महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र कोकण कृषी विद्यापीठाशी जोडण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील सातारा शहरात २३ जून १९६१ रोजी देशातील पहिल्या सैनिकी शाळेची स्थापना करण्यात आली. पहिल्या सैनिकी शाळेमुळे सातारा शहराची देशाच्या कानाकोपर्यात ओळख निर्माण झाली. राष्ट्रप्रेम निर्माणासाठी या शाळेचे महत्त्व अबाधित आहे.
मणिपूर राज्यातील इम्फाळ शहरापासून ४५ कि. मी. अंतरावर मोहरा हे ठिकाण आहे.
सिंगापूरमध्ये अनेक वर्षे मासेमार आणि चाच्यांच्या वसाहती होत्या. १४ व्या शतकापर्यंत येथे सुमात्राच्या श्रीविजय साम्राज्याची वसाहत होती.
१५ व्या शतकात मलायाच्या साम्राज्यात सिंगापूरचा समावेश झाला. १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी येथे वसाहत स्थापन केल्या १८१९ मध्ये सिंगापूरचे ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीकडे हस्तांतरण झाले.
ऑस्ट्रियातील स्लेझबर्ग हे शहर गोथीक काळातील इमारतींचे सुंदर शहर आहे.
ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ही चव सोबत ठेवण्यासाठी किंवा आवडत्या पाहुण्यांचा पाहुणचार करतांना या मेव्यापासून बनविलेले पदार्थ उपयोगात आणले जातात. रत्नागिरीच्या गावागावातून असे पदार्थ तयार स्वरुपात मिळतात.
फणसपेाळी, आंबापोळी, आंबावडी, विविध प्रकारची सरबते, कैरीचे पन्हे, चॉकलेट्स, टीन किंवा बाटलीबंद आंब्याचा रस, चिक्की आदी विविध पदार्थ पर्यटक आवडीने खरेदी करतात. या प्रक्रीया उद्योगावर अनेकांचे रोजगारही अवलंबून आहेत. या पदार्थंाच्या माध्यमातून कोकणची ओळख देशाच्या विविध भागात जाते.
ऑस्ट्रेलियातील उलुरु हा अखंड दगडाचा खांब असून याचा घेर सुमारे ९.४ कि.मी. इतका आहे.
मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक हा आफ्रिकेच्या मध्य भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. ह्याच्या उत्तरेला चाड, ईशान्येला सुदान, पूर्वेला दक्षिण सुदान, दक्षिणेला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक व काँगोचे प्रजासत्ताक तर पश्चिमेला कामेरून हे देश आहेत. युबांगी ही काँगो नदीची एक प्रमुख उपनदी मआप्रच्या दक्षिण दिशेने वाहते. बांगुई ही मआप्रची राजधानी व सर्वात मोठे शहर ह्याच नदीवर वसलेले आहे.
सेंट किट्स आणि नेव्हिस हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. अमेरिका (खंड)ातील हा सर्वात लहान स्वतंत्र देश आहे. सेंट किट्स व नेव्हिस ही ह्या देशातील दोन प्रमुख बेटे आहेत.
उतरप्रदेशातील लखनऊ येथे चार बाग रेल्वे स्टेशन आहे.
१३ पैकी हे सर्वात मोठे स्टेशन आहे.
इ.स. १९२३ साली बांधण्यात आलेल्या इमारतीत रेल्वे स्थानकाचा कारभार चालतो.
देशातील मुख्य शहरांना हे स्टेशन जोडले गेले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti