अखेर ते दुकान बंद पडलं आणि त्याचं शटर नेहमीकरिता खाली ओढण्यात आलं.
एका मराठी माणसाने ऐपतीबाहेर खर्च करून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचं धाडस केलं म्हणून अगदी मोजक्या लोकांना किंचित कौतुक वाटलं, तर स्वत: काहीही न करता इतरांचे व्यवसाय कसे व कधी बंद पडतील याची रात्रंदिवस काळजी वाहणाऱ्या बहुसंख्य रिकामटेकड्यांना ते दुकान लवकरच बंद पडणार, याबद्दल उद्घाटनाच्या दिवसापासूनच खात्री वाटू लागली ! दुकान तयार होऊन बरेच दिवस झाले तरी त्याचा शुभारंभ का होत नाही याबद्दल उत्सुकतेपोटी चौकशी केली तेव्हा कळलं की ‘गुरुमहाराज’ जे अक्षर ठरवतील त्या अक्षरापासूनच दुकानाचं नाव निश्चित होईल. व्यवसाय सुरू करण्यासाठी काढलेल्या कर्जावरील महागड्या व्याजाचं मीटर फिरू लागलं आणि तब्बल एक महिन्यानंतर दुकानावर पाटी झळकली. पण तरीही दुकान सुरू होण्याचं काहीही चिन्ह दिसेना. तोटा झाला तरी चालेल, पण गुरुमहाराजांनी मुहूर्त ठरवल्याशिवाय दुकान सुरू करायचं नाही असा निर्णय घेण्यात आल्याचं कळलं.
अखेर महाराजांनी मुहूर्त पक्का केला आणि तब्बल तीन महिन्यांनंतर दुकानाचा शुभारंभ झाला. ग्राहकांच्या गरजांपेक्षा गुरूंच्या सल्ल्याला अतोनात महत्त्व प्राप्त झाल्यामुळे महाराजांच्या मठाकडे दुकानमालकाच्या चकरा वाढल्या व त्याचे दुकानाकडे दुर्लक्ष होऊ लागले. अनेक ‘हितचिंतकांच्या’ अपेक्षेनुसार हळूहळू आचके देत दुकानाने एक दिवस शेवटचा श्वास घेतला व त्याचे शटर खाली ओढण्यात आले.
असे आम्ही कसे? वैचारिक स्पष्टतेला महत्त्व देण्याऐवजी भावना, प्रेम, विश्वास, श्रद्धा, व्यवहार या गोष्टींची सरमिसळ करत व वैचारिक गोंधळात गटांगळ्या खात आम्ही जाणूनबुजून आमच्या आयुष्याचं दिवाळं का काढतो? आयुष्यात प्रत्येकाची कशावर तरी श्रद्धा असणे आवश्यक आहे याबाबतीत दुमत असू शकत नाही. पण म्हणून आपल्या सगळ्यांसारख्या हाडामांसाच्या एखाद्या सामान्य माणसाला ‘महाराज’ ही उपाधी चिकटवून त्याच्या किती आहारी जायचं याला काही मर्यादा आहेत की नाही? ‘महाराजांच्या सल्ल्याशिवाय आमच्या घरातलं पानही हलत नाही,’ असे कौतुकाने ओथंबलेले शब्द अनेक घरांमधून जेव्हा ऐकू येतात तेव्हा मती गुंग होऊन जाते.अशा घरांमधील कर्त्या माणसांनी स्वत:च्या डोक्याचा, विचारशक्तीचा व निर्णयशक्तीचा वापर करणे कायमचे थांबवून टाकले असेल का? एखाद्याला देव्हाऱ्यात बसवून त्याच्याकडे आपली अक्कल आणि अख्खं आयुष्य गहाण टाकण्याइतकं कोणाचं आयुष्य स्वस्त असतं का? इतर कुणाहीपेक्षा आत्मपरीक्षणाला आपला खरा गुरू मानून व आत्मविश्वासात अफाट वाढ करून जर प्रगतिपथावर दमदार पावलं टाकण्यास सुरुवात केली तर घरोघरी विवेकानंद निर्माण होण्यास किती वेळ लागणार आहे?
-- श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
आज प्रत्येकजण स्वप्नांच्या मागेे धावतोय. स्वप्नं, इच्छा, अपेक्षा इ. ची न संपणारी यादी..! आपण इतकं धावतो, इतकं धावतो की आजूबाजूला पहातचं नाही. स्वप्नांच्या मागे धावताना येणारा प्रत्येक दिवस मागे सरत जातो. या प्रत्येक दिवसागणिक आठवणीही मागे पडतात. त्या आठवणी मनातून कधीही पुसल्या जात नाहीत (कडू असो की गोड). एक स्वप्न पूर्ण झालं की, दुसर्या स्वप्नांच्या मागे आपण धावत सुटतो. यालाच म्हणतात का आयुष्य..?
गडचिरोली-चिमूर आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघात आणि विशेषत: त्या मतदारसंघातील नक्षलप्रवण क्षेत्रात मतदान हे पवित्र वातावरणात किंवा कर्तव्य म्हणून नव्हे तर दहशतीच्या वातावरणात पार पडले. या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी इतर मतदारसंघातील मतदानापेक्षा अधिक राहिल्यामुळे पोलिस आणि प्रशासन खूश असले तरी हा प्रकार योग्य नव्हता. भीती दाखवून किंवा दडपशाही करून मतदारांना बाहेर काढायचे असेल तर मग नक्षली आणि पोलिसांमध्ये फरक तो काय राहिला?
पुण्यातील एक नामवंत उद्योगपती चंदू चव्हाण यांचा व्यापारी अनुभवावर आधारीत हा लेख, भावनांच्या डोहात डुंबणाऱ्या देशप्रेमी लोकांना विचार करायला लावणारा हा लेख.. फेसबुकवरुन आला तसा शेअर केलाय. वाचा आणि प्रतिक्रिया लिहा.
खुळचट राष्ट्रवादी penny wise pound foolish आहेत.ती त्यांच्या अभिमान cum फुकाचा गर्व या समर्थ रामदासांनी सांगितलेल्या मूर्खपनाच्या लक्षणाला साजेसं वर्तन आहे.
असो या लेखाचा उद्देश आपण जो देश म्हणूंन आर्थिक/सामाजिक/राजकीय मुर्खपणा करतो आणि त्यामुळे आपल्या देशाच्या वस्तुंच्या किमती जास्त आहेत त्याबद्दल आहे.
चांगल्या वस्तू स्वस्त बनवण्यासाठी गरज आहे इकॉनॉमी मध्ये efficiency of capital असण्याची. कशाने येते हि efficiency of capital?
मी चीन मध्ये 45 दिवस राहिलो, शेतकऱ्यांच्या घरी राहिलो, 10000 पेक्षा जास्त किलोमीटर passenger train ने प्रवास केला. युनिव्हर्सिटी च्या प्राध्यापकांना भेटलो, शेकडो लोकांना भेटलो.एवढच जाणून घ्यायचं होतं की 1950 साली भारतापेक्षा मागासलेला असलेल्या देशाने एव्हडी सामाजिक आणि आर्थिक प्रगती कशी केली?
काही कारणं सांगतो जी महत्वाची आहेत. मूलभूत प्रश्न सोडवल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.
1) कंमुनिस्ट क्रांतीने स्त्रियांना मुक्त केलं, जबरदस्तीने का होईना शर्ट पॅन्ट घालायला लावली, केस कापायला लावले आणि कामाला लावलं.चीन च्या आणि भारताच्या GDP मधला फरक समजून घ्यायचा असेल तर फक्त पडद्यात आणि बुरख्यात असलेल्या स्त्रियांचं उत्पन्न (जर त्यांनी काम केलं असतं तर) gdp मध्ये जमा करा आणि 65 वर्षाचं compounding करा. चीन शी स्पर्धा करायची असेल तर पाहिलं काम स्त्रीमुक्ती चं करा.
एका बाजूला कोट्यवधी बालमजूर शाळेत जात नाहीत आणि दुसऱ्या बाजूला कोट्यवधी स्त्रिया चूल आणि मूल यात अडकवून ठेवण्याविषयी तुम्ही काही करत नसाल तर तुमची देशभक्ती नपुंसक आहे. तुम्हाला त्याची लाज वाटली पाहिजे
कारण देश म्हणजे देशातील माणसे असतात
2) कंमुनिस्टांनी धर्म संपवला, आता बौद्ध मंदिरात फक्त पर्यटक जातात.
धर्मांच्या मठात आणि ट्रस्ट मध्ये राष्ट्रीय बचत चीन मध्ये अडकली नाही ती productive use मध्ये येऊन capitalism चा विकास चिनी कंमुनिस्ट पार्टी च्या नियंत्रणाखाली झाला.
भारतात प्रचंड पैसा धर्मामुळे unproductive कामासाठी मंदिर/मशीद/चर्च मध्ये ब्लॉक झाला आहे
आज भारतात जवळपास 30 टक्के deposit हे तिरुपती/शिर्डी/मशीद/चर्च सारख्या धार्मिक ट्रस्ट/सोसायटी/क्लबचे आहेत,
त्यांना बँका 10 टक्के व्याज देतात त्यामुळे उद्योगांवर कर्जावरील व्याजाचे दर 13-14 टक्के आहेत. चीन मध्ये हेच व्याजाचे दर उद्योगांसाठी 6 टक्के आहेत,
म्हणजे आपण तिरुपती आणि त्यासारख्या मंदिरांना संपत्ती ब्लॉक करायची. त्या संपत्तीला 10 टक्के व्याज द्यायचं आणि आपल्या उद्योजकांना सांगायचं वस्तू स्वस्त द्या.
कसं शक्य आहे?
बाकी 50 टक्के deposits गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेट्स चे आहेत, गरीब/मध्यमवर्गीय जनतेचे deposits फक्त 20 टक्के आहेत.
रिटेल loans जी लोकांनी घेतली आहेत ती जवळपास 30 टक्के आहेत त्याला व्याजाचे दर अजून जास्त आहेत, ढोबळमानाने असं म्हणता येईल की 50 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज सामान्य जनता भरते
हि व्याजरूपी लूट कोणाच्या बोडक्यावर टाकली जाते-साईबाबा/तिरुपती/मंदिर/मशी
हाऊसिंग/education/शेती या साठी लोन एक टक्क्याने देता येतील. आणि उद्योगांसाठी 5-6 टक्क्याने. मग इथले उद्योजक वस्तू स्वस्त बनवू शकतील.
धर्म नष्ट करा ती सर्वात मोठी देशभक्ती होईल.
चिनी वस्तू आपोआप महाग आणि भारतीय वस्तू स्वस्त होतील. धार्मिक मूर्खपणामुळे efficiency of capital कमी होते
3) चीन मध्ये जमिनीची मालकी राष्ट्राची असल्यामुळे सगळ्या जमिनीवर शेती होते, सगळ्या तळ्यात मत्स्य शेती होते, त्यामुळे अन्न धान्य/ फळं/मास मच्छी हि खूप स्वस्त आहे. त्यामुळे लोकांचं जीवनमान चांगलं आहे.
भारतातल्या 40 टक्के शेतीयोग्य जमिनीवर शेतीच होत नाही. जमिनीच्या मालकांना शेतीत इंटरेस्ट नाही आणि मजुरांकडे शेती नाही.
तळ्यात मत्स्यशेती तर नगण्य होते, त्यामुळे अन्नधान्याच्या किमती खूप जास्त आहेत. या व अनेक धार्मिक कारणांमुळे भारत in general कुपोषित आहे. Business हे देखील युद्ध असतं, कोट्यावधींना कुपोषित/वंचित ठेवून तुम्ही ते जिंकू शकत नाही. इतिहासात तसं केल्याने आपण खूप वेळा हरलो आहोत.
हे बदला धर्माना जमिनीत गाडा .ती खरी देशभक्ती, चिनी वस्तूंवरील बंदी तुम्ही करू पन शकत नाही आणि ते करणं मुर्खपणा आहे
चीन ची भांडवलशाही यामुळे ही अमेरिकेपेक्षा efficient आहे. आज अमेरिकेपेक्षा पेक्षा चीन ची अर्थव्यवस्था PPP बेसिस वर मोठी आहे. हि जादू त्यांनी कॅपिटलीसम आणि कंम्युनिसम चं त्यांच्या देशाला योग्य मिश्रण ठेवून आणि धर्म संपवून केलेलं आहे. चीन ला शिव्या घालणारे आणि वस्तूंवर बहिष्कार टाका म्हणणारे माझ्या मते अभ्यास नं केलेले आहेत. त्यांना आग सोमेश्वरी असताना बंब रामेश्वरी पाठवणारे मूर्खच म्हणायला लागेल. हे मूर्ख आम्ही मुतून एक गवताची आग कशी विझवली यात यात खुश आहेत.
असो शेवटी मुखशुद्दी साठी
"गोरा सोजीर मज समक्षच माझ्या भार्येशी कुकर्म करीत असतांना, मी सुद्धा त्याच्यावर धरलेली आपल्या हातातली छत्री मधुनमधून किंचित् कलती करून त्यास उन्ह लागेल असें करून त्या दुष्ट सोजीरावर सूड उगवत होतो."
चिल्लर चिनी चीजवस्तुंवर चिंधीचोर राष्ट्रवाद्यांनी घातलेल्या "कडक" बहिष्काराच्या निमित्ताने, अनेक वर्षांपूर्वी वाचलेलं (बहुधा चिं.वि.जोशी?) हे वाक्य आज सहज आठवलं.
प्रकाशन दिनांक :- 05/12/2004
धर्म ही अफूची गोळी आहे, असे म्हणतात. खरे तर असे जे मानतात त्यांना धर्म काय हेच माहीत नाही असेच म्हणावे लागेल. भारतात आज जवळपास 3000 चे वर जाती/ पोटजाती आहेत आणि बऱ्याचशा सरकार दरबारी सूचित समाविष्ट व्हाव्यात याकरिता ‘वेटिग लिस्ट’मध्ये आहेत.
‘बालपणीचा काळ सुखाचा’ आठवला की हरवून जातं मन. आठवणींची झुंबड उडते मनात. दिवाळीचे व गणपतीचे दिवस, गोकुळाष्टमीचे व होळीचे दिवस, सुट्ट्यांचे व सहलीचे दिवस आठवतात. प्रत्येक सण वा प्रसंग हे आपल्याला भरभरून देत असतात. असे खास दिवस साजरे होण्यापूर्वी तयारी करण्यात वेगळीच गंमत असते, तर ते खास दिवस पार पडल्यानंतर येणारी ‘पोकळी’ ही देखिल आयुष्याच्या चक्राविषयी नकळत शिकवीत असते.
कोणतीही पूर्वसूचना न देता विनायकराव ऊर्फ तात्या भेटायला आले. त्यांच्या अचानक येण्याने मला बऱ्यापैकी आश्चर्य वाटलं. कोणत्या तरी अनामिक कारणामुळे आलेल्या वैफल्याच्या झटक्याने त्यांचा चेहरा झाकोळून गेला होता. चेहऱ्यावरील विषण्णतेचे भाव त्यांना प्रयत्न करूनही लपवता येत नव्हते. अवघं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यागत ते खुर्चीत जवळपास कोसळलेच. हातात घेतलेलं महत्त्वाचं काम बाजूला ठेवून त्यांची समस्या समजावून घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तात्यांनी थोडाही वेळ वाया न घालवता तोंड उघडले.
‘‘या जगात कोणीही विश्वास ठेवण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही. आपल्याला नावं ठेवणारी एकही व्यक्ती या पृथ्वीवर निर्माण होऊ नये यासाठी मी आयुष्यभर काय नाही केलं? स्वत:च्या मतांना तिलांजली दिली, तत्त्वांना मुरड घातली, प्रसंगी स्वत:च्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं, प्रगतीची काळजी केली नाही व अनेकदा आर्थिक झळही सोसली. हे सगळं काही केलं ते केवळ एका गोष्टीसाठी. सर्वांनी मला चांगलं म्हणावं, कोणीही मला नावं ठेवू नये यासाठी. ज्यांच्या भल्यासाठी मी स्वत:चं नुकसान करून घेतलं त्यांच्यापैकीच एकाने आज माझा ‘स्वत:ची मतं नसलेलं बिनबुडाचं भांडं’ असा उल्लेख केलेला ऐकून मला काय वाटलं असेल? या जगात आता जगण्यासारखं काहीही शिल्लक राहिलेलं नाही.’’ तात्या पूर्णपणे खचून गेले होते. त्यांच्याबद्दल कोणाचं वाईट मत असणं ही गोष्ट त्यांच्या कल्पनेपलीकडली होती. ते स्वप्नातही अशा ‘भयंकर’ घटनेचा विचार करू शकत नव्हते. आपल्याबद्दल सभोवतालच्या सर्वांचं मत चांगलंच असलं पाहिजे हा जगावेगळा अट्टाहासच त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू लागला होता.
असे आम्ही कसे? समाजात एखाद्या व्यक्तीबद्दल सर्वांचं एकजात चांगलं मत असणं, टीका करणारी एकही व्यक्ती नसणं, उघड किंवा छुपा एकही शत्रू नसणं हे खरोखरच शक्य आहे का? या गोष्टी मानवीय प्रवृत्तीशी सुसंगत आहेत का? ज्यांना आयुष्यात प्रगती करायची आहे व यशस्वी व्हायचं आहे त्यांना सगळी कामं मिशनरी वृत्तीने पार पाडावी लागतात व हे करीत असताना ते सर्वांना एकाच वेळेस खुश ठेवू शकत नाहीत. कोणत्याही धडपड्या व यशस्वी व्यक्तीला मित्रांपेक्षा शत्रूच जास्त असतात व अशा शत्रूंचं त्या यशस्वी व्यक्तीबद्दल कधीच चांगलं मत नसतं. आपल्याबद्दल शत्रूंचं मत चांगलं नाही म्हणून यशस्वी व्यक्ती प्रगती करणे कधीच थांबवत नसतात.
या जगात सर्वांचं आपल्याबद्दल चांगलंच मत असलं पाहिजे यासाठी अविरत धडपड करणारी तात्यांसारखी माणसं सतत प्रचंड तणावाखाली वावरत असतात व शेवटी अपेक्षाभंगाच्या दु:खाने उद्ध्वस्त होतात. आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल तर लोकांच्या वाईट मतांना भीक घालण्यात अर्थ नसतो. अखेर सगळं जग सलाम करतं ते उगवत्या सूर्याला म्हणजेच यशस्वी व्यक्तीला !
-- श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
उदात्त प्रेम आज का निपजत नाही? पूर्वीची प्रेमगीते ही उदात्त होती, संस्कारक्षम होती, शरीर स्पर्शसुध्दा नव्हता. नग्नता मनाला शिवतही नव्हती. सौंदर्याचे आयाम इतके बदलले की केवळ नग्नतेच सौंदर्य शोधणं सुरु झाले. नग्नतेपलिकडेही काही सात्विक, सुंदर आहे, सत्य आहे, शिवासारखे आहे हे जाणवायला हवं तरच विकृती संस्कृतीवर मात करणार नाही.
एक पौराणिक कथा आहे. रघुराजाच्या दरबारात एक याचक आला. त्या याचकाने मागितलेले दान देण्याइतकी संपत्ती रघुराजाच्या खजिन्यात नव्हती. काय करावे, ही चिंता रघुराजाला पडली. याचक दारातून विन्मुख होऊन जाणे त्याकाळी अपमानास्पद समजले जायचे. याचकाला संतुष्ट तर करायचे होते, परंतु खजिन्यात तेवढे द्रव्य नव्हते. शेवटी एकच पर्याय होता.
Copyright © 2025 | Marathisrushti