महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
आसाम राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले करीमगंज हे शहर बांगलादेशच्या सरहद्दीवर वसलेले आहे. कुशीयारा नावाची नदी या शहराजवळून वाहते. ही नदीच भारत आणि बांगलादेश यांच्यामधली सीमा मानली जाते. या शहराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नोटी खल नावाचा एक मोठा कालवा या शहरातून वाहतो.
करीमगंज जिल्ह्याची स्थापना १९८३ मध्ये झाल्यानंतर जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात आले. त्यापूर्वी हे शहर सील्हेट जिल्ह्याचा एक भाग होते. रस्ते व रेल्वे मार्गाने हे शहर देशाच्या विविध भागांशी जोडलेले आहे. गुवाहाटीपासून करीमगंज ३५० किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.
राज्यातील २५ शहरांत शहरांतर्गत वाहतूक सेवा आहे. यासाठी म.रा.प.म. दररोज सरासरी ५२० बसगाड्यांचा वापर करते.
मुंबईच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे भारताच्या औद्योगिक, आर्थिक राजधानीचा मान मुंबईस मिळाला आहे. जगातील ‘फॉर्च्यून ४००’ कंपन्यांपैकी चार भारतीय कंपन्यांची कार्यालये मुंबईमधे आहेत. मुंबईतील औद्योगिक क्षेत्रात औषधनिर्माण, बांधकाम, अभियांत्रिकी, धातूउद्योग, रेशीमउद्योग, काचसामान, सिनेमा, प्लॅस्टिक, भारत व हिंदुस्थान पेट्रोलियम असे उद्योग आहेत.
चीनमधील डाझू गुहा त्यातील सुंदर कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहेत.
धुळ्यामधून मुंबई – आग्रा (राष्ट्रीय महामार्ग क्र. ३) व हाजीरा-धुळे-कोलकत्ता (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६) हे महामार्ग जातात. भुसावळ – शिंदखेडा – नंदूरबार – सूरत हा लोहमार्ग जिल्ह्यातून जातो.
चंद्रपूर हा विदर्भामधील जिल्हा असून धनसंपदेमुळे निसर्गसंपन्न झालेला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या नैऋत्य बाजूला राजुरा तालुका आहे. या तालुक्यामधे माणिकगडाचा वनदुर्ग आहे.
जॉर्जिया हा पश्चिम आशिया व पूर्व युरोपमधील एक देश आहे. कॉकासस भौगोलिक प्रदेशामध्ये वसलेल्या जॉर्जियाच्या उत्तरेला रशिया, दक्षिणेला तुर्कस्तान आणि आर्मेनिया, पूर्वेला व आग्नेय दिशेला अझरबैजान हे देश तर पश्चिमेला काळा समुद्र आहेत. त्बिलिसी ही जॉर्जियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
फार पूर्वी समुद्राचे पाणी वाढून संबंध गुहागर बुडण्याची वेळ आली तेव्हा गावकऱ्यांनी या गणेशाची प्रार्थना केली. तेव्हा या मूर्तीने आपले पूर्वेकडील तोंड पश्चिमेकडे केले व समुद्र हटविला. तोंड उफराटे केले म्हणून यास उफराटा गणपती म्हणतात.
कोन्नी हे केरळ राज्यातील पत्तनम्तिट्टा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. मुवट्टपुझा ते पुनलूर या मार्गावर पत्तनम्तिट्टापासून ११ किलोमीटरवर ते वसलेले आहे. हे शहर या परिसरातील हत्ती तसेच रबर उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.
प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस वजनदार असूनही तो सोबत नेतांना भार जाणवत नाही. त्याची गोडीच मुळी अशी असते. अनेक पौष्टिक घटक असलेल्या फणसात कापा आणि बरका असे दोन प्रकार येतात.
कापा हा प्रकार जास्त प्रिय आहे. फणस कापण्याचे कष्ट नको असतील तर तयार गरेदेखील बाजारात मिळतात. सोबत दुकानातून फणसाचे तळलेले गरेदेखील मिळतात. कच्च्या फणसाच्या भाजीची चवही एखाद्या कोकणी माणसाच्या घरी घेता येते.
लहान गोल आकाराचे क्वचीत आढळणारे बटाटा फणसाच्या (विलायती फणस म्हणूनही परिचीत आहे) भाजीची चव काही निराळीच असते. हे फणस सहजपणे सोबत नेता येते.
Copyright © 2025 | Marathisrushti