महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात इंद्रायणी नदीच्या काठावर देहू हे पुरातन तीर्थक्षेत्र आहे. संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ म्हणून देहू प्रसिध्द आहे. देहूपासून ५ किलोमीटर अतरावर असलेल्या भंडारा डोंगर येथे संत तुकाराम महाराज चिंतन करीत असल्याची नोंद आहे.
सोमालिया (सोमाली: Soomaaliya; अरबी: الصومال ) हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे.
धाडसी लमाणी लोकांचे वास्तव्य हे जालना जिल्ह्याचे वेगळे वैशिष्ट्ये आहे. भिल्ल्ल जमातीचे लोकही जिल्ह्यात आढळतात. भिल्ल जमातीची भाषा भिल्ली असून, अहिराणी व पावरी या बोलीभाषाही या भागात बोलल्या जातात.
मुंबई – पुणे मार्गावर चिंचवड हे गांव आहे. पुणे शहरापासून ११ मैलावर हे गांव आहे. येथे जाण्यासाठी बसची सोय आहे. श्री मोरया गोसावी यांनी या गावात मंगल मूर्तीची स्थापना केली. (हे फार थोर गणेशभक्त होते. यांचे चरित्र गणेश भक्तांनी अवश्य वाचावे.) मोरया गोसावींनी इस. १६५५ मध्ये येथेच जिवंत समाधी घेतली.
भंडारा जिल्हा वनसंपत्ती व खनिजसंपत्तीत समृद्ध असून जिल्ह्याच्या उत्तरेस बालाघाट जिल्हा (मध्य प्रदेश), पूर्वेस गोंदिया, दक्षिणेस चंद्रपूर तर पश्चिमेस नागपूर जिल्हा आहे.
धारवाड हे कर्नाटकातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. ते पुणे -बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आहे. या शहराशेजारचे हुबळी शहर व धारवाड यांची संयुक्त महापालिका आहे.
शिवकाशी हे तामिळनाडू राज्यातील विरुधुनगर राज्यातले एक महत्वाचे शहर आहे. या शहरातील फटाके बनविण्याचा उद्योग प्रसिध्द आाहे. देशातील एकूण गरजेच्या ७० टक्के फटाके या शहरात तयार होतात.
महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील माहूर अथवा माहूरगड हे एक प्रसिध्द धार्मिक स्थळ आहे. पैनगंगा नदीच्या काठावर सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत असलेले माहूर हे समुद्रसपाटीपासून २६०० फूट उंचीवर असून त्याला घनदाट जंगलाचा वेढा आहे.
ताजिकिस्तान, अधिकृत नाव ताजिकिस्तानचे प्रजासत्ताक, हा मध्य आशियातील एक भूवेष्टित देश आहे. याच्या दक्षिणेस अफगाणिस्तान, पश्चिमेस उझबेकिस्तान, उत्तरेस किर्गिझस्तान व पूर्वेस चीन हे देश वसले आहेत. याच्या सीमा पाकिस्तानाच्या चित्रल आणि गिलगित-बाल्तिस्तान प्रदेशांपासून नजीक असून अफगाणिस्तानाच्या वाखान पट्ट्यामुळे त्या दुरावल्या आहेत.
प्राचीन काळी चंद्रपूर हा जिल्हा लोकापुरा व त्यानंतर इंद्रपूर या नावांनी ओळखला जात असे. ब्रिटिश राजवटीत व स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे हा जिल्हा ‘चांदा’ या नावाने ओळखला जात होता. १९६४ मध्ये चांदा शहराचे नाव बदलून चंद्रपूर करण्यात आले. चांदा जिल्ह्यासही पुढे ‘चंद्रपूर’ जिल्हा या नावाने ओळखले जाऊ लागले.
Copyright © 2025 | Marathisrushti