महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस वजनदार असूनही तो सोबत नेतांना भार जाणवत नाही. त्याची गोडीच मुळी अशी असते. अनेक पौष्टिक घटक असलेल्या फणसात कापा आणि बरका असे दोन प्रकार येतात.
कापा हा प्रकार जास्त प्रिय आहे. फणस कापण्याचे कष्ट नको असतील तर तयार गरेदेखील बाजारात मिळतात. सोबत दुकानातून फणसाचे तळलेले गरेदेखील मिळतात. कच्च्या फणसाच्या भाजीची चवही एखाद्या कोकणी माणसाच्या घरी घेता येते.
लहान गोल आकाराचे क्वचीत आढळणारे बटाटा फणसाच्या (विलायती फणस म्हणूनही परिचीत आहे) भाजीची चव काही निराळीच असते. हे फणस सहजपणे सोबत नेता येते.
सुरीनाम हादक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. सुरीनामच्या पूर्वेला गयाना, पश्चिमेला फ्रेंच गयाना व दक्षिणेला ब्राझील हे देश तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहे. पारामारिबो ही सुरीनामची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
बिहार, छत्तीसगढ, उत्तरप्रदेश, झारखंड, ओरिसा आणि मध्यप्रदेशमध्ये लहान अवैध शस्त्रांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे एका पाहणीत स्पष्ट झाले.
स्वाझीलँड हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागामधील एक छोटा भूपरिवेष्टित देश आहे. स्वाझीलँडच्या उत्तर, पश्चिम व दक्षिणेला दक्षिण आफ्रिका व पूर्वेला मोझांबिक हे देश आहेत. स्वाझीलँडचा उल्लेख स्थानिक भाषेत न्ग्वाने किंवा स्वातिनी असाही होतो. स्वाझीलँडमध्ये स्वाझी जमातीचे लोक बहुसंख्येने राहतात.
कक्कनाड हे शहर सध्या केरळमधील कोची शहरांतर्गत येते. एर्नाकुलम जिल्ह्याचे हे मुख्यालय असून, राज्यशासनाची अनेक कार्यालये येथे आहेत.
पुणे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेले पुणे शहर हे संस्कृतीचा अर्क मानला जातो. पुणेरी पगडी, पुणेरी भाषा, पुणेरी मिसळ, पुरण पोळी, आळूची वडी; इत्यादी वैशिष्टयांसाठी पुणे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
प्रेअरी हा समशीतोष्ण कटिबंधातील गवताळ प्रदेश आहे. युरेशियात ‘स्टेप्स’, आफ्रिकेत ‘व्हेल्ड’, अर्जेंटिनात ‘पंपाज’, तर ऑस्ट्रेलियात ‘डाऊन्स’ या नावाने हा प्रदेश ओळखला जातो.
श्रीलंका (जूने नाव – सिलोन / Ceylon), हा हिंदी महासागरात भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस वसलेला द्वीप-देश आहे. श्रीलंका व भारताच्या दक्षिण किनाऱ्यादरम्यान ३१ कि.मी. रुंदीची पाल्कची सामुद्रधुनी पसरली आहे. श्रीलंकेच्या पश्चिमेला पाल्कची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात, उत्तर व पूर्वेकडे बंगालची खाडी तथा दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे. भारत आणि मालदीव हे श्रीलंकेचे शेजारी देश आहेत. श्रीलंका इ.स. १९४८ साली राष्ट्रमंडळाचा सदस्य या नात्याने स्वतंत्र झाला.
महाराष्ट्रात अनेक द्राक्षमळे आहेत. द्राक्षापासून मद्यनिर्मिती करणारे अनेक कारखानेही महाराष्ट्रात आहेत. नारायणगाव येथे चौगुले इंडस्ट्रीजचा मद्यनिर्मिती प्रकल्प असून येथे भारतातील शॅंपेनचे पगिले उत्पादन सुरु झाले होते.
कारंजा लाड हे वाशिम जिल्ह्यातील एक शहर आहे. संत कारंज यांच्या नावावरून या शहराचे हे नाव पडलेले आहे. नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मगाव असल्याने हे शहर देशभर एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti