दोघांची विचारसरणी, आवड जरी वेगवेगळी असली तरीही एकमेकासाठी आपल्या आवडीला दोघांनी थोडीशी मुरड घातली व आपल्या सहचाऱ्याचा त्याच्या आवडी निवडीचा थोडा जरी विचार केला तरी त्यांचा संसार आनंदाने फुलून जातो. ऊलट प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे वागायचे ठरवले तर जागोजागी आपणास एकतर विभक्त झालेली किंवा ओढूनताणून संसार चालवणारी जोडपी पहावयास मिळतील.
राम प्रधान समितीच्या अहवालामुळे सध्या महाराठ्र शासनाची अवस्था ‘धरले तर चावते, अन् सोडले तर पळते’ अशी झाली आहे. त्यामुळेच विधिमंडळात प्रधान समितीचा अहवाल सादर न करता त्यावरील कृती अहवाल तेवढा सादर करण्यात आला. त्यामुळे विरोधकांनी चिडून एवढा प्रचंड गोंधळ घातला की विधान परिषदेत तीन विरोधी सदस्यांना निलंबित करण्यात आले अहवालात असे कोणते भयंकर सत्य दडलेले आहे की सरकार स्वत:च्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ देणे पसंत करते; पण अहवाल विधिमंडळात मांडत नाही?
सध्या पावसाळा सुरू आहे. डॉक्टर मंडळींच्या भरभराटीचा हा मोसम असल्याचे गंमतीने म्हटले जाते. अर्थात ते सत्यही आहे.
4 रविवार, नोव्हेंबर 2007
पैसा, नाव कमाविण्याचे या जगात अनेक मार्ग, अनेक धंदे आहेत. अंगात फत्त* थोडा बेरकीपणा मुरवावा लागतो. तो मुरवला की बाकी कशाचीच काळजी करावी लागत नाही.
ज्याकाळी या देशात सोन्याचा धूर निघत होता, त्या काळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी,हे सूत्र इथे मान्यताप्राप्त होते. शेतीला सर्वोच्च दर्जा दिल्यानेच या देशात सोन्याचा धूर निघण्याइतपत समृद्धी होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.नंतरच्या काळात मात्र सगळे गणितच उलटेपालटे झाले. समृद्ध शेती भिकेकंगाल झाली, शेतीचा मालक पै पैसाठी मोताद झाला, परिस्थिती इतकी विकोपाला गेली की शेवटी शेतकर्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली.
असंच सहजच काहीतरी… मित्राची असलेली सद्यस्थिती येथे वर्णन करण्यात आली आहे….
पाण्याचे दुर्भिक्ष्य दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात मोसमी पावसाने दगा दिला, तर अगदी भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा अगदी थेंबाथेंबाने वापर व्हायला हवा. ऊस उत्पादक शेतकरी, त्यांचे नेते, साखर कारखानदार, कारखानदारीतून फोफावलेले राजकारणी या सगळ्यांना सरकारने जलशिस्त लावण्याचा प्रयत्न केला तरच काही साध्य होऊ शकेल. तेवढी हिंमत आणि नैतिकता सरकार दाखवू शकते का, हाच खरा प्रश्न आहे.
प्रथम आम्ही भारतीय आहोत..! पहले हम भारतीय है..! First We R Bhartiy…!
भारतात राहणाऱ्या तमाम भारतीयांना, आपल्या भारतमातेच्या विविधतापूर्ण गुणवैशिष्ट्यांवर अगाढ प्रेम आहे. या देशात सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, भाषिक, शैक्षणिक अशा अनेकबाबतीत विविधता असली तरी, सर्वांचे एकमत आहे की, ‘आम्ही सर्व भारतीय आहोत.’
भारतमातेचे सुख आणि दुःख आम्ही आपले मानतो. भारतमातेची उन्नती आणि अवनती ही आमची उन्नती –अवनती आहे, हे आम्हा सर्वांना ज्ञात आहे.आम्हाला कितीही जन्म मिळाले तरी, मातृभूमिचे ऋण मात्र आम्ही फेडू शकत नाही. परंतु त्या ऋणांची जाणीव ठेवून, मातृभूमीसाठी काही करता आले तर, ʻʻस्वातंत्र्ययज्ञात प्राणाहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली ठरेल .ʼʼ
भारतमातेच्या प्रेमापोटी प्रत्येकाच्या हृदयात लक्ष-लक्ष भावनांचे हिमालय उचंबळून येतात. आपल्या भावनांचे प्रकटीकरण करण्यासाठी हक्काचे स्थान असले की, राहवत नाही. हृदयातील प्रेमभरतीला शब्दांचे स्वरूप प्राप्त होते. हेच शब्द आपल्या विचारांचे प्रकटीकरण ठरावे. हे प्रकटीकरण कोणावर आरोप-प्रत्यारोप करणारे, अश्लील, असभ्य नसावे. तसेच भारताची एकता, एकात्मता, अखंडता, सुरक्षितता, संप्रभूता, विविधता, सार्वभौमिकता यांना बाधा पोहचविणारे नसावे ही मनापासून अपेक्षा आहे.
-- नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
इकडे दिल्लीत संसदेचे आणि इकडे नागपुरात राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. दोन्हीकडे मुंबईवरील आतंकवादी हल्ल्याचीच चर्चा आहे. हा हल्ला नुकताच घडून गेला असल्याने आणि नेहमीपेक्षा या हल्ल्याची पद्धत आणि विध्वंसक क्षमता अधिक असल्याने या मुद्द्यावर चर्चा होणे तसे अपेक्षितच असले तरी आतंकवाद ही एकच समस्या देशासमोर नसल्याचे लोकप्रतिनिधींनी ध्यानात घ्यायला हवे.


प्रकाशन दिनांक :- 28/09/2003
देशाला स्वातंत्र्य मिळून अर्धशतकाचा कालावधी उलटून गेला. स्वातंत्र्याचा उपभोग घेणारी तिसरी पिढी जन्माला आली. शेकडो वर्षांच्या संघर्षाचे एक पर्व संपले, परंतु त्याचा अर्थ संघर्ष संपला असा करता येणार नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti