महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती,मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी कोल्हापूर प्रसिद्ध आहे. येथील मसालेदार पाककृतीही तिखटपणासाठी भारतभर प्रसिद्ध आहेत. कोल्हापूर हे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे माहेरघरच मानले जाते. या जिल्ह्यात पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे १२ महिने विविध पिके घेतली जातात.
तुर्कमेनिस्तान (रशियन Туркмения, तुर्कमेन Türkmenistan ) मध्य आशियातील एक देश आहे. ११९१ सालापर्यंत तुर्कमेनिस्तान हे सोव्हियत संघाचा एक घटक होता.. अश्गाबाद ही तुर्कमेनिस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
जुन्नर गावातील शंकरपूरा भागात हे गणेश मंदिर आहे. या मूर्तीला लेण्याद्रीचाच गणपती येथे आला आहे असे मानले जाते.
शेंदुरजाना घाट हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. वारुड तालुक्यात ते येते. या शहरातील साक्षरतेचे प्रमाण संपूर्ण अमरावती जिल्ह्यात लक्षणीय आहे.
रामायण काळात जिल्ह्याचा परिसर एक ठळक स्थान होता. कारण वनवासात असताना श्रीराम,लक्ष्मण व सीतामाई हे त्रिकूट या परिसरात निवासाला होते असे मानले जाते. रावणाची बहीण शूर्पणखेचे नाक लक्ष्मणाने कापल्याने या शहराला नाशिक असे नाव पडल्याचे (नाक-नासिका-नाशिक या संगतीने) सांगितले जाते.
बाराव्या शतकात जिल्ह्यातील रायगड या डोंगराला तणस, राजिवर, रायरी, रायगिरी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात असे. दूरदृष्टी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देश व कोकणच्या सीमेवरील या किल्ल्याचे महत्त्व ओळखून येथेच राजधानी वसवली.
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील हर्नेश्वर येथील अर्ध नारी नटेश्वर हे प्रसिद्ध स्थळ आहे. या शिवाय जगात कुठेही अर्धनारी नटेश्वराची प्रतिमा नाही.
भंडार्यात प्राचीन किल्ला असून त्याचे रूपांतर आता कारागृहामध्ये झाले असून येथील खांब तलाव (तलावाच्या मध्यभागी उभा असलेला खांब) प्रसिद्ध आहे.
या प्राचीन खांब तलावाला ९०० वर्षाचा इतिहास आहे. महानुभव पंथाच्या लिळा चरित्रात या तलावाचा देवकी तलाव असा उल्लेख आहे. महानुभव पंथाचे सस्थापक चक्रधर प्रभु यांनी खांब तलावाच्या काठी जेवण आणि मुक्काम केल्याच्या नोंदी लिळा चरित्रात आहेत.
उत्तर इटलीमद्ये असणारे टेट्रो थिएटरचे बांधकाम १५८० ते १५८५ या काळात झाले. आंद्र पलाडिया याने याची रचना केली. मात्र, याचे उद्घाटन पलाडियाच्या मृत्यूनंतर ३ मार्च १५८५ ला झाले.
भारतातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा ही हजारो वर्षांची परंपरा आहे. प्रत्येक प्रांत, प्रत्येक नदी, प्रत्येक मंदिर, प्रत्येक मूर्ती या सर्वांत भारतीय समाजाची अस्मिता, श्रद्धा, पुराणकथा आणि अध्यात्म दडलेले आहे. या लेखात आपण अशाच काही अद्वितीय, महत्त्वपूर्ण, इतिहास प्रसिद्ध आणि लोकमान्य धार्मिक स्थळांचा परिचय करून घेणार आहोत.
Copyright © 2025 | Marathisrushti