(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सातारा जिल्ह्यातील लोकजीवन

    कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातला पण त्यांनी शैक्षणिक कार्याची सुरुवात केली ती सातारा जिल्ह्यातनं. महात्मा ज्योतीबा फुलेंच्या विचारांतून व राजर्षी शाहू महाराजांच्या प्रत्यक्ष सहवासातून कर्मवीरांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली.विचारांती त्यांनी शिक्षण क्षेत्र निवडले व १९१९ मध्ये कराड तालुक्यातील काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करुन शिक्षणाची गंगा बहुजन समाजापर्यंत पोहोचवली.

  • श्री महागणपती, टिटवाळा

    श्री महागणपती, टिटवाळा

    सिद्धिविनायक महागणपती मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर मुंबईजवळील टिटवाळा या गावात काळूनदीच्या काठावर आहे. चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांवर विजय मिळविल्यानंतर श्रीमहागणपतीचे हे मंदिर बांधले.

  • अहमदनगर जिल्ह्याची भौगोलिक माहिती

    राज्याच्या मध्यभागी असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा व औरंगाबाद जिल्हे; पूर्वेस बीड जिल्हा ; पूर्व व आग्नेय दिशांस उस्मानाबाद जिल्हा; दक्षिणेस सोलापूर जिल्हा, तर नैऋत्येस व पश्चिमेस पुणे जिल्हा व ठाणे जिल्हा हे जिल्हे वसलेले आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वांत मोठा असणार्‍या या जिल्ह्याने राज्याचे ५.५४% भौगोलिक क्षेत्र व्यापलेले आहे. 

  • धुळे जिल्ह्यातील दळणवळण सोयी

    धुळ्यामधून मुंबई – आग्रा (राष्ट्रीय महामार्ग क्र. ३) व हाजीरा-धुळे-कोलकत्ता (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६) हे महामार्ग जातात. भुसावळ – शिंदखेडा – नंदूरबार – सूरत हा लोहमार्ग जिल्ह्यातून जातो.

  • गडचिरोली जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

    येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. त्यामुळे शेतीशी निगडीत काही उद्योग या जिल्ह्यात केले जातात. वडसा येथे खत उद्योग आहे त्याचबरोबर भात गिरण्यादेखील आहेत.

  • नांदेड जिल्ह्याचा इतिहास

    नऊ ऋषींचे निवासास्थान म्हणजेच ‘नवदंडी’ हे नांदेडचे पूर्वाश्रमीचे नाव होते असे म्हटले जाते. नंद घराण्याच्या राजवटीमुळे नांदेडला ‘नंदतट’ असेही म्हणत.या दोन्ही शब्दांचा अपभ्रश होऊन पुढे या ठिकाणाला नांदेड म्हणून ओळखले जाऊ लागले.

  • बिनखांबी गणेश मंदिर, कोल्हापुर

    बिनखांबी गणेश मंदिर, कोल्हापुर

    कोल्हापुर शहराच्या महाद्वार रस्त्यावर हे मंदिर आहे. याला बिनखांबी गणेश मंदिर असे म्हणतात. खांबाशिवाय उभारलेल्या या गणेश मंदिराच्या प्रशस्त सभा मंडपावरून त्याला हे नांव पडले आहे.

  • महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग

    महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग

    मुंबई, नागपूर, मनमाड, अकोला, पुणे, आणि सोलापूर ही प्रमुख रेल्वे जंक्शन्स आहेत. नागपूर हे भारताच्या मध्यभागी असल्याने पूर्व-पश्चिम तसेच उत्तर-दक्षिण या चारही दिशाना जाणार्‍या गाड्या तेथून जातात.

  • बुलढाणा जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

    कापुस हे महत्त्वाचे कृषी उत्पादन असून त्यावर चालणारे अनेक लहान-मोठे उद्योगधंदे जिल्ह्यात चालतात.बुलढाणा जिल्ह्यात खामगाव, देऊळगावराजा, मलकापूर, तसंच बुलढाण्यात औद्योगिक वसाहती आहेत.

  • भंडारा जिल्ह्याची भौगोलिक माहिती

    भंडारा जिल्हा वनसंपत्ती व खनिजसंपत्तीत समृद्ध असून जिल्ह्याच्या उत्तरेस बालाघाट जिल्हा (मध्य प्रदेश), पूर्वेस गोंदिया, दक्षिणेस चंद्रपूर तर पश्चिमेस नागपूर जिल्हा आहे.