(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

  • केल्याने होत आहे रे ….

    पोलीस खात्यातील मी एक आहे. पोलीसशिपाई ते पोलीस महासंचालक. कोणीही! माझे काम कायदा राबवणे आहे. कायद्या समोर सर्व सामान आहेत हे बाळकडू मला मिळाले आहे. सद् रक्षणाय …..

  • शिक्षण क्षेत्राचा सांगाडा !

    आपली संपूर्ण शिक्षणप्रणाली विदेशी विद्यापीठांच्या जाळ्यात अडकण्यापूर्वीच सरकारने योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्राच्या मरू घातलेल्या सांगाड्यात जीव ओतण्याचा प्रयत्न करण्याऐवजी नव्या रसरशीत, चैतन्याने भरलेल्या, इथल्या संस्कृतीशी, प्राचीन ज्ञानाशी इमान राखणार्‍या शिक्षणपद्धतीला विकसित होऊ द्यावे.

  • वंश

    वंशाला दिवा हवा, अर्थात पणती सुद्धा आपलाच वंश आहे हे आम भारतीयाला समजायला अजून जितकी शतके लागणार तितकी शतके स्त्रीभ्रूण हत्या होत राहणार. आपल्या देशात अजूनही असा मोठा वर्ग आहे जो चितेला अग्नी देण्यासाठी मुलगाच पाहिजे या बुरसटलेल्या विचारांचा आहे. यात अशिक्षित, गरीब, निम्न मध्यम वर्गातील लोक अश्या विचारांचे आहेत हे प्रकर्षाने जाणवते, किंबहुना असे म्हणू शकतो कि, हा लेख ज्या लोकांच्या पर्यंत पोहोचत नाही असे हे लोक आहेत.

    ज्या लोकांना भ्रूण हत्येची भीती वाटते असे लोक अश्या पणत्याना उकिरड्यावर फेकतात, अथवा अनाथ आश्रमामध्ये रवानगी करतात, किव्वा घरात पणत्यांची आरास तयार करतात. आता इतक्या पणत्या घरात आल्यावर त्यांच्या उजेडात हा वंशाचा दिवा कोणते दिवे लावणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.

    यातील बहुतेक पणत्या पिताश्री घाटावर जाईपर्यंत सासरी जात नाहीत, कदाचित त्या न जाण्यामुळेच चिंतेने हाय खाऊन पिता यमाच्या दरबाराकडे प्रस्थान करतो, आणी या वंशाच्या दिव्याला अग्नी देण्याचे दिव्य कर्तव्य बजावावे लागते.

    खऱ्या अर्थाने कथा इथे सुरु होते, मागे राहिलेल्या कुटुंबाची बाप जिवंत असताना सुरु झालेली ससेहोलपट वेग धरू लागते. मुली सासरी न जाता वडिलांचा अर्धवट संसार आपल्या माऊलीकडे व या दिव्याकडे पहात स्वतःच्या खांद्यावर घेऊन नशिबाला दोष देतात.

    आजच्या जगात पणत्या काय कमी सक्षम आहेत का? त्या सर्व ठिकाणी खांद्याला खांदा भिडवून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करत आहेत, मग त्या काय अग्नी देण्यासारखी क्रिया करू शकत नाहीत? आजकाल वर्तमानपत्रात मुलीनी आपल्या वडिलांना अग्नी दिला, अश्या बातम्या वारंवार छापून येत आहेत, हे समाज परिवर्तनाचे सुंदर उदाहरण आहे, यालाच आपण धर्म मानला पाहिजे. मुक्ता दाभोळकर, पंकजा मुंडे, यांच्या सारख्या असंख्य मुलींनी समाजविरोध पत्करून आपल्या पित्याला अग्नी दिला, यांनी २१व्या शतकातील आदर्श प्रथा सुरु केली असे वाटत नाही का? या महिलांचा आदर्श समाजाने सशर्त स्वीकृत केला पाहिजे, आणि अश्या मुक्ता, पंकजा प्रत्येक घरात जन्माला आल्या पाहिजेत.

    ज्या काळात अग्नी देऊन अंत्यविधी करण्याची प्रथा अस्तित्वात आली, त्या काळी कुटुंब नियोजन प्रथा अस्तित्वात नव्हती, पाच ते आठ अपत्य असणे हेच कुटुंब नियोजन मानले जात असे, त्यामुळे त्यात किमान एक मुलगा जन्माला येतच असे. एकंदरीत, त्या काळी मुली, व बायका घराबाहेर फारश्या जात नसत, त्यामुळे मुलगे अग्नी देण्याचे काम बजावत असत, यात कोणताही कर्मकांडाच्या भाग नाही, तर ही एक सर्वसामान्य रूढी होती.

    केवळ अग्नी देण्यासाठी मुलगा पाहिजे असे म्हणून सर्व घरावर देशोधडीला लागण्याची पाळी येऊ देऊ नका असे या लेखाद्वारे सांगण्याची वेळ आली आहे, त्याच बरोबर हे हि सांगणे अपरिहार्य आहे कि, अश्या बऱ्याच प्रथा आपण मागे सोडून दिल्या आहेत, हे एकविसाव्या शतकातील लोकांनी विसरायला नको.

    हे लक्षात राहूद्या स्थल-काल-परत्वे ज्या मुळे निसर्गाला हानी पोहोचत आहे, अश्या पौराणिक प्रथा व परंपरा मोडीत निघाल्या पाहिजेत तसेच नवीन लोकहित प्रथा अस्तित्वात आल्या पाहिजेत, तरच लोक धर्माकडे आदराने पाहतील. धर्म म्हणजेच रूढी परंपरा काळानुसार तयार करून त्या नुसार जगणे, यात काही रूढी हजारो वर्षांपूर्वी योग्य असतील, पण आज त्यांची गरज नाही, तर त्या एक तर सोडून द्याव्यात, किव्वा त्यात काळानुसार बदल करावा.

    डार्विन ने सांगितल्याप्रमाणे उत्क्रांती हा निसर्गाचा नियम आहे, यात जो सक्षम आहे तोच जिवंत राहतो आणी सक्षम तोच असतो जो आपल्यात निरंतर बदल घडवितो. धर्मातही आज उत्क्रांतीची नितांत गरज आहे, अन्यथा कर्मठ, अघोरी धर्म डायनासोर सारखे लुप्त होण्यास वेळ लागणार नाही.

    धन्यवाद
    विजय लिमये (9326040204)

  • न्यायव्यवस्था

    नमस्कार मित्रांनो,

    भारत देशातील न्यायव्यवस्थेबाबत आज जरा बोलावसं वाटतं. मित्रहो आपल्या देशातील न्यायव्यवस्थेबद्दल सर्वांचे आप-आपले मत आहेत आणि तसे स्वातंत्र्य सुद्धा भारतीय घटनेने दिलेले आहेत.

    1877803"न्यायव्यवस्था" म्हणाल तर माणसासमोर एकच विचार येतो कि, आपल्याला या न्याय व्यवस्थेमुळे आपले हक्क सुरक्षित राहून, आपल्याला न्याय मिळेल. भारता सारख्या बलाढ्य देशात अनेकदा असं दिसून येतं कि, काही प्रकरणात या न्याय व्यवस्थेमुळे अन्याय केल्या जातो. मी असं म्हणत नाही कि, भारतीय न्यायव्यवस्था योग्य नाही, परंतु हि न्यायव्यवस्था जरा पांगळी झालेली आहे, असं वाटत नाही का? कदाचित मी जे बोललो कि, न्यायव्यवस्था पांगळी झालेली आहे, यावर नक्कीच तुम्हाला माझा राग आला असेल. शक्य आहे, कारण याबाबत मला विरोध किंवा टीका करण्याचा अधिकार नाही. कारण न्यायव्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार कुणालाच नाही आहे, न्यायव्यवस्थेद्वारे घेतलेला निर्णय सर्वोपरी आहे, असंच आपण ऐकतो.

    चला तर मग या न्यायव्यवस्थेचा अपमान न करता मी अभिमानाने या न्यायव्यवस्थेची गौरव गाथा म्हणतो आणि या न्यायव्यवस्थेपासून मला किती आनंद मिळतो ते व्यक्त करतो. आपल्या भारत देशात काही महान व्यक्तिमत्वाचे गरीब हितचिंतक आप-आपल्या सोयीनुसार, भारताच्या पांगळी नसलेल्या (तुमच्यामते) न्यायव्यवस्थेला खांदा देतात आणि आपले हित साध्य करून घेतात. त्यामुळे सर्व गरीब हितचिंतक आनंद व्यक्त करतात. भारतातील गरीब जनताच काय तर पाकिस्तान मधील गरिबांनाही या न्याय व्यवस्थेमुळे न्याय मिळतो आणि हि आपल्याला गौरव करण्याची बाब आहे. उगाच आपण या गरीब लोकांना गुंड , असामाजिक तत्व , आतंकवादी अश्या अनेक वाईट नावाने उच्चारतो, हे तर त्यांचे महान व्यक्तिमत्व आहे. त्यांना न्याय किंवा दया किंवा सूट मिळायलाच हवी आणि आपली न्यायव्यवस्था या सर्व महान व्यक्तींना त्यांचे योग्य हक्क मिळवून देते. हो कधी-कधी चुकीने एखाद्या वेळी एखाद्या गरिबाला फाशी किंवा शिक्षा देण्यात येते पण काय करणार चूक मानवच करतो, मग त्या न्यायव्यवस्थेमध्ये माणसंच निर्णय घेत असतात आणि माणसं देव नाहीत त्यामुळे चूक होणे साहजिकच आहे. पण असला प्रकार फार कमी दिसून येतो, नाहीतर या न्यायव्यवस्थेद्वारे कुण्याही गरिबावर अन्याय होत नाही आणिश्रीमंत लोकांना, गरीब बेईमान लोकांना बरोबर शिक्षा मिळत असते.

    या महत्वाच्या गरीब महानुभाव हितचिंतक लोकांना न्याय मिळवून देण्यात महत्वाचा वाटा असतो तो वकील या पदाचा, वकील म्हणजे कुणाला कसं वाचवायचं आणि कुठल्या खटल्यात कसे न्याय मिळवून द्यायचे हे या वकील वर्गाला योग्यप्रकारे माहित असते कारण त्याचीच शिक्षा त्यांनी घेतलेली असते. सर्वच वकील बेईमान नसतात पण काही असतात जे या गरीब हितचिंतकाच्या हित करण्याचे नकारतो आणि या देशातील श्रीमंत लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतात पण बघितलं तर जास्तीत जास्त वकील लोकं इमानदार आहेत आणि ते या देशातील हितचिंतकांचे हित साध्य करतात, कसलेही प्रकरण असुद्या श्रीमंत लोकं या गरीब महान लोकांवर कितीही आरोप लावत असेल किंवा साक्ष देत असेल तरी हे महान वकील सर्व दुखी गरीब लोकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करतात आणि ते पैसे अजिबात घेत नाही, कारण फार इमानदार असतात ते असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं ?

    या परिस्थितीत श्रीमंत व्यक्ती फक्त विचार करीत नि रडत बसतात कि , मला मिळाला नाही म्हणून. अहो त्या श्रीमंतांना न्याय कसे मिळेल कारण न्याय तर या गरीब हितचिंतकांनाच मिळेल ना कारण त्यांच्याकडे इमानदार वकील असतात जे इतकी मेहनत घेतात , गरीब लोकांचे मदतनीस साक्ष देत असलेल्या साक्षदारांना प्रेमाने समजावण्यात येते कि साक्ष देऊन श्रीमंत लोकांचं भलं करू नका म्हणून. मग न्याय हा गरिबांनाच मिळेल ना. आता श्रीमंत लोकांना रडत ओरडत बसण्याशिवाय कामच कोणते आहेत? हे गरीब महानुभाव देशहिताचा किती विचार करतात, ते तर माहित आहेच सर्वांना.

    एकदा पाकिस्तानमधून काही गरीब लोकं भारतात घुमायला आले असतांना त्यांना भारतातील बेइमान पोलिसांनी गोळीबार करून शहीद केले आणि एकाला अटक केली, एका बॉम्ब हल्याचा आरोप त्यांवर लावण्यात आला. हा कसला न्याय आहे? काय गरज होती या बेईमान पोलिसांना असं काही करण्याची? सोडून द्यायला हवं होतं ना त्यांना. ते महान लोकं होते. असो, पण या देशातील महान हितचिंतकांनी पूर्णपणे त्या पाकिस्तानी व्यक्तीची छानपैकी कोट्यावधी रुपये खर्च करून खातरदारी केली, रोज चिकन , मटन , आणि काय काय खाऊ घातले. काही वर्षांनी अचानक एकदिवस त्या व्यक्तीला फाशी दिल्याची बातमी ऐकली पण काहींना शंका आहे कारण त्या पाकिस्तानी व्यक्तीला डेंगू हा असल्याची बातमी मिडीया मध्ये दाखविण्यात आली होती. काय माहिती कि, त्याला फाशीवर लटकावले कि तो डेंगू या आजारेने मेला? काहीतरी चुकलं कदाचित, नाहीतर त्याच्यावर हा अन्याय झालाच नसता. शेवटपर्यंत या देशातील महान हितचिंतकांनी त्याची आवभगत केली असती, कितीही खर्च होऊ द्या. काही श्रीमंत लोकं उगाच म्हणतात कि, धन्य त्या मच्छराचे ज्याने त्या आतंकवाद्याला डसून मारून टाकले नाहीतर अजून किती रुपये त्याच्यावर या गरीब लोकांनि खर्च केले असते आणि त्याला पोसून ठेवले असते. हे एकच प्रकरण नाही असे अनेक प्रकरण आहे ज्यात फक्त नि फक्त या हितचिंतकांनाच न्याय मिळाला आहे, श्रीमंत आजही रडत बसलेले आहेत. आहे ना गर्व करण्याची बाजू ? म्हणून मी या न्याय व्यवस्थेला मनापासून मानतो आणि पूर्ण सन्माम करतो.

    या देशातले श्रीमंत लोकं उगाच ओरडतात कि, न्यायव्यवस्थेत न्याय होत नाही म्हणून अहो या श्रीमंतांनी समजायला नको का? कि, हे सर्व हितचिंतक आहेत आणि देशाच्या हिताचेच कामं करतात म्हणून. न्यायव्यवस्थेत देशाचे हितचिंतक लोकं पोलिस, वकील, जज, राजकारनिक यांचेही हित बघितात. असं नाही कि, कुणाचे लक्ष ठेवत नाही म्हणून. कारण ते महान व्यक्तिमत्व असतात मग न्यायालयाला त्यांचे म्हणणे मानावेच लागतं. देशातील हे काही महान लोकं देशाच्या हिताचेच कामं करीत आहेत.

    आता कोणत्याही श्रीमंताने या गरीब महान लोकांना गुंड, आतंकवादी,म्हणू नये कारण काही साक्ष राहत नाही, साक्षदार असले तर आपोआपच काय होतं तर काय माहित , साक्षदार आपली साक्ष बदलवून देतात किंवा आपोआप ते अपघातात किंवा वेगवेगळ्या कारणाने मरून जातात मग श्रीमंत लोकांचे खटले चुकीचे नाही का? हितचिंतकांचे नेहमी हित होते कारण ते महान कामं करतात, याबद्दल श्रीमंतांना बोलण्याचा काहीच अधिकार नाही , हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. जो पर्यंत हि न्यायव्यवस्था जिवंत आहे तो पर्यंत कुण्याही गरिबावर अन्याय होणार नाही. कुठला हि हितचिंतक दोषी ठरू शकणार नाही, हे नक्की.

    म्हणून मी म्हणतो, आपली न्यायव्यवस्था हि उच्च व उत्तम दर्ज्याची आहे, मला या न्यायव्यवस्थेविरोधात बोलण्याचा काहिएक अधिकार नाही.

    आता मी एकच ठरविलेलं आहे कि,

    "जे जे होते ते ते पहावे नि

    आपले डोळे बंद करावे. "
    ---------------------------------------*************************------------------------------------------
    आवडल्यास नावासहित share करू शकता.
    धन्यवाद!

    शशीकांत शांडीले (SD), नागपूर
    भ्रमणध्वनी -९९७५९९५४५०
    दि. ०१/०१०/२०१५

  • नवा वर्णवाद!

    अश्मयुगात रानोमाळ भटकणारा, शिकार करून कच्चे मांस खाऊन जगणारा माणूस शेतीचे प्राथमिक ज्ञान मिळाल्यावर स्थिर झाला. आधी त्याचे हे संघटन टोळ्यांच्या स्वरूपात होते. पुढे या संघटनेला अधिक रेखीव स्वरूप प्राप्त झाले आणि समाजाची निर्मिती झाली.

  • सहयोग

    आपण सहयोग देण्या व घेण्याची अपेक्षा शक्यतो आपल्या माणसाकडून करतो. जिथे संबंधामध्ये जवळीक आहे अश्या व्यक्तीला मनापासून सहयोग देतो. मग तो वस्तु, पदार्थ असो किंवा भावनिक आधार असो देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. कोणी दुःखी असेल व आपण त्याच्या भावना ऐकून घेतल्या तरी त्या व्यक्ति साठी हा ही खूप मोठा सहयोग असतो. एखाद्याला वेळ, आपलेपणा जरी दिला तरी त्याला त्याचे समाधान मिळते. त्यांना समाधान मिळणे हा सुद्धा सहयोग नाही का?

  • पॉझिटिव्हिटी आणि सामान्य माणूस

    आज अनेकजण कोरोनामुळे संघर्ष करत आहेत तर काहींनी आपली जवळची माणसे गमावली आहेत. खरेच आपण ज्यांनी माणसे गमावली आहेत त्यांना ‘ बी पॉझिटिव्ह ‘ हा सल्ला देऊ शकतो का?

  • अवडंबर !

    गेल्या साठ वर्षांपासून आपला देश अजूनही विकसनशील अवस्थेतच आहे आणि आपल्या मागे असलेले अनेक देश या शर्यतीत आपल्या खूप पुढे गेले आहेत. यामागचे मुख्य कारण आपली मानसिकता हेच आहे. कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे, कोणत्या गोष्टींचा संबंध राष्ट्राभिमानाशी जोडायचा याचे आपल्याकडे काही तारतम्यच नाही.

  • भारतही लष्करशाहीच्या दिशेने

    म्यानमार म्हणजे पूर्वीचा ब्रह्यदेश, कधीकाळी भारतीय महाखंडाचा एक भाग असलेला हा देश आज प्रचंड असंतोषाने धुमसत आहे. गेल्या अठरा वर्षांपासून लष्करी शासकांच्या ताब्यात असलेल्या या देशात बौद्ध भिक्षुंनी प्रस्थापित लष्करी शासनाविरूद्ध बंडाचा झेंडा उभारला आहे. लष्करी दडपशाहीला तिथली जनता कंटाळली आहे.

  • योग्य बटन दाबा!

    योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्याने किंवा निर्णयच न घेतल्याने अनेक समस्या जन्माला आल्या, वाढल्या आणि आता त्यांचे स्वरूप अक्राळविक्राळ झाले आहे. आज देशाचे अर्थमंत्री खत कारखानदारांना दिल्या जाणारी सबसिडी कारखानदारांना न देता थेट शेतकऱ्यांपर्यंत तो पैसा पोहोचविण्याचे मान्य करीत आहेत.

    घोडा का अडला, भाकरी का करपली, वगैरे प्रश्नांचे उत्तर एकच असल्याची दृष्टांत कथा सगळ्यांनाच माहीत आहे.