(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • मराठीची समृध्द स्वरमाला – अ ची बाराखडी

    ५ सप्टेंबर २०१५ रोजी संपन्न होणार्‍या विश्व साहित्य संमेलनानिमित्त......

    सोपी मराठी ... प्रवाही मराठी ... अुत्क्रांत मराठी ... समृध्द मराठी....

    अ अॅ आ ऑ अि अी अु अू अे अै ओ औ

    मराठीच्या आद्य लिपीकारांनी, अ ला काना लावून तयार झालेला आ स्वीकारला ......
    मराठीच्या आद्य लिपीकारांनी अ ला ओकार लावून तयार झालेला ओ स्वीकारला .....
    मराठीच्या आद्य लिपीकारांनी अ ला औकार लावून तयार झालेला औ स्वीकारला .....
    पण .....
    मराठीच्या त्याच लिपीकारांनी अ ला अिकार लावून तयार झालेली अि .....
    अ ला अीकार लावून तयार झालेली अी .....
    अ ला अुकार लावून तयार झालेला अु .....
    अ ला अूकार लावून तयार झालेला अू ...
    अ ला अेकार लावून तयार झालेला अे ...
    अ ला अैकार लावून तयार झालेला अै ....
    स्वीकारले असते तर ......
    इ, ई, उ, ऊ, ए, ऐ ही अक्षरचिन्हं घडविण्याची गरजच नव्हती.

    हाच विचार, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या प्रतिभावान द्रष्ट्या व्यक्तीला सुचला आणि त्यांनी, अि, अी, अु, अू, अे, अै ही अक्षरचिन्हं वापरण्यास सुरूवात केली. हीच अक्षरचिन्हं वापरून लेख लिहीले. अिसवीसन 1940 च्या सुमारास. पुण्याहून प्रसिध्द होणार्या, किर्लोस्कर, स्त्री वगैरे मासिकात प्रसिध्द झालेल्या मजकूरात हीच अक्षरचिन्हं वापरली आहेत, हे त्या काळी प्रसिध्द झालेल्या साहित्यात आढळतं. मी ही अ ची बाराखडी, गेली चाळीस वर्षे वापरतो आहे. माझ्या सर्व लेखात आणि पुस्तकात हीच बाराखडी वापरली आहे. डोळ्यांना आणि मेंदूला, या बाराखडीची सवय, लवकरच होते.
    आपणही हीच अक्षरचिन्हं वापरावीत.

    ही अक्षरचिन्हं वापरून तयार झालेले काही शब्द ......

    अिंद्र, अिन्द्र, अिंदिरा, अिन्दिरा, अितक्यात, अितीहास, अिच्छा ....
    अीश्वर, अीशस्तवन, अीशान्य, अीर्षा, ....
    अुपकार, अुपवन, अुकळणं, अुचापत्या, अुंच, अुंट, ....
    अून, अूब, अूर, अूस ....
    अेक, अेकवीस, अेकाअेकी, अेकादशी, अेकूण .....
    अैरावत, अैतिहासिक, अैवज, अैवजी, अैहिक .....

    हे शब्द वाचतांना काही अडचण आली? लिहीतांनाही कठीण वाटणार नाही.

    गजानन वामनाचार्य
    180/4931 पंतनगर, घाटकोपर (पूर्व),
    मुंबअी 400075.
    मोबाअील :: 9819341841

  • सुधारणेचा लटका प्रयत्न (नशायात्रा – भाग ४०)

    मी पोलीस स्टेशन वरून पळून आल्यानंतर घरात जो हलकल्लोळ माजला होता त्याचे फलित हे झाले की त्या दिवशी रात्री मी सर्वांची माफी मागितली. ( अर्थात तेव्हा ब्राऊन शुगर पिऊन झाली होती , टर्की नव्हती म्हणून ही पश्चात बुद्धी होती , अनेक व्यसनी असे नेहमी करतात , काही मोठी भानगड , भांडण , किवा मोठी चूक केली की ते तात्पुरते माफी मागतात , काही दिवस शांततेने जगतात अर्थात व्यसन बंदच असते असे नाही पण ते घरी त्रास देणे बंद करतात काही काळ ) व या पुढे चांगला वागेन असे वचन दिले . मनाशी देखील मी हे ठरवले होते की आता एखादी नोकरी शोधली पाहिजे जेणेकरून आपला खर्च आपल्याला स्वतःला करता येईल .

    माझा ऐक जिवलग मित्र होता भीमा डावरे म्हणून तो विष्णुनगर च्या पलीकडे असलेल्या दलित वस्तीत राहत असे , आठवी पासून तो माझा मित्र होता . भीमाचे वडील लहानपणीच गेले होते , मोठा भाऊ व त्याच्या पत्नी मुलांसोबत भीमा व त्याची आई राहत असे . मोठा भाऊ प्रेस मध्ये नोकरीला होता मात्र त्याच्या भावाला एकंदरीत ५ मुली होत्या व तुटपुंज्या पगारात सर्व कारभार चालला होता . भीमा जरी माझ्यासोबत नेहमी राहत असला तरी त्याचे ऐक वैशिष्ट्य असे की त्याने आमच्या कोणत्याही मवाली पणात अथवा व्यसनात भाग घेतला नव्हता , उलट तो आम्हाला समजावून सांगे व्यसन करू नका म्हणून , आम्ही त्याला अनेकवेळा अनेक प्रकारे व्यसनाचा आग्रह करूनही तो सोवळा राहिला होता .कित्येक वेळा तो कुतूहल म्हणून आमची चिलीम साफ करून देत असे , किवा एखादे वेळी सिगरेट मध्ये गांजा भरून देत असे पण कधी त्याने व्यसन केले नाही हे कौतुकास्पद होते

    म्हणजे आम्ही सगळे मित्र व्यसनी आणि सतत आमच्यात राहूनही स्वतःला कोणतेही व्यसन न लावून घेतलेला भीमा म्हणजे ऐक आश्चर्य होते . भीमा नेहमी माझ्या घरी आभ्यास वगैरे निमित्ताने असायचा , आईने मला सांगितलेली अनेक कामे मी भिमावर ढकलत असे , उदा . सिलेंडर साठी नंबर लावणे , दुकानातून किराणा समान घेऊन येणे वगैरे . आई नेहमी म्हणत असे की तुझ्याऐवजी भीमा माझा मुलगा हवा होता इतका प्रेमळ आणि नम्र व गुणी होता तो .( गेल्या अनेक वर्षात भीमा भेटलेला नाही , तो मुंबई ला कोणत्यातरी कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे असे समजले आहे ).

    तर या भीमा सारखे आता वागायचे असे मी ठरवले होते व तसे वचन देखील दिले होते सर्वाना . दुसऱ्या दिवशी पासून मी भिमासोबत नोकरी शोधू लागलो , अर्थात नोकरी शोधण्याच्या निमित्ताने व आता चांगला वागतो असे म्हणून आईकडून थोडेफार पैसे उकळतच होतो व त्यात नशा भागवत होतो कसातरी .त्या पोलीस स्टेशनच्या प्रकरणानंतर मोठा भाऊ मला जरा टरकूनच होता , त्याला जरी नंतर मी काही बोललो नव्हतो तरी त्याच्या मित्रांनी बहुधा त्याला शहाणपणाचा सल्ला दिला असावा की तू तुषार च्या भानगडीत पडू नकोस , तो उगाच तुला काहीतरी इजा करेल ,त्यामूळे असावे कदाचित तो आता माझ्या बाबतीत फारसे बोलत नसे अर्थात त्याची माझ्यावर नजर होतीच फक्त त्याने बोलणे कमी केले होते इतकेच .

    एकदा अशीच ऐक जाहिरात आली होती स्थानिक दैनिकात ' प्रचारक हवेत ' या आशयाची . नाशिक मध्ये उंट छाप बिडीचे उत्पादन होते त्याचे मालक बस्तीराम नारायणदास सारडा हे होते , त्या समूहाची ही जाहिरात होती ' उंट ' छाप बिडी चा गावोगावी प्रसार आणि प्रचार व विक्री वाढवण्यासाठी हे ' प्रचारक पद ' होते , त्यात उमेदवाराला गायन , अभिनय , ई बाबतीत प्राविण्य असावे असा उल्लेख होता म्हणून मी भीमा सोबत तेथे मुलाखतीला गेलो श्री . पाडेकर साहेब म्हणून होते मुलाखत घ्यायला ( हे पाडेकर नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात वावरणारे होते ) मुलाखतीच्या वेळी त्यांनी मला कविता म्हणून दाखव , गाणे म्हणून दाखव , कविता कर , असे प्रश्न विचारले तसेच एखादा अभिनय करून दाखवण्यास सांगितले मी त्यावेळी त्यांना नट सम्राट मधील ' घर देता का कुणी घर ' हा भाग करून दाखवला होता . त्यांनी लगेच माझी निवड केली प्रचारक पदासाठी . भीमा त्या वेळी एका ठिकाणी पार्टटाईम नोकरी करतच होता त्यामूळे त्याने काही मुलाखत दिली नाही . तर आता मी नोकरी करणार होतो , चांगला वागणार होतो भीमा सारखा म्हणून घरची मंडळी खुश होती . कामावर हजर व्हायला अजून ऐक आठवडा बाकी होता तो पर्यंत मग आईकडून निर्विघ्न पैसे मिळत गेले मला .

    मी व्यसन बंद केले नव्हते तर फक्त आता जरा सांभाळून व्यसन करत होतो इतकेच , आईने देखील घडल्या प्रकारचा धसका घेतला होता म्हणून ती मला बिनदिक्कत पैसे देत असे . माझ्या नोकरीचा दिवस उजाडला आणि मी सकाळी सकाळी मी माझा ब्राऊन शुगर चा डोस घेऊन कामावर हजर झालो पहिल्या दिवशी मला फक्त कामाचे स्वरूप समजावून सांगण्यात आले , नंतर सातपूर येथे असलेल्या उंट बिडीचे उत्पादन जेथे चालते तेथील कारखान्यात नेण्यात आले , बिडीची पाने वळून त्यात तंबाखू कशी भरली जाते , तंबाखूवर कशी प्रक्रिया होते ते सारे मी पहिले . मग उद्या पासून तुला मलकापूर येथे प्रशिक्षणासाठी जावे लागेल असे सांगितले गेले . प्रशिक्षण म्हणजे उंट विडीचा प्रचार करणारी ऐक व्हँन होती त्या व्हँन सोबत मला जायचे होते त्या गाडीवर वर भोंगे लावलेले होते , ऐक मँनेजर , ऐक प्रचारक , ऐक सहायक , चालक आणि त्याचा सहायक अशी टीम सुमारे १ आठवडा ते १५ दिवस अश्या दौऱ्यावर जात असे , त्या दोऱ्यात गावोगावी जाऊन उंट बिडीचा प्रचार करणे , तेथील व्यापाऱ्यांना बिडी सप्लाय करणे , विक्री वाढण्यास मदत करणे असे काम असे , सगळी टीम एखाद्या स्थानिक लॉज वर मुक्काम करत असे , आम्हाला जेवणाचा भत्ता मिळत असे . मी ज्या गाडीबरोबर प्रशीक्षणासाठी जाणार होतो त्या गाडीचे व्यवस्थापक आणि प्रचारक यांच्याशी माझी ओळख करून देण्यात आली , त्यांनी मला त्यांचे काही अनुभव सांगितले . व दुसऱ्या दिवशी मी प्रशिक्षणासाठी जाण्यास सज्ज झालो . रात्रीच माझा ब्राऊन शुगर चा दोन दिवसांचा स्टॉक मी घेऊन ठेवला होता .

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

  • धोका फुफ्फुसाच्या कर्करोगाचा

    धूम्रपान हे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. सिगारेटच्या धूरातील कार्सिनोजेन्समुळे हा कर्करोग जडतो. हा कर्करोग जडल्यानंतर रुग्ण वाचण्याची शक्यता अत्यल्प असते. निदानानंतर या कर्करोगाचे साठ टक्के रुग्ण वर्षभरातच मृत्यूमुखी पडतात. या व्याधीपासून दूर राहायचे असेल तर ताबडतोब धूम्रपान सोडायला हवे.

  • नवर्‍याची रांगोळी !!

    बायको माहेरी गेल्यावर आज सकाळी नवर्‍याने काढलेली रांगोळी.

    p-28514-navaryachi-rangoli

  • उत्खनन ..मंथन ! (बेवड्याची डायरी – भाग ३६ वा)

    फळ्यावर सरांनी " आम्ही निर्भय होऊन आमच्या गतजीवनातील नैतिकतेचा शोधक आढावा घेतला " असे वाक्य लिहिले होते .." मित्रानो या पूर्वी अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या पहिल्या तीन पायऱ्या तसेच " फक्त आजचा दिवस ' या बाबत चर्चा केली आहे..ज्यात दारू तसेच अन्य मादक पदार्थांबाबत असलेली आपली मानसिक आणि शारीरिक गुलामी मान्य करत ...आपले जीवन कसे अस्ताव्यस्त झालेय हे पाहण्याचा प्रयत्न केलाय ..दुसऱ्या आणि तिसऱ्या पायरीत या संपूर्ण विश्वात सुसूत्रपणे कार्यरत असलेल्या ईश्वरी अथवा नैसर्गिक शक्तीची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत ..यापुढे आपले जीवन या शक्तीच्या नियमानुसार किवा या शक्तीची मदत घेवून जगण्याचा निश्चय केलाय ..थोडक्यात सांगायचे तर आपल्याला स्वता:च्या इच्छेने जीवन व्यतीत करता यायला हवे हा अट्टाहास सोडून... ईश्वरासमान असलेले माझे नातलग ..शुभचिंतक ..यांच्या सूचना व सल्ल्याने जगण्याचा तसेच निसर्गनियम पाळण्याचा निश्चय केला आहे ...

    ' फक्त आजचा दिवस ' या संकल्पनेत रोज एक दिवस या तत्वाने कोणतेही मादक द्रव्य अथवा दारू सेवन न करता आपल्या चंचल मनाला कशी शिस्त लावता येईल ..आपली वैचारिक ..भावनिक व कृतीशीलते बाबतची अस्ताव्यस्तता ..बिघडलेपण कसे दूर करता येईल ते पहिले आहे ..आज आपण अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या चवथ्या पायरीवर चर्चा करणार आहोत ..ज्यात मला आत्मपरीक्षण ...आत्ममंथन ..आत्मचिंतन करण्यास सुचवले गेले आहे ..केवळ व्यसने बंद करून माझे काम भागणार नाही ...तर पुन्हा व्यसने सुरु होऊ नयेत या करिता ..माझ्या अंतर्मनात व्यसनांची ओढ कशी व का निर्माण झालीय हे बघत ..व्यसनांमुळे किवा माझ्या व्यक्तिमत्वातील स्वभावदोषांमुळे माझ्या गतजीवनात मी कसे बेताल वर्तन केले आहे ..हे शोधून पुढे माझे स्वभावदोष व्यक्तीमत्वातून हद्दपार करत ' आत्मशुद्धी ' ची प्रक्रिया सुरु होणार आहे.." असे सांगत सरांनी चौथ्या पायरीची प्रस्तावना केली .

    " फळ्यावर लिहिलेल्या वाक्यात निर्भयता हा शब्द आधी आलाय ..म्हणजे ' आत्मपरीक्षण ' करण्यासाठी निर्भयतेची गरज आहे हे स्पष्ट सांगितलेय ..कारण मानवी मन असे आहे की ते कधीच स्वतःहून स्वता:च्या चुका शोधण्याचा प्रयत्न करत नाही ....पत्येक व्यक्तीचा मनात त्याच्या चुकीच्या वर्तनाचे समर्थन करणारा हुशार वकील दडलेला असतो ..हा वकील नेहमी ' मी कसा चूक नाही ' हे स्वतःला तसेच इतरांना पटवून देण्यात मग्न असतो .. माझ्या तुलनेत इतर लोक कसे जास्त चुका करतात ..अपराध करतात ..गुन्हे करतात हे सांगत जातो ..प्रसंगी स्वतःच्या चुकांसाठी इतर लोक अथवा परिस्थिती कशी जवाबदार आहेत असे दोषारोप देखील करतो ..स्वताच्या अंतरंगात पारदर्शकतेने व तटस्थपणे डोकावून बघण्यास खरोखर निर्भय व्हावे लागते ..

    या अंतरंगात काम , क्रोध , लोभ , मद , मोह , मत्सर या विकारांमुळे सतत.. अशांती ..अस्वस्थता ..असमाधान निर्माण होत असते ..माझ्या गतजीवनात या विकारांमुळे मी अनेकदा ..माझे संस्कार ..थोरांनी शिकवलेली नैतिकता ...कायद्याने घातलेली बंधने ..कौटुंबिक व सामाजिक बंधने कशी लाथाडली याचे उत्खनन करण्याचा चौथ्या पायरीत प्रयत्न आहे ..केवळ व्यसन सुरु झाल्यापासून नाही तर मला समजायला लागल्यापासून अथवा मला आठवते आहे तेव्हा पासूनचे माझे विचार ..भावना ..वर्तन याची नैतिकतेच्या कसोटीतून तपासणी करायची आहे ..आपल्या अंतरंगातील समर्थनाचा ..इतरांवर दोषारोप करणारा वकील बाजूला करण्यासाठी निर्भयता असावीच लागते..
    सर हे सगळे बोलत असताना आम्ही त्यांच्या तोंडाकडे नुसतेच पाहत होतो ..बापरे !.. हे सगळे सहज सोपेपणाने समजण्यासारखे नव्हतेच मुळी..आमची अवस्था सरांच्या लक्षात आली असावी ..ते हसून म्हणाले .." बरेच जड जड शब्द वापरले आहेत वाटते मी ..कारण सगळ्यांचे चेहरे मख्ख वाटत आहेत..हे काय नवीन लफडे असेच भाव दिसत आहेत तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर .." आम्ही सगळे हसलो ..' घाबरू नका ही आत्मपरीक्षणाची प्रक्रिया आहे ..माझ्या आत दडलेल्या समर्थनाच्या वकिलाला हाकलून लावून .. मी वेळोवेळी कसा चुकला आहे हे तपासताना कंटाळा येणारच ..आत्मपरीक्षण करायचे म्हणजे नेमके काय करायचे हा प्रश्न पडेल ..कारण आपल्याला स्वता:च्या ऐवजी इतरांच्या वागण्याचे परीक्षण करण्याची सवय लागली आहे ..माझ्या तुलनेत जगात जास्त पापी ..अनैतिक वर्तन करणारे लोक आहेत ..दारू प्यायलो म्हणजे मी काही फार मोठा गुन्हा केलेला नाहीय ..असे वाटेलच ..

    शिवाय नैतिकता म्हणजे नक्की काय ? हा पुढचा प्रश्न आहेच ..कारण आजवर आपण जे करत आलोय ते नैतिक आहे किवा अनैतिक आहे याचा आपण कधीच विचार केला नव्हता ..मी माझ्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांनुसार वर्तन करत गेलो ..मी जे करतो ते नैतिक आहे किवा नाही याबाबत कधीच सावधगिरी बाळगलेली नाही ..आता हे सर्व शोधायचे कसे ? शोधून काय फायदा ? असे प्रश्न मनात उद्भवतील ...ज्या वर्तनाला अथवा कर्माला सर्व संतांनी वाईट म्हंटलेले आहे ..समाजात ज्या प्रकारच्या वर्तनाला वाईट समजले जाते ..कायद्याने ज्या प्रकारच्या वर्तनाला बंधने बंधने घातली आहेत ..अशी सर्व बंधने तोडून मी माझ्या आनंदासाठी ..इच्छापूर्तीसाठी ..कसा वागलोय हे शोधायचे आहे ..त्यात ..खोटे बोलणे ..इतरांच्या भावना दुखावणे ..हिंसा ..इतरांवर अन्याय करणे ..भ्रष्टाचार ..चोरी ..लबाडी ..टोपीबाजी ..विश्वासघात ..आर्थिक अफरातफर ..वगैरे प्रकारचे सगळे वर्तन तपासायचे आहे ..कठीण आहेच थोडे ..कारण माझ्या वर्तनाबाबत मी स्वतःचा उत्तम वकील असतो व इतरांच्या वर्तनाबात मी न्यायधीश बनतो ...इतरांना कशी शिक्षा झाली पाहिजे ..त्यांनी किती घोर अपराध केलंय हे लगेच ठरवून त्यांना शिक्षा व्हावी अशी कामना करतो ...मात्र स्वतःची वेळ येताच मला ..मी किती गरीब ..बिच्चारा ..निष्पाप आहे असेच वाटते....

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

    " मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
    संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५

  • बडबड गीत !

     

  • ऐरणीच्या देशा

    प्रत्येक व्यक्ती ही कुटुंब, गाव / शहर व देश यांची घटक असते. आपले दैनंदिन जीवन व्यतित करीत असताना आपण काही नियमांनी या तिन्ही पातळींवर बांधलेले असतो. आयुष्यात संधी तसेच समस्या, अडचणी प्रकट होत राहतात. परिस्थितीचे आकलन करून आपण संधीचा वापर करतो तर अडचणींचे निराकरण करतो. हे करत असताना नियमांच्या चौकटीत राहावे लागते. कुटुंबाचे नियम असतात, शहर व देश यांचे कायदे असतात. स्वतः व कुटुंब या पातळीवर, बाधित घटक व निर्णय घेणारे घटक मर्यादित असतात. पण गाव / शहर आणि देश या पातळीवर जेव्हा समस्या उद्भवतात, तेव्हा अनेक अंगांनी विचार करावा लागतो. उपायांची अंमलबजावणी योग्य प्रकारे करावी लागते.

    समस्यांचे निवारण करताना आपण योग्य तेथून मदत घेतो. उदाहरणार्थ, आजार, दुखणे यासाठी डॉक्टरांची मदत, दुरुस्तीसाठी तंत्रज्ञाची मदत आपण घेत असतो. दृष्टीदोष बारा करण्यासाठी आपण हृदयरोगतज्ञाकडे जात नाही, तो डॉक्टर असला तरी. आपल्याला डोळ्यांनी नीट दिसत नाही ही समस्या वैयक्तिक पातळीवर ओळखणे सोपे असते. पण शहरापुढील अडचणींचे मूळ कशात आहे हे सहजासहजी समजू शकत नाही. व्यापक विचार करून ते शोधावे लागते. एकदा ही निश्चिती झाली की उपाय ठरविता येतात. आपल्या देशात समस्या अगणित आहेत. त्यामुळे गुंतागुंत जास्त आहे. काही बाबतीत समस्येचं मूळ शोधणं सोपं नाही. जिथे समस्या व तिचे मूळ सुस्पष्ट आहे तिथे तरी उपाय लागू पडल्याचे दिसले पाहिजे. पण पुष्कळ ठिकाणी अंमलबजावणी तोकडी पडते. कारणे काहीही असोत. उत्तरदायीत्व न जुमानणारे हे अशा उपायांना बाधा आणतात.

    जिथे समस्या व तिचे मूळ याविषयी संदेह असतो तिथे, थातुरमातुर उपायांची मलमपट्टी केली जाते. काहीतरी कृती घडते आहे असे भसविले जाते. यामुळे अशी परिस्थिती काही काळाने पुन्हा उद्भवते. मराठी पत्रकारितेत याची, "... प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे" अशी बातमी बनते. ही ऐरण अनेक प्रश्नांना आपल्या पाठीवर वागवीत असते. रंगमंचावर जसा संवाद म्हणणार्‍या कलावंतावर प्रकाशझोत पडतो, तसा वेगवेगळा प्रश्न प्रकाशझोतात येत राहतो. आपली भूमिका झाली की कलाकार मंचावरून 'Exit' घेतो. पण ऐरणीवरच्या प्रश्नांना 'Exit' चा दरवाजा सहसा दिसत नाही.

    'ऐरण' या शब्दाचा जोडीदार आहे 'घण'. हे दोघे एकमेकावाचून निरुपयोगी. ऐरणीवर असलेल्या प्रश्नावर योग्य जागी घण पडला तर उपाय यशस्वी होऊ शकतो. पायाला गँगरीन झाले असताना हात कापणे हा उपाय असु शकत नाही. तसे झाले तर घाव भलत्याच ठिकाणी पडला असे म्हणावे लागेल. 'आग रामेश्वरी व बंब सोमेश्वरी’ हा वाक्प्रचारही पत्रकारितेत खूप प्रसिद्ध आहे. आपल्या देशात या दोन वाक्प्रचारांचा वापर करता येण्यासारखी परिस्थिती वारंवार उद्भवते. उदाहरणार्थ, '... घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे', '... बुडून झालेल्या मृत्यूंमुळे जलपर्यटन पुन्हा ऐरणीवर आले आहे', '... पेपरफुटीमुळे बोर्डाच्या क्षमतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे'. अशा असंख्य घटना सर्व क्षेत्रांना स्पर्शून जातात. घण व ऐरण यांची जिथे भेट होते तिथे समस्येचं योग्य कारण असलं तरच उपयोग असतो. समस्या तशीच राहण्याची कारणं पुढीलप्रमाणे असु शकतात.

    १. समस्येचं मूळ समजलेलं नाही, त्यामुळे घावही नाही (अज्ञानात आनंद).

    २. समस्येचं मूळ समजलेलं आहे, पण उपाय शोधण्याची इच्छा नाही (वैचारिक दारिद्र्य).

    ३. समस्येचं मूळ समजलेलं आहे, उपाय करण्याची इच्छा आहे, पण घाव वर्मी बसत नाही (सदोष अंमलबजावणी).

    ४. समस्येचं मूळ समजलेलं आहे, पण उपायाचं नाटक करायचं आहे. समस्या ऐरणीच्या एका बाजूला व घाव दुसरीकडे पडत आहे (उपायाचा आभास).

    पावसाळ्यात मुंबईत ठराविक ठिकाणी पाणी साचणे, रेल्वे रुळ पाण्याखाली जाणे या गोष्टी दरवर्षी घडाव्याच लागतात. बोअरवेलमधे लहान मूल अडकणे, सेलिब्रिटीजना विशेष सवलती मिळणे यांची बातमी व्हावीच लागते. त्यांना ऐरणीवर यावेच लागते. काही प्रश्न सोडविण्यासाठी नसतात. तसे झाले तर काम काय राहील घण मारणाराला?

    अव्यवस्था दूर केली तर सामान्याचे जीवन सुखी होईल, पण अव्यवस्थेमुळे ज्यांना रोजगार मिळत होता ते बेकार होतील. गुटका खाउन कितीही मेले तरी चालतील, पण गुटक्याचा कारखाना बंद झाला तर जे बेकार होतील त्यांचे काय? रस्ते चांगले झाले तर गॅरेज कशी चालतील? गाडीचे सुटे भाग बनविणारांनी काय करायचं? शाळेतच शिक्षण मिळालं तर क्लासवाले उपाशी राहतील त्याचं काय? अशा प्रकारे एक प्रश्न सोडवताना दुसरा उद्भवेल. म्हणजे प्रश्न आहेच. ‘मग आहे तो प्रश्न तसाच राहिला तर काय बिघडले’ ही वृत्ती बळावते आहे. अशा परिस्थितीत गळ्याशी आल्यावर धावाधाव करणे आले. आपल्या देशापुढील समस्या कोणत्या क्रमाने व कशा सोडवायच्या हा मोठा प्रश्न आहे. सुजाण नागरिकत्व अंगी बाणल्याशिवाय कोणतेही उपाय निरुपयोगी ठरतील, आणि हेच सर्वात कठीण आहे.

    खूप वर्षांपूर्वी ‘साधी माणसं’ या मराठी चित्रपटातील एक गीत प्रसिद्ध झाले, ‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहु दे ...’. पण आता, ‘ऐरण, घण व समस्या’ यांचा समन्वय साधता आला नाही तर म्हणावे लागेल, ‘ऐरणीच्या देशा तुला प्रश्न प्रश्न पडू दे ...’.

    - रवि गांगल

  • स्वारगेट ते अमेरिका..

    जायचंय अमेरिकेला.. पण विमानतळ सोडून भलतीकडेच पोचलेय स्वारी......

    p-16393-swargate-te-america

  • लाईफबोट

    लाईफ बोट दोन प्रकारच्या असतात फ्री फॉल आणि डेव्हीट लाँच टाईप. इमर्जन्सीमध्ये मग जहाजावर लागलेली आग असो किंवा जहाज बुडत असेल अशा परिस्थितीत कॅप्टन अबँन्डड शिप म्हणून घोषणा करतो आणि सगळे जण जाऊन लाईफ बोट मध्ये बसतात. लाईफ बोट खराब हवामानात हलू नये, खाली पडू नये म्हणून जहाजावर विशिष्ट पद्धतीने हुक आणि सेफ्टी सिस्टिम लावून अडकवून ठेवलेली असते. लाईफ बोट मध्ये बसण्यापूर्वी प्रत्येकजण त्याच्या पूर्व निर्देशित ड्युटी प्रमाणे सेफ्टी सिस्टिम आणि हुक काढून बसतात. सगळे आत बसल्यावर कॅप्टन किंवा अजून एखादा जवाबदार अधिकारी लाईफ बोट मधून काढावा लागणारा शेवटचा हुक काढतो ज्यामुळे लाईफ बोट जहाजावरुन पाण्यात उतरवली जाते. फ्री फॉल लाईफ बोट पाण्यात उतरवली जात नाही, ही जहाजाच्या सगळ्यात मागील भागात असते. तिचा हुक आतून रिलीज केला की सुमारे चाळीस फुटांवरून जहाजावरील संपूर्ण क्रू सह ती खाली पाण्यात पडते. सगळ्यांसह उंचावरून पडून पाण्यात डुबकी मारून पुन्हा वर यावी अशी तिची रचना असते.

  • प्रेमःएक आठवणींची कविता. क्रमशः पुढे चालू….

    प्रेमःएक आठवणींची कविता. क्रमशः