(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बदल विकासाचा आत्मा

    राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवासाठी मातृतिर्थ सिंदखेड राजा इथे जनसागर उसळला होता. अक्षरश: लाखो लोक तिथे जमले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात स्वत:ची एक वेगळी वाट, स्वत:चा एक वेगळा प्रवाह निर्माण करणाऱ्या मराठा सेवा संघाने, अर्थात पुरूषोत्तम खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवधर्माची दिक्षा घेण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

  • आता उरले लुटण्यापुरते

    पृथ्वीचा फेरफटका मारताना एकदा आद्य वार्ताहर नारदमुनींना एक गलेलठ्ठ डुक्कर घाणीत/गटारात लोळताना दिसले. ईश्वरी अवताराचे महाभाग्य लाभलेल्या वराहाची ती अवस्था नारदाला पाहवली नाही. नारदमुनींनी लगेच त्या वराहाला स्वर्गसुखाची अनुभूती द्यायचे ठरवले आणि स्वत:बरोबर स्वर्गात येण्याची विनंती केली.

  • वंश

    वंशाला दिवा हवा, अर्थात पणती सुद्धा आपलाच वंश आहे हे आम भारतीयाला समजायला अजून जितकी शतके लागणार तितकी शतके स्त्रीभ्रूण हत्या होत राहणार. आपल्या देशात अजूनही असा मोठा वर्ग आहे जो चितेला अग्नी देण्यासाठी मुलगाच पाहिजे या बुरसटलेल्या विचारांचा आहे. यात अशिक्षित, गरीब, निम्न मध्यम वर्गातील लोक अश्या विचारांचे आहेत हे प्रकर्षाने जाणवते, किंबहुना असे म्हणू शकतो कि, हा लेख ज्या लोकांच्या पर्यंत पोहोचत नाही असे हे लोक आहेत.

    ज्या लोकांना भ्रूण हत्येची भीती वाटते असे लोक अश्या पणत्याना उकिरड्यावर फेकतात, अथवा अनाथ आश्रमामध्ये रवानगी करतात, किव्वा घरात पणत्यांची आरास तयार करतात. आता इतक्या पणत्या घरात आल्यावर त्यांच्या उजेडात हा वंशाचा दिवा कोणते दिवे लावणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.

    यातील बहुतेक पणत्या पिताश्री घाटावर जाईपर्यंत सासरी जात नाहीत, कदाचित त्या न जाण्यामुळेच चिंतेने हाय खाऊन पिता यमाच्या दरबाराकडे प्रस्थान करतो, आणी या वंशाच्या दिव्याला अग्नी देण्याचे दिव्य कर्तव्य बजावावे लागते.

    खऱ्या अर्थाने कथा इथे सुरु होते, मागे राहिलेल्या कुटुंबाची बाप जिवंत असताना सुरु झालेली ससेहोलपट वेग धरू लागते. मुली सासरी न जाता वडिलांचा अर्धवट संसार आपल्या माऊलीकडे व या दिव्याकडे पहात स्वतःच्या खांद्यावर घेऊन नशिबाला दोष देतात.

    आजच्या जगात पणत्या काय कमी सक्षम आहेत का? त्या सर्व ठिकाणी खांद्याला खांदा भिडवून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करत आहेत, मग त्या काय अग्नी देण्यासारखी क्रिया करू शकत नाहीत? आजकाल वर्तमानपत्रात मुलीनी आपल्या वडिलांना अग्नी दिला, अश्या बातम्या वारंवार छापून येत आहेत, हे समाज परिवर्तनाचे सुंदर उदाहरण आहे, यालाच आपण धर्म मानला पाहिजे. मुक्ता दाभोळकर, पंकजा मुंडे, यांच्या सारख्या असंख्य मुलींनी समाजविरोध पत्करून आपल्या पित्याला अग्नी दिला, यांनी २१व्या शतकातील आदर्श प्रथा सुरु केली असे वाटत नाही का? या महिलांचा आदर्श समाजाने सशर्त स्वीकृत केला पाहिजे, आणि अश्या मुक्ता, पंकजा प्रत्येक घरात जन्माला आल्या पाहिजेत.

    ज्या काळात अग्नी देऊन अंत्यविधी करण्याची प्रथा अस्तित्वात आली, त्या काळी कुटुंब नियोजन प्रथा अस्तित्वात नव्हती, पाच ते आठ अपत्य असणे हेच कुटुंब नियोजन मानले जात असे, त्यामुळे त्यात किमान एक मुलगा जन्माला येतच असे. एकंदरीत, त्या काळी मुली, व बायका घराबाहेर फारश्या जात नसत, त्यामुळे मुलगे अग्नी देण्याचे काम बजावत असत, यात कोणताही कर्मकांडाच्या भाग नाही, तर ही एक सर्वसामान्य रूढी होती.

    केवळ अग्नी देण्यासाठी मुलगा पाहिजे असे म्हणून सर्व घरावर देशोधडीला लागण्याची पाळी येऊ देऊ नका असे या लेखाद्वारे सांगण्याची वेळ आली आहे, त्याच बरोबर हे हि सांगणे अपरिहार्य आहे कि, अश्या बऱ्याच प्रथा आपण मागे सोडून दिल्या आहेत, हे एकविसाव्या शतकातील लोकांनी विसरायला नको.

    हे लक्षात राहूद्या स्थल-काल-परत्वे ज्या मुळे निसर्गाला हानी पोहोचत आहे, अश्या पौराणिक प्रथा व परंपरा मोडीत निघाल्या पाहिजेत तसेच नवीन लोकहित प्रथा अस्तित्वात आल्या पाहिजेत, तरच लोक धर्माकडे आदराने पाहतील. धर्म म्हणजेच रूढी परंपरा काळानुसार तयार करून त्या नुसार जगणे, यात काही रूढी हजारो वर्षांपूर्वी योग्य असतील, पण आज त्यांची गरज नाही, तर त्या एक तर सोडून द्याव्यात, किव्वा त्यात काळानुसार बदल करावा.

    डार्विन ने सांगितल्याप्रमाणे उत्क्रांती हा निसर्गाचा नियम आहे, यात जो सक्षम आहे तोच जिवंत राहतो आणी सक्षम तोच असतो जो आपल्यात निरंतर बदल घडवितो. धर्मातही आज उत्क्रांतीची नितांत गरज आहे, अन्यथा कर्मठ, अघोरी धर्म डायनासोर सारखे लुप्त होण्यास वेळ लागणार नाही.

    धन्यवाद
    विजय लिमये (9326040204)

  • सेझचे ‘माया’ जाल!

    देशाच्या विकासासाठी एक जादूची कांडी सत्ताधाऱ्यांना गवसली आहे आणि ती म्हणजे ‘सेझ’! सेझ अर्थात विशेष आर्थिक क्षेत्राच्या माध्यमातून देशाचे चित्र आमुलाठा बदलण्याचे स्वप्न सरकार दरबारी पाहिले जात आहे. भांडवलदारांना औद्योगिक क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्राची तरतूद सरकारने केली आहे.

  • अ‍ॅडव्हर्सिटी कोशंट (प्रतिकूलता गुणांक)

    काही दिवसांपूर्वी माझ्या एका मानसोपचार तज्ञ असणाऱ्या मित्राने एक नवीन संज्ञेशी परिचय करून दिला ती म्हणजे AQ अर्थात Adversity Quotient जो प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करण्याच्या क्षमतेची कल्पना देतो. आपण त्याला प्रतिकूलता गुणांक म्हणू.

  • नोकरशाहीच्या धर्तीवर शेतमालाचेही मूल्यनिर्धारण करणे ही काळाची गरज!

    शेतकर्‍यांना न्याय देणारी, इतर समाज घटकांसोबतच त्याचाही बरोबरीने विचार करणारी आणि संवैधानिक आधार असलेली यंत्रणा उभी होणे काळाची गरज आहे. हे होत नाही तोपर्यंत या देशाचे दारिद्र्य संपणार नाही. आणि शेतकर्‍यांचे रस्त्यावर उतरणे बंद होणार नाही.

  • आंबेडकरी साहित्यासमोरील आव्हान!

    प्रकाशन दिनांक :- 13/02/2005
    ‘आंबेडकरी’ हे विशेषण धारण करणारा जो साहित्य प्रकार मराठी भाषेत रुजू झाला त्याची आता अर्धशतकाकडे वाटचाल सुरु आहे. साधारण 60 च्या दशकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चेतविलेल्या स्फुल्लिंगाच्या ठिणग्या साहित्यरुपाने उडू लागल्या आणि अख्खं मराठी साहित्य विश्व या ठिणग्यांच्या दाहकतेने हादरुन गेले.

  • प्रेरणेची पालवी

    देवाला अनेक ठिकाणी जायला जमत नाही म्हणून काही चांगली माणसे पृथ्वीतलावर कदाचित पाठवले असावीत.काही माणसांचे निष्पाप कर्म पाहून हाच विचार मनात येतो. प्रेरणेची पायवाट अजून काय असते?

  • पंतप्रधान आले अन् गेले!

    हा लेख तुमच्या हातात पडेपर्यंत पंतप्रधानांचा विदर्भ दौरा आटोपला असेल, या दौऱ्याची फलश्रुती तुमच्या समोर असेल; परंतु हा लेख लिहीत असताना पंतप्रधानांचा दौरा सुरू झालेला नव्हता. त्यामुळे पंतप्रधानांच्या या दौऱ्याने विदर्भाला काय मिळेल, ते कितपत परिणामकारक ठरेल याचा इथे केवळ अंदाज करणे शक्य आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या पंतप्रधानांना कुठेतरी अस्वस्थ करून गेल्या आणि म्हणूनच त्यांनी इथल्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा, इथल्या लोकांच्या समस्या थेट त्यांच्याकडूनच समजून घेण्याचा निर्णय घेतला यात शंका नाही.

  • To be chkd-जरा आजूबाजूला बघायला शिका!

    बायबलमध्ये एक बोधकथा आहे. येशू ख्रिस्त फिरत-फिरत एका गावात आले. त्यावेळी त्यांना दिसले की गावातील सगळेच लोकं एका मैदानात जमले आहेत. प्रत्येकाच्या हातात दगड आहे आणि मैदानाच्या मध्यभागी एका खांबाला बांधलेल्या स्त्रीला ते दगडांनी ठेचून मारणार आहेत. त्या स्त्रीचा अपराध कोणता, याची चौकशी केल्यावर येशू ख्रिस्तांना सांगण्यात आले की, ही स्त्री व्यभिचारी आहे आणि या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तिला दगडांनी ठेचून मारण्यात येणार आहे. येशू ख्रिस्तांना त्या स्त्रीची दया आली किंवा त्यापेक्षा अधिक गावकर्‍यांच्या बुध्दीची कीव वाटली. पहिला दगड त्या स्त्रीकडे भिरकावल्या जाण्यापूर्वी येशू ख्रिस्ताने उपस्थित जमावाला उद्देशून म्हटले की, या स्त्रीला शिक्षा केली पाहिजे हे मान्य, परंतु ही शिक्षा देण्याचा अधिकार केवळ त्याच व्यक्तीला आहे, ज्याने एखादेही पाफत्य केलेले नाही. येशु ख्रिस्तांच्या या आवाहनाने उपस्थित जमाव अंतर्मुख झाला आणि प्रत्येकाच्या हातातील दगड गळून पडला. ही घटना किंवा कथा बोधप्रद असली तरी त्यातील बोध त्या घटनेपुरताच प्रासंगिक ठरला. पापी, अन्यायी किंवा कर्तुत्वहीन लोकांनी स्वत:लाच न्यायाच्या उच्चासनावर बसवून इतरांकडे दगड भिरकावण्याचा अधिकार बाळगणारी मानसिकता आजही विद्यमान आहे. ती स्त्री त्यावेळी भाग्यवान ठरली, परंतु असे भाग्य त्यानंतर कुणाच्या वाट्याला आले नाही.