महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
दिल्ली येथील चाणक्यपुरीत भारतीय रेल संग्रहालयात रेल्वेचा तब्बल १४० वर्षांचा इतिहास आहे. विविध इंजिन आणि रेल्वेच्या डब्यासह देशातील पहिल्या रेल्वेचे मॉडेल आहे
धारवाड हे कर्नाटकातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. ते पुणे -बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आहे. या शहराशेजारचे हुबळी शहर व धारवाड यांची संयुक्त महापालिका आहे.
सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रात येतो. कृष्णा आणि वेण्णा या नद्यांच्या संगमावर समुद्रसपाटीपासून २३२० फूट उंचीवर सातारा शहर वसले आहे. सातारा जिल्ह्याच्या उत्तरेला पुणे जिल्हा असून; पूर्वेला सोलापूर, दक्षिण व आग्नेयेला सांगली, पश्र्चिमेला रत्नागिरी व वायव्येस रायगड जिल्हा आहे.
द ग्रेट ब्लू होल हे मध्य अमेरिकेतील सर्वात मोठे समुद्री विवर आहे.
चामराजनगर हे शहर कर्नाटक राज्याच्या दक्षिण टोकावर वसलेले एक मोठे शहर आहे. म्हैसूरचे नववे राजे चामराज यांच्या नावावरुन या शहराचे नाव पडलेले असून, कर्नाटकातील तुलनेने हे एक अल्पविकसित असे शहर आहे.
तामिळनाडू आणि केरळ या दोन राज्यांच्या सीमा चामराजनगरपासून खूपच जवळ आहेत. म्हैसूरपासून राष्ट्रीय महामार्घ क्र. १७ वरुन चामराजनगरला जाता येते.
चामराजनगर आणि परिसरात अनेक प्रसिध्द पर्यटनस्थळे आहेत. चामराजराजेश्वर मंदिर, बन्नारी अमन मंदिर, गोपालस्वामी मंदिर, बांदिपुरा राष्ट्रीय अभयारण्य, शिवनासमुद्र धबधबा आदींचा त्यात समावेश आहे.
प्रसिध्द भवानीसागर धरण येथून ७५ कि.मी. वर आहे.
आंध्रप्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्याचे हे मुख्यालय आहे. इथे विशेष दर्जा असलेली महापालिका असून इथले बंदर प्रसिध्द आहे. ब्रिटीश काळात या शहराचे नाव मासुलीपट्टणम असे होते. कृष्णा नदी बंगालच्या उपसागराला या ठिकाणी मिळते.
रामायण काळात जिल्ह्याचा परिसर एक ठळक स्थान होता. कारण वनवासात असताना श्रीराम,लक्ष्मण व सीतामाई हे त्रिकूट या परिसरात निवासाला होते असे मानले जाते. रावणाची बहीण शूर्पणखेचे नाक लक्ष्मणाने कापल्याने या शहराला नाशिक असे नाव पडल्याचे (नाक-नासिका-नाशिक या संगतीने) सांगितले जाते.
नांदगाव-खांडेश्वर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, तालुक्याचे मुख्यालय या शहरात आहे. येथे असलेले भगवान खांडेश्वराचे प्राचीन मंदिर राज्यात प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्रात कालव्यांचा विकास जवळजवळ १५० वर्षांपूर्वी सुरु झाला. सन १८७० मध्ये “कृष्णा” हा नावाचा पहिला कालवा बांधल्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात राज्यात अनेक कालवे बांधले गेले आणि नंतर सिंचन क्षेत्राच्या विकासाला गती मिळाली.
ब्रिटीशकालीन खोडशी धरणातून सांगली जिल्हय़ात पाणी नेण्यासाठी कृष्णा कालव्याची निर्मिती करण्यात आली. सैदापूरच्या रेणुका मंदिराजवळ कृष्णा कालवा सुरू होतो.
खोडशी (ता. कराड) येथून निघालेला कृष्णा कालवा ८६ कि.मी. लांबीचा असून, तो सातारा, सांगली जिल्ह्यातून जातो. या दोन्ही जिल्ह्यातील कराड, वाळवा, पलूस, तासगाव या तालुक्यातील ४५ गावांतील सुमारे ९४०० हेक्टर क्षेत्र या कालव्याच्या लाभ क्षेत्रात येते.
सध्या या कालव्याला अतिक्रमणांनी विळखा घातलेला दिसतो. जवळपास २००० हेक्टरहून जास्त क्षेत्रामध्ये अतिक्रमणे आहेत.
अरुणाचल प्रदेशातील लोअर सुंबासिरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. सर्वाधिक शंभरपेक्षा जास्त खासगी आणि शासकिय शाळा येथे आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti