्यालाही कोणत्या शहराविषयी लिहायचे असेल तर जरुर लिहा. डोंबिवलीच्या तुमच्या आठवणी आणि किस्से जरुर शेअर करा. )
संस्कार हे संस्कार असतात
अणुइंधनाने समृद्ध असलेल्या राष्ट्रांनी भारतावर लादलेले निर्बंध दूर करत अमेरिकेशी अणुकरार करणार्या मनमोहनसिंग यांनी जपानशी आर्थिक सहकार्याचा करार करून पुढचे पाऊल टाकले. या कराराद्वारे त्यांनी देशाचा आर्थिक विकास साधण्याच्या प्रयत्नाबरोबरच राजकीय मुत्सद्देगिरीचाही नमुना पेश केला. या प्रयत्नांमुळे विकासदर 10 टक्क्यांवर जाऊन चीनच्या भारतविरोधी धोरणांनाही खीळ बसू शकेल.
आभाळ भरून आलं. कोणत्याही क्षणी तो कोसळेल असे वातावरण. सगळीकडे काळोख दाटला. अधून मधून वादळाची चाहूल. आणि मंदाताई बेडवर टेकून बसून बघत होत्या. हेडफोन लावून गाणी ऐकत होत्या. का रे दुरावा. का रे अबोला. आणि मागील सगळेच आठवायला लागले.
व्यथा वार्धक्याची
नको नको ते लाजिरवाणे जगणे आता आम्हाला
अर्थही नसतो असल्या भेकड दुबळ्या जीवनाला
दुखणे खुपणे चालू असते त्याची कटकट सगळ्यांना
असुनी अडचण सदा वाटते घरच्या सर्वही लोकांना
गरजे पुरते जवळी येतील ठाऊक आहे आम्हाला
प्रेमाचा तिथ शब्दही नसतो वा मायेचा ओलावा
आम्ही भुकेले प्रेमासाठी नातवंडे ती भूक पुरविती
अंधारातील प्रकाश तारे उजळविति जीवन गगनाला
अनिल आपटे
१२ वी ला असताना पंचवटी कॉलेज मध्ये स्नेहसंमेलनाच्या वेळी आपण एखादी एकांकिका बसवावी असे आमच्या मनात आले अर्थात या पूर्वी अभिनयाचा काही अनुभव नव्हता परंतु आमच्या पेक्षा वयाने मोठे असेलेल जे आमचे विलास पाटील , रतन पगारे , यशवंत .. वगैरे मित्र होते ( अर्थात हे मित्र आमच्या सारखे व्यसनी नव्हते ) त्यांनी आम्हाला या प्रकरणी मदत करायचे ठरवले ,
सर्जेरावांनी लेखन करताकरता गेल्या काही वर्षात रंगांशी खेळता खेळता त्यांचे हात इतके सरावले की आज पर्यत त्यांनी केलेल्या पेंटिंग्सपैकी सर्वोत्कृष्ट चित्र म्हणून जयवंत पाटलांच्या या चित्रांची गणना होईल, हे नक्की. संस्थेच्या लोभापोटी, आपली संस्था आपुलकीच्या नात्यांसवे सौहार्दपूर्ण कलाकारांच्या उन्नतीचे व्यासपीठ आहे.
श्रीमहाराज ‘ नामावतार ‘
सिंगापूर मध्ये अनेक भारतीय क्रांतिकारी कार्यरत होते. १९४२ साली ब्रिटिशांनी सिंगापूरवरचा आपला ताबा सोडला, जपान कडे सिंगापूर परत आले. त्यावेळी तिथल्या जखमी सैनिकांना वैद्यकीय उपचार करण्याचे काम डॉ लक्ष्मी ह्यांनी केले.
Copyright © 2025 | Marathisrushti