(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • उपाय

    रामास प्रार्थना

  • फिर ये सीट मेरी हुई ना?

    मैने खिडकीसे सीटपर रुमाल डाला था, (बसमध्ये प्रवास करतांना भांडणं निर्माण करणारी नेहमीची एक समस्या आणि एक सुंदर प्रवासवर्णन, नक्की वाचा)

  • बेवड्याची डायरी !

    एका व्यसनीला व्यसनातून बाहेर पडण्यास इच्छाशक्ती देण्यासाठी नेमके काय उपचार होतात ? याबाबत अनेकांना कुतूहल असते. तसेच व्यसनमुक्ती केंद्राबाबत अनेक गैरसमज देखील असतात ..तेथे मारतात ..टाॅर्चर करतात ..पोटभर जेवण मिळत नाही वगैरे गैरसमज आहेत ..माझ्या ‘ बेवड्याची डायरी ” या लेखमालेत मी आमच्या ‘ मैत्री व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद ‘ नागपूर ..येथे कसे वातावरण असते ..काय काय घडते …कशा गमती जमती तसेच गंभीर घटना घडतात ..याबाबत लिहिले आहे

  • बॉम्बे टू गोवा – एव्हरग्रीन चित्रपटाची ४५ वर्षे

    ३ मार्च १९७२ हा दिवस.... बॉम्बे टू गोवा या चित्रपटाला चित्रपटगृहात लागून ४५ वर्षे पूर्ण झाली.
    p-34076-Bombay-to-Goa
    एखाद्या ठिकाणी सहलीला जायचं असल्यास प्रवास हा आलाचं. या प्रवासाची साधनं वेगळी असू शकतात, परंतु एक बाब मात्र सामायिक असते. ती म्हणजे पिकनिकला जाताना लागणारी गाणी. उडत्या चालीची गाणी गाऊन सहलीतील प्रवासाचा शीण घालवण्याकडे सर्वांचाच कल असतो. या पिकनिकमधील गाण्यात आवर्जून म्हटलं जाणार गाणं म्हणजे 'बॉम्बे टू गोवा' या चित्रपटातील 'देखा ना हाय रे सोचा ना हाय रे' हे गाणं.

    १९७२ साली मेहमुद यांनी त्याचा भाऊ अनवर अली व अमिताभ बच्चन यांच्यासाठी एस. रामनाथन यांच्या निर्देशनाखाली यांच्यासाठी नितांत सुन्दर कॉमेडी बॉम्बे टू गोवा हा सिनेमा कढला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अरुणा इरानी, महमूद, अनवर आली, नासीर हुसेन, शत्रुघ्न सिन्हा, केष्टो मुकर्जी, ललिता पवार, मनोरमा, मुकरी, सुंदर, किशोर कुमार या सारखे कलाकार होते. या सर्वानी चित्रपटात जो धुमाकुळ घातला आहे तो अप्रतिम, केष्टो यांचे नशेत गाड़ी लोटने, ललिता पवार यांचे अंगात आलेली बाई लाजबाब.

    या चित्रपटातील गाणी ..."देखा ना हाये रे सोचा ना हय रे रख दी ‍निशाने पे जान ल ल ल लला .. कदमो पे तेरे निकले मेरा दम.....है बस यही अरमान ...." किशोर कुमार यांची अप्रतिम गाणी ....एव्हरग्रीन फ्रेश .. ' किशोर कुमार व लताजी यांची दोंन गाणी ..."तुम मेरी ज़िंदगी मे कुच इस तराह से आये ..." 'दिल तेरा है मे भी तेरी हु सनम ..तेरे सर की कसम हो सनम, गीतकर राजेन्द्र कृष्ण, संगीत राहुल देव बर्मन यांची सर्व गाणी लोकप्रिय. आजही हा सिनेमा बघावा ....एकदम ताजे तवाने झाल्या सारखे वाटते.

    मेहमूद यांनी, त्यांच्या अभिनय कौशल्याने शत्रुघ्न सिन्हा, अमिताभ बच्चन, अरुणा इरानी, पंचम आणि किशोर कुमार यांनी सुपर हिट केलेला "ऑल टाइम ग्रेट" " बॉम्बे टू गोवा"

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ : इंटरनेट

  • दुधामधील चंद्र

    बागेतील तारका-

  • चतुर व्हा

    सध्याच्या जगाला लाडीलबाडी व प्रत्येक क्षेत्रातील जीव घेणी स्पर्धा , या दोन गोष्टींनी ग्रासलं आहे . भारताचे भावी आधारस्तंभ असलेल्या माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो, आपल्या अंगचा सज्जनपणा न सोड्ता, जर या परिस्थितीवर मात करुन तुम्हाला आपली ध्येये साध्य करायची असतील तर, अंगी चातुर्य बाणविण्याची आत्यंनतीक गरज आहे.

  • एक होकार देऊया आपल्या आतल्या आवाजाला – १

    १)आयुष्यातील सगळी गणितं निव्वळ बेरीज,वजाबाकी,गुणाकार आणि भागाकार यांच्या मदतीने सुटत नाहीत वा उत्तराबद्दल ठाम भाकीत करता येत नाही.या गणिताचं संपूर्ण ज्ञान आणि भरपूर सराव काही हमखास उत्तरं मिळवण्याचा मार्ग नव्हे.शेवटी नियतीनं तिच्यापाशी राखून ठेवलेला एक हाच्चा सगळी गणितं सोडवीत असतो . आणि याच हाच्च्याचा ज्याला अर्थ कळला त्याला आयुष्यभर गणिताची भीती उरत नाही.--- गणित हा सरावाचा विषय आहे.एकदा विशिष्ट प्रकारच्या गणिताला सोडविण्याची रीत कळली नि तशी भरपूर गणित सोडविण्याचा सराव केला कि परीक्षेतील शंभर पैकी शंभर गुणांची बेजमी झालीच म्हणून समजा....पण आयुष्यातलं गणित हे कुणालाच न कळलेलं कोडं आहे....इथं काही भाग्यवंताना ते सुटलेले असते...पण ते इतरांना समजावून देण्यात त्यांना यश येईलचं याची शाश्वती नाही....किंबहुना ते त्यांना सुटलेले आहे याचा भास होत असावा....काही भाबड्याना या सुटलेल्या कोड्याची खबर होत नाही ...ते पुन्हा पुन्हा पाप – पुण्याचा ताळा करीत बसतात...प्रत्येकाला आपल्यापेक्षा शेजाऱ्याचे प्रश्न...कोडी सोपी वाटतात...शेजारच्या घरातील तोळाभर आनंदाचे ओझे त्याला स्वत:च्या मणभर दु:खापेक्षा जड होत असते...पूर्वी पावकी...निमकी..मुखोदगत असणाऱ्या जमान्यात स्वत:ची गणितं स्वत:च सोडविण्यास फार जिकिरी कधीच होत नव्हती...पण या कलियुगात ... जिथं आजची तारीख विचारली तर मनगटावरल्या घड्याळाला विचारलं जातं ... तिथं सगळ्याच सोप्या सोप्या पायऱ्यावर कुठल्या ना कुठल्या कुबड्यांची मदत अपरिहार्य ठरत आलीय...वास्तविक अशा परावलंबी वृत्तीने माणसाची प्रतिकारशक्ती...विचारशक्ती...नि स्व-गुण ...कौशल्य...ओळखायची...जोपासायची सवय लुप्त झाली आहे...कायम साखळदंडात बांधला गेलेल्या सर्कशीतील हत्तीला जसं साखळदंडातून मुक्त केलं तरी मुक्त होण्यासाठी त्याचा पाय उचलत नाही ...तसं आपलं होतं...शिक्षणामुळे माणूस सुशिक्षित झाला पण सुसंस्कृत झाला असं म्हणायला काही जीभ रेटत नाही...कारण सुशिक्षितपणा आणि सुसंस्कृतपणा या दोन वेगळया गोष्टी आहेत...या दोन गोष्टींपैकी पहिल्या गोष्टीचा केवळ अभ्यासाशी नि दुसऱ्या गोष्टीचा नेक संवादाशी संबंध आहे .भूकेपुरते खाणे ही झाली प्रकृती....भुकेपेक्षा जादा खाणे ही झाली विकृती....नि स्वत:च्या चतकोर भाकरीतला नितकोर तुकडा कुणा भुकेल्या प्राण्यास देणे ही झाली संस्कृती...आणि ह्याच संस्कृतीचा वारसा आपल्या पिढ्यांनी चालवावा असं म्हणणे हीच नाही का माणसाची माणूस म्हणून ओळख

    १७.०४.२०१३

  • “नशायात्रा” एक अनिर्बंध प्रवास (नशायात्रा – भाग १)

    देव म्हणजे नक्की काय ? तो कसा असतो ? कसा दिसतो वगैरे प्रश्न मला लहानपणापासून पडत व या प्रश्नांचे सविस्तर उत्तर देखील कोणी देण्यास तयार नव्हते देव्हा-यातील मूर्ती , मंदिरीतील मूर्ती , विविध देवतांचे आकर्षक आणि तेजोवलय असलेले फोटो पाहताना मात्र निश्चितच मनात एक प्रकारचा शांततेचा भाव उमटत असे , कदाचित देवाबद्दल ऐकलेल्या दिव्य कथांचा तो परिणाम असावा ,

  • लग्न आणि विघ्न गूढ

    आज काकुंना एका नयनी आनंद व एका नयनात दुःख वाटत होतं. आपल्या मुलीच्या लग्नात पतीराजाची कमी त्यांना प्रकर्षाने जाणवत होती. पतीच्या जाण्याने न खचता मोठ्या धीरानी त्यांनी आपल्या मुलांना सांभाळले वाढवले. आज मातृ कर्तव्याबरोबरच पितृ कर्तव्यही त्या पार पाडीत होत्या.

  • काय राव तुम्ही? (वात्रटिका)

    काय राव तुम्ही?

    नावात काय आहे?

    असा शेक्सपियरचा शंख आहे.

    मात्र नामांतर नाट्याचा

    महाराष्ट्रात नवा अंक आहे.