महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
सदाशिवरावभाऊ पेशव्यांनी निजामा विरुध्दची लढाई उदगीर जवळ झालेली लढाई जिंकल्यामूळे हा किल्ला सर्वांना परीचित आहे. उदगीर हा भूईकोट किल्ला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव औद्योगिक वसाहत तळोदे येथे आहे. जिनिंग व प्रेसिंगचे कारखाने नंदूरबार व शहादे येथे आहेत. तळोदे येथील सागाच्या लाकडाची बाजारपेठ जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.
भीमा नदी पंढरपुरात चंद्रभागा नावाने ओळखली जाते. भाविक पंढरीत पाऊल ठेवताच प्रथम चंद्रभागेत स्नान करून पावन होतात. भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी आहे. ती महाराष्ट्रात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे ७२५ कि.मी. आग्नेयेस वाहून मिळते.
महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर महाप्रभू यांनी भंडारा जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी दिल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
मध्य प्रदेशातील झांशी हे एक ऐतिहासिक शहर आहे. ‘मेरी झांशी नही दुंगी’ अशी गर्जना करुन इंग्रज राजवटीसोबत करारी झुंज दिल्यामुळे आजही झांशीला राणी लक्ष्मीबाईची झांशी म्हणूनच ओळखले जाते.
मोनॅको हा युरोपातील एक नगर-देश आहे. मोनॅको आकाराने जगातील दुसरा सर्वात लहान सार्वभौम देश आहे (सर्वात लहान देश: व्हॅटिकन सिटी). मोनॅकोच्या पूर्वेला भूमध्य समुद्र तर इतर तीन दिशांना फ्रान्स हा देश आहे तर मोनॅकोपासून इटली देशाची सीमा केवळ १६ किमी अंतरावर आहे. मोनॅकोमध्ये राजेशाही सरकार आहे. आल्बर्ट दुसरा हा मोनॅकोचा राजकुमार व सत्ताप्रमुख आहे.
आसाम राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले करीमगंज हे शहर बांगलादेशच्या सरहद्दीवर वसलेले आहे. कुशीयारा नावाची नदी या शहराजवळून वाहते. ही नदीच भारत आणि बांगलादेश यांच्यामधली सीमा मानली जाते. या शहराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नोटी खल नावाचा एक मोठा कालवा या शहरातून वाहतो.
करीमगंज जिल्ह्याची स्थापना १९८३ मध्ये झाल्यानंतर जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात आले. त्यापूर्वी हे शहर सील्हेट जिल्ह्याचा एक भाग होते. रस्ते व रेल्वे मार्गाने हे शहर देशाच्या विविध भागांशी जोडलेले आहे. गुवाहाटीपासून करीमगंज ३५० किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.
सॉलोमन द्वीपसमूह हा ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक देश आहे. सॉलोमन द्वीपसमूह पापुआ न्यू गिनीच्या पूर्वेला आहे.
गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे १९५० साली गुजरात विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठाचे स्वरुप संलग्न व अध्यापनात्मक आहे.
एकही घटक महाविद्यालय नसलेले राज्यातील हे एकमेव विद्यापीठ आहे.
या विद्यापीठाचा सर्व प्रशासकीय कारभार हा कुलसचिवांकडे असून या विद्यापीठास एकूण १३६ महाविद्यालये संलग्न आहेत.
ज्वारी हे नगर जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामात घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या जास्त आहे.गेल्या काही वर्षांपासुन द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन जिल्ह्यात वाढते आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti