(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • सिफन धबधबा

    किलंग नदीवरील सिफन धबधबा हा तैवानमधील सर्वांत रुंद धबधबा आहे.

  • श्रीलंकेला का जावे

    श्रीलंकेला का जावे

    भारतीय उपखंडाच्या दक्षिण टोकापासून अवघ्या ३५ किलोमीटरवर, हिंद महासागराच्या निळ्याशार पाण्यात तरंगणारा एक सुंदर बेटराष्ट्र म्हणजे श्रीलंका. प्राचीन काळी याला लंका, सीलोन आणि सिंहलद्वीप अशा नावांनी ओळखले जात असे. आज “मोत्याचे बेट” म्हणूनही हे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. श्रीलंका आकाराने लहान असली तरी तिचा इतिहास, संस्कृती आणि निसर्ग यांचे वैभव अपार आहे. रामायणातील अनेक महत्त्वाचे प्रसंग याच भूमीशी जोडलेले आहेत. त्यामुळे भारतीयांसाठी ही केवळ एक परदेशयात्रा नसून आध्यात्मिक आणि सांस्कृतिक भावविश्वाचा अनुभव आहे.

  • अमरावती जिल्ह्यातील लोकजीवन

    अमरावती हे ऐतिहासिक शहर असल्यामुळे या शहराला तटबंदी आहे. आणि त्याला असलेले दरवाजे – अंबागेट , जवाहर गेट अशा नावाने प्रसिद्ध आहेत. याच जिल्ह्यातील मेळघाट परिसरात चिखलदरा व धारणी या तालुक्यांत आदिवासी मोठ्या संख्येने राहतात. त्यातील ८० टक्के लोकसंख्या कोरकू आदिवासींची आहे. तसेच या परिसरात कोलाम, बसोडे, गोंड, माडिया-गोंड, ढाणका यांसारख्या आदिवासी जमातींचेदेखील वास्तव्य आहे.

  • पिठापूर – कुरवपूर : दत्तभक्तांची अविस्मरणीय तीर्थयात्रा

    पिठापूर – कुरवपूर : दत्तभक्तांची अविस्मरणीय तीर्थयात्रा

    भारतातील प्रत्येक दत्तभक्ताच्या अंतःकरणात दोन तीर्थक्षेत्रे पवित्र स्थान राखून आहेत – पिठापूर आणि कुरवपूर. आंध्रप्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील पिठापूर हे श्रीपाद श्रीवल्लभ – दत्तात्रेयांचे प्रथम अवतार यांचे जन्मस्थान आहे, तर कुरवपूर ही त्यांची तपोभूमी. कृष्णामाईच्या विशाल पात्रामध्ये वसलेले कुरवपूर मंदिर आणि पिठापूरमचे जन्मस्थान  हे दैवी अनुभूतीचे केंद्र मानले जाते.

  • सातारा जिल्ह्यातील लोकजीवन

    कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातला पण त्यांनी शैक्षणिक कार्याची सुरुवात केली ती सातारा जिल्ह्यातनं. महात्मा ज्योतीबा फुलेंच्या विचारांतून व राजर्षी शाहू महाराजांच्या प्रत्यक्ष सहवासातून कर्मवीरांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली.विचारांती त्यांनी शिक्षण क्षेत्र निवडले व १९१९ मध्ये कराड तालुक्यातील काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करुन शिक्षणाची गंगा बहुजन समाजापर्यंत पोहोचवली.

  • नाशिक जिल्ह्याची भौगोलिक माहिती

    नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला धुळे; पूर्वेला जळगाव; आग्नेयेला औरंगाबाद, दक्षिणेला अहमदनगर, पश्चिमेला ठाणे, आणि वायव्येला डांग व सुरत (गुजरात) असे जिल्हे वसलेले आहेत. नाशिक जिल्हा हा तापी व गोदावरीच्या खोर्‍यात उत्तर महाराष्ट्रात वसला आहे.

  • अरुणाचल प्रदेश – उगवत्या सूर्याची भूमी (लँड ऑफ rising sun)

    अरुणाचल प्रदेश – उगवत्या सूर्याची भूमी (लँड ऑफ rising sun)

    भारताच्या नकाशाकडे पाहीलं, की पूर्वेकडच्या टोकाशी डोंगररांगांमध्ये सामावलेलं एक राज्य आपल्याला दिसतं – अरुणाचल प्रदेश. नावाप्रमाणेच भारतात सर्वप्रथम सूर्य इथेच डोकावतो. सकाळच्या पहिल्या किरणांनी हिमालयाच्या कड्यावर पडलेलं सोनसळी तेज, दऱ्यांमधली धुक्याची चादर आणि शांत डोंगर वेडं वातावरण – प्रवाशाला नकळत मोहवून टाकतं.

  • atlantic-highway-norway

    अटलांटिक हायवे – नॉर्वे

    नॉर्वे सरकारकडून हा रस्ता सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आला आहे.

  • टोगो

    टोगो हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. टोगोच्या पश्चिमेला घाना, पूर्वेला बेनिन, उत्तरेला बर्किना फासो तर दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे. लोम ही टोगोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

  • परभणी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

    गौतम ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही परभणी भूमी गौतमी नदीचा उगम येथेच झालेला आहे.गंगाखेड हे गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन धार्मिक क्षेत्र आहे. या ठिकाणी नदीच्या काठावर व गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. येथे संत जनाबाईंची समाधी आहे. येथे तीनशे वर्षांपूर्वी संत आनंदस्वामी यांनी स्थापन केलेले बालाजीचे मंदिर असून बालाजीची वाळूची मूर्ती आहे.