महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
हे मंदिर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे आहे. भारतातील प्रमुख गणेश पीठापैकी हे एक पीठ होय. या स्थानांजवळील तलावात वर्षाऋतूत नेहमी कमळ असतात. कमळ म्हणजे पदम आणि आलय म्हणजे घर – म्हणून याला पद्मालय असे म्हणतात.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरातील शिवाजी मंदिर हे प्रसिद्ध नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाची व्यवस्था श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीकडे आहे.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मांढळ हे प्राचीन ठिकाण आहे. जवळच्या डोंगर रांगेत सातवाहनकालीन लेणी सापडल्या आहेत. मांढळ येथे वाकाटक वसाहत, ढोरफडी भागातिल उत्खननीत मंदिरावशेष, भोला टेकडीवरील उत्खननात सापडलेले ताम्रपट ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करतात.
मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ती बाराखडी राहिली नसून चक्क चौदाखडी झालेय. मराठी वर्णलिपीत १२ स्वरांत आणखी दोन स्वरांची भर अधिकृतपणे घालण्यात आली गेली आहे.
प्रसिद्ध स्थापत्य विशारद श्री.फैयाजुद्दीन यांच्या कल्पना आविष्कारातून साकारलेली लातूर शहरातील ‘गंजगोलाई’ ही वर्तुळाकार बाजारपेठ तिच्या रचनेमुळे आकर्षक ठरते. शहरातील अनेक रस्ते या बाजारपेठेस वेगवेगळ्या बाजूंनी येऊन मिळतात. येथील सुरतशाहवाली दर्गा, सिद्धेश्वर मंदिर, केशवराज मंदिर, लातूर-औसा रस्त्यावरील विराट हनुमानाची मूर्ती व पार्श्र्वनाथ मंदिर या सारखी धार्मिक ठिकाणे प्रसिद्ध आहेत.
मेक्सिकोमधील नायका येथे जिप्समच्या खाणीत जिप्सच्या कांड्या असलेली गुहा आढळते. अशाप्रकारची ती जगातील एकमेव गुहा आहे.
बोलिव्हिया हा दक्षिण अमेरिका खंडाच्या मध्य भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. बोलिव्हियाच्या उत्तरेला व पूर्वेला ब्राझिल, दक्षिणेला पेराग्वे व आर्जेन्टिना तर पश्चिमेला चिली व पेरू हे देश आहेत. ला पाझ ही बोलिव्हियाची राजधानी तर सान्ता क्रुझ हे सर्वात मोठे शहर आहे.
मराठी ही आपली राज्यभाषा असली तरी, गोंदिया शहर मध्यप्रदेशपासून फक्त २० किलोमीटर अंतरावर असल्याने, गोंदियामध्ये जास्त बोलली जाणारी भाषा हिंदी आहे. गोंदियाला हिंदी भाषिक तालुका पण म्हणतात. गोंदियात दिवाळी, होळी, दसरा हे सण जल्लोषात साजरे केले जातात.
चीनमधील यिन झू इ.स.पूर्व १३०० या काळात शान राजवटीची राजधानी होती.
जिल्ह्यात केवळ बीडमधे औद्योगिक वसाहत आहे. जिल्ह्यात के १९७० साली परळी येथे औष्णिक विद्युत केंद्र उभारण्यात आले. १९९५ मध्ये वृक्षारोपणासाठी महाराष्ट्र शासनाच्या वनश्री पुरस्काराने या केंद्रास गौरविण्यात आले.
Copyright © 2025 | Marathisrushti