(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • अहमदनगर जिल्ह्यातील मिरी माका

    मिरी हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक महत्वाचे शहर आहे. पैठण रोडवर वसलेले हे शहर नेवासापासून २० किलोमीटर अंतरावर आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी सहकारी बँक

    महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सहकार क्षेत्रात प्रथम क्रमांक लागतो. ३० ऑक्टोबर १९५७ रोजी या बँकेच्या नोंदणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

  • अमरावती जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

    अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे प्रमुख पर्यटनस्थळ आहे. अमरावती शहरापासून ९० किमी अंतरावर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ३६हजार फूट उंचीवर सातपुड्याच्या कुशीत आहे. चिखलदर्‍याच्या परिसरात आठ प्रेक्षणीय स्थळे असून गाविलगडचा किल्ला , किचकदरा, आणि विराटराजाचा महाल इत्यादी मुख्य आकर्षणाची ठिकाणे आहेत. वैराट हे येथील सर्वात उंच ठिकाण आहे.

  • काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक

    काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक (किंवा डी.आर. काँगो) हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. डी.आर. काँगो हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिकेतील तिसरा व जगातील १२व्या क्रमांकाचा देश आहे.

  • चेक रिपब्लिक

    चेक प्रजासत्ताक हा मध्य युरोपातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. चेक प्रजासत्ताकाच्या उत्तरेस पोलंड, पूर्वेस स्लोव्हाकिया, दक्षिणेस ऑस्ट्रिया तर पश्चिमेस जर्मनी हे देश आहेत. प्राग ही चेक प्रजासत्ताकाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

    १९१८ ते १९९३ दरम्यान हा देश चेकोस्लोव्हाकिया ह्या भूतपूर्व देशाचा एक भाग होता. १ जानेवारी १९९३ रोजी चेकोस्लोव्हाकियाचे शांततापुर्वक विघटन झाले व चेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हाकिया हे दोन नवीन देश निर्माण झाले.

  • व्हिकेंझा

    इटलीतील व्हिकेंझा हे शहर दुसर्‍या सतकात वसविण्यात आले आहे.

  • महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

    महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते. याशिवाय बॉक्साईट, चुनखडी, इल्मेनाइट, क्रोमाइट आणि बांधकामाचे खडक यांचे वैशिष्ट्यपूर्ण साठे महाराष्ट्रात आहेत, तर डोलोमाइट, कायनाइट, सिलिकायुक्त वाळू व काही उद्योगधंद्यात वापरल्या जाणार्‍या मृतिका यांचे साठे आहेत.

  • लालगड महल, बिकानेर, राजस्थान

    राजस्थानातील बिकानेर शहरात लालगड महाल हा एक पुरातन राजवाडा आहे. या राजवाड्याचे बांधकाम इ.स. १९०२-१९२६ या काळात तत्कालीन महाराजा सर गंगासिंह यांनी केले आहे.

  • भंडारा जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

    महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर महाप्रभू यांनी भंडारा जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी दिल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

  • रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

    गोपाळ कृष्ण गोखले – यांचा जन्म याच जिल्ह्यातील कोतळूक या गावी झाला. ते भारत सेवक समाजाचे संस्थापक होते तसेच वाराणशी येथे १९०५ साली भरलेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षही होते.