महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
रायचूरला समृध्द ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. बहामनी , विजयनगर आणि निजामशाही राजवटी या शहराने अनुभवलेल्या आहेत.
पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायर्या चढून येथे पोहोचता येते. या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.
कोत द’ईवोआरचे प्रजासत्ताक (फ्रेंच: République de Côte d’Ivoire; पूर्वीचे नावः आयव्हरी कोस्ट) हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. कोत द’ईवोआरच्या पश्चिमेला लायबेरिया व गिनी, उत्तरेला माली व बर्किना फासो तर पूर्वेला घाना हे देश आहेत. देशाच्या दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे. यामूसूक्रो ही कोत द’ईवोआरची राजधानी तर आबीजान हे सर्वांत मोठे शहर आहे.
थळ-वायशेत येथे राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स हा सार्वजनिक क्षेत्रातील खत-प्रकल्प कार्यरत आहे. पनवेल तालुक्यात रसायनी येथे हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स हा प्राथमिक रसायने तयार करण्याचा प्रकल्प असून येथे मोठ्या प्रमाणावर प्रतिजैविकांची (अँटीबायोटिक्स) निर्मिती केली जाते.
भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेलं परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यात आहे. तसेच या परिसराशी जोडले गेलेले रामायणातील संदर्भ, अंबेजोगाई येथील श्री योगेश्र्वरी देवीचे स्थान यामुळे बीड जिल्हा संपूर्ण भारतात धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र स्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
नागपूरजवळच्या रामटेक गावामध्ये रामटेकचा गिरीदुर्ग उभा ठाकलेला असला तरी या किल्ल्याची ओळख किल्ला म्हणून कमी आणि धार्मिक स्थळ म्हण्नू जास्त आहे. धार्मिक श्रद्धेमुळे अनेक भाविकांचा किल्ल्याकडे ओढा असतो.
चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी म्हणतात कारण जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत. चंद्रपूरमध्ये अनेक चुन्याच्या खाणीदेखील आहेत.
पूर्वी पूर्व खानदेश या नावाने ओळखल्या जाणार्या जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, दक्षिण-पूर्व दिशेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा , दक्षिण-पश्चिमेस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे.
लातूर हा मराठवाडा विभागातील एक प्रमुख जिल्हा असून अलीकडच्या काळात लातूर एक गुणवत्तापूर्ण शैक्षणिक केंद्र बनले आहे. ३० सप्टेंबर १९९३ ला पहाटे ३.५६ वाजता झालेल्या ह्या भीषण भुकंपामुळे जिल्ह्याचे प्रचंड नुकसान झाले होते.
नागपूरपासून ४८ कि.मी. अंतरावर असलेल्या रामटेक येथे प्रभू श्रीरामचंद्राने काही काळ वास्तव्य केले होते अशी अख्यायिका आहे. महाकवी कालिदासाने आपले मेघदूत हे काव्य येथेच लिहिले असे मानले जाते. येथे महाकवी कालिदासाचे स्मारक उभारण्यात आले असून प्राचीन साहित्य, शास्त्र यांचा अभ्यास व संशोधन करण्यासाठी कवी कुलगुरु कालिदास विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti