महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदैवत आहे. इ.स. १७६७ साली व्हिक्टोरीया टर्मिनसच्या बांधकामावेळी इंग्रजांनी मुंबादेवीचे पुरातन मंदीर हटवून काळबादेवी-भुलेश्वर भागात बांधून दिले.
सिंधुदूर्ग महाराष्ट्र राज्यातील सागरतटीय जिल्हा आहे, व याचे प्रशासकीय केन्द्र सिंधुदुर्ग नगरी, ओरस येथे आहे. पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक किल्ले (३७), जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे.
भारतातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा ही हजारो वर्षांची परंपरा आहे. प्रत्येक प्रांत, प्रत्येक नदी, प्रत्येक मंदिर, प्रत्येक मूर्ती या सर्वांत भारतीय समाजाची अस्मिता, श्रद्धा, पुराणकथा आणि अध्यात्म दडलेले आहे. या लेखात आपण अशाच काही अद्वितीय, महत्त्वपूर्ण, इतिहास प्रसिद्ध आणि लोकमान्य धार्मिक स्थळांचा परिचय करून घेणार आहोत.
बुल्गेरियातील रिला मॉनस्ट्री (मठ) चा शोध १०व्या शतकात सेंट जॉन यांना लागला. आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या या मठाची १८३४ ला पुनर्बांधणी करण्यात आली.
सिंगापूरमध्ये अनेक वर्षे मासेमार आणि चाच्यांच्या वसाहती होत्या. १४ व्या शतकापर्यंत येथे सुमात्राच्या श्रीविजय साम्राज्याची वसाहत होती.
१५ व्या शतकात मलायाच्या साम्राज्यात सिंगापूरचा समावेश झाला. १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी येथे वसाहत स्थापन केल्या १८१९ मध्ये सिंगापूरचे ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीकडे हस्तांतरण झाले.
चीनचे प्रजासत्ताक (मराठी नामभेद: तायवान, तैवान) हे पूर्व आशियामधील एक वादग्रस्त सार्वभौम राष्ट्र आहे. चीन देशाच्या राज्यकर्त्यांशी याचा सार्वभौमत्वाबद्दल वाद सुरू आहे. तैवान व नजीकच्या लहान बेटांवर या देशाची सत्ता आहे.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर कौण्डीण्यपूर वसले. पूर्वीच्या वैदर्भ राज्याची ही राजधानी असल्याचे मानले जाते. याठिकाणी ताम्रपाषाण युगापासून वसाहत असल्याचे दाखले मिळाले आहेत.
महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना जोडणारा लोहमार्ग नंदुरबार जिल्ह्यातून जातो. नंदुरबार, नवापूर, चिंचपाडा रनाळे ही जिल्ह्यातील महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत.
हिंगोली जिल्हा हा मराठवाडा विभागाच्या उत्तरेस असून,हिंगोलीच्या उत्तरेस अकोला जिल्हा व यवतमाळ जिल्हा, पश्चिमेस परभणी जिल्हा, दक्षिण-पूर्वेस नांदेड जिल्हा आहे, आताचा हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्याचा एक भाग होता.
ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज: República Federativa do Brasil) हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात चौथा मोठा देश आहे. ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी याला लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हिया व पेरू, नैर्ऋत्येस आर्जेन्टिना व पेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti