महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
भंडार्यात प्राचीन किल्ला असून त्याचे रूपांतर आता कारागृहामध्ये झाले असून येथील खांब तलाव (तलावाच्या मध्यभागी उभा असलेला खांब) प्रसिद्ध आहे.
या प्राचीन खांब तलावाला ९०० वर्षाचा इतिहास आहे. महानुभव पंथाच्या लिळा चरित्रात या तलावाचा देवकी तलाव असा उल्लेख आहे. महानुभव पंथाचे सस्थापक चक्रधर प्रभु यांनी खांब तलावाच्या काठी जेवण आणि मुक्काम केल्याच्या नोंदी लिळा चरित्रात आहेत.
महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. जवाहर नगर येथे युध्द साहित्य निर्मितीची ऑर्डिनन्स फॅक्टरी १९६४ पासून आहे. नागपूर पासून केवळ २८ किलोमीटर अंतरावर आहे.
व्हेनेझुएला (संपूर्ण नावः व्हेनेझुएलाचे बोलिव्हारियन प्रजासत्ताक; स्पॅनिश: República Bolivariana de Venezuela) हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. व्हेनेझुएलाच्या पश्चिमेला कोलंबिया, दक्षिणेला ब्राझील, पूर्वेला गयाना हे देश तर उत्तरेला कॅरिबियन समुद्र आहेत.
महाराष्ट्रातील बीड हे अतिशय पुरातन शहर आहे. बिंदूसरा नदीच्या काठी वसलेल्या या शहरानजीक खजाना ही प्रसिध्द विहीर आहे. निजामशहाच्या सलाबत खान या सरदाराने या विहीरीचे बांधकाम केले आहे.
समर्थ रामदास स्वामी – श्री समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या गावी झाला. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीचा पाया भक्कम करण्याचे काम समर्थांमुळे सोपे झाले आणि या महाराष्ट्राच्या भुवनी आनंदवन उदयास आले.
कराईकल हे पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या या शहराचा कारभार महानगरपालिकेमार्फत चालतो.
त्रिचूर हे केरळ राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या केरळमधील शहरांच्या यादीत त्याचा चौथा क्रमांक लागतो. हे शहर थेक्कीनकाडू नावाच्या विस्तीर्ण मैदानी प्रदेशात वसलेले असून, येथील वडुक्कुमनाथन मंदिर प्रसिद्ध आहे.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर कौण्डीण्यपूर वसले. पूर्वीच्या वैदर्भ राज्याची ही राजधानी असल्याचे मानले जाते. याठिकाणी ताम्रपाषाण युगापासून वसाहत असल्याचे दाखले मिळाले आहेत.
रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र कोकण कृषी विद्यापीठाशी जोडण्यात आले आहे.
विदर्भातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच अमरावती जिल्हा कृषीप्रधान असून लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्रावर अन्नधान्याची लागवड केली जाते. ज्वारी हे जिल्ह्यातील एक प्रमुख पीक आहे. जिल्ह्यातील अन्नधान्य पिकांखालील क्षेत्रापैकी निम्मे क्षेत्र ज्वारीखाली आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti