मराठी अर्वाचीन कादंबरीचे जनक' अशा शब्दांत ज्यांचे वर्णन होते अशा हरी नारायण उर्फ ह. ना. आपटे यांचा जन्म ८ मार्च १८६४ रोजी झाला.
भारतातील कंपनी सरकारचे राज्य खालसा होऊन ब्रिटिश सरकारची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर प्रतिभावंतांची जी पहिली पिढी जन्माला आली, त्यात ह. ना. आपटे यांचा समावेश होता.
हरी नारायण आपटेंनी कथा, स्फूट लेखन, कविता, कादंबरी, नाटक व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत मर्दमुकी गाजवत आपले नाव प्रतिभेच्या सर्व दालनांवर सुवर्णाक्षरांनी कोरले. 'करमणूक' या त्या काळात वाचकप्रिय झालेल्या मासिकाची स्थापना त्यांनी केली व त्याचे ते काही काळ संपादकही होते. ज्ञान प्रकाश या मासिकाचेही त्यांनी काही काळ संपादन केले व आनंदाश्रम ही प्रकाशनसंस्था चालवली. प्रख्यात महिलांची माहिती देणारे 'स्त्रीरत्ने' हे सदर त्यांनी बराच काळ लिहिले. त्यात त्यांनी लीलावती, राणी दुर्गावती अशा कर्तृत्ववान महिलांची ओळख वाचकांना करून दिली.
कै. गोविंद बल्लाळ देवल यांचे सुप्रसिद्ध `संगीत शारदा' हे नाटक मा.ह. ना. आपटेंनीच प्रकाशात आणले व केशवसुतांची कविताही त्यांनीच प्रयत्नपूर्वक लोकप्रिय केली.
अकोल्यात झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना लाभले. त्यावेळी अध्यक्षपदावरुन त्यांनी केलेले भाषण बरेच गाजले. या भाषणात त्यांनी नवमराठी साहित्याचा पुरस्कार करून मराठी वाङमय जीवनस्पर्शी असलेच पाहिजे या भूमिकेचा पुरसकार केला. ह. ना. आपटेंनी अनेक पुस्तकांना प्रस्तावनाही लिहिल्या. मा.ह. ना. आपटेंनी साहित्याच्या अनेक प्रांतांत मुशाफिरी केली असली, तरी ते गाजले त्यांच्या कादंबरी लेखनामुळेच. बारा सामाजिक व अकरा ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्या सर्वच लोकप्रियही झाल्या. पण त्यांचे नाव आजतागायत गाजत राहिले, ते त्यांच्या 'पण लक्षात कोण घेते?' या कादंबरीमुळे. ही कादंबरी मराठी साहित्याच्या वाटचालीतील मैलाचा दगड बनून राहिली. त्यांच्या लिखाणावर महादेव गोविंद रानडे व गोपाळ कृष्ण गोखले या सुधारणावादी नेत्यांचा प्रभाव होता. त्यामुळे त्यांच्या लिखाणाचा गाभाही समाजाला शहाणे करून सोडण्याचाच होता.
ह. ना. आपटेंचा इंग्रजी भाषेचा अभ्यास दांडगा होता. त्यामुळेच त्यांनी शेक्सपियर व्हिक्टर ह्युगो, कॉग्रेव्ह, फ्रेंच नाटककार मोलियर यांच्या नाटकांची रुपांतरे मराठीत आणली. मेडोज टेलर याच्या दोन गाजलेल्या कादंबऱ्यांची 'तारा' व 'पांडुरंग हरी' ही रुपांतरे त्यांनी प्रकाशित केली. निबंधकार विष्णूशास्त्री चिपळूणकर हे ह. ना. आपटेंचे लेखनातील आदर्श. शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर त्यांनी 'शिष्यजनविलाप' ही ऐंशी श्लोकांची विलापिका लिहिली. त्यांनी वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी 'केसरी'मध्ये त्यांनी भवभूती व कालिदास यांच्यासंदभांत टीकात्मक लेखन केले. हे लेखन त्यांनी 'बिचारा' या टोपण नावाने केले होते.
ह.ना.आपटे यांचे ३ मार्च १९१९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
खरतर कोकीळा कधीच सुंदर आणि गोड गात नाही किंवा ‘कुहूकुहू’ आवाज करीत नाही. मादीचा आवाज किक-किक-किक असा असतो. बऱ्याच जणांना माहीत नसते की साद कोकिळेची नसून कोकीळ नर पक्ष्याची आहे.
श्री समर्थ आणि दीपज्योती बचत गटाने नुकतेच सुरु केलेले पेस्ट कंट्रोल हे पुण्यातील पहिलेच युनिट ! पापड, कुरडई करणार्या महिला आता पेस्ट कंट्रोलसारख्या व्यवसायातही आपले अस्तित्व दाखवत आहेत. पुणे जिल्ह्यातील वडगांव बु।। येथील समर्थ महिला बचत गटाने पुरुषांच्या मक्तेदारीला बगल देवून आपले सामर्थ्य सिध्द करुन दाखवले आहे.
नवीन औषध शोधण्यासाठी शेकडो डॉलर्स खर्च झाल्याने औषधांच्या किंमती वाढतात असा दावा केला जातो. पण लंडन स्कूल ऑफ ईकॉनॉमिक्स – सोसायटीज याननियतकालिकातील संशोधन निबंधाने उघडकीला आणले आहे, की एक औषध शोधण्यासाठी १३० कोटी डॉलर्स नव्हे तर फक्त ६ कोटी डॉलर्स लागतात! दुसरे म्हणजे युरोप – अमेरिकेत औषधांसाठी होणार्या मूलभूत संशोधनांपैकी बरेचसे सार्वजनिक पैशातून होते. सहसा शेवटचा टप्याचेच संशोधन खासगी कंपन्या करतात.
भारतात दि. २३ जुलै १९२७ रोजी मुंबई आणि कोलकाता येथे आकाशवाणीचे प्रसारण सुरू झाले.
त्या मुळे दरवर्षी २३ जुलै हा प्रसारण दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
५ सप्टेंबर २०१५ रोजी संपन्न होणार्या विश्व साहित्य संमेलनानिमित्त......
सोपी मराठी ... प्रवाही मराठी ... अुत्क्रांत मराठी ... समृध्द मराठी....
अ अॅ आ ऑ अि अी अु अू अे अै ओ औ
मराठीच्या आद्य लिपीकारांनी, अ ला काना लावून तयार झालेला आ स्वीकारला ......
मराठीच्या आद्य लिपीकारांनी अ ला ओकार लावून तयार झालेला ओ स्वीकारला .....
मराठीच्या आद्य लिपीकारांनी अ ला औकार लावून तयार झालेला औ स्वीकारला .....
पण .....
मराठीच्या त्याच लिपीकारांनी अ ला अिकार लावून तयार झालेली अि .....
अ ला अीकार लावून तयार झालेली अी .....
अ ला अुकार लावून तयार झालेला अु .....
अ ला अूकार लावून तयार झालेला अू ...
अ ला अेकार लावून तयार झालेला अे ...
अ ला अैकार लावून तयार झालेला अै ....
स्वीकारले असते तर ......
इ, ई, उ, ऊ, ए, ऐ ही अक्षरचिन्हं घडविण्याची गरजच नव्हती.
हाच विचार, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या प्रतिभावान द्रष्ट्या व्यक्तीला सुचला आणि त्यांनी, अि, अी, अु, अू, अे, अै ही अक्षरचिन्हं वापरण्यास सुरूवात केली. हीच अक्षरचिन्हं वापरून लेख लिहीले. अिसवीसन 1940 च्या सुमारास. पुण्याहून प्रसिध्द होणार्या, किर्लोस्कर, स्त्री वगैरे मासिकात प्रसिध्द झालेल्या मजकूरात हीच अक्षरचिन्हं वापरली आहेत, हे त्या काळी प्रसिध्द झालेल्या साहित्यात आढळतं. मी ही अ ची बाराखडी, गेली चाळीस वर्षे वापरतो आहे. माझ्या सर्व लेखात आणि पुस्तकात हीच बाराखडी वापरली आहे. डोळ्यांना आणि मेंदूला, या बाराखडीची सवय, लवकरच होते.
आपणही हीच अक्षरचिन्हं वापरावीत.
ही अक्षरचिन्हं वापरून तयार झालेले काही शब्द ......
अिंद्र, अिन्द्र, अिंदिरा, अिन्दिरा, अितक्यात, अितीहास, अिच्छा ....
अीश्वर, अीशस्तवन, अीशान्य, अीर्षा, ....
अुपकार, अुपवन, अुकळणं, अुचापत्या, अुंच, अुंट, ....
अून, अूब, अूर, अूस ....
अेक, अेकवीस, अेकाअेकी, अेकादशी, अेकूण .....
अैरावत, अैतिहासिक, अैवज, अैवजी, अैहिक .....
हे शब्द वाचतांना काही अडचण आली? लिहीतांनाही कठीण वाटणार नाही.
गजानन वामनाचार्य
180/4931 पंतनगर, घाटकोपर (पूर्व),
मुंबअी 400075.
मोबाअील :: 9819341841
ट्रान्स सैबेरियन टूरचा प्रवास करणे म्हणजे बऱ्याच लोकांचं एक स्वप्न असतं. जगातील सर्वात मोठा रेल्वे प्रवास – मॉस्को पासून ते रशियाच्या पूर्वेच्या व्लादिवोस्तोक पर्यंत किंवा दुसरा मॉस्कोपासून ते मंगोलिया मार्गे बीजिंगपर्यंत. (ट्रान्स मंगोलिन) १५ दिवसांचा प्रवास करण्यासाठी चांगले नियोजन आणि थोडासा अभ्यास करावा लागतो.
“महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षात नवीन वीजनिर्मिती झाली नाही.”
“महाराष्ट्र २०१२ पर्यंत लोडशेडींगमुक्त होणार- ऊर्जामंत्री”
“२०१६ पर्यंत लोडशेडींग चालू ठेवावे लागणार- महाजेनको”
देशात सध्या भ्रष्टाचारविरोधी वारे वाहत आहेत. ए. राजा, कलमाडी आणि अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई झाल्याने भ्रष्टाचार्यांना तो दडवणे अवघड बनत चालल्याचा इशारा मिळाला. पण, काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करणार्या भाजपने कर्नाटकचे भ्रष्ट मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची पाठराखण केल्याने भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई निर्णायक ठरणार नाही असा संदेश जात आहे.
मर्ढेकरांची पिंपात मेले ओल्या उंदिर कविता – दुसऱ्या महायुध्दात झालेल्या ज्यूंच्या हत्याकांडाचा तसेच तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचा संदर्भ
Copyright © 2025 | Marathisrushti