महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
ठाणे जिल्हा हा औद्योगिकदृष्ट्या विकसित असून ठाणे, ठाणेवाडी, कळवा, मिर्या, वागळे इस्टेट, डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण, कल्याण-भिवंडी रोड, ठाणे-बेलापूर रोड, बदलापूर, तारापूर, मुरबाड व शहापूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत.
कापूस हे विदर्भाचे मुख्य पीक असून राज्यातील ३२ लाख हेक्टरपैकी निम्मे म्हणजे १६ लाख हेक्टर क्षेत्र विदर्भात आहे.
धार्मिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान लाभलेला नाशिक जिल्हा पर्यटनाच्या विविध अंगांनी नटलेला आहे. नैसर्गिक आणि जैविक वैविध्य जिल्ह्याच्या समृध्दतेचे एक अविभाज्य अंग आहे. रामकुंड परीसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेथे मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला ते काळाराम मंदिरदेखील पर्यटकांचे खास आकर्षण राहिले आहे.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे. पुरातन आणि ऐतिहासिक असलेल्या बाळापुर शहराची बाजारपेठ एकेकाळी विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ समजली जायची.
औरंबजेबाचं सैन्यस्थळ अशीही ओळख असलेल्या बाळापूरची ८० टक्के वस्ती मुस्लिम समाजाची असूनही बाळापुरची ग्रामदेवता श्री बाळादेवी आहे. अतिशय पुरातन आणि ऐतिहासिक वारसा असणाऱ्या बाळापूर या शहराला या देवीच्या नावावरुनच नाव मिळालं आहे.
‘मनकर्णिका’ जी आता ‘मन नदी’ म्हणून ओळखली जाते आणि ‘महेशा’ नदी जी आता ‘म्हस नदी’ म्हणून ओळखली जाते, या दोन्ही नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी उंच टेकडीवर बाळादेवीचं सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात बाळादेवी मातेचा सुंदर असा मुखवटा बसवलेला आहे. मुखवट्यावर दोनवेळा उगवत्या सुर्याची थेट किरणे पडतात. ही स्वयंभू देवी असल्याचं सांगितलं जातं.
बाळादेवीच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी ५५ पायऱ्या चढून जाव्या लागतात. लाकडांच्या खांबावर उभं असलेल्या या मंदिराचा १९७८ मध्ये जिर्णोद्धार करण्यात आला.
इथल्या मुस्लीमांचाही बाळादेवीच्या अनेक उत्सवांमध्ये सहभाग असतो. त्यामुळे बाळादेवी या गावाला बंधुत्वाच्या एका अनोख्या नात्यात बांधणारी देवता असल्याचं येथील मुस्लीमांना वाटतं.
चीनमधील प्राचीन पिंग यो शहर हान काळातील वास्तुरचनेसाठी प्रसिद्ध आहे हे शहर १४व्या शतकातील शहररचनेच्या उत्कष्ट नमुना आहे.
मिंग आणि क्विंग राजांच्या काळात हे शहर भरभराटीला आले.
महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा हे महत्त्वपूर्ण शहर आहे. तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या या शहरात बहामनी राजवटीत बांधलेला पुरातन किल्ला आहे.
लातूरला मराठवाड्याचे पुणे म्हणून ओळखले जाते. लातूर जिल्हा हा शैक्षणिकदृष्ट्या नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी जोडला असून या विद्यापीठा-अंतर्गत सर्वांत जास्त ६६ महाविद्यालये आहेत. नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाचे एक उपकेंद्र लातूर येथे स्थापन होत आहे. लातूर शहरात अनेक शैक्षणिक संस्था असून शिक्षणाच्या बाबतीत गेल्या काही वर्षांपासून लातूर जिल्हा एक उत्तम शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे.
पाचगणी हे सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण असून, महाबळेश्वरइतकेच हेही पर्यटकांच्या आवडीचे पर्यटनस्थळ आहे. पाच डोंगरांच्या समूहावर विकसित झालेले. असल्यानेच या शहराचे नाव पाचगणी असे ठेवण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र राज्यातील प्राचीन यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. निरगुडा नदीकाठी वसलेले हे शहर चुन्याच्या व्यापाराचेही प्रमुख ठिकाण आहे.
आळंदी अर्थात संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी, व देहू हे संत तुकारामांचे गाव ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. अष्टविनायकांपैकी पाच गणपती महाराष्ट्रात श्री गणपतीच्या आठ मंदिरांना विशेष स्थान आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti