महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
अंबड शहरात मत्स्योदरी देवीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर इ.स.१८ व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कारकिर्दित झाले आहे.
महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे प्रसिध्द संत गोरा कुंभार यांचे जन्मस्थळ आहे. याच ठिकाणी संत गोरा कुंभारांची समाधीही आहे. प्राचीन काळी याचे नाव तगर असे होते.
भारतातील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी आठवे औंढा- नागनाथ हिंगोली जिल्ह्यात आहे. येथे हेमाडपंती मंदिर असून ते द्वादशकोनी व शिल्पसमृद्ध आहे. धर्मराजाने हे मंदिर महाभारतकाळात बांधल्याचं एका आख्यायिकेत म्हटलं आहे.
कोट्टायम हे केरळ राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. या शहरात रबराची मोठी बाजारपेठ आहे.
कोची हे केरळ राज्यातील एर्नाकुलम जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे. या शहराला अरबी समुद्राचा मोठा किनारा लाभलेला असून, येथे मोठे बंदर आहे.
पुणे जिल्ह्याच्या उत्तर-पश्चिमेस ठाणे जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा, दक्षिण-पूर्वेस सोलापूर जिल्हा तर उत्तर-उत्तरपूर्वेस अहमदनगर जिल्हा आहे.
शहरी आणि औद्योगीक कचर्यापसून निर्मित रॉक गार्डन चंदीगढ शहरात आहे. या गार्डनला पिंजौर रॉक गार्डन तसेच नेकचंद गार्डन म्हणून ओळखले जाते. नेकचंद यांनी या गार्डनची निर्मिती केली आहे.
ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन निर्माण केलेला पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात नवा जिल्हा. अनेकविध वैशिष्ट्यांनी समृध्द असा हा जिल्हा आहे. पश्चिमेला अरबी समुद्र असल्याने या जिल्ह्याला सुंदर किनारा लाभला आहे. पूर्वेला सह्याद्रिची रांग असल्याने हा जिल्हा जंगल, डोंगर-कपारींनी समृध्द आहे.
मुंबई -जंजिरा एस्.टी ने जंजिर्यास उतरून पायी रस्त्याने १० मिनीटाच्या अंतरावर. हे गणेश मंदिर आहे. मुंबई – मुरूड अंतर १६६ कि.मी. आहे.
सिद्धिविनायक महागणपती मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर मुंबईजवळील टिटवाळा या गावात काळूनदीच्या काठावर आहे. चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांवर विजय मिळविल्यानंतर श्रीमहागणपतीचे हे मंदिर बांधले.
Copyright © 2025 | Marathisrushti