(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • द लेडी ऑफ माली

    गिनीमधील माऊंट लैमा येथे १५०० मीटर उंच असा पर्वताचा सुळका असून, त्यावर वाऱ्याच्या आघातामुळे एका सुंदर स्त्रीची प्रतिमा कोरली गेली आहे.

  • अकोल्याच्या बाळापूरची ग्रामदेवता श्री बाळादेवी

    अकोल्याच्या बाळापूरची ग्रामदेवता श्री बाळादेवी

    अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे. पुरातन आणि ऐतिहासिक असलेल्या बाळापुर शहराची बाजारपेठ एकेकाळी विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ समजली जायची.

    औरंबजेबाचं सैन्यस्थळ अशीही ओळख असलेल्या बाळापूरची ८० टक्के वस्ती मुस्लिम समाजाची असूनही बाळापुरची ग्रामदेवता श्री बाळादेवी आहे. अतिशय पुरातन आणि ऐतिहासिक वारसा असणाऱ्या बाळापूर या शहराला या देवीच्या नावावरुनच नाव मिळालं आहे.

    ‘मनकर्णिका’ जी आता ‘मन नदी’ म्हणून ओळखली जाते आणि ‘महेशा’ नदी जी आता ‘म्हस नदी’ म्हणून ओळखली जाते, या दोन्ही नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी उंच टेकडीवर बाळादेवीचं सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात बाळादेवी मातेचा सुंदर असा मुखवटा बसवलेला आहे. मुखवट्यावर दोनवेळा उगवत्या सुर्याची थेट किरणे पडतात. ही स्वयंभू देवी असल्याचं सांगितलं जातं.

    बाळादेवीच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी ५५ पायऱ्या चढून जाव्या लागतात. लाकडांच्या खांबावर उभं असलेल्या या मंदिराचा १९७८ मध्ये जिर्णोद्धार करण्यात आला.

    इथल्या मुस्लीमांचाही बाळादेवीच्या अनेक उत्सवांमध्ये सहभाग असतो. त्यामुळे बाळादेवी या गावाला बंधुत्वाच्या एका अनोख्या नात्यात बांधणारी देवता असल्याचं येथील मुस्लीमांना वाटतं.

  • यवतमाळ जिल्ह्याचा इतिहास

    यवतमाळ ह्या शहराचे नाव आधी ‘यवत’ अथवा ‘यवते’ असावे असे मानले जाते. या यवत किंवा यवतेचा माळ (टेकडीवरील सपाटीचा प्रदेश) किंवा ‘यवते’ चा महाल (परगणा किंवा विभाग) अशा शब्द रचनेतून ‘यवतमाळ’ हे नाव पडले असावे.

  • गडचिरोली जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

    येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. त्यामुळे शेतीशी निगडीत काही उद्योग या जिल्ह्यात केले जातात. वडसा येथे खत उद्योग आहे त्याचबरोबर भात गिरण्यादेखील आहेत.

  • kanyakumari-featured

    कन्याकुमारी

    कन्याकुमारी हे तामिळनाडु राज्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळ आणि धार्मिक केंद्र आहे. देशाच्या दक्षिण टोकावर ते वसलेले आहे. हे ठिकाण पूर्वी केप कॉमोरीन नावाने ओळखले जात होते.

  • पैनावू

    पैनावू

    पैनावू हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्याचे मुख्यालय असलेले शहर आहे. हे थोड्डुपुझा तालुक्यात येते.

  • बीड जिल्ह्याचा इतिहास

    बीड जिल्ह्याचा प्राचीन इतिहास रामायण काळाशी जोडलेला आहे असे मानले जाते. सुसंगत व लिखित इतिहास साधारण इ.स.चौथ्या शतकापासूनचा उपलब्ध आहे.

  • भारतातील तिसरे विद्यापीठ

    भारतातील तिसरे विद्यापीठ

    नागपूर येथे महाराष्ट्रातील पहिले “पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ” आहे अशा प्रकारचे हे विद्यापीठ भारतातील तिसरे असून, पशुधनावर संशोधन करणारी मध्य भारतातील ही महत्त्वपूर्ण संस्था आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

    संगीत क्षेत्रातील साथीची वाद्ये उत्पादित करण्यामध्ये अहमदनगर राज्यात आघाडीवर आहे. प्रामुख्याने चर्मवाद्ये, हार्मोनियम, टाळ-झांज यांची निर्मिती नगरमध्ये केली जाते. वारकरी संप्रदायाच्या भजनात अत्यावश्यक असलेले कासे-पितळ्याचे टाळ सुध्दा येथे तयार होतात. नगरचा कापडबाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, त्यामुळे लग्नसराईच्या काळात येथे ग्राहकांची गर्दी उसळते.

  • नागपूरमधील शून्य मैलाचा दगड

    नागपूरमधील शून्य मैलाचा दगड

    नागपूर जसे संत्र्यांसाठी प्रसिध्द आहे, तसेच स्थापत्य अभियांत्रिकीच्या बाबतीतही शहराची वेगळी ओळख आहे. ती म्हणजे, नागपूर शहरातील शून्य मैलाचा दगड.