(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आहे हिम्मत आता चले जाव म्हणण्याची!

    या देशाला परकीय आक्रमणांची तशी नवलाई नाही. अगदी शक, हुणांपासून ते इंठाजांपर्यंत ही परंपरा चालत आली आहे. त्यापैकी अनेक आक्रमक नंतर इथलेच होऊन राहिले.

  • भाकर एकः खाणारे शंभर!

    शेतकरी किंवा उद्योजक अशा कोणत्याही घटकाला सरकारचा ना आधार आहे ना सरकारची त्यांना मदत मिळते, अशा परिस्थितीत इथे बेरोजगारीची समस्या निर्माण होणे अपरिहार्य आहे.

  • सोनारांचे कान टोचण्याची गरज !

    कधी काळी भारतात सोन्याचा धूर निघत असे. खरं आहे. सोने हे आपले सर्वांचे आकर्षण. एक चांगली गुंतवणूक म्हणून पाहताना आपण अन्य गोष्टींपैकी सोन्याला विशेष प्राधान्य देत आलो आहोत. दीर्घकाळात सोन्याचा परतावा योग्य येऊ शकतो या कारणास्तव सोने म्हणजे भविष्यातले आपले तारणहार पण हिला निर्जीव गुंतवणूक म्हणू या ...! कारण या पासून आपल्याला व्याज असे काही मिळत नाही. विवाह कार्यात लेकी, सुना, नातवंडाना सोन्याचे दागिने देण्याच्या असलेल्या पद्धतीमुळे आपला ओढा सोन्याकडे अधिक असतो, हे तर सांगणे न लगे. परिस्थितीनुसार काही जन आपली हौस चांदीचे दागिने परिधान करून भागवतात. अडीअडचणीला स्वत:चे दागदागिने विकून घराला आíथक संकटातून खेचून बाहेर काढणाऱ्या स्त्रिया बघितल्या की सोन्याची ताकद काय ती समजते. सोने हे सौंदर्यवृद्धीसाठी आहेच शिवाय शरीरस्वास्थाची काळजी घेते व काही रोग बरे करण्यासाठी मदत करतात, अये आयुर्वेद सांगत आहे. परिधान केलेले सोन्याचे दागिने शरीरातील काही नलिका बिंदूवर दबाव टाकून मन व शरीर प्रसन्न ठेवते.

    कान टोचावयास सोनारांची समस्त हिंदुना गरज सोनारांची पडते त्या सोनारांचे कान कोण टोचणार ....? हा प्रश्न नेहमीच आम्हांला पडतो. असे अनेक व्यावसायिक असतील त्यांच्या बाबतीत हेच घडत असेल. सोनार म्हणजे अर्थात ज्वेलर्स, जे सोन्याचांदीची खरेदी विक्री करतात त्यांच्याविषयी माझ्याच नव्हे तर जनमनातले विचार प्रतिपादन करायचे आहेत. गल्लीबोळात असणारे विशेषत: घोडपदेव फेरबंदर विभागात नव्हे तर अन्य विभागात व्यापाऱ्यांनी काय उच्छाद मांडला आहे तो केवळ गरीब आणि गरजवंत यालाच ठाऊक आहे. पण अडचणीचा फायदा घेऊन त्याची पिळवणूक करणारे हे सोनार. त्यांच्याकडून लुबाडणूक होत असूनही त्याच्याच कडे जाणारे खरेदीदार म्हणजे सर्वसामान्य अर्थात आपण मंडळी.

    मी एकदा आपल्या एका ज्वेलर्सकडून बारश्याला लहान मुलाला भेट देण्यासाठी लहान मुलाची २३ कॅरेटची अंगठी रोकड देऊन खरेदी केली. काही अवधीनंतर झवेरी बाजार मध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानात कामासाठी बसलो होतो. तेथे सरसकट २२ कॅरेटचा व्यवहार चालतो. तेथे बसलेलो असताना मी घेतलेल्या अंगठीशी तंतोतंत दिसणाऱ्या अंगठ्या काउंटर वर आल्या. हजार दोन हजार अंगठ्याचा जुडगा मुंबईतल्या वेगवेगळ्या दुकानामध्ये वितरीत होणार होता. मी सहज त्याला बोललो ‘अरे यार मी अशी २३ कॅरेटची अंगठी कालच खरेदी केली.’ त्याने सांगितले शक्य नाही, या मालामध्ये २३ कॅरेट नसते. अरे मी तर २३ कॅरेटचे पैसे देऊन खरेदी केले. त्यावर हसत मला त्यांनी सांगितले, ‘तुला त्याने उल्लू बनविले.’ अरेच्या असं कसं होईल या मारवाड्यांना आपण आपले मानले आहे. ते आपल्याला कसे फसवू शकतील. म्हणून त्या प्रकारची अंगठी खरेदी करण्याच्या उद्देशाने अनेक दुकानात फिरलो आणि २३ कॅरेटच्या अंगठीची विचारणा केली पण कोठे ही आढळून आली नाही. मग मात्र माझं डोकं सैरभैर झाले. पन्नास रुपये जादा गेल्याचे दु:ख नव्हते. फसविल्याची कळ सोसवत नव्हती. इकडे आमच्यासारख्यांना लुटायचं आणि सामाजिक, विधायक कार्यांना मदत केल्याचे चित्र निर्माण करण्यात यांचा हातखंडा. देणार तर हजार दोन हजार पण अशा थाटात देणार की, त्याने फार मोठे पुण्याचं काम केले आहे.

    गल्लीबोळात धंदा करणाऱ्या व्यापाऱ्यांविषयी माझे स्पष्ट मत आहे. त्यात काही चांगलेही असतील आणि काही चांगलेही नसतील. काही प्रामाणिक असतील तर काही लुटेरेही असतील. हे आपल्या सर्व सामान्य वर्गाला का लुटतात...? तरीही लुट होत असूनही आपला माणूस त्यांच्या दुकानाची पायरी का चढतो....? या प्रश्नाच्या मुळाशी गेलात तर हे व्यापारी काही महिन्यासाठी उधार देतात, तगादा लावत नाहीत. घडणावळ बाहेरच्या व्यापाऱ्यापेक्षा कमी असते. व्यापाऱ्याकडून ग्राहकाला मिळणारे अवास्तव महत्व आणि त्याला हुरळून जाणारा ग्राहक. आणि उद्या गहाण अथवा मोडण्याची वेळ आली तर दूर जायला नको. अशी आपण स्वत:हून ओढवून घेतलेली कारणे. एका विशिष्ट प्रांतातल्या लोकांनी आपल्या जीवावर कसे इमले बांधलेत, याचं तर वर्णन करावयास नको.

    सोने खरेदी करताना तुम्हाला सोन्याची शुद्धतेची हसत हसत शाश्वती देणाऱ्या व्यापाऱ्यांच्या बोलण्यात दुट्टपीवृत्ती भरलेली असते. यांच्याकडून घेतलेले सोनं काही दिवसात काजळी चढल्याप्रमाणे का दिसते. २३ कॅरेटच आहे मग त्याप्रमाणे ते देतात का...! किती मिलावट असते,याचा विचार कोणीही करीत नाही. मग तुम्ही मोडावयास गेल्यानंतर कपाळावर हात मारून घेता की नाही. एकूण एका तोळ्याच्या मागे १ ग्राम घट धरली जाते ती काय म्हणून...! काही मारवाडी १ ग्राम घट धरूनही एकूण चालू भावाच्या १०% कमी दर त्या व्यक्तीच्या गळी उतरवितो. वाहन घसारा किंवा इलेक्ट्रोनिक्स वस्तूवर घसारा मान्य आहे. या सोन्यातल्या घट विषयी व्यापाऱ्यांची उद्दामगिरी आपण खपवून घ्यायची. आपले लोक काही पैसे वाचविण्यासाठी बिल घेत नाहीत. मग त्यांना आयती संधी चालून येते. ज्या दुकानात सोने घेतले त्यांनी त्या दिवसाचा पूर्ण भाव आहे तो द्यायलाच हवा. ही त्याची जबाबदारी आहे . त्याने जबाबदारी असून दूर पळता कामा नये.

    आपली माणसं देवभोळी आहेत. हल्ली दुकानात सोन्या चांदीच्या देवादिकांच्या नाणी, मुर्त्या आहेत. त्यामध्ये मिलावट असूनही व्यापारी सांगेल त्या भावाला खरेदी करतो. देव्हाऱ्यात ठेवा काही दिवसात काळ्याभोर पडतात. तरीही उजेडात सरळ फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचा उदोउदो आपणच करतो. या व्यापाऱ्यांच्या उद्यमशीलता वाढीसाठी जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ सतत असतो पण दिसत नाही. प्रचंड संयम व कौशल्य आणि दुधात साखर म्हणुन त्यांस लागणारा अपार गोडवा जो मुळातच केवळ आतच नाही तर जिभेतुन पाझरत असतो.

    काही ग्राहक क्रेडीट कार्डाचा वापर करून सोने घेतात तेव्हा काही मारवाडी त्यावर काही टक्के अधिक रक्कम उकळतात. सोन्याचांदीची किती मोठमोठी दुकाने आहेत . त्यांच्या दुकानात असं घडत नाही मग हे गल्लीबोळातले महाभाग आपल्या भोळ्याभाबड्या माणसांना का फसवितात...? त्यांच्या अनैतिक व्यवहाराला कसा लगाम घालता येईल, हे ग्राहकच ठरवू शकतो.

    अशोक भेके

  • कत्तल गोवंशाचीच नव्हे समृध्दी आणि मूल्यांचीहा!

    प्रकाशन दिनांक :- 20/03/2005

    बहुसंख्यकांची इच्छा प्रमाण मानणे हेच लोकशाहीचे मूलभूत बीज आहे. संसद, विधिमंडळ, मंत्री, खासदार, आमदार या सगळ्या लोकशाही वृक्षाच्या शाखा- उपशाखा मूळ बीजाच्या पोषणातूनच फुलत गेल्या, फळत गेल्या. परंतु दुर्दैवाने या बाह्य विस्ताराच्या कौतुकात मूळ बीजाकडे कायम दुलर्क्ष होत आले.

  • संपूर्ण महाराष्ट्राचेच आरक्षण हवे !

    आज देशाची अशी परिस्थिती आहे की कुणाला कीतीही वाटलं तरी मराठी माणूस देशाच्या पंतप्रधान होणार नाही, नव्हे त्याला होऊच दिले जाणार नाही. अपघातानी झाला तर फारकाळ टिकून राहू शकणार नाही. महाराष्ट्राला केवळ शिवजयंती, सत्यनारायणाची महापूजा, गणेशोत्सव आणि परंपरागत यात्रा उत्सव भरवणे इतकेच स्वातंत्र्य अपेक्षित नाही. मराठी माणूस आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टीने स्वंतत्र होण्याची गरज आहे. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाच्या विकासाची कास धरायची तर “संपूर्ण मराठी राज्याचे आरक्षण” हवे.

  • संवेदनशीलता

    दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते, परंतु स्वत:च्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, अशा स्वरूपाचा एक वाक्प्रचार आपल्याकडे प्रचलित आहे. आपल्या सरकारला, राजकारण्यांना हा वाक्प्रचार चपखलपणे लागू पडतो. स्वत:च्या बुडाखाली काय जळत आहे याची त्यांना अजिबात कल्पना नाही.

  • सल्ला – दान आणि व्यसन

    प्रस्तुत लेखात सल्ला / उपदेश देण्याच्या समाजाच्या / लोकांच्या सर्वव्यापी सवयीला / व्यसनाला नेमकी कोणती मानसिकता आणि कारणे असावीत, ते दान की व्यसन, त्याच्या वाट्याला  जाणे का टाळावे वगैरेचा एक अनुभव-जन्य लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

  • हीन वैचारिक पातळी

    काँग्रेस पक्ष हा या देशातील सर्वात जुना पक्ष आहे, त्याला राजकीय परिपक्वतेची खुप मोठी पार्श्वभूमि आहे परंतू या पक्षाला काही कालावधीचा अपवाद वगळला तर सक्षम प्रतिस्पर्धी कोणीही भेटला नाही. त्यामुळे या पक्षाची वैचारीक पातळी सातत्याने हेलकावत राहिली व म्हणूनच हा पक्ष नेहमीच टिकेचे लक्ष्य तर बनलाच परंतू त्यातील वैचारिक दिवाळखोरीही चव्हाट्यावर येवू लागली परिणामी लोकांच्या विश्वासाला नेहमीच तडा गेला हे कटू सत्य.

    -- अतुल तांदळीकर

  • नव्या वाटा

    सध्या बरेच पालक आपल्या मुलास किंवा मुलीस ते मुल ५ / ६ वर्षाचे असतानाच गायन, वादन, नृत्य अशा कोणत्या तरी कलेचे शिक्षण घेण्यासाठी क्लास लावतात. सर्वच मुलांना त्यांची आवड असते असेही नाही. काहींना जन्मजात देणगी असते अशी मुले योग्य मार्गदर्शन व परिश्रम घेतल्यास उत्तम कलाकार बनतात. शरयू दाते हे ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे.

  • एटीएम – ATM

    माझी सहा वर्षाची कन्या नेहेमी माझ्यासोबत ATM मध्ये येत असे, मशीन मध्ये कार्ड सरकवण्याची तसेच पैसे निघाले कि पटकन बाहेर ओढून माझ्या हातात देण्याची तिला भारी हौस.

    काही दिवसांनी तिने प्रश्न विचारला, बाबा जर ATM मधून पैसे मिळतात, तर तुम्ही काम करायला कशाला जाता? पैसे संपले कि आपण मशीन मधून काढायचे व खर्च करायचे. अर्थात, त्या बाल मनाला काय ठाऊक कष्ट करूनच पैसे बँकेत जमा करता येतात आणि मग ATM मधून काढता येतात.

    माझ्यासारख्या सर्वच लोकांची विचारसरणी माझ्या लेकी सारखीच आहे. आज प्रदूषणाचा राक्षस आपला प्रभाव अक्राळ विक्राळ स्वरूपात सर्व ठिकाणी दर्शवू लागला आहे. हजारो टन कार्बन डाय ऑक्सिइड दररोज हवेत सोडला जातो, आणि त्याच्या दुप्पट अमूल्य ऑक्सिजन हवेतून नष्ट केला जातो. हा वायू लाखो वर्षापासून या ग्रहावर असणाऱ्या लहान मोठया वनस्पती रूपातील जीवांनी फोटोसिंथसीस द्वारे तयार करून आपल्यासाठी ठेवला आहे.

    आज आपण हाच प्राणवायू किव्वा ऑक्सिजन येणाऱ्या पिढ्यांचा विचार न करता संपवू लागलो आहोत. यात अग्रक्रम औष्णिक वीज प्रकल्प ज्यात जमिनीतून मिळणारा कोळसा, व तेल यांचा वाटा सर्वात जास्त आहेे. या नंतर सर्व इंजिनातून निघणारा धूर, ज्यात इंधन म्हणून पेट्रोल, डिझल, केरोसीन आदी द्रवरूप इंधने जी फक्त भूगर्भातून मिळतात, याचा वापर करण्यात येतो. जगातील 95 टक्के प्रदूषण वरील दोन प्रकारे होते. याचा दुसरा अर्थ आज जगात जो प्राणवायू उपलब्ध आहे तो आपण संपवित चाललो आहोत, आणि CO2 जो समस्त प्राणी मात्रांसाठी घातक आहे त्याची उत्पत्ती करत आहोत.

    पृथ्वीचे वातावरण हि ऑक्सिजन बँक आहे, वरती सांगितलेले इंजिन व औष्णिक प्रकल्प ATM मानुया, ज्यातून प्राणवायू काढल्यामुळे कमी होत चालला आहे. आज काळाची गरज आहे कि जितका ऑक्सिजन आपण यातून काढत आहे, तितका बँकेत परत भरला गेला पाहिजे, जे आज तरी होत नाही हि दुर्दैवाची गोष्ट आहे. शहरातील व जंगलातील झाडे कापून जगाला प्राणवायू देणाऱ्या एकमात्र यंत्राचा नाश करून, आपण स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहोत.

    झाडांच्या रुपात आपण गुंतवणूक केल्यास, ज्याला व्यवसाय म्हणू ऑक्सिजन रुपी नफा मिळेल, जो परत वातावरण रुपी बँकेत जमा करून, ATM रुपी औष्णिक व इंजिना मधून परत खर्च करता येईल. आज तरी सर्वांची वैचारिक अवस्था माझ्या कन्येसारखी आहे, आपल्याला हे लक्षातच येत नाही कि ऑक्सिजन रुपी पैसे देखील कधीतरी संपणार आहेत, आणि आपली बँक डुबणार आहे.

    विश्वात भूतान हा एकमेव असा देश आहे, जो ऑक्सिजन जितका खर्च करतो त्या पेक्ष्या जास्त तयार करतो. खऱ्या अर्थाने नफ्यात असलेला देश आहे, बाकी सर्व जग हे व्ययात आहे, ज्याची फार मोठी किंमत येणाऱ्या पिढ्यांना मोजावी लागणार आहे.

    विजय लिमये
    (9326040204)