(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • कॉपीमुक्तीचे दिवास्वप्न

    दहावी-बारावीच्या परीक्षांमधील कॉपीचे वाढते प्रकार रोखणे हे मोठे आव्हान आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने काही नवे उपाय सुचवले. त्यात विद्यार्थ्यांनी कॉपीविरोधातील शपथ घेणे तसेच कॉपी करणार्‍यांवर कठोर कारवाई यांचा समावेश आहे. पण, या उपायांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाल्यावरच कॉपीमुक्तीचे स्वप्न प्रत्यक्षात येईल.

  • न्यूयॉर्क शहरातील इम्पीरियल थिएटर

    इम्पीरियल थिएटर हे न्यूयॉर्क शहरातील मिडटाउन-मॅनहॅटन मधील २४९ वेस्ट ४५ व्या रस्त्यावर (जॉर्ज अबॉट वे) वर स्थित एक ब्रॉडवे थिएटर आहे. थिएटरमध्ये १४१७ इतकी आसन क्षमता आहे.

  • प्रिटोरिया – माझा सर्वोत्तम काळ – भाग १

    Standerton इथली खेळी संपली!! ती संपत असताना मला प्रिटोरियामध्ये नवीन नोकरी मिळाली होती पण ती join करण्याआधी, मी भारतात सुटीवर यायचे ठरले. येताना, मनात विचार आला, सुटीवर येत आहे तर महिंद्र कंपनीत “खडा” टाकून बघूया!! नाहीतरी महिनाभर तसा उद्योग नव्हता. महिंद्रने नुकताच साउथ आफ्रिकेत बिझिनेस सुरु केला होता, तेंव्हा त्यांना माणसांची गरज तर लागणारच, असा हिशेब मांडून एका मित्राच्या ( तो तिथे पूर्वी नोकरीला होता!!) ओळखीने, तिथल्या P.N.Shah या माणसाला भेटायला गेलो. वास्तविक,हातात नोकरी असल्याने,तसा जाताना बराच आत्मविश्वास होता. सुदैवाने, लगेच भेट मिळाली. प्राथमिक बोलणी चांगली झाली आणि साउथ आफ्रिकेहून पुढील आठवड्यातच, तिथला C.E.O. विजय नाक्रा आणि C.F.O. हेतल शाह इथे काही कामानिमित्त येणार आहेत, तेंव्हा त्यांच्याशी भेट घेऊन, पुढे ठरवायचे, असे ठरले. P.N.Shah बरोबर,सचिन आरोलकर म्हणून वरिष्ठ अधिकारी होता आणि त्याच्याबरोबर मला संधान बांधायचे ठरले. पुढील आठवड्यात, महिंद्र कॉर्पोरेट ऑफिसमध्येच माझी मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्येच नोकरी पक्की झाल्याचे ठरले.
    अर्थात, भारतातली सुटी आनंदात गेली, तेंव्हा मी प्रिटोरिया शहरातील “लोडीयम” या उपनगरात रहात होतो. हेतलने, मला सांगितले की जसा, साउथ आफ्रिकेत येशील,तशी त्याला लगेच फोन करायचा. त्याप्रमाणे, जसा सकाळी मी, लोडीयम इथे पोहोचलो,तशी लगेच त्याला फोन केला. तोपर्यंत,मी “सेंच्युरीयन” हा भाग पाहिला देखील नव्हता आणि इथे, विशेषत: फ्रीवेवर रस्ता चुकला तर कमीत कमी १० किलोमीटरचा फटका!! त्यामुळे, त्याच्याकडून ऑफिसचा पत्ता व्यवस्थित घेतला आणि निघालो. वास्तविक रात्रभरचे विमान प्रवासाचे जागरण डोळ्यांवर होते तरीही महिंद्रमधील नोकरी, ही बाब मला उल्हसित करीत होती.प्रिटोरियामधील एक अतिशय सुंदर उपनगर म्हणजे सेंच्युरीयन!! क्रिकेटचे प्रसिद्ध स्टेडीयम इथलेच!!
    ऑफिसला गेलो त्यावेळी हेतल बाहेर गेला होता. त्याने, श्रीधर म्हणून एक कर्मचारी होता, त्याला भेटायचे, असा निरोप ठेवला होता. श्रीधर देखील, महिंद्र कॉर्पोरेट ऑफिसमधून इथे ट्रान्स्फर झालेला, माझ्यापेक्षा तरुण आणि हसमुख!! वास्तविक, मी पोहोचलो तेंव्हा जेवायची वेळ झाली होती तेंव्हा श्रीधर आणि मी बाहेर जेवायला गेलो. परत आलो, तेव्हढ्यात हेतल आला आणि माझ्या कामाचे स्वरूप नक्की झाले. रात्री परत गाडी घेऊन लोडीयममध्ये, मित्राच्या घरी!! परंतु, आता सेंच्युरीयन इथे नोकरी करायची म्हणजे तिथेच घर शोधणे आवश्यक!!
    रोज, साधारणपणे १०० किलोमीटर प्रवास करणे तसे कंटाळवाणे!! सुदैवाने, जिथे ऑफिस होते, तिथेच इको पार्क मध्ये घर मिळाले आणि लगेच shift झालो. साउथ आफ्रिकेत मी बऱ्याच शहरात राहिलो परंतु या Complex सारखी जागा त्यापूर्वी आणि नंतर कधीच मिळाली नाही. सुरक्षा व्यवस्था तर तोंडात बोट घालावी अशा दर्जाची, complex च्या समोर मॉल त्यामुळे खरेदी करायला जास्त लांब जायला नको!! वास्तविक, हा भाग अतिशय सधन लोकांच्या वस्तीचा आहे. त्यामुळे Infrastructure इतके सुरेख की मला भेटायला येणारी व्यक्तीदेखील खुश व्हायची.
    Complex चा स्वत:चा क्लब, पोहायचा तलाव, टेनिस कोर्ट (एकाचवेळी ३ सामने होऊ शकतील इतके मोठे) इत्यादी सोयी होत्या. समोरच्या मॉलमध्ये आयरिश पब, इटालियन हॉटेल्स आणि अर्थात Shoprite, Woolworth सारखी प्रचंड दुकाने. अर्थात, इथे मलाच घर घ्यायचे असल्याने, थोडेफार फर्निचर घेणे जरुरीचे होते, तसे लगेच घेतले. आता, ऑफिस आणि घर एकाच गल्लीत असल्याने, मला फारच सोयीचे झाले. Infrastructure वरून आठवण झाली, इथले रस्त्यांचे Planning इतके चोख असते की कॉम्प्लेक्समध्ये गाडी चालवायची तरी ३०, ४० च्या वेगाने नेता येते!! ऑफिसमध्ये, आम्ही भारतातून आलेले ५ जण आणि मी सहावा, वगळता बहुतेक सगळे गोरे!!
    त्यातील काहीजण तर आजही माझ्या संपर्कात आहेत, इतके की अधूनमधून आमचे फोनवर बोलणे होते, खासकरून, Natasha, James, Wendi यांच्याशी अजूनही चांगला संपर्क आहे. अर्थात, नेहमीप्रमाणे,सुरवातीला सगळेच असतात पण ओळख झाली की मग, मात्र मैत्री चांगली घट्ट होते. विशेषत: मी सेंच्युरीयन इथे नवीन आहे, म्हणून जेम्स मला त्याच्या गाडीतून हिंडवीत असे. मुंबईच्या मानाने प्रिटोरिया तसे लहान शहर आहे परंतु राजधानीचे शहर असल्याने देशात या शहराला राजकीय महत्व अधिक!!
    इतकी वर्षे, मी, मकरंद फडकेशी फोनवर बोलत असे परंतु आता तो जोहान्सबर्ग इथे रहात असल्याने, भेटीगाठी होण्याच्या शक्यता वाढल्या आणि पुढे तशा भरपूर झाल्या देखील. तसेच, जोहान्सबर्ग इथे माझा पुर्विचा मित्र,विनय असल्याने, त्याच्याशी भेटणे देखील व्हायला लागले. मकरंद तर इथे, याच शहरात १९९४ पासून असल्याने, इथला veteran!! Standerton च्या मानाने इथे थंडीचे प्रमाण तसे कमी!! म्हणजे -३,४ इतके नसून १,२ इतके!! मकरंद गाठीभेटी वाढल्या तशी, त्याच्याबरोबरचे, सुहास ओक,वैभव पोरे, बंटी( शाह) या तरुण मित्रांशी ओळखी झाल्या. पुढे यात अशोक,राजेश असे थोडे वयस्कर मित्र येउन मिळाले. महिन्यातून एकदा भेटायचे,असा आमचा अलिखित झाला. तसे,कधीकधी १,२ आठवड्यातून देखील भेटायचो, भेटीचे ठिकाण शक्यतो एखादा मॉल, म्हणजे तिथे जेवण-खाणे आणि एखादा सिनेमा!! कधीकधी कुणाच्या घरी देखील भेटीगाठी व्हायच्या.
    मी, एक बाब स्पष्टपणे बघितली, म्हणजे आम्ही अंतराने भेटायचो, पण गप्पांचे विषय तसे ठराविक!! राजकारण हमखास, त्यातून इथे आम्हाला NDTV 24, हे Channel बघायला मिळत असल्याने,भारताच्या बातम्या अद्ययावत कळायच्या. मला तसा राजकारणाचा मुळातून कंटाळा!! त्यामुळे बरेचवेळा मी ऐकण्याची भूमिका बजावत असे!! इथे, तोपर्यंत आणि पुढे मराठी मंडळात सक्रिय सहभागी झालो,परंतु कुणालाही साहित्य,संगीत,वाचन अशा बाबतीत फारसा रस नसायचा त्यामुळे मला नेहमीच “कानकोंडे” व्हायचे. त्यातून, बरेचवेळा ऑफिस आणि “मी किती मोठा” या विषयावर गाडी यायची,आणि मला तर याचा तिटकारा!! माझे म्हणणे असे, आपण दिवसातला बराचसा वेळ ऑफिसमध्ये देतो, मग एकदा ऑफिस सुटल्यावर परत त्याच विषयाचे चर्वितचर्वण कशाला !! पण, हे सगळीकडे चालत असते, मीच misfit!!
    अर्थात, इथे आपल्याला बरीच भारतीय माणसे भेटत आहेत,याचाच खरा आनंद व्हायचा. त्यातून, सुहास ओकला संगीतात चांगली गती होती,पण फारशा गप्पा झाल्या नाहीत कारण आम्ही भेटायचो ते सगळे एकत्र !! इथले मराठी मंडळ मात्र चांगले आहे, अर्थात, अमेरिका/युरपच्या मानाने इथे फारशी मराठी मंडळी नाहीत परंतु जी आहेत, ती एकमेकांना धरून आहेत!! त्यातही एक बाब गमतीची, दर वर्षी मंडळाची कार्यकारिणी ठरवली जायची आणि त्यानुसार कार्यक्रम ठरवले जायचे. प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी होताना, कार्यकारी मंडळाचे सदस्य वगळता, ठराविक मंडळी (च) एकत्र यायची!! म्हणजे, जोहान्सबर्ग इथे जवळपास ३०० कुटुंबे आहेत पण कार्यक्रमाला येणाऱ्यांची संख्या असायची जास्तीतजास्त २० कुटुंबे!! प्रत्येकवेळेस काहीना काहीतरी कारणे ऐकायला ऐकायला मिळायची, काहीजण तर चक्क “टीका” करायचे!!
    तरीही, मी, राजीव तेरवाडकर, आदित्य, प्रशांत, विनय कुलकर्णी, मुसळे इत्यादी एकत्र जमत असू!! अर्थात, माझ्या सध्याच्या बातमीनुसार यात अजूनही फारसा फरक नाही. गंमतीचा भाग असा, एकीकडे “आमचे मराठी मंडळ” म्हणून ढोल वाजवायचा परंतु प्रत्यक्ष कार्यक्रमात मात्र, न येण्याची शेकडो कारणे सांगायची!! असे दुटप्पी वागणे, बरेचवेळा मनाचा त्रागा करायचे!! वास्तविक, आमचे कार्यक्रम वर्षाला ५ ते ६ इतकेच असायचे, प्रत्येक कार्यक्रमाची कमीतकमी दोन महिने आधी तयारी व्हायची तरीही आयत्या वेळेस, कार्यक्रमाकडे “पाठ” फिरवायची!!
    - अनिल गोविलकर

  • प्रेमःएक आठवणींची कविता. क्रमशः पुढे चालू…..

    प्रेमःएक आठवणींची कविता. क्रमशः ………….

  • सारसबाग गणपती

    पुण्याच्या सारसबागेत पेशव्यांनी बाग वसवली. तलाव खोदून त्यात पाणी सोडले, मधोमध एक बेटवजा जागा ठेवून त्यात बाग फुलवली.

  • भारतमातेच्या वीरांगना – 15 – झाशीची राणी

    मे १८५७ ला मेरठ मधून संग्रामला सुरवात झाली. झाशी अजूनतरी शांत होते. राणी लक्ष्मीबाईंनी आपले सैन्य उभे करायला सुरुवात केली. हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करून, स्त्री शक्तीला जागृत केले, त्यांना आणि इतर बांधवांना धैर्य दिले. झाशी सदैव स्वतंत्र राहील ह्याचे आश्वासन सुद्धा दिले. जुनमहिन्यात संग्रामच्या झळा झाशीपर्यंत पोचल्या. आधी शेजारी राज्य ओरछा आणि दातीया राज्याकडून आक्रमण आणि मग ब्रिटिश सैन्याचे आक्रमण. शेजारी राज्यांना पराभूत करून राणी इंग्रजांविरुद्ध च्या लढाईसाठी सज्ज झाल्या. त्यावेळी राणीने आपल्या सैन्याला, लोकांना सांगितले, ‘आपण युद्धाला सज्ज आहोत, जर जिंकलो तर विजयाचा आनंदोत्सव साजरा करू आणि जर हरलो तर आपल्याला आत्मिक आनंद नक्कीच मिळेल की आपण शरणागती पत्करली नाही.’

  • मुंबई – एक अस्वच्छ शहर आहे का ?

    जगातील अस्वच्छ शहरांच्या यादीत मुंबईचे नाव असल्याचे कोठेतरी माझ्या वाचनात आले आणि माझे मन बेचैन झाले.

  • ४ फेब्रुवारी – फेसबुकचा स्थापना दिवस

    इंटरनेटच्या प्रसारामुळे ‘हे विश्वची माझे घर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आली असली तरी या जगाला एका कुटुंबाप्रमाणे बनवण्याचे श्रेय जाते ते फेसबुकला. या सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करणा-यांची संख्या १८० कोटींहून अधिक असल्याने फेसुबक म्हणजे १८० कोटींहून अधिक लोकांचे एक कुटुंबच बनले आहे.

    आज ४ फेब्रुवारी रोजी या सोशल नेटवर्किंग साइटला १३ वर्षे पूर्ण होत असताना फेसबुक वापरणारे त्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असतात. कोणाला ते विरंगुळ्याचे साधन वाटते तर कोणाला ते जास्तीत जास्त लोक जोडणारे आणि काळाच्या ओघात विसर पडलेल्या मित्रमैत्रिणींना पुन्हा जवळ आणणारे साधन वाटते. मार्क झुकरबर्ग हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कने आपले वर्गमित्र डस्टिन मोस्कोविट्ज, एड्युअर्डो सार्विन आणि ख्रिस ह्युजेस यांच्या सोबत फेसबुकची स्थापना केली. ४ फेब्रुवारी २००४ रोजी आपल्या हार्वर्ड वसतीगृह खोलीत झुकेरबर्ग, फेसबुक सुरू केली आहे. विशेष म्हणजे मार्क झुकरबर्ग हा हार्वर्ड विद्यापीठाचा ड्रॉप आउट आहे. पण या फेसबुकची ताकद ओळखून मार्क झुकरबर्गने त्यामध्ये वेळोवेळी कल्पक बदल केले आणि त्यामुळे या सोशल नेटवर्किंग साइटची लोकप्रियता वाढतच गेली. इंटरनेटमुळे जग ख-या अर्थाने जवळ आले असले तरी फेसबुकमुळे जग घट्ट जोडले गेले हे मान्य करावेच लागेल. गेल्या काही वर्षात या सोशल नेटवर्किंग साइटने जी लोकप्रियता मिळवली, तशी लोकप्रियता दुस-या कोणत्याही नेटवर्किंग साइटला मिळालेली नाही. सध्या फेसबुकला ट्विटर आणि तशाच प्रकारच्या इतर नेटवर्किंग साइट्सकडून स्पर्धा निर्माण झाली असली आणि फेसबुकच्या आधीही तशा प्रकारच्या वेबसाइट्स निर्माण झाल्या असल्या तरीही सोशल नेटवर्किंग ही संकल्पना लोकांमध्ये इतक्या जास्त प्रमाणात रुजवणारी फेसबुक ही पहिली वेबसाइट आहे आणि या वेबसाइटची वाटचाल थक्क करणारी आहे. एकुण १२ देशात फेसबुकची कार्यालयं आहेत. फेसबुकला मिळणाऱ्या जहिरातींमुळे फेसबुकला विनामुल्य सेवा देणं शक्य झालं आहे. झुकरबर्ग चा साधेपणाच हे त्याचे वैशिष्ट्य ठरले आहे. १८ मे २०१२ ला फेसबुकने सामान्य माणसाठी फेसबुकचे शेअर्स काढले आणि या शेअर्स नी बाजारात धुमाकूळ घातला. या शेअर्स मुळे फेसबुकला करोडोचा फायदा झाला. फेसबुकच्या कर्मचाऱ्यांची संख्या स्थापना झाली तेव्हा ४ होती आता ती १२ हजार ६०० च्या वर आहे.

    कॅलिफोर्नियातल्या ‘मेन्लो पार्क’ इथं फेसबुकचं मुख्य कार्यालय आहे. गेल्या दोन वर्षात , फेसबुकने प्रचंड प्रतिष्ठा प्राप्त केले आहे. असा सामान्यातला असामान्य मार्क झुकरबर्ग आजच्या तरुण पिढीसाठी खराखुरा आयडल आहे. कंपनीत मार्क झुकेरबर्गची भागीदारी २४ टक्के, एसेल पार्टनरची १० टक्के, डिजिटल स्काय टेक्नॉलॉजीची १० टक्के, डस्टिन मोस्कोव्हिट्झची ६ टक्के, इडुअर्डो सॅव्हेरिनची ५ टक्के, सिएन पार्करची 4 टक्के, पीटर थिएलची ३ टक्के, ग्रेलॉक पार्टनर्सची १ ते २ टक्के, मायक्रोसॉफ्टची १.३ टक्के, ली का शिंगची ०.७५ टक्के व इंटरपब्लिक ग्रुपची ०.५ टक्के भागीदारी आहे. २४ ऑक्टोबर २००७ रोजी बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने फेसबुकमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी फेसबुकचे १.६ टक्के समभाग २४ कोटी डॉलरला विकत घेतले. याशिवाय माजी कर्मचारी व सेलेब्रिटिजचीही भागीदारी आहे. फेसबुकला सर्वाधिक महसूल जाहिरातींद्वारे मिळतो. मायक्रोसॉफ्ट फेसबुकची एक्क्लुसिव्ह पार्टनर असून ती कंपनीसाठी बॅनर अॅ डव्हर्टायझिंग करते. २००६ मध्ये कंपनीचा महसूल जवळपास ५२ अब्ज डॉलर होता. पुढील वर्षी १८८ टक्के वाढीसह तो १५० अब्ज डॉलरवर पोहोचला. २०१६ मध्ये महसूल २७६ अब्ज डॉलर आहे. २००८ साली इंग्लंडमधील १०२ वर्षे वयाच्या इव्ही बिन यांनी फेसबुकवर अकाउंट उघडले होते. त्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी फेसबुकवर अकाउंट उघडले. बिन या ट्विटरच्या सर्वाधिक वयाच्या उपयोगकर्ता होत्या. फेसबुकवर त्यांचे ४ हजार ९६२ मित्र, तर ट्विटरवर ५६ हजारांहून अधिक पाठीराखे होते. जुलै २०१० मध्ये त्यांचा मृत्यू झाला. फेसबुकवर त्यांच्या सन्मानार्थ अनेक फॅन पेजेस बनवण्यात आले.

    फेसबुकवर एका उपयोगकर्त्याचे सरासरी १३० मित्र असतात आणि तो दर महिन्यास किमान ८ लोकांना मैत्रीचे आवाहन करतो.

    १ ऑक्टोबर २०१० रोजी डेव्हिड फिन्चर दिग्दर्शित ‘द सोशल नेटवर्क’ चित्रपट प्रदर्शित झाला. तो मार्क झुकेरबर्ग व फेसबुकवर आधारित आहे.

    २२ फेब्रुवारी २०११ रोजी इजिप्तमध्ये एका मुलाचे नाव फेसबुक ठेवण्यात आले, कारण इजिप्तच्या क्रांतीत फेसबुकचा महत्त्वाचा वाटा होता.

    -- संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • वांगे अमर रहे…!

    मेहता पब्लिकेशन हाऊस आणि मी मराठी.नेट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

    लेखन स्पर्धा २०१० या स्पर्धेचा निकाल दिनांक ११-०२-२०११ रोज आला असून

    या स्पर्धेत “वांगे अमर रहे…!”

    या लेखाला उत्तेजनार्थ पारितोषक जाहीर झाले आहे.

    ………………………………

    माझी वांगंमय शेती तोट्यात गेली पण वांङ्मय शेतीला बरे भाव मिळत आहेत.

  • एजन्ट

    बरेच जणांना प्रश्न पडतो की आम्ही जहाजावर कसे जातो किंवा जहाजावरुन घरी कसे येतो. आम्हाला घ्यायला किंवा सोडायला जहाज मुंबईत किंवा भारतात येते का किंवा कसे. मी असलेले एकही जहाज आजपर्यंत मुंबई काय भारतातील कोणत्याही पोर्ट मध्ये आलेले नाही. फक्त एकदाच सिंगापूरहुन गल्फ मध्ये जाताना भारतीय सागरी हद्दीतून काही तास गेले आहे. जिथे जहाज असेल तिथे आम्हाला पाठवले जाते. मग ते जहाज परदेशात असो किंवा भारतातील कोणत्याही पोर्ट मध्ये असो. जहाज ज्या देशात असेल तिथला विजा, इमिग्रेशन किंवा ईतर सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतरच जहाजावर पाठवले जाते तसेच जहाजावरून घरी पाठवले जाते. जहाजावर जसे कोणाला तरी रिलीव्ह करायला जावे लागते तसेच कोणी रिलिव्हर आल्याशिवाय जहाजावरुन खूप दुर्मिळ वेळा परत यायला मिळते. दुसरा कॅप्टन आल्याशिवाय सध्याचा कॅप्टन जाऊ शकत नाही तसेच पॅम्पमॅन आणि फिटर यांच्यापैकी एखादा खलाशी सुद्धा रिलिव्हर आल्याशिवाय जाऊ शकत नाही.