महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
इसवी सनाच्या अकराव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत बहुतांश इंडोचायना द्वीपकल्पावर राज्य गाजवणाऱ्या सामर्थ्यवान हिंदू-बौद्ध ख्मेर साम्राज्याचे वारसदार राज्य म्हणजेच आजचा आधुनिक कंबोडिया म्हणता येईल.आधुनिक कंबोडियाची राजधानी फ्नोम पेन्ह येथे वसलेली आहे.

दिल्ली येथे प्रसिध्द अक्षरधाम हे विशाल मंदिर आहे. हे मंदिर पुरातन नाही पण विशाल असे असून अहमदाबाद येथील स्वामी नारायण मंदिराची प्रतिकृती आहे. प्रमुख स्वामी यांनी या मंदिराची निर्मिती केली आहे.
दिल्लीतील मंदिर ६ नोव्हेंबर २००५ ला अधिकृतपणे खुले झाले. जगातील सर्वांत मोठे हिंदू मंदिर म्हणून याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. यमुना नदीच्या काठावर उभारण्यात आलेल्या या मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे ३००० स्वयंसेवक व ७००० कारागिरांनी मेहनत घेतली. स्वामिनारायण यांच्या आयुष्यातील प्रसंग आणि भारताच्या इतिहासातील प्रसंग या मंदिरावर कोरण्यात आलेले आहेत.
हिंगोली हा मराठवाड्यातील एक महत्त्वाचा जिल्हा. हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेव महाराजांचे मूळ गाव असून बालपणापासूनच पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीची गोडी लागलेल्या संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून औंढा-नागनाथास जाऊन विठोबा खेचरांकडून गुरूपदेश घेतला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला. येथे त्यांचे तीन मजली घर असून, या शेजारीच किर्ती मंदिर स्मारक आहे.
क्रिकेटमध्ये जमैका हा शब्द आपण बर्याचदा ऐकतो. वेस्ट इंडिजमधील हा एक छोटासा भाग.
चीन (इंग्रजी: China/ चायना; नवी चिनी चित्रलिपी: 中国; जुनी चिनी चित्रलिपी: 中國; फीनयीन: Zhōngguó; उच्चार: चाँऽऽग्-कुओऽ; अर्थ: जगाच्या मध्यभागी वसलेला देश), अधिकृ्त नाव:- चीनचे जनतेचे प्रजासत्ताक (नवी चिनी चित्रलिपी: 中华人民共和国; जुनी चिनी चित्रलिपी: 中華人民共和國; फीनयीन: Zhōnghuá Rénmín Gònghéguó; उच्चार: चाँऽऽग्-हुआऽ रऽन्-मीऽन् कोंग्-हऽ-कुओऽ) हा आशियातला, जगातला सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. बौद्ध धर्म हा चीनचा प्रमुख धर्म असून देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये ९१% (१२२ कोटी) लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे
व्हेनिस हे युरोपातील इटलीतील प्रमुख शहर. जगातील प्राचीन शहरांमध्ये याचा समावेश होतो. ११८ छोट्या बेटांच्या समुहानी हे शहर पुलांनी जोडलेले आहे. येथील दळणवळण नौकांमधून चालते.
कोकणातील अनेक गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इतिहासात डोकावण्याची आवड असणार्या पर्यटकांनी गावांचा-पर्यटनस्थळांचा मागोवा घ्यायचा म्हटला तर सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यातील मालडी या सुंदर गावाला अवश्य भेट द्यायला हवी.
व्हिएतनामच्या उत्तर-पूर्व भागात हे वसलेले आहे. या खाडीला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून दर्जा दिला आहे. हा लॉंग बे परिसर सुमारे १५५३ किमी आहे. हे विविध आकाराच्या १९६९ बेटांपासून तयार झाले आहे.
देऊळगावराजा हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहरातील जुने बालाजी मंदिर प्रेक्षणीय असून, महाराष्ट्राचे तिरुपती अशी या मंदिराची ख्याती आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti