(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नव्या कुरणांची निर्मिती

    साखर. मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक. मधूमेहाचे रोगी सोडले तर उर्वरीत मनुष्यजातीतील एकाचाही एकही दिवस बिनासाखरेचा जात असेल, असे वाटत नाही. मानवाचे संपूर्ण जीवन व्यापणार्‍या या साखरेला महाराष्ट्रात तर अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशातील सर्वाधिक पुढारलेले राज्य म्हणून मिरविणार्‍या या राज्याचे राजकारण साखरेभोवती फिरत असते, असे म्हटले तर ते अजिबात वावगे ठरणार नाही. राज्याच्या पश्चिम भागाने सहकारी साखर कारखानदारीच्या बळावर प्रचंड विकास साधून घेतला आहे आणि देशातील एक संपन्न भाग म्हणून नावारूपाला आला आहे. पश्चिम महाराष्ट्राने सहकारी साखर कारखानदारीच्या बळावर घेतलेली प्रगतीची झेप बघून मराठवाडा व विदर्भ या तुलनेत अविकसित भागातही, सहकारी साखर कारखाने उभे राहिलेत.

  • खरं जगणं

    मुळात आयुष्य म्हणजे जगणं असतं का? आता हा फार जटील, गुंतागुंतीचा प्रश्न असला तरी हे जीवन जटील नाहीच. मग का आपण व्यवस्थेच्या बाजारात हे जगणंच हरवून बसतो? का आयुष्यभर इतरांशी तुलना करत… त्यांचं वैभव, त्यांची प्रतिष्ठा बघत स्वत:ला ठेंगणं करून घेतो..?

  • नोकरशाहीच्या धर्तीवर शेतमालाचेही मूल्यनिर्धारण करणे ही काळाची गरज!

    शेतकर्‍यांना न्याय देणारी, इतर समाज घटकांसोबतच त्याचाही बरोबरीने विचार करणारी आणि संवैधानिक आधार असलेली यंत्रणा उभी होणे काळाची गरज आहे. हे होत नाही तोपर्यंत या देशाचे दारिद्र्य संपणार नाही. आणि शेतकर्‍यांचे रस्त्यावर उतरणे बंद होणार नाही.

  • पुन्हा एका शिवाजीची गरज!

    प्रकाशन दिनांक :- 22/02/2004

    भारतीय पुराणात सप्त चिरंजीवांचा उल्लेख आहे. बजरंगबली, अश्वत्थामा वगैरे मंडळींचा या सप्त चिरंजीवात समावेश आहे. पुराणकथांचे लेखन नेमके केव्हा बंद झाले ते माहिती नाही, परंतु ते आजतागायत सुरू राहिले असते तर त्यात आठव्या चिरंजीवी संकल्पनेची नक्कीच भर पडली असती.

  • जागतिक भ्रष्टाचार आलेख व क्रमवारी सन २०१०.

    सकाळचे वर्तमान पत्र उघडताच भ्रष्टाचाराच्या बातम्या ह्याची पण आपणास सवय झाली. प्रत्येक जण त्यां बद्दल बोलतो पण सध्याच्या बिघडलेल्या परिस्थिती मध्ये कोणीही कसलेही पाऊल उचलणयास धजत नाही.

    भ्रष्टाचार हा काहीं भारतातच आहे असे नाही तर सबंध जगात तो बोकाळ लेला आहे. जर का देशाची प्रगती सर्वांगीण साधायची असेल तर सरकारला भ्रष्टाचार रुपी राक्षसास समूळ नष्ट करावे लागेल. त्या साठी काहीं कठोर पावले उचलावी लागतील तसेंच वेळ पडल्यास स्वकीयावर कारवाई करण्यास कुचराई करतां कामा नये .

    गेली ६० वर्षे आपण बघतो आहोत कि हा भ्रष्टाचार रुपी राक्षस असा वाढला कि त्याला मारणे किवां काबूत ठेवणे पण कठीण होऊन गेले. ह्या चें मुळ कारण देश भक्ती,सदाचार, सच्चेपणा, निष्कलंकता , आत्मीयता ,जिव्हाळा,तसेंच निस्वार्थ बुद्धी अशा सर्वच गुणांचा झालेला ऱ्हास.सध्याची बदललेली राजकीय समीकरणे , राजकीय नेते,सरकारी अधिकारी,प्रत्येक मंडळाचे अध्यक्ष व ईतर उच्च पदावर असलेले प्रतिष्ठीत ह्या सर्वांची स्वहित जपण्याची प्रवृत्ती त्यामुळे सगळीकडे भ्रष्टाचार माजलेला आहे.

    सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व सरकारी क्षेत्रात पारदर्शकता व आकाउंटीबिलीटी ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहे ती जर अमलात आणली तर, हा भ्रष्टाचार चा राक्षसास समाप्त करणे कठीण जाणार नाही.जगात अशी पण उदाहरणे आहेत कि जेव्हा भ्रष्टाचाराचा विळखा सर्वत्र पसरला तर जनतेस जगणे अशक्य होऊन जाते तेव्हां ,जनतेचा राग कोणीही थांबू शकणार नाही. सर्व भ्रष्टाचारी मंडळींची काय गत होईल ते देवच जाणे.

    भारतीय जनता फारच शोशिक आहे पण कां एकदा त्याचा अंत झाला कि मग परिस्थिती काहीं वेगळीच होईल. तेव्हां सर्व राजकर्त्यांनी,सरकारी अधिकारि,आणि उच्च पदस्थ लोकांनी वेळीच सावध होऊन स्वहित जपणे सोडले पाहिजे नसता लोक क्षोभास समोरे जावे लागेल हें पक्के.

    भारत सरकारने मग ते कोणत्याही पार्टीचा कां असेना UNO convention against curruption चा ठराव कडकरीत्या आमलात आणले पाहिजे व आपल्या राजकारणी नेत्यांनी " स्वहित " बाजूला सारून किवां त्यागून जनतेच्या भल्यासाठी ,देश प्रगती पथावर नेण्यासाठी आपल्या कामात पारदर्शकता, जवाबदारी च्या भावनेनी वागले पाहिजे नसता पुढचा काळ त्यांचा अंधारमय होईल.

    जगातील काहीं देशांनी आपला कारभारात पारदर्शकता व जवाबदारीने करून आपल्या राष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर आणल्याची उदाहरणे आहेत. डेन्मार्क,न्यूझीलंड,आणि सिंगापोर ह्या देशांनी कठोर कारवाई, पारदर्शकता,जवाबदार वृतीने काम करून भ्रष्टाचाराचा नाश करून जागतिक क्रमवारीत वरच्या कृमंकावर जाऊन पोहचली आहेत. ह्या वरून असे दिसून येते कि स्वछ राज्य कारभार, लोक उपयोगी कामे, आत्मीयता,आणि देशासाठी समर्पण भावना ठेऊन राष्ट्र हिताची कामे केली तर टप्या , टप्याने भ्रष्टाचार रुपी राक्षसाचा नाश करणे साध्य होईल.

    वर उध्रत केल्या प्रमाणे जागतिक भ्रष्टाचारचा आलेख व क्रमवारी Transparancy International ह्या संथेने जगातील १७८ राष्ट्राचा अभ्यास व पडताळणी करून एक अहवाल तय्यार केला आणि त्यांत सर्वात जास्त भ्रष्टाचार कोणत्या देशात आहे व सर्वात कमी भ्रष्टाचार कोणत्या देशात आहे ह्यावरून त्यांनी सर्व देशाची क्रमवारी केली. कोण कोणती राष्ट्रे किती भ्रष्टाचारी आहेत ते ० ते १० यां माप पट्टी ने मोजून क्रमवारी दिली आहे. आपणा साठी तो आलेख व माप पट्टी कृमांक देत आहे. ह्या क्रमवारीत भारत देश ( इंडिया ) ८६ कृमंकावर आहे व माप पट्टी मध्ये भ्रष्टाचार मोजणी ३.३ आहे.

    आपण आशा करुया कि भारतीय राजनीतिक नेते ह्या पासुन काहीं शिकतील व आपला देश पण भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त होईल.

    -- मा.ना. बासरकर

  • भ्रामक लोकशाही!

    पूर्वीच्या काळी ताब्यात असलेल्या गडकोटावरून एखाद्या राज्याची, राजाची श्रीमंती ठरत असे. जितके जास्त किल्ले, दुर्ग वर्चस्वाखाली तितका तो राजा प्रभावी समजला जायचा. एखादा किल्ला ताब्यात असला की, आजुबाजूच्या मोठ्या परिसरावर सहज नियंत्रण ठेवता यायचे. सैन्य, त्यांच्यासाठी लागणारी रसद आणि अर्थातच सुरक्षितता आदी कारणांमुळे गडदुर्गांना खूप महत्त्व असायचे. काळ बदलला. गडदुर्ग केवळ पर्यटनापुरते उरले. अर्थात गडदुर्गाचे महत्त्व संपुष्टात आले असे नाही, ते आजही कायम आहे. फक्त त्यांचे स्वरूप बदलले एवढेच. केवळ स्वरूपच नव्हे तर उपयोगितादेखील बदलली.

  • म्हातारा मेल्याचे दु:ख नाही

    वृत्तपत्रे समाजाचा आरसा असतात, समाजातील गरीब, पीडित, शोषित लोकांचा आवाज म्हणजे वृत्तपत्रे, सरकारची, प्रशासनाची सामान्य जनतेशी नाळ जोडणारे माध्यम म्हणजे वृत्तपत्रे, आदी अनेक विशेष गुणांद्वारे वृत्तपत्रांचे कौतुक केले जायचे. केले जायचे एवढ्याचसाठी की आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. एकेकाळी वृत्तपत्रे खरोखरच एक जबरदस्त ताकद म्हणून ओळखली जायची.

  • एटीएम – ATM

    माझी सहा वर्षाची कन्या नेहेमी माझ्यासोबत ATM मध्ये येत असे, मशीन मध्ये कार्ड सरकवण्याची तसेच पैसे निघाले कि पटकन बाहेर ओढून माझ्या हातात देण्याची तिला भारी हौस.

    काही दिवसांनी तिने प्रश्न विचारला, बाबा जर ATM मधून पैसे मिळतात, तर तुम्ही काम करायला कशाला जाता? पैसे संपले कि आपण मशीन मधून काढायचे व खर्च करायचे. अर्थात, त्या बाल मनाला काय ठाऊक कष्ट करूनच पैसे बँकेत जमा करता येतात आणि मग ATM मधून काढता येतात.

    माझ्यासारख्या सर्वच लोकांची विचारसरणी माझ्या लेकी सारखीच आहे. आज प्रदूषणाचा राक्षस आपला प्रभाव अक्राळ विक्राळ स्वरूपात सर्व ठिकाणी दर्शवू लागला आहे. हजारो टन कार्बन डाय ऑक्सिइड दररोज हवेत सोडला जातो, आणि त्याच्या दुप्पट अमूल्य ऑक्सिजन हवेतून नष्ट केला जातो. हा वायू लाखो वर्षापासून या ग्रहावर असणाऱ्या लहान मोठया वनस्पती रूपातील जीवांनी फोटोसिंथसीस द्वारे तयार करून आपल्यासाठी ठेवला आहे.

    आज आपण हाच प्राणवायू किव्वा ऑक्सिजन येणाऱ्या पिढ्यांचा विचार न करता संपवू लागलो आहोत. यात अग्रक्रम औष्णिक वीज प्रकल्प ज्यात जमिनीतून मिळणारा कोळसा, व तेल यांचा वाटा सर्वात जास्त आहेे. या नंतर सर्व इंजिनातून निघणारा धूर, ज्यात इंधन म्हणून पेट्रोल, डिझल, केरोसीन आदी द्रवरूप इंधने जी फक्त भूगर्भातून मिळतात, याचा वापर करण्यात येतो. जगातील 95 टक्के प्रदूषण वरील दोन प्रकारे होते. याचा दुसरा अर्थ आज जगात जो प्राणवायू उपलब्ध आहे तो आपण संपवित चाललो आहोत, आणि CO2 जो समस्त प्राणी मात्रांसाठी घातक आहे त्याची उत्पत्ती करत आहोत.

    पृथ्वीचे वातावरण हि ऑक्सिजन बँक आहे, वरती सांगितलेले इंजिन व औष्णिक प्रकल्प ATM मानुया, ज्यातून प्राणवायू काढल्यामुळे कमी होत चालला आहे. आज काळाची गरज आहे कि जितका ऑक्सिजन आपण यातून काढत आहे, तितका बँकेत परत भरला गेला पाहिजे, जे आज तरी होत नाही हि दुर्दैवाची गोष्ट आहे. शहरातील व जंगलातील झाडे कापून जगाला प्राणवायू देणाऱ्या एकमात्र यंत्राचा नाश करून, आपण स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहोत.

    झाडांच्या रुपात आपण गुंतवणूक केल्यास, ज्याला व्यवसाय म्हणू ऑक्सिजन रुपी नफा मिळेल, जो परत वातावरण रुपी बँकेत जमा करून, ATM रुपी औष्णिक व इंजिना मधून परत खर्च करता येईल. आज तरी सर्वांची वैचारिक अवस्था माझ्या कन्येसारखी आहे, आपल्याला हे लक्षातच येत नाही कि ऑक्सिजन रुपी पैसे देखील कधीतरी संपणार आहेत, आणि आपली बँक डुबणार आहे.

    विश्वात भूतान हा एकमेव असा देश आहे, जो ऑक्सिजन जितका खर्च करतो त्या पेक्ष्या जास्त तयार करतो. खऱ्या अर्थाने नफ्यात असलेला देश आहे, बाकी सर्व जग हे व्ययात आहे, ज्याची फार मोठी किंमत येणाऱ्या पिढ्यांना मोजावी लागणार आहे.

    विजय लिमये
    (9326040204)

  • अहंकाराची फळे

    अहंकाराची फळे

    विजयच्या आत्महत्येची बातमी माझ्यासाठी धक्कादायक होती. एका उमद्या व्यक्तिमत्त्वाने अचानक सर्वांचा निरोप घ्यावा याला काय म्हणावं? स्वत:चं आयुष्य स्वत:च्याच हाताने संपवण्याइतकं असं कोणतं कारण असावं याबद्दल मला जिज्ञासा वाटू लागली. विजयच्या मृत्यूचं दु:ख काही प्रमाणात ओसरल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांकडून त्याच्या आत्महत्येशी संबंधित माहिती मिळविण्याचा मी प्रयत्न केला.

    विजयचे वडील एक मोठे सरकारी अधिकारी. मोठ्या पदामुळे त्यांच्याभोवती सतत खुशमस्क-यांचा गराडा पडलेला असे व आपल्या बॉसचा अहंकार सतत कुरवाळण्याचं काम हे खुशमस्करे मोठ्या इमाने-इतबारे पार पाडायचे. अधिकारीपदाच्या खुर्चीमुळे साहेबांना कोणाकडूनही नकार ऐकण्याची सवयच राहिली नव्हती. घरातसुद्धा प्रत्येकाने आपल्याला सलाम करावा व आपलेच म्हणणे ऐकावे असे त्यांना वाटू लागले. विजयची आई महिला मंडळं, क्लब्ज व पार्ट्यांच्या विश्वात रमणारी स्त्री होती. तिला स्वत:च्या सौंदर्याचा अत्यंत गर्व होता व सभोवतालच्या सर्वांनी आपलं केवळ कौतुकच करावं अशी तिची अपेक्षा होती. कोणीही तिच्या मनाविरुद्ध वागलं तर तिच्या जिवाचा अत्यंत संताप होत असे. दोघेही जन्मदाते अहंकाराला कुरवाळण्यात इतके व्यग्र होते की विजयच्या आयुष्याकडे व समस्यांकडे लक्ष देण्यास त्यांना अजिबात फुरसत नव्हती. आपल्या भावना, विचार, समस्या समजावून घेणा-या व्यक्तीच्या शोधात निघालेला विजय अखेर एका मुलीच्या प्रेमात पडला. पण तिची मानवनिर्मित जात वेगळी होती. स्वत:च्या मुलाच्या भवितव्याचा विचार करण्यास कधीही फुरसत न मिळालेले त्याचे पालक त्याच्या प्रेमप्रकरणाचा सुगावा लागताच प्रचंड बिथरले. आपल्या मुलाशी थेट चर्चा न करता इतरांच्या मदतीने त्यांनी प्रेमी युगुलावर लग्न न करण्यासाठी प्रचंड दबाव आणला व त्यांची मोठ्या प्रमाणात बदनामी करण्याचा प्रयत्न केला. अखेर अति अहंकाराने आंधळ्या झालेल्या पालकांच्या भावनाशून्य वागण्याची परिणती झाली विजयच्या अत्यंत दुर्दैवी आत्महत्येत !

    असे आम्ही कसे? प्रत्येक घरातली मुलं त्यांच्या वयोमानानुसार वागत असतात. त्यांचं विश्व वेगळं, त्यांची स्वप्नं वेगळी, आकांक्षा वेगळ्या, धडपड वेगळी, आदर्श वेगळे. त्यांना अवघं जग जिंकायची इच्छा असते. पण त्याच वेळेस लहान वयातील अपरिपक्वतेमुळे व बरेचदा अति उत्साहामुळे अनेक चुका त्यांच्या हातून घडतात.पूर्ण विचार न करता उतावळेपणाने चुकीचे निर्णय घेणे, एकतर्फी प्रेम तसेच शारीरिक आकर्षणालाच प्रेम समजण्याची घोडचूक ही सगळी सळसळत्या तारुण्याची लक्षणे आहेत. आपल्या मुलांशी सुसंवाद साधून, त्यांना पूर्ण विश्वासात घेऊन तारुण्यातील धोकादायक वळणांची जाणीव करून देण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे हे पालकांच्या परिपक्वतेचे व त्यांना आपल्या अपत्यांप्रति असलेल्या जबाबदारीचे लक्षण आहे. आई-वडील जर चोवीस तास आपल्याच तो-यात वावरत असतील तर मुलांनी त्यांच्या भावना, व्यथा कोणाजवळ व्यक्त कराव्या? अशा वेळी होणा-या प्रचंड कोंडमा-याचा जर आत्महत्येसारखा दु:खद शेवट झाला तर त्याला जबाबदार कोण?

    घराघरातील पालकांनी स्वत:चा अहंकार काबूत ठेवून व मुलांच्या अहंकाराला न डिवचता त्यांना योग्य वेळी सावध करणे हे कौशल्याचे काम आहे आणि शक्य तितक्या लवकर त्यांनी ते कौशल्य हस्तगत करणे ही काळाची गरज आहे !

    श्रीकांत पोहनकर
    98226 98100
    shrikantpohankar@gmail.com

  • कोळसा, उगाळावा तेवढा काळाच!

    खाणीतला कोळसा कितीही उगाळला तरी काळाच राहतो, हे भौतिक सत्य आहे; परंतु समाजातील वरून पांढरे दिसणारे हे बगळे सत्याच्या कसोटीवर घासले गेले, तर आतून इतके काळे असू शकतात, हे सत्य कोणत्या परिभाषेत मांडायचे?