(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आरक्षणाचा तमाशा!

    राज्यात सध्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेचे वारे घोंघावत आहे. जनप्रतिनिधित्व लोकसंख्येच्या प्रमाणात असावे, हा मुख्य आधार या पुनर्रचनेमागे आहे. शिवाय अनुसूचित जाती, जमाती तसेच इतर मागासवर्गीयांच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दाही या पुनर्रचनेचा आधार आहे.

      September 25, 2005


  • ठोठवा म्हणजे उघडेल

    एक मंदिर होत, प्रसिध्द मंदिर होत, त्या मंदिरात अनेक देश विदेशातील लोक यायचे, भक्तगन यायचे. त्यामुळे ते मंदिर खुपच चर्चेचे प्रसिध्दीचे होते. आणि मग काही दिवसांनी त्या मंदिराचे ट्रस्टी बदलले. आणि मग ट्रस्टी बदलल्यावर त्यांनी विचार केला आपल्या मंदिरात देश-विदेशातील लोक, भाविक भक्त येतात. त्यामध्ये इंग्रजी बोलणारे भाविक भक्त वैगेरे असतात. तेव्हा आपल्या मंदिरातल्या सगळया लोकांना, कर्मचार्यांना पण इंग्रजी आल पाहिजे. त्यांनी लगेच फरमानच काढला. मंदिरामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी आलच पाहिजे. कंम्पलसरीच आहे म्हणे….

    झाल…..
    आता काय,

    आता त्या देवळात एक घंटा वाजवणार होता. त्याला हि कंम्पलसरी झाल ना. ते म्हणे मला काय इंग्रजीचा उपयोग आहे? मी का इंग्रजीत घंटा वाजवतो का ? आणि इंग्रजीत वाजविली काय अन मराठीत वाजवली काय, वाजणार घंटाच आहे. म्हणुन मी शिकलो नाही म्हणुन काय होतय… ट्रस्टी म्हणाले नाही, नियम म्हणजे नियम, सगळयांना इंग्रजी आलच पाहिजे.

    आता त्या घंटा वाजवणाराच पन्नास-पंच्चावन वय त्याच, तो म्हणाला आता कधी शिकव ? त्याने सरळ ती घंटा वाजवायची नौकरीच सोडली.

    बर आता नौकरी सोडली पण पोटापाण्यासाठी काहीतरी केलच पाहिजे. कराव तर काय कराव, मग त्याने विचार केला मंदिर प्रसिध्द आहे देश-विदेशातले भाविक-भक्त येथे येतात आणि मंदिराच्या आसपास कुठ चहा पिवाव तर काही व्यवस्था नाही. मग त्याने काय केले तर सरळ मंदिराच्या बाहेर एक चहाच टपर टाकल. आता मंदिरात अनेक भाविक-भक्त यायला लागले त्यामुळे गर्दी जास्त, जशी गर्दी जास्त तस चहाच टपर जोरात चालल. बघता बघता त्या चहाच्या टपराच त्याने एका छोट हाॅटेल केल. छोट हाॅटेल हि तुफान चालल. मग छोटया हाॅटेलच त्याने मोठ हाॅटेल केल. मोठ हाॅटेल सुध्दा भयानक चालल आणि बघता बघता त्याची तिन चार मोठी हाॅटेल झाली. आणि मग नंतर त्याने फाईव्हस्टार हाॅटेलच काढल. आणि अशा फाईव्ह स्टार हाॅटेलची साखळीच तयार केली. अन त्याच्या या फाईव्ह स्टार हाॅटेल मध्ये देष-विदेषातील भाविक-भक्त यायला लागले. निवासासाठी थांबायला लागले. त्या हाॅटेलच व्यवस्थापण, तिथल नियोजन हे सगळ बघायला लागले.

    एका दिवशी त्या हाॅटेलला एक विदेशी शिष्टमंडळ उतरल आणि उतरलेल्या विदेषी शिष्टमंडळाला अस वाटल की या हाॅटेलच नियोजन, व्यवस्थापन इतक उत्तम आहे तेव्हा या हाॅटेलच्या मालकाला भेटाव. आणि त्यांनी त्या मालकाला भेटायची इच्छा व्यक्त केली.

    मग हा आला भेटायला. आता ते सगळे इंग्रजीतुन बोलायला लागले अन हा पठठया मराठीतुन बोलायला लागला. मग एकजण म्हणाला अहो, एवढया फाईव्ह स्टार हाॅटेलचे मालक तुम्ही; अन तुम्हाला इंग्रजी येत नाही का ? तुम्ही इंग्रजी शिकला नाहीत का ? तसा हा पठठया म्हणाला इंग्रजी शिकलो असतो तर आत्तापर्यंत देवळात घंटाच वाजवत बसलो असतो……

    यशाकडे नेणाऱ्या पुष्कळ वाटा असतात हो, एक दार बंद झाल तर त्या झोळीत दहा दार उघडलेली असतात. तुम्ही एकाच दारावर नका टकरा मारत बसु. आम्ही काय करतो एक दार बंद झाल ना, की तिथच हातपाय गाळुन शांत बसतो. काहीच नाही होणार आता, हा दरवाजा उघडच नाही…

    दरवाजा स्वत:हुन नाही उघडणार; तुला उघडावा लागेल.
    रस्ता तुझ्यापुढे नाही येणार; तुला स्वत:ला रस्ता निर्माण करावा लागेल नाहीतर शोधावा लागेल.

    एक जिवंत नियम आहे-
    सांगा म्हणजे कळेल,
    मागा म्हणजे मिळेल,
    शोधा म्हणजे सापडेल,
    आणि ठोठवा म्हणजे उघडेल…
    हे करणं ज्याला जमत त्याला यश मिळत…

    शोधा म्हणजे सापडेल. दार ठोठवा म्हणजे उघडेल, कारण मागणार्‍याला मिळतं, शोधणार्‍याला सापडतं आणि दार वाजवणार्‍याला दार उघडतं.

      April 11, 2017


  • मतांनाही मूल्य हवे!

    प्रकाशन दिनांक :- 23/05/2004

    परिस्थितीनुरूप बदल हा कुठल्याही क्षेत्रातील विकासाचा अविभाज्य भाग आहे. बदलत्या परिस्थितीला अनुसरून योग्य ते बदल स्वीकारीतच कोणतीही व्यवस्था टिकू शकते, प्रगल्भ होऊ शकते. काळाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी ही लवचीकता आवश्यकच ठरते.

      May 23, 2004


  • मनावर ताण नाही; ताबा असणं महत्वाचं…

    कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी समजून घेऊन आपापसातील संवादात सकारात्मक शब्दप्रयोग केले पाहिजेत. मनाला मन:पूर्वक मानलं, समजून घेतलं, मोकळं केलं, आनंदी ठेवलं, तंदुरुस्त ठेवलं, सकारात्मक विचारांमध्ये गुंतवलं आणि नकारात्मक विचारांपारून दूर ठेवलं कि फक्त आणि फक्त भरघोस घवघवीत यश, आनंदच प्राप्त होत राहतो. अशा परीस्थित मनावर ताण नाही तर ताबा असणं महत्वाचं असतं, हे समजून घेतलं पाहिजे.

      February 20, 2022


  • मंगेश मुंबईकर घोगरे

    छंद हे मानवी जीवनातील केवळ विरंगुळा असत नाहीत तर जीवनाला आकारही देतात. अभ्यास जेव्हां छंद बनतों तेव्हां नाविन्यपूर्ण व सृजन आकाराला येतं. प्रत्येक सृजन पायवाट असते प्रेरणेची. कोणत्याही छंदाचा अभ्यास केला की त्यात प्राविण्य मिळतं आणि यशा कडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो.बुद्धीला व्यायाम देणारी शब्दकोडी म्हणजे अनेकांचे वेळ घालवण्याचे साधन असते. पण सहसा कोणी एखादे शब्दकोडे तयार करण्याचा विचार करत नाही. पण एका भारतीय आणि त्यातही मराठी माणसाने असा भन्नाट छंद जोपासला आणि शब्दकोड्यात वेळ घालवण्याऐवजी त्यात वेळेची गुंतवणूक केली.

      August 12, 2026


  • सुवर्ण – झळाळी

    सुवर्ण – झळाळी

    मागील वर्ष- सहा महिन्यापासून सोने हे सर्वात जास्त चर्चेत आलेला विषय आहे. वर्तमानपत्र, मासिके व व्हाट्सअँप ग्रुप वर याची धमाल आहे. याचा दहा ग्राम (एक तोळा ) चा दर ७० हजार रुपये पासून २.५ लाख तोळ्यावर पोहचला होता. व आजकाल तो १.६० लाख रुपये तोळा पर्यंत खाली आलेला आढळतो. तुम्ही म्हणाल सोन्याला एवढी मागणी का निर्माण झाली? तर जगात कोठेही युद्ध सुरु झाले की लोकांची गुंतवणूक सोन्यात होते. कारण ही कधीही न बुडणारी गुंतवणूक आहे. सामान्य माणूसच काय पण प्रत्येक देश यात गुंतवणुकीला प्राधान्य देतो. हे आत्ताच घडते आहे असे नाही, पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीही हीच परिस्थिती होती.

      June 29, 2026


  • विकल्पांमुळे होतो समाधानाचा नाश

    विकल्प माणसाच्या डोक्यात बिघाड निर्माण करतात.

      November 6, 2016


  • धोरण शेतकरी केंद्रित असावे !

    आज गुजरात एक प्रगत राज्य म्हणविले जाते; कारण तिथला शेतकरी समृद्ध झाला आहे. गुजरातमध्ये भारनियमन नाही, शेतीसाठी भरपूर पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला उचित दाम मिळण्याची काळजी तिथले सरकार घेते, शासन आणि प्रशासन स्तरावर भ्रष्टाचार अगदी नसल्यातच जमा आहे. गुजरात सरकारने शेतकऱ्यांना जोडधंदे उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. त्याचाही परिणाम शेतकर्‍यांच्या उन्नतीवर झाला आहे. हे आपल्याकडे का होऊ शकत नाही?

      October 9, 2011


  • मध्यरात्रीच्या अंधारातले कायदे!

    पाण्यावर पहिला हक्क शेतकर्‍यांचाच आहे आणि तो कायम राहायलाच हवा. सरकारला अत्यंत घाईघाईने, अगदी मध्यरात्री जल विधेयक पारित करून घेण्याची काहीच गरज नव्हती. सरकारची भूमिका पारदर्शक असती तर असले गनिमी कावे खेळण्याची आवश्यकता सरकारला का भासली? इतर अनेक विधेयके, ज्यांचा सामान्य जनतेशी अगदी जवळचा संबंध आहे ती महिनो न महिने रखडतात, तेव्हा सरकारची तत्परता कुठे जाते?

      April 27, 2011


  • पेराल ते उगवणारच !

    आपला शेजारी देशही असाच सूडाच्या भावनेने पेटलेला आहे. केवळ भारताला धडा शिकविण्यासाठी या शेजारी देशाने आतंकवादाच्या आगीचा खेळ करायला सुरूवात केली. एका मर्यादेपर्यंत त्यात तो देश सफलही झाला, परंतु आता त्या देशाने पेटविलेल्या आगीचे चटके त्यांनाच सहन करावे लागत आहेत.

      April 5, 2009