महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
अरुणाचल प्रदेशातील पश्चिम सियांग जिल्ह्याचे मुख्यालय असलेले अलाँग शहर आसाम राज्याच्या सीमेपासून जवळ आहे. वसले आहे. हिरवे शहर, आरोग्यदायी शहर म्हणूनही अलोंगची ओळख आहे. हे थंड हवेचे ठिकाण असून, उन्हाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.
मुर्तिजापूर हे अकोला जिल्ह्यातील एक तालुका मुख्यालय असलेले शहर आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील एक महत्वाचे जंक्शन या शहरात असून देशांच्या विविध भागांत जाणार्या गाड्या या ठिकाणी थांबतात.
महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा हे महत्त्वपूर्ण शहर आहे. तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या या शहरात बहामनी राजवटीत बांधलेला पुरातन किल्ला आहे.
महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात समाविष्ट असलेले जालना हे शहर कृषी आधारित उद्योगासाठी प्रसिध्द आहे. समर्थ रामदास स्वामी याचे वास्तव्य होते. १९८२ पूर्वी हे शहर औरंगाबाद जिल्ह्याच्या भागात होते.
बहामास हा अटलांटिक महासागरातील २९ बेटांनी बनलेला एक देश आहे. बहामास अमेरिकेच्या आग्नेय दिशेला तर क्युबा, डॉमिनिकन प्रजासत्ताक व हैतीच्या पूर्वेला कॅरिबियन प्रदेशात वसला आहे. नासाउ ही बहामासची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
व्हियेतनाम हा आग्नेय आशियातील एक देश आहे. व्हियेतनामच्या उत्तरेस चीन, पश्चिमेस लाओस व कंबोडिया हे देश तर पूर्वेस व दक्षिणेस दक्षिण चीन समुद्र आहेत. सुमारे ८.८ कोटी लोकसंख्या असलेला व्हियेतनामचा ह्या बाबतीत जगात १३ वा तर आशिया खंडात आठवा क्रमांक आहे. हनोईही व्हियेतनामची राजधानी तर हो चि मिन्ह सिटी (जुने नाव: सैगॉन) हे येथील सर्वात मोठे शहर आहे. बौद्ध धर्म हा या देशाचा मुख्य धर्म असून देशाची ८५% लोकसंख्या ही बौद्ध धर्माची अनुयायी आहे.
मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर शहर हे मराठा समाजातील शिंदे या वतनदार घराण्याचे वतनी संस्थान म्हणून प्रसिध्द आहे.
ज्येष्ठ साहित्यिक मो.ग रांगणेकर यांचा जन्म ठाणे शहरात झाला. १९६७ साली गोव्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
मोझांबिक हा आग्नेय आफ्रिकेतील एक देश आहे. मोझांबिकचा शोध वास्को दा गामाने १४९८ साली लावला व १५०५ मध्ये पोर्तुगीजांनी तेथे आपली वसाहत स्थापन केली.
केरळ राज्यातील कोचीन शहराची अरबी समुद्राची राणी म्हणूनच ओळख आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti