महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
श्रीगोंदा हे शहर अहमदनगर जिल्ह्यातील एक जुने शहर आहे. या शहराचा संतांची पुण्यभूमी असा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो.
जळगाव येथे भिल्ल, पावरा, तडवी, पारधी, गोमीत, गोंड यांसार‘या आदिवासी जमातीचे लोक राहतात. चोपडा, यावल, व रावेर या तालुक्यांमध्ये हे लोक बहुसंख्येने राहत आहेत.
नेवासा हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. संत ज्ञानेश्वरांनी येथेच ज्ञानेश्वरी लिहिली. ज्या खांबाला महाराज टेकून बसले होते, तो खांब आजही तेथे आहे.
वि.स.खांडेकर – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिले मराठी साहित्यिक वि.स.खांडेकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला. आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या.
माउंट वुताई हा चीनमधील बौध्द धर्मातील लोकांसाठी पवित्र डोंगर आहे.
महाराष्ट्रातील वाशिम हा जिल्हा जुलै १ १९९८ रोजी स्थापन झाला. जिल्ह्याची लोकसंख्या १०,२०,२१६ इतकी आहे. जिल्हाच्या पूर्वेस यवतमाळ, उत्तरेस अकोला, ईशान्येस अमरावती, पश्चिमेस बुलढाणा आणि दक्षिणेस हिंगोली हे जिल्हे आहेत.
फलटण हे सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण व महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. फलटणचे श्रीराम मंदिर प्रसिध्द असून येथे साधारणपणे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत रथोत्सव साजरा केला जातो.
टनेल ऑफ लव्ह हा युक्रेनमधील दोन रेल्वे स्टेशनला जोडणारा रस्ता आहे. मात्र, या मार्गावरील झाडांच्या रचनेमुळे तो जगप्रसिध्द झाला आहे.
तुर्कस्तानचे नाव, तुर्की भाषेमध्ये Türkiye (तुर्किए) यावचे दोन अर्थ होऊ शकतात: १. ‘तुर्क’ याचा अर्थ जुन्या तुर्की भाषेमधे शक्तिशाली असा होतो. २. तुर्कस्तानच्या नावाची फोड तुर्कि-एन आहे. त्याचा अर्थ : तुर्की म्हणजे तुर्की लोक, एन म्हणजे त्यांच्या मालकीचे आहे असा होतो. यावरून तुर्कस्तानला हे नाव पडले असावे.
जगात दक्षिण अफ्रिका या देशात प्लॅटिनमचे सर्वाधिक साठे आहेत. भारतामध्ये ओडिशा राज्यात प्लेटिनमचे साठे मोठ्या प्रमाणात अढळून येतात. म्हणून ओडिशा राज्याला भारताचे प्लॅटिनमचे कोठार असे म्हटले जाते.
Copyright © 2025 | Marathisrushti