टिळक महाराष्ट्र विद्यापीठ लोकमान्य टिळक यांनी पुरस्कारिलेले राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या विद्यापीठात नेहमीच्या कॉलेजच्या विषयांखेरीज संस्कृत आणि आयुर्वेद शिकविले जाते. अनेक वर्षांपासून या विद्यापीठातर्फे संस्कृतच्या परीक्षा घेण्यात येतात. विद्यापीठातर्फे दरवर्षी नारळी पौर्णिमेला संस्कृत दिनानिमित्त लोकमान्य टिळक यांच्या नावाचा संस्कृत पुरस्कार देण्यात येतो.
मराठी माणसाचा सिंहाचा वाटा आहे मुंबईला प्रगत बनविण्यासाठी. फारच कमी जणांना माहिती असेल की मुंबई मराठी माणसाने विकत घेतली आहे. होय, हे खरे आहे. संयुक्त महाराष्ट्र जन्माला येण्यासाठी गुजरातला महाराष्ट्राने कोट्यवधी रुपये दिले आहेत. .
झुर्कावाल्याची व्यथा ही एक काल्पनिक व्यथा मांडली आहे. तरी गैरसमज नसावा !
आकाशाला भिडणारे प्रेम
आता कानाला भिडले
हृदयात शिरणारे प्रेम
मोबाईल मध्ये घुसले...
माझ्या चारोळ्या वाचा
सहन करू नका
नाही आवडल्या तरी
छान म्हणू नका...
वाटत नाही कोणाला
मी प्रेमवेडा आहे...
कारण प्रेमाने मला
बोलताच येत नाही...
माझी कविता रोज
तरुण होत गेली
माझे तारुण्य रोज
थोडे चोरत गेली...
.
माझी कविता काळापलीकडे
कधीच जात नाही
तरी कोणतीच बंधने
काळाची जुमानत नाही...
साम, दाम, दंड आणि भेद या आयुधांवर आधारित असलेलं राजकारण…गुन्हेगारी पार्श्वभूमीचा ठपका पुसण्यासाठी राजाश्रय हे एक पूरक आणि पोषक साधन…असुशिक्षित, असुशील व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नेते, ज्यांना समाजसेवेची ओढ,आवड अथवा समाजाशी कसलीही बांधिलकी नाही,..जनतेच्या अडी-अडचणी, दैनंदिन समस्या, सामाजिक प्रश्नांची जाण व समज नसलेले नेते जनतेचे नेतृत्व करण्यास लायक असतील का?
ही कविता लिहिणा-या कवीला त्रिवार वंदन !
मम्मी सोड मोबाईल
माझ्या सोबत बोल
थोडावेळ बागेमध्ये
खेळु आपण चल...!
सोबत तुला नेहमी
मोबाईल लागतो केवळ
घरी आल्यावर तरी
घे ना मला जवळ...!
रात्रभर मोबाईल
असतो तुझ्या उशाला
तरीसुद्धा दिवसभर
सोबत ठेवते कशाला...?
पप्पा आज मोबाईल
ऑफिसमध्ये विसरा
माझा चेहरा होईल
आनंदाने हसरा...!
दिवसभर मोबाईल
तुम्ही हातात धरता
माझे बोट धरून
सांगा कधी फिरता...?
पुढच्या जन्मी मला
मोबाईल व्हायच आहे
कारण मला दिवसभर
मम्मी आणि पप्पांसोबत
रहायचं आहे...!
आज साठीच्या जवळपासच्या मुंबईकरांना ट्रामचा प्रवास नक्कीच आठवत असेल.
मुंबईत घोड्यांची पहिली ट्राम ९ मे १८७४ रोजी आली. तीन आण्यात कुलाबा ते पायधुणी आणि अर्ध्या आण्यात पायधुणी ते बोरीबंदर असा प्रवास करता येत असे. १८९९ सालच्या प्रारंभी ट्रामने एका आण्यात मुंबईत कुठेही जाता येत असे. सहा ते ८ घोड्यांनी ओढली जाणारी ही ट्राम एका तासात सुमारे ५ मैल अंतर कापत असे.
मुंबईतली ट्राम सुरुवातीला व्यापारी विभागांमध्ये सुरु केली गेली. कुलाबा - क्रॉफर्ड मार्केट - पायधुणी आणि बोरीबंदर - काळबादेवी - पायधुणी अशा २ मार्गांवरून ती सुरु झाली. यामध्ये ग्रॅंट रोड, पायधूनी, गिरगाव, भायखळा आणि ससून डॉक या भागांचा समावश होता.
१९०७ मध्ये ट्रामचे विद्युतीकरण झाले आणि ती किंग्ज सर्कल पर्यंत धावू लागली. तोपर्यंत ट्रामचे शेवटचे स्थानक होते दादरचे खोदादाद सर्कल. शेवटच्या स्टेशनला टर्मिनस म्हणून संबोधतात. त्यामुळेच खोदादाद सर्कललाही दादर ट्राम टर्मिनस म्हणजेच दादर टीटी याच नावाने ओळखले जाऊ लागले. ट्रामची वाहतूक बंद झाल्यानंतर इतकी वर्षे लोटली तरी खोदादाद सर्कलचे दादर टी.टी. हे नावं आजही प्रचलित आहे. कधीतरी टॅक्सीवाल्याला सांगून बघा की खोदादाद सर्कलला जायचेय.. कदाचित त्याला कळणारही नाही.
१९०७ मध्ये BEST ने ट्रामवाहतूक आपल्याकडे घेतली. ७ मे १९०७ रोजी विजेवर चालणारी ट्राम सुरु झाली आणि १९२० मध्ये डबल डेकर म्हणजेच दुमजली ट्राम सुरु झाली.
३१ मार्च १९६४ पासून मुंबईतली ट्राम कायमची बंद करण्यात आली त्यानंतर मुंबईत जलद वाहतुकीसाठी BEST च्या बसगाड्यांना सर्वत्र रस्ते मोकळे झाले.
फेब्रुवारी २०१६ मध्ये दक्षिण मुंबईतल्या काही रस्त्यांचे दुरुस्तीकाम सुरु असताना अचानकपणे जुन्या काळातल्या ट्रामच्या रुळांचे अवशेष सापडले आणि मुंबईतली ट्राम पुन्हा एकदा चर्चेत आली होती.
-- निनाद अरविंद प्रधान
व्यवस्थापकीय संपादक, मराठीसृष्टी
www.marathisrushti.com
मुंबईच्या रंजक इतिहासातील टप्पे - भाग ३
(क्रमश:)

Copyright © 2025 | Marathisrushti