(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • गडचिरोली जिल्हा

    घनदाट जंगले, विरळ लोकसंख्या अन्‌ त्यामुळे निसर्गरम्यतेबरोबरच अतीव शांतता हे गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य. गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्हयातील बर्‍याचशा ठिकाणी नागरी भागातील माणसांची पावले पोहोचलेली नाहीत.

  • प्राचीन शहर अचलपूर

    अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे आणि अतिशय प्राचीन शहर आहे. या शहराला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असून अनेक पुरातन वास्तू याची साक्ष देतात. शहरावर मोगल, मराठे, निजामांनी राज्य केले आहे.

  • वाशिम जिल्ह्यातल्या मंगलपीर उपविभागातील तालुका मुख्यालय मनोरा

    मनोरा हे शहर वाशिम जिल्ह्यातल्या मंगलपीर उपविभागातील तालुका मुख्यालय असलेले एक शहर आहे. अकोला. शहरापासून ते ८९ किलोमीटरवर वसलेले आहे.

  • अझरबैजान

    अझरबैजान हा मध्यपूर्व आशियातील व पूर्व युरोपातील एक देश आहे. कॉकासस प्रदेशामधील सर्वात मोठा देश असलेल्या अझरबैजानच्या उत्तरेला रशिया, वायव्येला जॉर्जिया, पश्चिमेला आर्मेनिया व दक्षिणेला इराण हे देश आहेत तर पूर्वेला कॅस्पियन समुद्र आहे. १९९१ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी अझरबैजान हे सोव्हिएट संघाचे एक प्रजासत्ताक होते.

  • ॲँटिग्वा आणि बरबुडा

    अँगोला हा मध्य अफ्रिकेतील एक देश आहे. येथे १६व्या शतकापासुन इ.स. १९७५ पर्यंत पोर्तुगालची वसाहत व आधिपत्य होते.

  • मुंबईचा मानवनिर्मित पूर्व किनारा

    mumbai-eastern-waterfront-600

    तिन्ही बाजुंनी समुद्राने वेढलेला भूभाग आणि चौथ्या बाजुला म्हणजे उत्तरेला मुंबईशी जुळलेली शहरे, असे वाढीला प्रतिकूल परिस्थिती असलेले शहर भारतात इतर कोणतेही नाही.

    सर्व शहरांची वाढ जमीनीला समांतर होत असते. मात्र मुंबईची वाढ आकाशाच्या दिशेने होत आहे.

    १९५० आणि १९५७ साली मुंबईची सीमा उत्तरेच्या दिशेने वाढवण्यात आली. १९५० साली मुंबईच्या सीमा उत्तरेकडील साष्टी बेटापर्यंत वाढवण्यात आल्या. मूळ शहराशी ताळमेळ साधताना पायाभूत आणि आवश्यक सेवासुविधा देणे शक्य व्हावे हा यामागचा उद्देश होता.

    मुंबई बंदराचा पूर्वेकडील किनारा संपूर्णपणे मानवनिर्मित आहे.

  • महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग

    मुंबई, नागपूर, मनमाड, अकोला, पुणे, आणि सोलापूर ही प्रमुख रेल्वे जंक्शन्स आहेत. नागपूर हे भारताच्या मध्यभागी असल्याने पूर्व-पश्चिम तसेच उत्तर-दक्षिण या चारही दिशाना जाणार्‍या गाड्या तेथून जातात.

  • ठाणे जिल्ह्यातील दळणवळण सोयी

    जिल्ह्यात थळ घाट, नाणे घाट व माळशेज घाट हे नाशिक, अहमदनगर व पुणे या जिल्ह्यांना जोडणारे महत्त्वाचे घाट आहेत. भारतातील पहिली रेल्वे १८५३ साली मुंबई ते ठाणे या स्थानकांदरम्यान धावली. जिल्ह्यातून जाणारे तीन प्रमुख लोहमार्ग मुंबई-चेन्नई, मुंबई-कोलकाता व मुंबई-दिल्ली हे आहेत.

  • केवूकनॉफ

    नेदरलँडमधील लिस्से येथे असणारी केवूकनॉफ ही जगातील सर्वांत मोठी फुलांची बाग आहे. या बागेत सुमारे सत्तर लाख फुले आहेत. १९४९ मध्ये ही बाग फुलविण्यास प्रारंभ झाला.

  • गोंदिया जिल्ह्याची भौगोलिक माहिती:

    गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर आहे.