आजपर्यंत आपण वृद्धांच्या समस्या, त्यांच्या व्यथा, त्यांना होणारे त्रास, त्यांचे केवीलवाणे जीवन, तरुणांकडून त्यांची होणारी ससेहोलपट आणि दुर्लक्ष यांसारख्या विषयांवर बरेच काही बोललो आहोत, ऐकले आहे, वाचले आहे आणि थोडेफार पाहीले पण आहे. या विषयावरचे डोळ्यांतुन अश्रुंचे पाट व्हायला लावणारे 'चिमणी पाखरे' पासून ते 'बागबान' पर्यंतचे अनेक चित्रपट पण पाहीले आहेत. पण अनेकांनी 'वृद्धजीवनशास्त्र' हा शब्द पण ऐकला नसेल. नीदान मी तरी ऐकला नव्हता. थोडक्यात वृद्धांनी आपले जीवन आनंदात कसे घालवावे याचे पणं एक शास्त्र आहे हे मला पहिल्यांदा कळले.
मी जेव्हा जेव्हा अमेरिकेत येतो तेव्हा तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात येते. येथील वृद्ध मंडळी त्यांचे जीवन आनंदात जगताना मला दिसतात. बहुतेकांचे चेहेरे आनंदी असतात. त्यांच्या चेहेर्यारवर हास्य असते. मिस्कीलपणा तर भरपूर असतो. हसत खेळत हे लोक जीवन जगत असतात. तुम्हाला वाटेल की अमेरिका हा श्रिमंत देश आहे. या लोकांकडे भरपूर पैसा असतो. सरकार पण या लोकांची काळजी घेत असते म्हणून हे लोक आनंदाने जगत असतात. पण हे आपल्याला वाटते तेवढे खरे नसते. या लोकांनी सुद्धा आयुष्यात अनेक दुःखे भोगलेली असतात. अनेक संकटांना तोंड दिलेले असते. अनेकवेळा मानहानी झालेली असते. काहीजणांना तर वर्णद्वेषाला पण तोंड द्यावे लागलेले असते. बरे यांची संकटे पण फार विचित्र असतात. डायव्होर्स होणे, नवर्यााने बायकोला किंवा बायकोने नवर्याअला अचानक सोडून जाणे, अचानक नोकरी जाणे, मुलांनी लहान वयातच घर सेडून जाणे आणि वर्षातुन एकदाच म्हणजे थॅन्क्सगिव्हिंगच्या दिवशी आणि ते सुद्धा जमलेच तर भेटायाला येणे, सावत्र आई किंवा सावत्र बाप असणे, अचानक बिघडणारी इकॉनॉमी या सारखी संकटे या लोकांवर कोसळलेली असतात. तरी सुद्धा हे लोक हॅपी असतात. नाहीतर आपल्याकडे नेमके उलटे चित्र असते. मला ठाऊक असलेली बहुतेक म्हातारी मंडळी आंबट किंवा नुकतेच एरंडेल घेतलेल्या चेहेर्या ने वावरताना दिसतात. त्यांचे चेहेरे खंगलेले, दुःखी, कष्टी, उदास आणि काळवंडलेले असतात. मरण येत नाही म्हणून कसेतरी जगायचे किंवा आला दिवस ढकलायचा हे यांचे सूत्र असते. त्यांचा बोलण्याचा विषय पण बहुतकरून एकच असतो. ते म्हणजे त्यांचे आयुष्य किती वाईट आहे हे सांगत बसणे. त्यांची चर्पटपंजीरी ऐकल्यावर कोणाचाही समज, 'म्हातारपण नको रे देवा' असे होण्याचा संभव असतो. अमेरिकेमध्ये वृद्धकाळाला 'गोल्डन ईयर्स' म्हणतात पण आपल्याकडे मात्र या गोल्डन इयर्सचे मातेरे केलेले असते. असे का होते याचा मी गेली अनेक वर्षे विचार करत होतो. मग माझ्या लक्षात आले की या लोकांना थोड्याफार प्रमाणात का होईना 'वृद्धजीवनशास्त्र' कळलेले आहे आणि ते सुद्धा तरुण वयात कळलेले आहे. आपल्याकडे मात्र या शास्त्राचा थांगपत्ताच लोकांना नाही. त्यामूळे हे शास्त्र आता वृद्धांबरोबरस तरुणांनी पण जाणून घेणे आवश्याक आहे.
सुप्रसिद्ध मराठी लेखीका मंगला गोडबोले यांचेकडून मी पहिल्यांदा हा शब्द ऐकला. तुम्ही म्हणाल मंगलाताई तर विनोदी लेखीका म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा 'वृद्धजीवनाशी' काय संबंध? (त्या पण ज्येष्ठ नागरीकच आहेत). पण त्याचे असे झाले.
सन 1963 साली पुण्याच्या डेक्कन जिमखाना भावेस्कूलमधून (आत्ताचे विमलाबाई गरवार हायस्कूल) 11 वी म्हणजे मॅट्रिक झालेल्या आमच्या बॅचला 54 वर्षे झाली आहेत. सन 2013 साली आमच्या बॅचला 50 वर्षे पूर्ण झाली त्याबद्दल पुण्याला एका भव्य स्नेह मेळाव्याचे म्हणजेच गेट टुगेदरचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. जवळ जवळ 70 च्या वर माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या मेळाव्याला उपस्थीत होते. त्यानंतर माझे मित्र सुरेश रानडे आणि जयंत दामले यांच्या पुढाकाराने महिन्यात एकदा भेटणे आणि वर्षातुन एकदा गेट टुगेदर करणे असे प्रोग्रॅम सुरू झाले. या वर्षीचा म्हणजे सन 2017 चा गेट टुगेदर जानेवारी महिन्यात पुण्यात पार पडला. याला पण 50 च्या वर मंडळी उपस्थीत होती. या मध्ये महिलांची संख्या जवळ जवळ पुरुषांइतकीच होती. या मेळाव्याला मंगलाताई गोडबोले यांना मुख्य आतिथी म्हणुन आमंत्रीत केले होते. आपल्या 45 मिनिटांच्या खुसखुशीत आणि विनेदाची झालर असलेल्या भाषणात मंगलाताईंनी 'वृद्धजीवन' या विषयावर पहिल्यांदा प्रकाशझोत टाकला. त्यांच्या बोलण्यातून 'वृद्धजीवन' हे एक शास्र आहे याचा अंदाज आला. यावर मी पण थोडाफार अभ्यास केला.
एका फ्रेंच महिलेने सन 1950 ते 1070 या 20 वर्षांच्या काळात अनेक वृद्ध व्यक्तींच्या जिवनाचा अभ्यास करून त्यावर एक ग्रंथ लिहीला आहे. हा 600 पानांचा ग्रंथ असून याचे इंग्रजी भाषांतर पण उपलब्ध आहे. या ग्रंथामध्ये वृद्धांच्या जीवनाचा अभ्यास करून आणि त्यांचे अनुभव विचारात घेऊन 'वृद्धांनी त्यांचे जिवन आनंदात कसे घालावावे' या विषयी काही मार्गदर्शक तत्वे सांगीतली आहेत. वृद्धांच्या जीवनावरचा हा जगातला पहिला 'ऑथेंटिक' ग्रंथ समजला जातो. हा अभ्यास जरी युरोपमधील वृद्ध मंडळींबद्दल मर्यादीत असला तरी इतर देशातील वृद्ध मंढळींना पण यातील बरीच तत्वे लागू होतात. तसेच तुम्हाला यातील काही तत्वे ठाऊक असतील, काही नवीन असतील. काही पसंत पडतील तर काही पसंत पडणार नाहीत. पण वाचायला तरी काहीच हरकत नाही. असो.
माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या घटनेला एक 'स्टार्टिंग पॉईंट' असतो. माणसाचा जन्म झाला की त्याच्या आयुष्याला सुरवात होते. त्याला 16 वे वर्ष लागले की त्याच्या तारुण्याला सुरवात होते. त्याचे लग्न झाले की त्याच्या वैवाहीक आयुष्याला सुरवात होते. हे सगळे 'स्टार्टिंग पॉईंट्स' आहेत आणि याला 'सेलिब्रेशन' असते. सेलिब्रेशन हे नेहमी आनंद व्यक्त करण्यासाठी होत असते. पण वार्धक्याला म्हणजे म्हातारपणाला नक्की असा स्टार्टिंग पॉईंट नसतो की याचे सेलिब्रेशन पण नसते. मी वृद्ध झालो म्हणून कोणी आनंद व्यक्त करत नसतो. देवाने माणसाला पहिल्यांदा केवळ 25 वर्षांचेच आयुष्य बहाल केले होते. पण माणसाने वारंवार देवाकडे जाऊन अधीक आयुष्याची मागणी करायला सुरवात केली. मग देवाने घोडा, बैल, गाढव, माकड या प्राण्यांची आयुष्ये कमी करून माणसाचे आयुष्य वाढवले. म्हणुन मग माणसाला पंचविशीनंतर घोड्यासारखे धावावे लागते, मग आधी बैलासारखी आणि मग गाढवासारखी ढोर मेहेनत करावी लागते शेवटी त्याचे माकड होते असे सांगणारी एक बोधकथा जगप्रसिद्ध आहे. शरीरशास्त्र दृष्ट्या माणसाच्या पंचविशीनंतरच त्याच्या वार्धक्याला सुरवात होते. म्हणजे माणसाचे म्हातारपण हे त्याच्या वयाच्या पंचविशीपासूनच सुरु होते. आपल्याकडे माणसाला 60 वे वर्ष लागले की त्याच्या म्हातारपणाला सुरवात झाली असे समजले जाते. पण ते काही खरे नाही. हल्ली चाळीशितील माणसे सत्तर वर्षांच्या वृद्धासारखी वागत असतात तर सत्तरीतील वृद्ध पंचवीस वर्षांच्या तरुणाच्या उत्साहाने वावरत असतात. पण एक गोष्ट मात्र खरी आहे. प्रत्येक माणसाला वृद्धत्व हे 'बाय डिफॉल्ट कंपल्सरी' मिळालेले आहे. यातून सुटका नाही. यातून सुटका करायचा एकच मार्ग आहे तो म्हणजे लौकर किंवा तरूण वयात मरणे. पण हा मार्ग काही योग्य नाही. कारण मरण काही आपल्या हातात नसते आणि आत्महत्या हा गुन्हा आहे.
पूर्वीचे वृद्ध आणि हल्लीचे वृद्ध यात बराच फरक पडला आहे. पूर्वी वृद्ध माणूस म्हणजे सोडावॉटरच्या बाटलीच्या तळासारख्या काचेचा जाड भिंगांचा चष्मा लावणारा, तोंडाचे बोळके झालेला किंवा दातांची कवळी वापरणारा, कानात भले मोठे कर्णयंत्र घातलेला, हातात काठी घेऊन गबाळ्या कपड्यात थरथरत्या अंगाने फिरणारा गरीब बापडा म्हातारा असे रूप असायचे. पण हल्लीचे वृद्ध असे नसतात. त्याची शरीरे धडधाकट असतात, अंगात अजून ताकद असते, ते चांगले कपडे घालत असतात. पूर्वी चष्मा लागणे ही वृद्धत्वाची खूण समजली जायची. पण हल्ली तर तरुण वयात किंवा लहान वयातच चष्मा लागतो. त्या मूळे चष्मा लागणे ही वृद्धत्वाची खूण कालबाह्य झाली आहे. पूर्वी वृद्धांचे वय छोटे होते. साधारणपणे वयाची साठी ओलांडली की पाच ते दहा वर्षात माणसाची 'एक्झिट' व्हायची. पण आता तसे होत नाही. आता माणसाचे वय वाढत चालले आहे. आता 80 किंवा 90 वर्षांचे अनेक वृद्ध दिसू लागले आहेत. याला कारणीभूत आहे 'मोडिकल इंडस्ट्री'. आता 'मेडिकल' हे प्रोफिशन राहीले नसून त्याची मोठी इन्डस्ट्री झाली आहे. या इन्डस्ट्रीच्या इन्कमचा एक मुख्य सोर्स वृद्धांना येन केन प्रकाराने जिवंत ठेवणे, त्यांचे आयुष्य वाढवत बसणे हा आहे. माणसाची सुद्धा जास्तीत जास्त वर्षे जगण्याची इच्छा पण असते. त्यामूळे आपल्याला आता आपल्याला कोणी लवकर मरू देणार नाही याची खूणगाठ प्रत्येकाने बांधून ठेवावी. भारतीय कुटुंबांमध्ये अजुन एक गोष्ट आढळून येते. पुरुषाचा मृत्यु आधी होतो आणि त्याच्या मृत्युनंतर त्याच्या पत्नीला कमीत कमी दहा वर्षे तरी जगावे लागते. मला काही ज्येष्ठ महीला ठाऊक आहेत की ज्यांच्या पतीचे निधन 60 ते 70 या वयांमध्ये झाले (त्या वेळी या महिलांचे वय 50 ते 60 च्या मधे होते). आता या महिलांचे वय 80 ते 90 च्या मधे आहे. त्यामूळे आपल्या मृत्युनंतर आपली पत्नी कमीत कमी 5 ते 10 वर्षे तरी जिवंत रहाणार आहे तर त्यासाठी लागणार्यात पैशांची योग्य ती तजवीज करून ठेवणे आवश्यक आहे. पती पत्निमध्ये जर पती आधी गेला तर पत्निची फारशी ससेहोलपट होत नाही. पण जर पत्नि आधी गेली तर मात्र पतीची फारच ससेहोलपट होते असे आढळून आले आहे. असा जर प्रसंग आला तर काय करायचे हे पण आधीच ठरवावे लागेल.
कमी कमी होत जाणारे अधीकार ही वृद्ध मंडळींची पहीली प्रमुख समस्या असते. याची सुरवात शरीरापासून होते. आपले शरीरच आपले हुकुम मानेनासे होते, साथ देईनासे होते. मग आपल्या घरातले किंवा संसारातले आपले महत्व कमी कमी होऊ लागते. घरामध्ये आपले हुकुम चालेनासे होतात. अनेक वृद्धांना हे पचवणे फार जड जाते. ज्या घरात आपला दरारा होता त्या घरात आता आपली किंमत शून्य झाली आहे हे अनेकांना सहन होत नसते. मग त्यांची, 'मला कोणी घरात विचारत नाही. मला घरात काही किंमत नाही. हल्ली माझा सल्ला घेतला जात नाही. मी म्हणजे घरातील एक अडगळीची वस्तु झालो आहे' अशी बडबड चालू होते. घरातील तरूण पिढी विचारत नाही हा त्यांचा मुख्य आरोप असतो. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. आपण जेव्हा कुटुंब प्रमुख होतो तेव्हा आपल्या घरातील मंडळी, विशेषतः मुलेबाळे आपला हेकुम पाळत होती. आपल्या इच्छेप्रमाणे जगत आणि वागत होती. आपल्या प्रतिष्ठेला किंवा इभ्रतीला कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही याची काळजी घेत होती. आता ती मंडळी कुटुंब प्रमुख झाली आहेत तर त्यांचा योग्य तो आदर करणे हे आपले कर्तव्य आहे हे वृद्ध मंडळींनी जाणून घ्यायला हवे. यात कोणताही प्रकारचा कमीपणा नसतो. यासाठी काही पथ्ये मात्र पाळणे जरूरीचे आहे. आपल्या घरातील दुय्यम स्थान आपण स्वखुशीने स्विकारायला हवे. घरातील तरूण पिढीला जेणेकरून आपला त्रास किंवा वैताग होणार नाही. तसेच त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोचणार नाही अशी वागणूक आपण ठेवायला हवी हे आता वृद्ध मंडळींनी जाणून घ्यायला हवे. यासाठी वारंवार घरातील तरुणांच्या मधे मधे करू नये. त्यांच्या कामाला नेहमी प्रायॉरिटी द्यावी. त्यांना सतत उपदेशांचे डोस पाजत बसू नये तसेच सुचनांचा मारा करत राहू नय. त्यांचे निर्णय त्यांना घेण्याची पूर्ण मुभा द्यावी. त्यांनी मागितल्याशिवाय सल्ले देऊ नयेत. जेणेकरून त्यांच्या काळजीत भर पडेल असे काही करू नये. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्याविषयी तक्रारी करत फिरत बसू नये किंवा त्यांना नावे ठेवत तसेच त्यांच्यातील दोष काढत बसू नये. वृद्धांनी एवढी पध्ये जरी पाळली तरी त्यांच्या 50 टक्के समस्या आपोआप कमी होतील.
अनेक वृद्ध मंडळींना आयुष्यात अनेक कष्ट आणि मेहेनत करावी लागलेली असते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागलेले असते. काडी काडी जमवून संसार उभा करावा लागलेला असतो. कोंड्याचा मांडा करून संसार करावा लागलेला असतो. पै पै वाचवून मुलांचे शिक्षण करावे लागलेले असते. अनेक प्रकारचे त्याग करावे लागलेले असतात. याचा त्यांना सार्थ अभीमान असतो. काहीजण तर स्वतःला त्यागमूर्ती समजत असतात. पण हल्लीच्या तरूण पिठीला त्यांच्या या कष्टाचे किंवा त्यागाचे फारसे अप्रुप किंवा ऍप्रिसिएशन नसते. कारण हल्लीच्या तरूण पिढीलापण तेवढेच कष्ट, मेहेनत किंवा त्याग करावा लागत असतो. फक्त त्याचे रूप बदललेले असते. असे असूनही अनेक वृद्ध मंडळींना 'आमच्यावेळी असे होते, आमच्यावेळी तसे होते' असे सांगत आपला भूतकाळ तरुण पिढीच्या तोंडावर फेकून मारण्याची सवय असते. ही सवय अत्यंत घातक आहे. अनेक वेळा त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगीतल्या जातात. त्यामूळे माणसे बोअर होत असतात. तसेच कालच्या भूतकाळावर उद्याचा भविष्यकाळ घडत नसतो. तो आजच्या वर्मानकाळावर घडत असतो हे तत्व ते विसरतात. काही मंडळी तर भूतकाळात पार डुंबुंन गेलेली असतात. त्यांनी आता भूतकाळातून बाहेर पडून वर्तमान काळात येणे आवश्यक असते. त्यामूळे भूतकाळातील घटना शक्यतो 'झाले गेले गंगेला मिळाले' या कॅटेगरीत ठेवाव्यात आणि वर्तमान काळ आनंदात कसा घालवता येईल याची चिंता करत बसावे.
पूर्वीच्या वृद्धांच्या मानाने हल्लीच्या वृद्धांची सांपत्तीक स्थिती बरीच चांगली असे. बँकेत बर्याापैकी पैसे असतात. स्वतःचे एखादे घर, प्लॉट, फ्लॅट, बंगला किंवा जमिनीचा तुकडा असतो. ही संपत्ती गोळा करायला सुद्धा पुष्कळ मेहेनत करावी लागलेली असते. त्यामूळे या संपत्तीचा रास्त अभीमान असणे साहजीकच आहे. अनेकांना असे वाटत असते की ही संपत्ती मुलाबाळांसाठी किंवा नातवडांसाठी आपली आठवण म्हणून ठेऊन द्यावी. काहीजणांचा असा पण समज असतो की आपल्या संपत्तीकडे पाहून किंवा आपल्या संपत्तीच्या मोहापायी आपली मुले बाळे आपली योग्य अशी देखभाल करतील. पण हा फार मोठा भ्रम आहे. हल्लीच्या तरून पिढीला या संपत्तीचे पण फारसे अप्रुप राहिलेले नसते. कारण हल्लीची तरूण पिढी कितीतरी पटीने जास्त पैसे कमवत असते. त्यामूळे या संपत्तीचे त्यांना काहीच आकर्षण नसते. आता व्रद्धांनी या संपत्तीचा उपयोग स्वतःसाठी करायला शिकले पाहीजे. अनेक वृद्ध मंढळी भावनेच्या भरात किंवा दबाव आल्यामूळे आपली सर्व संपत्ती जिवंतपणीच मुलाबाळांमध्ये वाटून टाकतात किंवा रहाते घर मुलांच्या नावाने करून टाकतात. मग यातूनच 'नटसम्राट' सारखी नाटके आणि सिनेमे तयार होतात आणी उतारवायात 'कोणी घर देता का घर' असे म्हणत बसायची पाळी येते. त्यामूळे जिवंतपणी आपली सर्व धनदौलत आणि संपत्ती मुलाबाळांच्या किंवा नातवंडांच्या नावे करण्याचा गाढवपणा करू नये. आपली संपत्ती आपल्या मृत्युनंतरच मुलाबाळांना मिळावी अशी कायदेशीर तरतुद करावी. त्यासाठी मृत्युपत्रासारखे अनेक मार्ग उपलब्ध आहे. अजून एक गोष्ट. वृद्धपणाचा काळ हा गुंतवणूकीसाठी योग्य नव्हे. अनेक जण सांगतात म्हणून अनेक वृद्ध मंडळी शेअर मार्केट म्हणजेच स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, कमोडिटी मार्केट यामध्ये गुंतवणूक करत असतात. पहीली गोष्ट म्हणजे या वयात संपत्तीमध्ये वृध्दी करायचे काही कारण नसते. दुसरी गोष्ट म्हणजे या रिस्की इन्व्हेस्टमेन्ट आहेत. त्यामूळे उगीच ब्लड प्रेशर वाढते आणि रात्रिची झोप खराब होते. हे पैसे आता इन्जॉय करण्यासाठी वापरावेत. फॉरीन टूरला जावे (हल्ली अनेक ज्येष्ठ नागरीक अशा टूर्स करू लागले आहेत), भारत फिरून बघावा, आपला छंद जोपासावा किंवा वाढवावा, नाटक सिनेमा बघावा किंवा एखादा आवडीचा कोर्स करावा, छान कपडे घालावेत. अनेक मार्ग आहेत.
वृद्धपणामध्ये प्रत्येक वृद्धाने आपल्या तब्येतिची काळजी घेणे मात्र आवश्यक आहे. वेळच्यावेळी वैद्यकीय तपासण्या करून घेणे, औषध पाणी वेळच्या वेळी घेणे, पथ्य पाणी संभाळणे या गोष्टी आवश्यक आहेत. व्यायाम झेपेल एवढाच करावा. अघोरी व्यायामाच्या मागे लागून आपली तब्येत आणखी बिघडवून घेऊ नये.
हल्ली अनेक वृद्धांकडे भरपूर वेळ असतो आणि तो कसा घालवायचा हा त्यांचा मुख्य प्रॉब्लेम असतो. डोळे अधू झाल्यामूळे फारसे वाचन करणे जमत नाही. हल्ली टी. व्ही. पण फारसा पहाण्याच्या लायकीचा राहीलेला नाही. मग करायचे काय हा प्रश्न उपस्थीत होतो. यावर उत्तम उपाय म्हणजे 'टेक्नोसॅव्ही' व्हावे. इंटरनेटचा जास्तीत जास्त उपयोग करायला शिकावे. हल्ली अनेक घरांमध्ये इंटरनेट कनेक्शन असते. नसले तर घेता येते. अनेक घरांत पिसी, लॅपटॉप किंवा टॅबलेट्स पडलेल्या असतात. नसल्यास विकत आणता येतात. इंटरनेटने आख्या जगाचे दार उघडून दिले आहे. स्मार्टफोममुळे तर इंटनेट आपल्या खिशापर्यंत किंवा पर्सपर्यंत पोचले आहे. त्यामूळे कॉम्युटर कसा वापरायचा, इंटरनेट कसे वापरायचे, स्मार्ट फोन कसा वापरायचा हे शिकून घ्यावे. सोशल मिडीयाचा उपयोग करावा. यूट्युबवर आवडीचे व्हिडियो बघावेत. आपल्याला या विषयांवरचे गुरु आपल्या घरातच भेटतात. ते म्हणजे घरातील तरून पिढी. त्यांचेकडून हे सर्व शिकताना त्यांच्यातील अंतर कमी होते आणि त्यांच्याशी दोस्ती पण होते.
विनोदासारखा दुसरा विरुंगळा नसतो. एकदा खळखळून हसले की जिवनातील अनेक दुःखे हलकी होतात. विनेद हा नेहमी विसंगतीवर अवलंबून असतो आणि आपल्या आजुबाजुला अनेक विसंगत आणि विनोदी गोष्टी सतत घडत असतात. त्यामूळे विनोद बुद्धी सतत जागृत ठेवावी. अमेरिकेतील वृद्ध मंडळींमध्ये चांगली विनोदबुद्धी असते आणि ते नेहमी दुसर्यावला हसवण्याचा प्रयत्न करीत असतात असे मला आढळून आले आहे.
हल्ली आपल्याकडे वृद्धांना 'ज्येष्ठ नागरीक किंवा सिनियर सिटिझन्स' म्हटले जाते. पण वृद्ध आणि सिनियर सिटिझन यात फरक आहे. जे शरीराने आणि मनाने गलीतगात्र झालेले असतात ते वृद्ध असतात पण जे शरीराने आणि मनाने धडधाकट असतात ते सिनियर सिटीझन्स असतात. आपण वृद्ध व्हायचे का सिनियर सिटिझन रहायचे हे प्रत्येकाच्या मनोवृत्तीवर अवलंबून असते. हा चॉईस प्रत्येकाला असतो. 87 वर्षांचे वॉरन बफे, 84 वर्षांच्या आशाताई भेसले, 71 वर्षांचे डोनाल्ड ट्रंप ही मंडळी अजुनही वृद्ध नसून सिनियर सिटिझन कॅटेगरीतच आहेत आणि शेवटपर्यंत त्याच कॅटेगरीत रहातील असे वाटते. अनुभव हा वृद्ध व्यक्तींचा फार मोठा ठेवा असतो. अनेकांच्या कडे प्रचंड अनुभवांचा खजीना असतो. ही खरे म्हणजे या लकांची संपत्ती असते. सिनियर सिटिझन मंडळी या अनुभवाचा उत्तम उपयोग करत असतात. आपणही जास्तीत जास्त काळ 'सिनियर सिटिझन' कॅटेगरीत रहावे यासाठी प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.
या शिवाय अजून बरीच तत्वे आहेत. पण ही प्रमुख तत्वे आहेत. ही तत्वे जरी युरोपियन लोकांसाठी असली तरी ती आपल्याला पण लागू आहेत. मंगलाताईंनी त्यांच्या भाषणात पण याच तत्वांवर प्रकाश टाकला.
आता ही तत्वे पाळून आपले म्हातारपण सुखी आणि आनंदी बनवायचे की नाही जे ज्याचे त्याने ठरवायचे.
-- उल्हास हरी जोशी
मोः-9226846631
धन, संपत्ती, पैसा प्रवाहित असेल तरच त्याची वृद्धी होत असते आणि धनाची जितकी अधिक वृद्धी होईल तेवढ्या अधिक प्रमाणात लोकांचे आयुष्य सुखी होईल, हा एक सर्वसाधारण नियम आहे.
बातम्या : * दलितांवरील अत्याचार * स्त्रियांवरील अत्याचार
* स्त्रियांचे समाजातील unequal स्थान
संदर्भ : वृत्तपत्रें व इलेक्ट्रॉनिक मीडियांमधील विविध बातम्या .
• सामाजिक असमानतेच्या व अत्याचारांच्या विविध बातम्या वाचल्या-ऐकल्यानंतर , खरंच आपण २१व्या शतकात आहोत कां, असा मनाला प्रश्न पडतो. कुठे दलितांवर अत्याचार होताहेत, तर कुठे स्त्रियांवर ; तर अनेक मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश नाकारला जातोय. ( या , प्रवेश नाकारण्याबद्दल, व स्त्री-पुरुष असमानतेबद्दल मी आधी एक लेखही लिहिलेला आहे, जो वेबसाइटवर वाचतां येईल).
अशा सततच्या बातम्यांमुळे मनात अतिशय अस्वस्थता येते, आली आहे. म्हणून, ही पोटतिडीक, ही टिप्पणी.
• ध्यानात राहूं द्यावें की, आपण या प्रश्नाचा ऊहापोह, धार्मिक बाब म्हणून करणार नसून, एक महत्वाची सामाजिक बाब या अर्थानेंच करीत आहोत.
• तथाकथित ‘खालच्या’ जातींना ‘सापत्न’ वागणूक देतांना आपण Dignity of Labour चा विचार करत नाहींच ; पण आपण हाही विचार करत नाहीं की, या लोकांनी शतकानुशतकें समाजाला ज्या ‘सेवा’ (services) दिल्या, त्या जर दिल्या नसत्या, तर समाज सुचारु रूपानें चालूं शकला असता कां ? समाजाच्या एका महत्वाच्या भागाला आपण बाजूला ठेवतो, दूर लोटतो आहोत , याचें भान या समाजाला नाहीं कां ?
• बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मपरिवर्तन कां केलें, याचा सखोल विचार आपण कधी करणार ? सुदैवानें त्यांनी बौद्ध धर्मासारखा शांतिपूर्ण धर्म स्वीकारला. बरीच वर्षें मनन-चिंतन करून, राष्ट्राच्या ऐक्याचा विचार करून, त्यांनी हेतुत: हाच धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला, हें आपले भाग्यच ! पण या घटनेपासून आपण कांहीं शिकलो कां ? आपली ‘दकियानूसी’ वृत्ती बदलायचा प्रयत्न तरी केला कां? की आपले, ‘पहिले पाढे पंचावन्न’ ?
• आतां , सएमाजातील घटकांच्या असमानतापूर्ण वर्तणुकीला कंटाळून एका गावातील ३०० दलित कुटुंबें धर्मांतर करायचें ठरवत आहेत. त्यांना कसा दोष द्यायचा ? त्यांच्या स्वत:च्या धर्मातील तथाकथित ‘उच्चवर्णी’, त्यांच्यावर अत्याचार करून, त्यांना ‘खालचे’, दुय्यम ठरवून, त्यांचे न्याय्य अधिकार नाकारत आहेत. या ‘सो-कॉल्ड् उच्चवर्णीयांना’ हें कळत नाहीं की, मध्ययुगात असेच अनेक लोक परधर्मात गेले आहेत. दर वेळी त्यांच्यावर कुणी सक्ती केली असेलच असें नाहीं, दर वेळी धर्मांतरासाठी कोणी त्यांना लालूच दिली असेल असेंही नाहीं. शतकानुशतकें झालेल्या या धर्मांतराचें प्रमुख कारण, स्वधर्मांमधील लोकांची वर्तणूकच होती. याची अनेक उदाहरणें देतां येतील. जिना यांचे पूर्वज (आजोबाच) हिंदू होते, पण त्यांनी सुरूं केलेल्या धंद्यावरून त्याना ‘वाळीत’ टाकलें गेलें होतें ; त्यामुळे त्यांनी धर्म बदलला. नंतर त्यांना पश्चात्ताप झाला, व स्वधर्मात परत येण्याची त्यांची इच्छा होती ; परंतु समाजानें तें होऊं दिलें नाही. (ही सर्व माहिती, जिना यांच्यावरील पुस्तकात सहज उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी ती ज़रूर वाचावी ). या धर्मांतराचा, नंतरच्या काळात किती भयंकर राजकीय परिणाम झाला, हें आपण जाणतोच ! मात्र, यांतून आपला समाज कांहींच शिकत नाहीं, ही खेदाची गोष्ट आहे. सगळे परिणाम लगेत घडतही नाहींत, लागलीच दिसूनही येत नाहींत. मात्र, ते घडतात, तेव्हां कधी कधी फाऽर फाऽर उशीर झालेला असूं शकतो.
• हमीद दलवाई यांनी त्यांच्या लेखनात महत्वाचा मुद्दा मांडला आहे , तो हा की, आज मुस्लिमांमधील अनेक लोक केवळ लहान लहान धंदे करून जेमतेम पोट भरत आहेत. आणि खरं आहे, आपल्या सभोवताली, प्लंबर, विणकर, हातगाडी घेऊन जात असलेला भंगारवाला, फुटलेल्या काचा बसवणारा काचवाला, सायकलीवर चाक बसवून चाकू-सुर्यांना धार लावणारा, असे अनेक धंदे करणारे लोक मुस्लिम आहेत. हे सगळे लोक कांहीं इराण, तुर्कस्थान/ टर्की, अफगाणिस्तान वगैरे देशांमधून येथें आलेले नाहींत, तर ते या देशातील हिंदूंमधीलच विशिष्ट जातींचे लोक आहेत, ज्यांनी मध्ययुगात धर्मांतर केलेलें आहे ; आणि याला प्रमुख कारण अर्थातच हिंदूंमधील तत्कालीन लोकांचे वर्तनच आहे, यात संशय नाहीं.
• पुन्हां एकदा आठवण करून देतो की, येथें आपला दृष्टिकोन धार्मिक नसून फक्त सामाजिक आहे ; धर्माचा उल्लेख केवळ त्या अनुषंगानेंच आहे.
• धर्म ही गोष्ट असावी वा नसावी, एखाद्यानें धर्म मानावा किंवा मानूं नये, ही एक वेगळीच चर्चा आहे, तिच्यात आपण तुर्तास जात नाहीं आहोत. पण, कुठलाच धर्म perfect नाहीं, नसणारच ! मात्र, मुस्लिम धर्मात हिंदूंपेक्षा अधिक समानता practice केली झाते, हें मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलें आहे. मी शाळेत असतांना स्वत: पाहिलेलें आहे की, कांहीं तत्कालीन प्रसिद्ध फिल्मस्टार्सचे नातेवाईक आणि आमच्या हॉस्टेलमधील साधारण नोकर, हे रमज़ानचा रोज़ा एकाच दस्तरख़्वानवर बसून सोडत होते ! हिंदूंमध्ये, ज्ञानेश्वरकालीन संतमंडळ, संत एकनाथ, विठ्ठल रामजी शिंदे, स्वातंत्र्यवीर सावरकार, राजर्षि शाहू महाराज, विवध समाजसुधारक , अशा अनेकांनी प्रयत्न करूनही समता establish झालेली नाहीं, हें कटु असलें तरी सत्य आहे.
• कदाचित थोडेसें विषयांतर होईल. पण या संबंधात, स्वतंत्र्यवीर सावरकर यांची हिंदुत्वाची व्याख्या पहावी. दुर्दैवानें त्याबद्दल अनेक गैरसमज पसरवले गेले. पण ही व्याख्या मूलत: राजकीय-सामाजिक आहे , धार्मिक नाहीं. त्या दिशेनें समाजानें जर विचार केला असता, तर ‘ही जात - ती जात’ असा भेदभाव संपण्याच्या दिशेनें पाऊल पुढे पडलें असतें.
(यावरील माझा लेख वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्थात, हाही एका वेगळ्या चर्चेचा विषय आहे. आत्ता, फक्त प्रस्तुत विषयाच्या अनुषंगानें त्याचा उल्लेख केलेला आहे, इतकेंच ).
• आतां तर, ‘इलेक्टेड डेमोक्रेसी’च्या संदर्भात जातपातींच्या राजकारणाचें महत्व वाढतच आहे ! जातीपातींना आज ‘एकगठ्ठा मतांचा समूह’ असेंच बघितलें जात आहे. आणि, सरकारी फायदे मिळवण्यासाठी लोक, अमुक जातीला अमुकअमुक मागासवर्घीय फायदे मिळायला हवेत, यासाठी आंदोलनें करत आहेत. (त्याच्या योग्यायोग्यतेची चर्चा आपण तूर्तास करत नाहीं आहोत, पण - ) याचा अर्थ असा की, ‘मी भारतीय आहे’ ही भावना कमी महत्वाची ठरून, ‘मी अमुक अमुक जातीचा आहे’ ही गोष्ट priority घेते !
• स्त्रियांच्यावरील अत्याचार ही बाब पुरुषप्रधान संस्कृतीशी संबंधित आहे. हेंही मध्ययुगात वाढत्या प्रमाणात झालें. आजही सुशिक्षित स्त्रियांनाही या प्रॉबलेमला सामोरे जावें लागतें आहे (भारतातच नव्हे, तर पाश्चिमात्य देशांमध्येसुद्धा). ज्या लोकांनी हल्लीच, डेमॉक्रेटिक पार्टीच्या ‘नॅशनल कन्हेन्शन’मधील हिलरी क्लिंटन यांचें भाषण ऐकलें-वाचलें असेल, त्यांना हें कळलेंच असेल की, हिलरींनी सुद्धा या मुद्दयाचा, एक महत्वाचा मुद्दा म्हणून, परामर्श घेतलेला आहे. स्त्रियांना मिळणारी असमान वागणूक हिलरीना अस्वस्थ करते, व त्यासाठी बरेंच कांहीं करण्याचें आश्वासन त्या देतात.
• स्त्रियांना मंदिर-प्रवेश नाकारणारे लोक, त्यासाठी धर्म व परंपरा यांची ‘दुहाई’ देतात. ज्या परंपरा समाजातल्या ५०% भागाला, म्हणजे स्त्रियांना, असमान वर्तणूक देतात, त्या काय कामाच्या?
• ज़रा कल्पना करा, या असमानतेच्या सामाजिक वर्तनाला कंटाळून स्त्रियांच्या समूहांनी जर धर्म बदलायचा असें म्हटलें, तर संपूर्ण समाजातल्या घराघरात हाहा:कार उडेल ! समाजाचें नशीब थोर म्हणूनच केवळ, अजूनतरी स्त्रियांच्या ग्रूप्सनीं असला विचार केलेला नाहीं. पण, तसें उद्या घडणारच नाहीं, याची काय गॅरंटी ?
• दलित असो वा स्त्रिया, त्यांच्यावरील atrocities, समाजाला नुसतें समजावून कमी होतील काय ? तसें जर असतें, तर , समाजसुधारकांच्या प्रयत्नांनंतर संपूर्ण समाजच बदलून गेला नसता कां ? अर्थात, तसें प्रयत्न तर होतच रहायला हवेत, हें खरें आहे ; पण, ‘न-समजून-घेणार्यांसाठी’ कांहींतरी strict उपाय सरकारनें योजायला नकोत कां ?
• दलित, स्त्रिया किंवा अल्पवयीन मुलें यांच्यावर अत्याचार करणार्यांना कठोर शिक्षेची तरतूद सरकारनें केली पाहिजे. उदा. अमेरिकेत तर, अगदी आईवडीलसुद्धा जर आपल्या अल्पवयीन अपत्यांवर अत्याचार करत असले, तर त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊं शकते.
• भारतातही, असा शिक्षेची कांहीं तरतूद आहे, उदा. सासू-सासर्यांनी सुनेवर केलेले अत्याचार.
पण, हें जें कांहीं कायदे आहेत, तें कितीसें पुरेसें पडत आहेत ?
• यासाठी, पार्लमेंटनें नवीन कायदा करून, अशा गोष्टींसाठी –
- स्पेशल, ‘फास्ट कोर्टस्’ स्थापन करून , च्यातर्फे अशा केसेस चालवल्या जाव्यात
- नुसत्या atrocities च नाहीं, तर , अगदी मंदिर-प्रवेश नाकारणार्यांनासुद्धा सज्जड सज़ा ठेवावी, (जसें की ५ वर्षें सक्तमजुरी). Carrot & stick म्हणतात ना, त्यातील, इथें stick चा प्रयोग, किंवा धाक असल्याशिवाय अशा सामजिक सुधारणा होणारच नाहींत.( म्हणतात ना, ‘लातों के भूत बातों से नहीं मानते’ ).
- आजही कांहीं देशांमध्ये, हात तोडणें , रस्यात उभें करून दगडधोंडे फेकून मारणें अशा मध्ययुगीन शिक्षा प्रचारात आहेत. अशा मध्ययुगीन शिक्षांचा मी पुरस्कार करत आहे, असें कृपया कुणी समजूं नये. मात्र, अगदी , सक्तमजुरीच्या शिक्षेची भीती सुध्दा मोठें deterant नक्कीच ठरेल.
• पण, --- आणि , हा मोठा ‘पण’ आहे ---- , असा कायदा केला तर समाजाचा एक भाग सरकारवर खात्रीनें नाराज होणार, हें नक्की. मग, सरकार ही रिस्क घेईल काय ? त्यासाठी, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन, असा कायदा आणायला हवा.
पण आपल्या राजकीय पक्षांची one-up-manship पहातां, असें काहीं घडेल, ही आशा धरावी काय, हा मोठा प्रश्न आहे. म्हणजेच, अशा atrocities चालूंच रहाणार काय ?
म्हणे, २१वें शतक !! आपण कुठे आहोत ? अजूनही मध्ययुगातच आहोत ? आपण कुठे चाललो आहोत ? पुढे जाणें दूरच,पण हा समाज मागेमागें जात आहे काय ?
या प्रश्नांची उत्तरें शोधायला गेलें तर, हातात कांहींच fruitful लागत नाहीं , ही अतिशय खेदाची गोष्ट आहे.
• अखेरीस :
हा असमानतेचा ‘सिलसिला’ शतकानुशतकें चालत आलेला आहे. दुर्दैवानें, लोक अनेकदा short-sightedness च दाखवतात, आपल्या कृतींचे दूरगामी दुष्परिणाम त्याच्या ध्यानातच येत नाहींत; आणि थोडेफार ज़री आलेच, तरी ते त्याकडे दुर्लक्षच करतात.
पण, आपण हे सत्य विसरूं नये की, इतिहास कुणाला क्षमा करत नाहीं .
तेव्हां, इतिहासानें धडा शिकवण्यांआधी, आपणच ज़रा आपल्या मनाला विचारूं या ,
( एका प्रसिद्ध गीताला poaraphrase करून ), की -
‘ये कहाँ जा रहे हम , यूं ही अपनोंको मसलके ?’ ;
आणि, मनाला ही जाणीव करून देऊं या , की -
‘ये ज़माना बढ़ चलेगा , अब हमें ही कुचलके’ .
चला, कांहींतरी concrete करूं या, अजूनही वेळ गेलेली नाहीं !
-- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
भारत पर्यटनाला आलेली ती विदेशी महिला हातातील चिप्सचे रिकामे पाकीट फेकण्यासाठी अर्धा तास डस्टबिन शोधत फिरली...
आणि तिच्याच समोर संत्र्याची सोललेली साल मी बिनधास्त रस्त्यात फेकली...
माझ्याकडे रोखलेली तिची ती प्रश्नार्थी नजर पाहिली
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या बेगडी स्वच्छतेची...!
त्याने बेकायदेशीर काम करण्यासाठी माझ्याकडे सरकवलेलं नोटांचं पाकीट मी हळूच खिशात दाबलं...
आणि त्याच्याच मागून भिकाऱ्यासारखं हात जोडून मला विनंती करीत आलेल्या कफल्लक म्हाताऱ्याला वयाचा दाखला आणायला मी बळेच पिटाळून लावलं...
त्याच्या डोळ्यातला तो अश्रूचा थेंब पहिला
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या अधाशी हावरट पोटाची...!
रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिच्या नवऱ्याला इस्पितळात न्यायची तिने विनंती करताच माझी नवी कोरी चमचमीत आलिशान कार रक्ताने माखेल की काय या भीतीने मी दुसऱ्या मार्गे जात असल्याच सांगून हळूच टांग मारली...
तिच्या नजरेतली भीक मी स्पष्टपणे पहिली
तरीही मला लाज नाही वाटली ....
लाज माझ्या दिखावेबाज श्रीमंतीची...!
बलात्काराच्या केसमधून त्याला निर्दोष सिध्द करताना मी माझ्या वकिलीची सीमापार गाठली...
बलात्काराच्या बळीची आब्रू पुन्हा वेशीवर टांगली. तिच्या डोळ्यातला राग पहिला
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या कायदाप्रिय बुद्धिमत्तेची...!
एअरकंडीशनर मॉल मधून महागडे कपडे अन शूज खरेदी करून मी अभिमानाने कार्ड स्वाईप केलं...
फाईव्ह स्टार हॉटेलच्या मेजवानीनंतर वेटरच्या हातावर १०० रुपयांची टीप सुध्दा टेकवली...
मात्र बाजारातून भाजी खरेदी करताना १० रुपयासाठी अपार घासाघिस केली...
त्या गरीब शेतकऱ्याच्या आर्त विनवणीचा सूर कानात घुमत राहिला.
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या काटकसरी व्यवहारांची...!
समुद्रात लाखो करोडो रुपयांची रक्कम ओतून शिवछत्रपतींचे स्मारक उभारण्याच्या मी खूप गप्पा मारल्या...
पण जिथे माझा राजानं अखेर प्राण सोडला त्या खऱ्याखुऱ्या स्मारकरूपी रायगडाची मात्र दयनीय अवस्था केली...
शिवछत्रपतींची तलवार तोडली गेल्याची बातमी टीव्हीवरती पसरली...
प्रेमी युगुलांची नावं लिहलेल्या गडाच्या बुरुजांचा आक्रोश कानठळ्या फोडू लागला
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या नादान शिवभक्तीची...!
गगनभेदी बिल्डींग, शॉपिंग मॉल, मल्टीप्लेक्स, ३ जी- ४ जी अन बुलेटट्रेनच्या जमान्यात कुणी आरक्षणासाठी तर कुणी आरक्षणाच्या विरुध्द भांडला...
आदिवासी पाड्यावरचा रुग्ण वाहतूकसुविधे अभावी अजूनही झोळीत टाकून आणलेला पहिला...
डॉक्टर म्हणे तो तर रस्त्यामध्येच मेला.
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या विकासाच्या राजकारणाची...!
२६/११ ला मी मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहिली...
पाकिस्तानशी युद्धाच्या पोकळ गप्पा मारून देशाखातर मरण्याच्या सिंहगर्जना केल्या...
त्याच पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट मी चवीने पहिले...
माझ्याच पैशात मी कित्त्येक कसाब पोसले
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या फुटक्या देशभक्तीची.!
आणि अजूनही मला लाज नाही वाटत....
माझ्या निर्लज्जपणाची...!!!
आज आर्थिक, वित्तीय व औद्योगिक क्षेत्रात परदेशियांनी (पाश्चिमात्यांनी) आपल्यावर आक्रमणच केलेलें आहे. ‘बळी तो कान पिळी’ या न्यायानें सगळीकडे आम्हांस ते त्यांच्या मर्जीप्रमाणें वाकवतात. शस्त्रास्त्रनिर्मिती करणार्या परदेशी कंपन्या चालाव्यात म्हणून अविकसित देशांना शस्त्र विक्री केली जाते . रासायनिक युद्धतंत्रविषयक ( केमिकल वॉरफेअर ) ज्ञानातून कीटकनाशकांची ( पेस्टिसाइडस् ) निर्मिती होते , त्या हानिकारक उत्पादनांवर विकसित देशांत बंदी घातली जाते आणि इकडे तेच तंत्र भारतीय कंपन्यांना पुरवलें जातें.
शेतकर्यांना नेस्तनाबूद करून त्यांच्या जमिनी बहुराष्ट्रीय कंपन्यांना “कॉन्ट्रक्ट” पद्धतीने द्यायचा घाट घातला जात आहे. हे एक विशाल षडयंत्र आहे. केवळ ग्राहक किंवा खरेदीदार असलेला “इंडिया” शाबूत ठेवून उत्पादक भारत नष्ट करण्याचा कट शिजविला जात आहे.
विक्रीच्या संदर्भात म्हणावयाचे झाल्यास, असे म्हटले जाते की, ज्यावेळेस आपण १० ग्राहकांच्या ठिकाणी खडा मारतो, त्यावेळेस त्यातील फक्त एकच खडा योग्य ठिकाणी लागतो ……….
मी याच स्तंभात 28 मार्चला लिहिलेल्या ‘कोण म्हणतो भारत गरीब आहे?’ या प्रहारला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. हा प्रतिसाद हेच दर्शवितो, की आयपीएलच्या माध्यमातून या देशात सुरू असलेला काळ्या पैशाचा तमाशा लोकांना चीड आणत आहे.
सर्वात मोठा प्रश्न हा आहे की तिच्या भावाची जी विकृत मानसिकता आहे तिचा जन्म कोठे झाला जिने त्याला त्याच्या सख्या बहिणीचा खून करण्यास प्रवृत्त केलं ! त्या मानसिकतेचे उगम स्थान शोधून ते वेळीच नष्ट करायला हवं नाही का ?
पूर्वी केंद्र सरकारच्या कार्यालयांत फक्त सचिवाला गाडीची सुविधा होती. बाकी वरिष्ठ अधिकार्यांना फक्त जाण्या-येण्यासाठी गाडी. तेही किमान २ अधिकार्यांना एकाच गाडीत आणले जायचे. पण आजकाल सर्वच प्रशासनिक सेवेच्या अधिकार्यांना स्वतंत्र गाडी दिली जाते. महानगरचे प्रदूषण वाढविण्यात साहेबांच्या गाडीचा हि योगदान आहेच.
Copyright © 2025 | Marathisrushti