महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
फ्रान्समधील अल्बी या शहराची उभारणी १०ते१३ व्या शतकादरम्यान झाली. बिशपांच्या वर्चस्वाखाली असलेल्या या शहरात मध्ययुगीन काळातील अनेक चर्च, इमारती पहायला मिळतात.
शुध्द सोन्यासाठी जळगावची बाजारपेठ महाराष्ट्रात प्रख्यात आहे.
जळगाव हे जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर असून कापूस, खाद्यतेले, केळी या कृषी मालाची मोठी बाजारपेठ येथे आहे.
येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन ठिबक सिंचन प्रकल्प देशभर प्रसिध्द आहेत. या शहरात मराठीसोबतच अहिराणी बोलीही बोलली जाते.
कावळ्याचा रंग काळाच असतो मात्र पांढऱ्या रंगाचाही ‘कावळा’ असतो आणि तो आपल्याला नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयाच्या पक्षी विभागात पाहायला मिळतो. पांढरा कावळा हा फक्त नागपूरातील मध्यवर्ती संग्रहालयातच आहे.
पालीन हे अरुणाचल प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आणि एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. कुरुंगकुमे या जिल्ह्यात हे शहर येते. समुद्रसपाटीपासून १०८० मीटर उंचीवर वसलेल्या या शहराची लोकसंख्या ५८१६ इतकी आहे.
गिनी हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. इ.स. १८९४ ते १९५८ दरम्यान गिनी ही एक फ्रेंच वसाहत होती व फ्रेंच गिनी ह्या नावाने ओळखली जात असे. गिनीच्या पश्चिमेस अटलांटिक महासागर तर इतर दिशांना गिनी-बिसाउ, सेनेगाल, माली, सियेरा लिओन, लायबेरिया व आयव्हरी कोस्ट हे देश आहेत. कोनाक्री ही गिनीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. आफ्रिकेतील गिनी हा शब्द वापरणाऱ्या गिनी-बिसाउ व इक्वेटोरियल गिनी ह्या देशांपासून वेगळा ओळखला जाण्यासाठी गिनीला अनेकदा गिनी-कोनाक्री असे संबोधले जाते.
प्राचीन भारतातील प्रसिद्ध गणिततज्ज्ञ भास्कराचार्य हे बीडच्याच परिसरातील होते असे म्हटले जाते.त्याचप्रमाणे गोपिनाथ मुंडे यांचं जन्मगाव आणि मतदारसंघ म्हणून बीड जिल्हा हा देशात प्रसिद्ध आहे.
औरंगाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. अनेकवेळा या जिल्ह्याला संभाजीनगर असेही संबोधले गेले आहे.जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०१०० चौ.कि.मी असून लोकसंख्या २८,९७,०१३ (२००१ च्या जनगणनेनुसार) इतकी आहे. या जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू ही पिके घेतली जातात.
होळकर घराण्याची सत्ता असताना इंदूर येथे सात मजली राजवाडा बांधण्यात आला भारतीय ऐतिहासिक वास्तुशिल्प कलेचा हा उत्कृष्ट नमुना आहे.
प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस वजनदार असूनही तो सोबत नेतांना भार जाणवत नाही. त्याची गोडीच मुळी अशी असते. अनेक पौष्टिक घटक असलेल्या फणसात कापा आणि बरका असे दोन प्रकार येतात.
कापा हा प्रकार जास्त प्रिय आहे. फणस कापण्याचे कष्ट नको असतील तर तयार गरेदेखील बाजारात मिळतात. सोबत दुकानातून फणसाचे तळलेले गरेदेखील मिळतात. कच्च्या फणसाच्या भाजीची चवही एखाद्या कोकणी माणसाच्या घरी घेता येते.
लहान गोल आकाराचे क्वचीत आढळणारे बटाटा फणसाच्या (विलायती फणस म्हणूनही परिचीत आहे) भाजीची चव काही निराळीच असते. हे फणस सहजपणे सोबत नेता येते.
गोंड, कोहली, पोवार, गोवारी, हळबी या जाती-जमातींचे लोक भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करतात त्याचबरोबर विविध प्राचीन जाती-जमातींचा निवास आणि धातूच्या भांड्यांची निर्मिती करणारे,पारंपरिक कलाकुसर ही आढळतात.
Copyright © 2025 | Marathisrushti