(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • कायदेशीर वारस प्रमाणपत्र आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र याबाबतचे समज आणि गैरसमज

    सर्व सामान्य नागरिकांना नेहमीच संभ्रमात टाकणारा विषय म्हणजे वारस विषयक कायद्यातील तरतुदी. ह्या तरतुदी अत्यंत किचकट असून भारतात हिंदूंसाठी (बौद्ध, शीख, जैन, ब्राह्मण समाज,आर्यसमाज, नंबुद्री, लिंगायत) ‘हिंदू वारसा कायदा’, मुस्लिमांसाठी‘मुस्लिम वारसा कायदा’ तर पारसी, ख्रिश्चन, अंग्लो इंडियन आणि इतर सर्व धर्मियांसाठी ‘भारतीय वारसा कायदा’ यातील तरतुदी पहाव्या लागतात.

  • रात्र राणी

    अहाहऽआ काय सुंदर उद्यान ! उंच उडणारी कारंजी, पुष्कराणी, तर्‍हतर्‍हेची फुलझाडे – फळझाडे, थंडगार हवा दाट झाडांची सावली, पक्ष्यांचे मंजुळ कुंजन… मन उल्हसीत करणारा सगळा देखावा. जणू स्वर्गातलेच उद्यान असावे असा भास व्हावा.

  • गणेश वाचनालय परभणी

    गणेश वाचनालय is more than 100 Years old having established in the यर1 901. आयटी was established by a team of Freedom Fighters.

  • निखळ आनंदाचा झरा ‘बालनाट्य’

    चंदा रणदिवे एकांकिका व नाटके ज्या काळात बसवत होते, तेव्हा नायिका म्हणून भूमिका करण्यास मुली मिळणे कठीण होते. परंतु चंदा यांना ही अडचण कधीच आली नाही. कारण त्यांचे चोख व निखळ चारित्र्य! त्यांच्याविषयी सर्वांना गाढ विश्वास होता. चंदा दिवेकर, मीना प्रधान, मंगल फणसे, शालिनी राजे, सुनंदा कर्णिक, लता सावंत, उषा गुप्ते. अशा असंख्य हिरॉईन्स चंदा यांच्या नाटकातून घडल्या.

  • एक फाशी

    नक्की वाचा आणि सर्वांनी विचार करा
    •••••••••••••••••••••••••••

    एका जिगरबाज पोलीस अधिकाऱ्याने याकुब मेमनच्या अंत्ययात्रेसाठी झालेली गर्दि यावर लिहीलेला हा बेधडक लेख.
    ........................................................

    एक फाशी…तीही दहशतवाद्याला…! शेकडो जीव घेणार्‍या नराधमाला. पण त्यावरही एवढा गदारोळ होईल. इतकी चर्चा होईल अशी कल्पनाही कधी पोलीसांनी केली नव्हती.

    पण त्याहूनही अस्वस्थ करणारी होती ‘ती’ गर्दी. याकूब मेमनच्या अंत्ययात्रेसाठी झालेली "गर्दी",

    का जमली होती ती ‘गर्दी’?

    कल्याण, मुंब्रा, वांद्रे मुंबईच्या अनेक भागातून लोक याकूबच्या अंत्ययात्रेसाठी का आले?
    याकूब मेमन महात्मा होता कि भारतरत्न ?
    त्याच्या अंत्यविधीला इतकी गर्दी?

    ही गर्दी म्हणजे भारतीय लोकशाहीचा अपमान आहे. ज्या न्यायाधीशांनी निर्णय दिला, ज्या पोलिसांनी जीवाचं रान करून तपास केला, ज्या वकिलांनी जीव धोक्यात घालून खटला लढवला.

    ही "गर्दी" म्हणजे त्या सगळ्यांचा अपमान आहे.
    ही "गर्दी" मुंबई बॉम्बस्फोटात जीव गमावलेल्या प्रत्येक जीवाचा अपमान आहे.
    त्यांच्या नातेवाईकांचा अपमान आहे.
    हा अपमान भारतीय न्यायव्यवस्थेचा आहे.

    जे मुस्लिम अंतयात्रे सामील झाले, ते त्यां मुस्लिमांना भारत मान्य नाही. ते स्वत:ला भारतीय समजत नाहीत. असा अर्थ काढायचा का ..??

    एक दहशतवादी, बॉम्बस्फोट घडवतो, शेकडो जीव घेतो आणि त्याला दफन करण्यासाठी इतका मोठा जमाव येतो, हे अति नाही का ?

    अरे, तुमचे डोळे उघडणार कि नाही ?

    देशाची वाट लागल्यावर तुम्हाला जाग येणार का.?

    खरंच का जमला असेल एवढा मोठा जमाव?

    मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाचं त्या मुस्लिमांना दु:ख नाही का?

    मुंबईवरचा हल्ला फक्त हिंदूंपुरता मर्यादित होता का?

    मुंबईला झालेली जखम ही मुस्लिमांची नव्हती. की मग ती गर्दी समर्थन करत होती मुंबई बॉम्बस्फोटाची..?

    या सर्व गोष्टींचा पोलीस म्हणुन आपण विचार केलाचं पाहिजे.

    याकूबच्या अंत्यविधीला त्याच्या नातेवाईकांनी येणं हे समजू शकतो. पण मुंबईच्या प्रत्येक भागातून मुस्लिमांनी एवढी गर्दी का केली?
    जमावबंदी झुगारून पोलीसांना न जुमानता गर्दी वाढत होती. गर्दी एवढी होती की दोनवेळा प्रार्थना घ्यावी लागली. याकूब मेमनसाठी एवढी प्रार्थना का?

    या प्रश्नाचं उत्तर काही केल्या सापडत नाहीय...पण त्या गर्दीनं खूप चुकीचा संदेश दिला एवढं नक्की.

    मुस्लीम समाजानं एक मोठी संधी गमावली असं सतत राहून-राहून वाटतंय. जर याकूबच्या अंत्यविधीसाठी गर्दी जमली नसती, तर एक कठोर संदेश गेला असता की, मुस्लीम समाज हा दहशतवादाचं समर्थन करत नाही आणि अशा कृत्यात सहभागी असणार्‍यांना बहिष्कृत देखील करतो.

    पण दुर्दैवाने असे घडले नाही....
    आणि जमली ती फक्त गर्दी ...गर्दी....गर्दी.....!

    गर्दी देशाविरोधाची ........................
    गर्दी भारतीय घटनेच्या बहिष्काराची....
    गर्दी दहशतवाद्यांचे समर्थन करणारी....
    गर्दी पोलीसांना न घाबरणारी.............
    गर्दी न्याय व्यवस्थेला न माणनारी........

    या गर्दी वर कठोरपणे कारवाई होणे आवश्यक होते नाही तर उद्या कोणाला साधी अटक केली तरी आमच्या माणसाला अटक केली, म्हणून पण पोलीस ठाण्यात गर्दी जमली तर नवल वाटायला नको..?

    या गर्दी ने असे दाखवून दिले कि पोलिस व न्यायव्यवस्था यांचे वजन कमी झाले आहे.

    शत्रुघ्न माळी
    पोलीस निरीक्षक
    ••••••••••••••••••••••••••••••••

    आम्ही जाणतो की हा मजकुर जितका पाहिजे तितका नाही फिरणार कारण असे संदेश फिरायला नेटपॅक नाही...तर मनगटात जोर असावा लागतो...!!!

    जय हिंद

  • लोकल

  • श्री नृसिंह अवतारकथा

    जीवनाच्या रगाड्यातून

  • पुणेरी पाट्यांचे आक्रमण मॅकडोनाल्ड्सवर झाले तर काय होईल बरे?

    अस्सल पुणेरी भाषेत असलेली ही मॅकडोनाल्ड्सची पाटी

  • अन्याय

    सकाळी अकरा – साडेअकराची वेळ होती. जरा बाहेरची कामे करून यावी म्हणून निघाले होते. घरात बाहेरची कामेच जास्त असतात. कधी लाईट बिल, पाणी बिल, बाजारहाट, बँकेची कामं वगैरे. आणि ही सगळी कामं सकाळीच करायला लागतात. तशीच त्या दिवशी पण बाजारात जायला निघाले होते. जवळच सेन्ट्रल स्कूल आहे. शाळा सुटली होती. सोसायटीतील लहान मुले परीक्षा संपल्या म्हणून जवळ जवळ नाचतच आनंदात घरी परत चालली होती ही सगळी मुले आठ ते अकरा या वयोगटातील आहेत. माझ्या मनात विचार आला “चला आजपासून धुमाकूळ चालू.”

    साधारण दीड दोन तासाने कामे आटोपून घरी येत होते. बघितले कि ही सगळी ‘वानरसेना’ दोन तीन सायकलीवरून आलेल्या मुलांच्या मागे वेडी वाकडी धावत आमच्याच घराच्या बाजूने जात होती. मी थांबले आणि विचारले “अरे काय झाले?” सगळे एकदम चूप. तशी ही सगळी मला उगाचच घाबरत असतात. मला बघितल्यावर त्यांचे चेहरे हे कामासाठी निघालेल्या माणसाला मांजर आडवी गेली कि जितका वाईट होतो तेवढे वाईट झाले. क्षणभर मला वाटले शेजारच्या बाईच्या आंब्याच्या झाडावर चढण्याचा यांचा प्लॅन बहुतेक मला बघून फसलेला दिसतोय. शेजारचे दोघेही नवरा बायको नोकरी करतात त्यामुळे या मुलांना ही आयतीच संधी.

    पण नाही. जशी घराच्या जवळ पोहोचले तसे लक्षात आले कि ही मुले या सायकल वरून आलेल्या मुलांच्याच मागे धावत होती. मी टोकल्यावर तशीच उभी राहिली आणि त्या मुलांकडे बघत होती. मला कळून चुकले कि काहीतरी गडबड या नवीन आलेल्या मुलांचीच आहे म्हणून जरा जोरातच त्या मधल्या एका मुलाला विचारले “काय आहे? काय गडबड चालली आहे?”

    पण एक नाही की दोन नाही आणि माझ्याकडे बघतच तो शेजाऱ्यांच्या कंपाऊंडवर चढायला लागला. बाकीची मुले घाबरून उभी होती. क्षणभर वाटले की साप निघाला कि काय? या बाजूला बरेच वेळा लोकांनी साप बघितला आहे. म्हणून त्याला जोरात ओरडले “अरे चढू नकोस, तो साप उलटा तुझ्यावर येईल. खाली उतर.” तसा तो माझ्याकडे बघून हसला आणि म्हणाला “आँटी यहाँ साप नाही है.”

    त्याला बघून माझी खात्रीच झाली हा सोसायटीतला नाही. दहा अकरा वर्षाचा असेल. सायकल चालवून चालवून दमलेला दिसत होता. हातात येशू ख्रिस्ताचा क्रॉस असलेली फिक्कट हिरव्यां रंगाची माळ होती. बहुतेक रेडियम सारखी असावी. ती त्यांनी हातात घट्ट धरून ठेवली होती. अगदी केविलवाणा, कावराबावरा. त्याच्याकडे बघून हा काहीतरी शोधत इथपर्यंत आलेला आहे आणि त्याचा त्या देवाच्या माळेवर अपार विश्वास असावा हे पटकन कळून येत होते आणि देव त्याला नक्कीच मदत करणार आहे अशी त्याला खात्री असावी. म्हणूनच एका हातात ती माळ घट्ट धरली असावी. त्याच्या बरोबरची मुले फक्त शांत उभी होती. त्यातल्या एकाच्या हातात एक काठी होती. दुसऱ्या जवळ बॅगेला गाडीत बांधायला वापरतात तशी एक साखळी होती आणि शर्टच्या खिशातून बिस्किटचा छोटासा डबा बाहेर डोकावताना दिसत होता.

    मी त्यांच्याजवळ जाऊन विचारले, “ तुम्ही कोण आहात? कुठून आला आहात? आणि इथे काय करताय?” माझा तो शांत अवतार बघून सोसायटीतील चिटकी पिटकी माझ्या शेजारी येऊन उभी राहिली. आणि तो ही कंपाऊंडवरून खाली उतरला. त्याच्या बरोबरची मुले पण त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली. तो मला काही सांगणार तेवढ्यात कंपाउंडच्या आत एक छोटेसे पांढरे कुत्र्याचे पिल्लू दिसले. तसा तो धावत “जॉली जॉली” करत त्याच्याकडे पळाला. मला माहित होते हे कुत्रे तर इथलेच आहे. मग हा का त्याला हाक मारतोय? तो म्हणाला, “हा माझा कुत्रा आहे”. बाकीची मुले ओरडली, “हा कुत्रा त्याचा नाही.” तो अगदी रडवेला झाला.

    म्हणाला, “ मी तेरा सेक्टर मध्ये राहतो. एकदा मला रस्त्यात एक कुत्र्याचे पिल्लू सापडले त्याच्या पायाला काहीतरी लागले होते. त्याला पट्टी लाऊन, औषधे देऊन मी बरे केले. तो माझ्याबरोबर खेळतो म्हणून शेजारच्या डॉ. काकांनी त्याला इंजेक्शनं पण दिली आहेत. त्याला मी जेवणही देतो. तो माझ्याच जवळ राहतो पण माझ्या बाबांना वाटले की मी त्याच्यामुळे अभ्यास करत नाही. म्हणून माझ्या परीक्षेच्या आधीच त्यांनी त्याला या बाजूला कुठेतरी सोडून दिले आहे. हा त्यांचा ऑफिसचा रस्ता आहे. म्हणून मला खात्री आहे की तो इथेच कुठेतरी आहे. माझी परीक्षा आज आता सकाळीच संपली. आम्ही लगेच त्याला सायकलवर शोधायला निघालो आहोत. आम्ही जॉलीला घरी घेऊन जायला आलो आहोत.”

    ऐकून काय करावे हे क्षणभर सुचलेच नाही. मी विचारले “हेच कुत्रे तुझे आहे कशावरून?” तो म्हणाला “तो असाच आहे. माझा आवाज ओळखतो, मी हाक मारली की लगेच येईल” असे बोलत परत त्या कंपाऊंडवर चढून “जॉली जॉली” अशी हाक मारायला लागला.

    त्याच्या आवाजातली ती आद्रता ऐकून असे वाटले हाच त्याचा जॉली असावा आणि त्याच्याकडे धावत यावा. पण तसे झाले नाही. अगदी नाराज होऊन ती मुले सायकलवर चढून दुसरीकडे त्याच्या शोधात निघाली. आम्ही सगळे त्यांच्याकडे नुसते बघतच राहिलो. एवढा वेळ हा त्याचा कुत्रा नाही म्हणून भांडणारी इतर छोटी मुले त्याच्या मदतीला धावून गेली. “अरे शेजारच्या गल्लीत एक नवीन पांढरे कुत्रे आहे. जाऊन बघा” आणि परत त्यांच्या मागे धावत गेली.

    संध्याकाळी सोसायटीतील मुले खेळत होती. एकदा वाटले कि त्यांना विचारावे “अरे त्याचा कुत्रा मिळाला का?” पण मन घाबरले, कदाचित नाही ऐकण्याची माझ्या मनाची तयारी नसावी. पण मनोमन देवाला प्रार्थना करत होते कि “त्या लहान मुलाचा जॉली त्याला लवकर भेटू दे आणि या इवल्याशा चेहऱ्यावर परत खूप आनंद झळकू दे. तुझ्यावरच्या त्याच्या श्रद्धेला तडा नको जाऊ देऊ”.

    आणि स्वत:ला एक प्रश्न विचारावा असे वाटले की, “कधी कधी आपण आपल्या मुलांवर किती अन्याय करतो नाही?”

  • संगीतभूषण पं. राम मराठे

    रामभाऊंच्या आक्रमक आणि तडफदार गायकीला ‘झंझावात’ हाच शब्द योग्य ठरेल. आयुष्याच्या अखेरपर्यंत पांढरी चार आणि प्रसंगी काळी तीन पट्टीमध्ये रात्री 9 ते पहाटे 4 पर्यंत, विलक्षण ताकदीने आणि दमसासाने गायची अद्भुत क्षमता रामभाऊंकडे होती. या सादरीकरणात कधी बालगंधर्व आणि मास्टर कृष्णरावांची लडिवाळ गायकी, कधी नोम तोम युक्त आलापी आणि लयदार तिहाया घेणारी आग्रा गायकी, कधी लयदार आणि बुद्धिनिष्ठ रंजक ग्वाल्हेर गायकी अशी चतुरस्र गायकी रामभाऊ श्रोत्यांपुढे अत्यंत सहज ठेवून थक्क करायचे.