(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • चंद्रपूर जिल्ह्यातील शेतीव्यवसाय:

    चंद्रपूर जिल्ह्याचे प्रमुख पीक ‘भात’ हे आहे. पूर्ण महाराष्ट्रात भाताच्या उत्पादनात चंद्रपूर जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो. आहे. चिमूर या भागात अत्यल्प प्रमाणात गहू पिकवला जातो. त्याचप्रमाणे काही प्रमाणात ज्वारीचे उत्पादनही केले जाते.

  • पुणे जिल्ह्यातील रोहीडा किल्ला

    शिवकालात रोहीडय़ाचा किल्ला दुय्यम होता. तसेच इतिहासमधेही फारशी मोठी घटना या किल्ल्याच्या संदर्भाने घडलेली नाही. तरीही हिरडस मावळाच्या वाटेवर देखरेखी साठी अतिशय मोक्याच्या जागी हा किल्ला आहे.
    गडावरुन सिंहगड, कात्रजचा डोंगर, तोरणा, राजगड, पुरंदर, वज्रगड, खंबाटकीचा घाट तसेच रायरेश्वराचे पठार आणि पाचगणीचे पठार व मांढरदेव दृष्टीपथात येतात.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

    दादासाहेब कन्नमवार – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातला. १९२० पासून ते स्वातंत्र्यचळवळीत सहभागी होते. तसेच जून, १९४८ साली ते नागपूर प्रदेशाचे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. जुन्या मध्य प्रदेशात १९५२ मध्ये त्यांची आरोग्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली होती.

  • रत्नागिरी जिल्ह्यातील लोकजीवन

    रत्नागिरीची लोकसंस्कृती स्वभावतः कोंकणी असून जिल्ह्याचा अभिमानास्पद इतिहासाचे प्रतिबिंब येथील संस्कृतीत दिसून येते. अनेक शैक्षणिक संस्था आणि उद्योगांचे माहेरघर असलेले रत्नागिरी, व्यापार आणि निवासासाठी सोयीचे ठिकाण मानले जाते.

  • जळगाव जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

    साने गुरुजी – अतिशय संवेदनशील लेखक, कवी व समाजसुधारक साने गुरुजी हे काही काळ जिल्ह्यातील अंमळनेर येथे वास्तव्यास होते.

  • पातूरची रेणूकामाता

    पातूर हे अकोला जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. या शहरातील रेणुकामाता मंदिर प्रसिद्ध आहे. येथून जवळच असलेल्या सास्ती येथील राममंदिरही प्रसिद्ध आहे.

  • वाशिम जिल्ह्यातल्या मंगलपीर उपविभागातील तालुका मुख्यालय मनोरा

    मनोरा हे शहर वाशिम जिल्ह्यातल्या मंगलपीर उपविभागातील तालुका मुख्यालय असलेले एक शहर आहे. अकोला. शहरापासून ते ८९ किलोमीटरवर वसलेले आहे.

  • मुंबई जिल्ह्याचा इतिहास

    आजची मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख ग्रीकांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. इ.स.पू. ३ च्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती. शिलाहार या हिंदू साम्राज्याने १३४३ पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर गुजरातच्या मुस्लिम साम्राज्याने मुंबई हस्तगत केली. एलिफंटा गुहा व वाळकेश्वर मंदिर ही याच काळातील आहेत.

  • शिवगंगा

    शिवगंगा हे तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक शहर आहे. या शहराला मरथू पंडियार यांची भूमी असेही म्हटले जाते. हे शहर समुद्रसपाटीपासून १०२ मीटर उंचीवर वसलेले असून, येथे वार्षिक ३३६.२ मि.मी. इतका पाऊस पडतो.

  • स्वित्झर्लंड

    स्वित्झर्लंड पश्चिम युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. आल्प्स पर्वतरांगेमध्ये ४१,२८५ चौरस कि.मी. इतक्या छोट्या क्षेत्रफळावर वसलेल्या ह्या देशाची लोकसंख्या ७६,००,००० आहे. स्वित्झर्लंडच्या उत्तरेस जर्मनी, पश्चिमेस फ्रान्स, दक्षिणेस इटली, पूर्वेस ऑस्ट्रिया व लिश्टनस्टाइन हे देश आहेत. स्वित्झर्लंड हे २६ कँटनांनी – म्हणजे राज्यांनी – बनलेले संघराज्यीय प्रजासत्ताक आहे. स्वित्झर्लंडमध्ये सरकारप्रमुख किंवा राष्ट्रप्रमुख केवळ एक व्यक्ती नसून ७ सदस्य असलेली एक संघीय समिती देशाचा कार्यभार एकत्रितपणे चालवते. ह्या प्रकारचे सरकार असलेला स्वित्झर्लंड हा जगातील एकमेव देश आहे. स्वित्झर्लंडची राजधानी बर्न तर जिनिव्हा, झ्युरिक, बासल व लोझान ही शहरे मोठी शहरे आहेत.