वेगळे परिणाम मिळण्यासाठी गोष्टी वेगळ्या पद्धतीने विभाजीत केल्या गेल्या पाहिजेत. बदलाचे हे मॉडल सात पातळ्यांमध्ये विभाजीत केलेलं आहे – सोप्यापासून कठीणाकडे
गेल्या आठवड्यात पावसाने वऱ्हाडाचा तुरळक भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरश: झोडपून काढले. मुंबई आणि कोकण या किनारपट्टीवरील प्रदेशात तर पावसाने विनाशकारी तांडवनृत्य केले. गेल्या 140 वर्षांचा विक्रम मोडणाऱ्या पावसाने मुंबईचे तथाकथित सौंदर्य पार धुऊन काढले.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात शिंदे वासुली गावाजवळ उभ्या होत असलेल्या ‘डाऊ’ कंपनीच्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी समस्त वारकरी रस्त्यावर उतरले आहेत. हा विरोध केल्याबद्दल वारकरी सेनेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी अटक केल्यामुळे संपूर्ण राज्यातील वातावरण तापले आहे. वारकरी संप्रदायाचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात अशी ज्येष्ठ कीर्तनकाराला अटक होत असेल तर बहुराष्ट्रीय कंपन्यांना संरक्षण देण्यासाठी सरकार कोणत्या थराला जाऊ शकते हेच त्यातून दिसून येते.
*मी अत्यंत भाग्यशाली आहे की मला अश्या भूमीत जन्म लाभला ज्या भूमीत बहिणींचे, स्त्रियांचे रक्षण** *करण्यास वचनबद्ध होण्यासाठी संपूर्ण एका दिवसाचा उत्सव साजरा केला जातो*.. *स्त्रियांना इतका मान-सन्मान देणारा संपूर्ण विश्वात भारत हाच एकमेव देश आणि हिंदू हाच एकमेव धर्म आहे. अर्थात काही नराधम आपल्या या संस्कृतीला गालबोट लागेल अशी कृत्ये करत असतात. आणि याला कमी अधिक प्रमाणात आपली चित्रपट सृष्टी कारणीभूत आहे. नेमके* *रक्षाबंधांच्याच दिवशी बहिणीवर होणारे अत्याचार तर कित्येक चित्रपटात चित्रित केले गेलेत. शिवाय शासनाची निष्क्रियता अश्या वासनांध नराधमांना जास्तच खतपाणी घालत असते. अन्यथा ज्या पवित्र भूमीत खास स्त्रियांसाठी सण,उत्सव साजरे केले जातात त्या भूमीत या गोष्टी घडल्याच नसत्या*..
असो...
*आज हा बहीण-भावाच्या नात्याचा पवित्र सण भर हिंदुस्थानात साजरा होतोय.. आजच्या या पवित्र दिनी आपण सारे भाऊ मिळून शपथ घेऊ या की या देशातील प्रत्येक स्त्रिचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली असेल. लव्ह जिहाद, धर्मांतरण या सारख्या विळख्यात अडकणाऱ्या प्रत्येक मुलीला,स्त्रीला आपलीच बहीण समजून तिला या विळख्यातून बाहेर काढण्याची शपथ आज घेऊ या.. त्या साठी ती या विळख्यात कशी अडकणार नाही या साठी तिचे प्रबोधन करू या. शाळा कॉलेज, नाते संबंधात, शेजारी-पाजारी, कार्यालयातील स्त्रियांना या विषयी जागृत करू या*..
*आजची स्त्री खरे तर अबला नाहीच*. *ती खमकी आहे. शूर आहे. समजदार आहे*. *तडफदार आहे. कर्तबगार आहे. अश्या भगिनींना सोबत घेऊन इतर सर्व भगिनींना जागृत करू या*.
*भाऊ बहिणीच्या या हिंदूंच्याच आणि हिंदुस्तानच्याच असणाऱ्या या पवित्र उत्सवाच्या सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा*...
|| जय हिंदूराष्ट्र ||
*इवल्या इवल्या हाताने माझ्या राखी तुला बांधेल* !!
*दादा दादा म्हणत तुझ्या मागे मी फिरेन* !!
*गोड गोड खाऊ मी माझ्या हाताने तुला भरवेन* !!
*आपल्या या नात्याला नव आयुष्य लाभेल* !!
*या साठी दादा मला येऊ दे* !!
*आई ला तू सांग ना मला जग पाहू दे*!!
*केवळ परंपरेचा भाग म्हणून रक्षाबंधन साजरे करू नका* !!
*तूमच्या मूलांच्या बहिणींना गर्भातच मारू नका*!!
*कला सूसंगत परंपरांना आमचे नेहमीच वंदन आह*े !!
*गर्भातल्या लेकी-बहिणी वाचवणे हेच आमूचे खरे रक्षाबंधन आहे* !!
देव-बीव सगळं झूट आहे..थोतांड आहे..'मेडिकल सायन्स' हाच खरा परमेश्वर आहे..गेल्या ५० वर्षांत मेडिकल सायन्स मुळे जेवढे प्राण वाचले असतील,तेवढे देवाने लाखो वर्षात कुणाचे वाचवले नाहीत..मला कीव करावीशी वाटते त्या लोकांची जे 'ऑपरेशन थेटर ' च्या बाहेरही देवाची प्रार्थना आणि स्तोत्र म्हणत बसतात.."-डॉकटर कामेरकरांच्या ह्या वाक्यावर, सभागृहात एकंच हशा उठला..डॉक्टर कामेरकर एका 'मेडिकल कॉन्फरन्स' मध्ये बोलत होते..डॉक्टर कामेरकर शहरातले निष्णात डॉक्टर..त्यांना भेटायला पेशंट्सच्या रांगाच्या रांगा लागत असत..
कॉन्फरन्स संपली आणि डॉक्टर घरी आले..वाटेतच त्यांच्या 'मिसेस' चा मेसेज होता कि "मी आज किटी-पार्टीला जात्ये..मुलं सुद्धा बाहेर गेली आहेत..जेवण डायनिंग टेबलवर काढून ठेवलंय..घरी गेलात कि जेवा"...डॉक्टर घरी आले..हात-पाय तोंड धुवून जेवायला बसले..जेवण आटोपल्यावर लक्षात आलं,कि बरंचसं जेवण उरलंय..आता जेवण फुकट घालवण्यापेक्षा कुणाला तरी दिलेलं बरं..म्हणून उरलं-सुरलेलं सगळं जेवण डॉक्टरांनी एका पिशवीत बांधलं आणि कुणातरी भुकेल्याला ते द्यावं म्हणून आपल्या बिल्डिंगच्या खाली उतरले..लिफ्ट मध्ये असताना, त्यांचंच भाषण त्यांच्या कानात घुमत होतं.."देव-बिव सगळं झूट आहे" -हे वाक्य त्यांच्याच भाषणातलं सगळ्यात आवडतं वाक्य होतं..डॉक्टर कामेरकर हे पक्के नास्तिक..देव अशी कुठलीही गोष्ट,व्यक्ती,शक्ती जगात नाही ह्यावर ठाम..जगात एकंच सत्य..'मेडिकल सायन्स'..बाकी सब झूट है'..
डॉक्टर स्वतःच्याच विचारात बिल्डिंगच्या खाली आले..जरा इकडे-तिकडे बघितल्यावर रस्त्यात थोड्याच अंतरावर कुणीतरी बसलेलं दिसलं..ते त्या दिशेने चालू लागले..जवळ आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं कि एक मध्यम वयाची बाई,आपल्या एका १०-१२ वर्षांच्या मुलाला कवटाळून बसली आहे.
ते पोर त्याच्या आईच्या कुशीत पडून होतं..ती बाई देखील रोगट आणि कित्येक दिवसांची उपाशी वाटत होती..डॉक्टरांनी ती जेवणाची पिशवी, त्या बाईच्या हातात टेकवली..आणि तिथून निघणार, इतक्यात ती बाई,तिच्या मुलाला म्हणाली "बघ बाळा..तुला सांगितलं होतं ना..आज आपल्याला जेवाया मिळेल..देवावर विश्वास ठेव..हे बघ..देव-बाप्पाने आपल्यासाठी जेवण धाडलंय"......हे ऐकल्यावर डॉक्टरांच्या तळ-पायाची आग मस्तकात गेली..ते त्या बाईवर कडाडले, "ओह शट-अप..देव वगैरे सगळं खोटं आहे..हे जेवण तुझ्यासाठी मी घेऊन आलोय..देव नाही..हे जेवण मी फेकूनही देऊ शकलो असतो..पण मी ते खाली उतरून घेऊन आलोय..काय देव देव लावलंयस..नॉन-सेन्स.."
"साहेब..हे जेवण तुम्ही माझ्यासाठी आणलंत ह्यासाठी मी तुमची आभारी आहे..पण साहेब..देव हा माणसातच असतो ना ? आपणच त्याला उगीच चार हात आणि मुकुट चढवून त्याला फोटोत बसवतो..माझ्यासाठी तर प्रत्येक चांगलं कर्म करणारा माणूस,हा देवच आहे..आपण त्याला फक्त चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीने शोधाया जातो एवढंच..माझ्यासाठी तुम्ही 'देव'च आहात साहेब..आज माझ्या लेकराचं तुम्ही पोट भरलंत..तुमचं सगळं चांगलं होईल...हा एका आईचा आशिर्वाद आहे तुम्हाला.."
डॉक्टर कामेरकर, त्या बाईचं बोलणं ऐकून सुन्न झाले..एक रोगट-भुकेलेली बाई त्यांना केवढं मोठं तत्वज्ञान शिकवून गेली होती..आणि ते ह्याच विचारात डांग झाले कि ही गोष्ट आपल्या कधीच डोक्यात कशी काय आली नाही ? चांगली कर्म करणारा प्रत्येक माणूस हा देवच असतो...चांगल्या कर्मातच परमेश्वर आहे..चांगल्या माणसात देव आहे..प्रत्येक 'सत्कृत्यात' देव आहे हे आपल्या कधीच का लक्षात आलं नाही ? आपण 'देवावर विश्वास' ठेवा म्हणतो म्हणजे नक्की काय ? तर आपल्याला चांगली माणसं भेटतील,चांगली परिस्थिती निर्माण होईल ह्यावरच तो विश्वास असतो..डॉक्टरांनी एकदाच त्या बाईकडे वळून बघितलं..आपल्या भुकेल्या लेकराला ती माउली भरवत होती..त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून डॉक्टरांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं..एक कणखर डॉक्टर त्या दोन अश्रूंत विरघळला होता...डोळे मिटून,ओघळत्या अश्रूंनी,डॉक्टरांचे हात नकळत जोडले गेले होते..
-- स्वरूप पुरुषोत्तम काळे
-- संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.
राजधानी दिल्लीमधल्या वृक्षाच्छादित रस्त्यांनी नटलेल्या लुटयेन्स झोन मध्ये राहायला फुकट सरकारी घर मिळवणं हे बऱ्याच भारतीय राजकारणी, पत्रकार, चित्रकार, कलाकार वगैरे लोकांचं स्वप्न असतं. नाना खटपटी करून एकदा लुटयेन्स दिल्लीमध्ये घर मिळवलं की हे लोक तिथेच आयत्या बिलावरचे नागोबा होऊन वर्षानुवर्षे ठाण मांडून बसतात. सत्ता बदलली,केंद्रातलं पद गेलं तर स्वतःहून लोकांनी ही घरं खाली करावीत अशी अपेक्षा असते, पण नाममात्र भाड्यात मिळणारी अशी अलिशान घरे सोडणार कोण?
मी निरुत्तर झालो, माझ्याच घरात काय, दिल्लीतल्या ८० टक्के घरांत आंगण नाही किंवा कुठले झाड हि नाही. रस्त्यांवरची झाडे हि दुकानदारांनी, आपले दुकान वाढविण्यासाठी केंव्हाच तोडून टाकली. मोठ्या-मोठ्या कोठीवाल्यांना हि त्यांच्या महागड्या कारांवर पडणारा झाडांच्या पानांचा कचरा सहन झाला नाही. त्यांनी हि झाडांना तोडून टाकले. आता धुळीच्या आंधीला विसाव्यासाठी कुठलीच जागा उरली नाही. थेट लोकांच्या घरात शिरणे तिची हि मजबुरी.
राघोबा दादांनी नारायणला ‘धरावे’ असा आदेश गारद्यांना दिला आणि आनंदीबाईंनी ‘ध’चा ‘मा’ करीत पेशव्यांच्या इतिहासातील एका काळ्याकुट्ट प्रकरणाला जन्म दिला. केवळ अक्षर बदलले आणि शनिवारवाड्याच्या भिंती कोवळ्या, निष्पाप नारायणाच्या रक्ताने न्हाऊन निघाल्या. एखादे अक्षर, एखादा शब्द किंवा एखादे वाक्य!
हिंदुस्थानला कायमस्वरूपी गुलामीत ढकलू पाहणाऱ्या शक्तींनी बाहुबलाऐवजी बुध्दिबळाने आपले प्रयत्न चालविल्याचा उल्लेख मागील ‘प्रहार’मध्ये मी केला आहे. या शक्तींनी आपली कुटिल योजना तडीस नेण्यासाठी तीन प्राथमिक लक्ष्ये निर्धारित केली आहेत. त्यापैकी संस्कृतीवरचे त्यांचे अप्रत्यक्ष आक्रमण कसे यशस्वी ठरले, याचा उहापोह मागील लेखात झालाच आहे.
आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. म्हणजेच देशाचा कोणताही अधिकृत धर्म नाही. धर्मच नाही म्हटल्यावर ईश्वर किंवा ईश्वरी अवतार या कल्पनाही आपोआपच बाद होतात; परंतु देशाचा एकूण कारभार पाहिला की ईश्वराला नाकारणे खूप कठीण जाते.
Copyright © 2025 | Marathisrushti