महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
इंटरपोल अर्थात इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑरगनाझेशन ची स्थापना १९२३ मध्ये झाली. इंटरपोलचे जगातील १८६ राष्ट्रे सदस्य आहेत. फ्रान्समधील लिऑन हे या संघटनेचे मुख्यालय आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने ९ प्रेक्षणीय स्थळे आहेत.
लातूर हे मराठवाडयातील एक ऐतिहासिक शहर आहे. दक्षिणेवर राज्य करणार्या राष्ट्रकूट राजांच्या राजधानीचे हे शहर होते. पहिला राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याच शहरात राहत असे या शहराचे तत्कालीन नाव कत्तलूर असे होते. पुढे अपभ्रंश होत त्याचे सध्याचे लातूर हे नाव पडले.
व्हियेतनाम हा आग्नेय आशियातील एक देश आहे. व्हियेतनामच्या उत्तरेस चीन, पश्चिमेस लाओस व कंबोडिया हे देश तर पूर्वेस व दक्षिणेस दक्षिण चीन समुद्र आहेत. सुमारे ८.८ कोटी लोकसंख्या असलेला व्हियेतनामचा ह्या बाबतीत जगात १३ वा तर आशिया खंडात आठवा क्रमांक आहे. हनोईही व्हियेतनामची राजधानी तर हो चि मिन्ह सिटी (जुने नाव: सैगॉन) हे येथील सर्वात मोठे शहर आहे. बौद्ध धर्म हा या देशाचा मुख्य धर्म असून देशाची ८५% लोकसंख्या ही बौद्ध धर्माची अनुयायी आहे.
कृषिप्रधान असलेल्या लातूर जिल्ह्यात ज्वारी हे प्रमुख पीक असून ऊसाखालचे क्षेत्रदेखील लक्षणीय आहे. कन्हार जिल्ह्यातील नद्यांच्या खोर्यांमध्ये अतिशय सुपीक माती आढळते. काही भागात हलकी,मध्यम स्वरुपाची तर काही भागात भरडी जमीन आढळते.औसा येथील द्राक्षे प्रसिद्ध आहेत.
१२ ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग परळी येथे आहे. ते जवळजवळ सातशे वर्ष जुने असून अहिल्याबाई होळकरांनी त्याचा इ.स. १७०६ मध्ये जिर्णोध्दार केला.
पुणे जिल्ह्याच्या उत्तर-पश्चिमेस ठाणे जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा, दक्षिण-पूर्वेस सोलापूर जिल्हा तर उत्तर-उत्तरपूर्वेस अहमदनगर जिल्हा आहे.
सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हटले जाते.
जिल्ह्यात रबी हंगामातील ज्वारीचे क्षेत्र सुमारे ७ लाख हेक्टर असून,खरीप ज्वारीचे क्षेत्र १५०० हेक्टर आहे. जिल्ह्यात ज्वारीची मालदांडे ३५-१ ही जात प्रसिध्द आहे. राज्य शासनाच्या फळबाग लागवड योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यात फळबाग लागवडीतही क्रांती झाली आहे.
पुणे-नासिक महामार्गावर चाकण -राजगुरूनगर- मंचर- नारायणगांवाहून जुन्नर मार्गे लेण्याद्री हे अंतर पुण्यापासून ९४ किमी. आहे.
हिमाचल प्रदेशातील शिमला येथील व्हाईसरॉय लॉजला राष्ट्रपती निवास म्हणून ओळखले जाते. राष्ट्रपती एस. राधाकृष्णन येथे अभ्यासासाठी थांबत होते. १८८० साली या इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली; त्यानंतर ८ वर्षांनी म्हणजेच १८८८ मध्ये इमारतीचे उद्घाटन झाले.
Copyright © 2025 | Marathisrushti