महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
ऑस्ट्रेलियातील फ्रासर बेट हे जगातील सर्वांत मोठे वाळूचे बेट आहे.
कामेरून हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. इतर आफ्रिकन देशांच्या तुलनेत कामेरूनला राजकीय व सामाजिक स्थैर्य लाभले आहे.
रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र कोकण कृषी विद्यापीठाशी जोडण्यात आले आहे.
बोत्स्वाना हा हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे. बोत्स्वानाच्या आग्नेय व दक्षिणेला दक्षिण आफ्रिका, पश्चिमेला व उत्तरेला नामिबिया, उत्तरेला झांबिया तर वायव्येला झिम्बाब्वे हे देश आहेत. बोत्वासाचा ७० टक्के भाग कालाहारी वाळवंटाने व्यापला आहे. गाबोरोनी ही बोत्स्वानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. केवळ ३.४ इतकी लोकसंख्या घनता असलेला बोत्स्वाना जगातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेल्या देशांपैकी एक आहे.
लाओस (अधिकृत नाव: लाओ जनतेचे लोकशाहीवादी प्रजासत्ताक) हा आग्नेय आशियातील देश आहे. या देशाच्या वायव्येस म्यानमार व चीन, पूर्वेस व्हियेतनाम, दक्षिणेस कंबोडिया, पश्चिमेस थायलंड हे देश आहेत. व्हियांतियान ही लाओसची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. उत्तर लाओस, मध्य लाओस आणि दक्षिण लाओस असे या देशाचे तीन प्रमुख विभाग आहेत.
अंजनगाव हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर असून, येथून जवळच असलेले सुरजी हे या शहराचेच एक जुळे शहर आहे. येथील संत गुलाबबाबांचे समाधी मंदिर प्रसिद्ध आहे.
भंडारा जिल्हा वनसंपत्ती व खनिजसंपत्तीत समृद्ध असून जिल्ह्याच्या उत्तरेस बालाघाट जिल्हा (मध्य प्रदेश), पूर्वेस गोंदिया, दक्षिणेस चंद्रपूर तर पश्चिमेस नागपूर जिल्हा आहे.
राहुरी हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. शहराचा साक्षरतेचा आलेख उल्लेखनीय आहे. सरासरी ७० टक्के लोक साक्षर आहेत. या शहरात असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ देशभर प्रसिद्ध आहे.
भारतातील पहिली रेल्वे मुंबई-ठाणे दरम्यान सुरू झाली. दि.१६ एप्रिल, १८५३ रोजी ती वाहतूकीस खुली करण्यात आली व त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. १८७० मध्ये मुंबईला कोलकाता या महानगराशी, तर १८७१ मध्ये चेन्नईशी लोहमार्गाद्वारे जोडण्यात आले.
शिवकालात रोहीडय़ाचा किल्ला दुय्यम होता. तसेच इतिहासमधेही फारशी मोठी घटना या किल्ल्याच्या संदर्भाने घडलेली नाही. तरीही हिरडस मावळाच्या वाटेवर देखरेखी साठी अतिशय मोक्याच्या जागी हा किल्ला आहे.
गडावरुन सिंहगड, कात्रजचा डोंगर, तोरणा, राजगड, पुरंदर, वज्रगड, खंबाटकीचा घाट तसेच रायरेश्वराचे पठार आणि पाचगणीचे पठार व मांढरदेव दृष्टीपथात येतात.
Copyright © 2025 | Marathisrushti