गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नौपाडय़ातील कृष्ण निवास ही धोकादायक इमारत कोसळली आणि ठाण्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. त्यानंतर अशा प्रकारच्या संभाव्य धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना नोटिसा दाखवून बेघर करण्यात आले. त्यापैकी बरीचशी कुटुंबे सध्या रेंटल हाऊसिंग नामक असुविधांचा सामना करीत जगत आहेत. खरे तर धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांचे प्रश्न समजून घेऊन त्याबाबत उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र दुर्दैवाने शासन आणि स्थानिक प्रशासन त्याबाबतीत फारसे संवेदनशील नसल्याचा सर्वसामान्य ठाणेकरांचा अनुभव आहे..
एक वर्षांपूर्वी उत्तररात्री २ वाजून १५ मिनिटांनी ठाण्याच्या ‘बी’ केबिन परिसरातील ‘कृष्ण निवास’ ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. तब्बल १२ जणांचा त्यात मृत्यू झाला. त्यानंतर पुढे महिनाभर बचाव कार्यात आपण कसे सहकार्य केले हे सांगण्यात जवळपास सर्व राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ लागली होती. यासंदर्भात सहयोग मंदिर सभागृहात झालेल्या चर्चेत अतिरिक्त आयुक्तांनी एनडीआरएफ पथकाला आठ दिवसात शहरातील मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध करून देतो असे आश्वासन दिले होते. ते आश्वासन हवेत विरले. आताही हे पथक कौश्याहून येते असे समजते. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब ही की २०१६-१७ च्या अर्थसंकल्पामध्ये एनडीआरएफच्या पथकाला जागा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. आयुक्तांनीही तातडीच्या बैठका घेऊन अशा घटना टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा खल केला. झालेल्या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त अशोक कुमार रणखांब, उपायुक्त अशोक बुरपुल्ले तसेच उपनगर अभियंता राजन खांडपेकर अशा कर्तव्यकठोर अधिकाऱ्यांची त्रिसदस्य समिती नेमण्यात आली. या समितीची चौकशी पूर्ण होताच चौकशी अहवाल ठाणेकरांच्या समोर ठेवण्याची घोषणा करण्यात आली. मात्र अद्याप तरी या समितीचा चौकशी अहवाल ठाणेकरांसाठी खुला करण्यात आलेला नाही. आता किमान ‘वर्षश्राद्धाला’ तरी तो अहवाल जनतेसमोर येईल, अशी अपेक्षा आहे…
या घटनेचा धसका घेऊन ‘आजी कृपा’, ‘यशवंत कुंज’, ‘शांतासदन’, ‘आई’, ‘चंद्रकला’, ‘गणेश भुवन’, ‘सावित्रीदीप’, ‘अनुस्मृती’, ‘कमळाजी भुवन’, ‘शकुंतला’, ‘श्रमधाम’, ‘पार्वती निवास’, ‘मनीषा’, या भाडेकरूंच्या रहिवास असलेल्या इमारती जीवितहानीचा दाखला देत रिकाम्या करण्यात आल्या. काही इमारती तर केवळ २४ तासांच्या नोटिशीवर खाली करण्यात आल्या. खासकरून नौपाडा प्रभागातील अशा इमारतीतील राहणारे, ज्यात विशेषकरून वरिष्ठ नागरिकांची संख्या जास्त होती, ते अक्षरश: एका दिवसात रस्त्यावर आले. बऱ्याचशा भाडेकरूंची या घराशी जन्मापासून असलेली नाळ अशी अचानक तोडण्यात आली. या ज्येष्ठ नागरिकांमध्ये अनेक विधवा महिला आहेत. ‘यशवंत कुंज’ आणि ‘आजीकृपा’मधील अशा महिलांनी जेव्हा आपल्याबरोबर या घरात आलेला देवघरातील ‘लंगडा बाळकृष्ण’ आणि ‘अन्नपूर्णा देवी’ उचलून आपल्या मुठीत घट्ट धरली, तेव्हा बंदोबस्तासाठी तिथे उपस्थित असलेल्या महिला पोलिसांचेही डोळे पाणावले. काळाने एका झटक्यात या सर्वाना आप्तेष्टांच्या उंबरठय़ावर व्यथित जीवन जगण्यासाठी नेऊन उभे केले आणि त्यातून अनेक कौटुंबिक प्रश्न निर्माण झाले. भाडेकरूंना इमारतीबाहेर काढताना त्यांच्या हक्कांचे रक्षण केले जाईल. आपण राहत होतात तेवढय़ा क्षेत्रफळाचे ‘हमी पत्र’ देण्यात येईल असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्षात त्याऐवजी ५० रुपये शुल्क आकारून नौपाडा प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्तांनी ज्या दिवशी या इमारती पाडल्या, त्या दिवशी असलेल्या भोगवटाधारकांच्या नोंदीमध्ये आपले नाव असल्याचा उतारा देऊन निष्कासित भाडेकरूंची बोळवण केली आहे. आतापर्यंत नौपाडय़ातील एकाही निष्कासित भाडेकरूला ‘हमी पत्र’ देण्यात आलेले नाही. त्यामुळे पुनíवकासास आणखी तीन वर्षे लागल्यास आयुक्त बदललेले असणार. मग जेव्हा तुम्हाला निष्कासित केले, तेव्हाच ‘हमी पत्र’ का नाही घेतले, असा प्रश्न प्रशासन विचारणार..
या सर्व इमारतींचे कोणतेही स्ट्रक्चरल ऑडिट न करता अथवा कोणताही तांत्रिक अहवाल सादर न करता केवळ प्रशासनिक २६७(१) कलमाचा आधार घेत स्थानिक वर्तमानपत्रात जाहिराती देत मूळ ठाणेकर असलेल्या या करदात्यांना बेघर करण्यात आले. त्यामुळे बऱ्याच जणांच्या नशिबी एका रात्रीत ‘बुरे दिन’ आले. पुढे तीन-चार महिने पाठपुरावा केल्यानंतर या सर्वाना रेंटल हाऊसिंग नामक १६० चौरस फुटांच्या जागेत कोंबण्यात आले. त्यामुळे आगीतून फुफाटय़ात पडावे, अशी त्यांची अवस्था झाली. दरमहा दोन हजार रुपये भाडे घेणाऱ्या महापालिका प्रशासनाने या इमारतींच्या देखभालीकडे कमालीचे दुर्लक्ष केले आहे. भाडेतत्त्वावरील या इमारतींना टीएमसीकडून नियमितपणे पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे त्यांना टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. टँकरच्या दूषित पाण्यामुळे या निवाऱ्यांना गंभीर आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
ठाण्यातील नौपाडा प्रभागातील या सर्व अधिकृत भाडेकरूयुक्त इमारतींचा पुनर्विकास रखडण्याची कारणे म्हणजे त्यासाठी आवश्यक असणारे दुप्पट चटईक्षेत्र. तसेच इमातींसमोरील ९ मीटरच्या रस्त्याची अट. शासन या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही. त्यात ठाण्यातील ८२% बांधकामे अनधिकृत असल्याची माहिती बाहेर आल्यामुळे शासनाने आपला मोर्चा ही सर्व बांधकामे नियमित करण्याच्या कामाकडे वळविला आहे. त्यामुळे १८ टक्के अधिकृत इमारतींकडे किंवा त्यांच्या पुनर्विकासाच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्यास शासनास रस वाटत नाही हीच खरी शोकांतिका. शासनाच्या अलीकडच्या हालचाली पाहता ठाण्यात ‘अनधिकृत तुपाशी आणि अधिकृत उपाशी’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पाश्र्वभूमीवर ब्राह्मण सोसायटीतील ‘शरदचंद्र दर्शन’ या पन्नास वर्षे जुन्या इमारतींबद्दल सुखद अनुभव आला. या इमारतीस ठाणे महानगरपालिकेने अतिधोकादायक ठरवून पाडण्याची नोटीस दिली. इमारतीचे मालक शरदचंद्र लोहकरे आणि इमारतीत वास्तव्यास असलेल्या भाडेकरूंची एक तातडीची बैठक घेऊन या इमारतीचे ठाणे मनपाच्या पॅनलवरील स्ट्रक्चरल ऑडिटरकडून ऑडिट करून घेतले. तेव्हा ही इमारत दुरुस्त करून वापरण्यास योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाले. लगेचच महानगरपालिकेकडून रीतसर परवानगी मिळवून इमारत दुरुस्त करण्यात आली. त्यामुळे भेदरलेल्या समाजापुढे एक आदर्श ठेवण्यात आला.
अलीकडेच २२ जुलै रोजी आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत नागरिक मंचच्या पदाधिकाऱ्यांनी ‘शरदचंद्र दर्शन’ या इमारतीचा दाखला देत काही सूचनावजा मागण्या केल्या. मुंबईच्या धर्तीवर ठाणे शहरासाठी तातडीने दुरुस्ती मंडळाची स्थापना करावी, धोकादायक इमारतींना दुरुस्ती करण्याची संधी द्यावी. उपकरप्राप्त इमारतींची ‘इमारत निरीक्षक’मार्फत इमारतीच्या आयुष्यमानाप्रमाणे दरवर्षी पालिकेच्या शहर विकास विभागाकडून पाहणी करण्यात यावी, पालिकेद्वारा जमीनदोस्त केलेल्या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाबाबत कालबद्ध नियम व योजना बनविण्यात यावी आदींचा त्यात समावेश आहे.
असो. भेदरलेल्या आणि विखुरलेल्या या भाडेकरूंना डायबेटीस, ब्लड प्रेशर, गुडघेदुखी या दुर्घर आजारांनी वेढलेले आहे. कारण रेंटल हाऊसिंगमधील गैरसोयींचा त्यांनी धसका घेतला आहे.
-- महेंद्र मोने,
ठाणे येथील जागरुक नागरिक, भाडेकरूंचे प्रतिनिधी
दि. ३ ऑगस्ट २०१७ च्या `लोकसत्ता'मध्ये प्रकाशित लेख
कांहींच न करता समाजसेवेचा आव आणण्याचा एक तमाशा ( समस्त तमाम तमासगीरांची माफी मागून ) म्हणजे या धावण्याच्या स्पर्धा.
राजधानी दिल्लीमधल्या वृक्षाच्छादित रस्त्यांनी नटलेल्या लुटयेन्स झोन मध्ये राहायला फुकट सरकारी घर मिळवणं हे बऱ्याच भारतीय राजकारणी, पत्रकार, चित्रकार, कलाकार वगैरे लोकांचं स्वप्न असतं. नाना खटपटी करून एकदा लुटयेन्स दिल्लीमध्ये घर मिळवलं की हे लोक तिथेच आयत्या बिलावरचे नागोबा होऊन वर्षानुवर्षे ठाण मांडून बसतात. सत्ता बदलली,केंद्रातलं पद गेलं तर स्वतःहून लोकांनी ही घरं खाली करावीत अशी अपेक्षा असते, पण नाममात्र भाड्यात मिळणारी अशी अलिशान घरे सोडणार कोण?
आपण जोवर सबुरीनें घेत आहोत, तोवर दहशतवादी ‘मऊ लागलें म्हणून कोपरानें खणणार’च ! . पण जर त्यांना दिसलें की आपण रिटॅलिएट करायला दृढसंकल्प आहोत, तर तें मोठें डिटरंट ठरेल. अशा वेळी, हा पत्रकार सबुरीनें घ्यायला सांगतो, हेंच अनाकलनीय आहे !
चीनने नुकतेच जगातील दुसर्या क्रमांकाची अर्थसत्ता हे स्थान मिळवले. 2025 पर्यंत चीन अमेरिकेला मागे टाकून पहिल्या क’मांकाची आर्थिक सत्ता होईल असा अंदाज आहे. आर्थिक सामर्थ्यावर लष्करी सामर्थ्य अवलंबून असल्याने महासत्ता बनण्याच्या प्रकि’येत आर्थिक विकास महत्त्वाचा ठरतो. जगात सर्वाधिक लोकसं’या असूनही चीनने हे यश मिळवले आहे. एकवीसावे शतक आपले असल्याचा दावा चीन खरा करेल असे वाटते.
प्रकाशन दिनांक :- 05/12/2004
धर्म ही अफूची गोळी आहे, असे म्हणतात. खरे तर असे जे मानतात त्यांना धर्म काय हेच माहीत नाही असेच म्हणावे लागेल. भारतात आज जवळपास 3000 चे वर जाती/ पोटजाती आहेत आणि बऱ्याचशा सरकार दरबारी सूचित समाविष्ट व्हाव्यात याकरिता ‘वेटिग लिस्ट’मध्ये आहेत.
आजचे युग स्पर्धेचे युग आहे असे नेहमी म्हटले जाते. पण मला ते तितकेसे पटत नाही. स्पर्धा हा काही केवळ आजच्या युगाचाच युगधर्म नाही. तर स्पर्धा हा निसर्गचक्राचाच अविभाज्य घटक आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून स्वतःचे अस्तित्व राखण्याच्या स्पर्धेत अवघी सजीव सृष्टी धडपडताना दिसते. जे या स्पर्धेत यशस्वी झाले ते टिकले आणि मागे पडले ते नामशेष झाले. “सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट” या तत्वातून हीच गोष्ट तर स्पष्ट होते. -डायनॉसोरसारखे अजस्त्र, महाकाय प्राणी नष्ट झाले पण डासांसारखे बचावले कारण अस्तित्व टिकविण्याच्या स्पर्धेत ते यशस्वी झाले. एकाच जागी उभी राहून वाढणारी झाडेसुद्धा अधिकाधिक सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी एकमेकांपेक्षा उंच वाढण्याची स्पर्धा करतात मग अशा सर्वव्यापी स्पर्धेपासून मानवी जीवन मुक्त कसे असेल?
स्पर्धा ही वैश्र्विक चैतन्याचे प्रतिक आहे असे मला वाटते. गुणवत्ता यादीत येण्यासाठी झटणारे विद्यार्थी, वर्ल्डकप मिळवण्यासाठी क्रीडागंणावर झुंजणारे विविध देशाचे क्रिकेटचे संघ, आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या उत्पादनाचा खप वाढावा म्हणून परिश्रम करणारे उद्योजक. चित्रपटसृष्टीतील आपले आघाडीचे स्थान अबाधित रहावे म्हणून धडपडणारे सिनेस्टार्स इतकेच काय ९.५२ च्या लोकलमध्ये विंडोसीट पकडण्यासाठी धावपळ करणारा सामान्य माणूस देखील या चैतन्याचा भाग आहे. जे पुढे जाते ते जीवन आणि पुढे जायचे म्हणजे स्पर्धा आलीच म्हणून तर शिक्षण, राजकारण, कला, क्रीडा, अर्थकारण अशा सर्वच क्षेत्रात स्पर्धा आढळते आणि ती असायलाच हवी. ती जर नसेल तर एक प्रकारचे साचलेपण येउन त्या क्षेत्रावर मरगळ पसरेल.
स्पर्धा म्हणजे चालना. स्पर्धा म्हणजे गती. प्रगती साधण्यासाठी गती अनिवार्य असते. पण ही गोष्ट लक्षात न घेता अनेकजण स्पर्धेचा विनाकारण बाऊ करतात. स्पर्धेमुळे निर्माण होणारी चुरस गतीला पूरक, पोषकच असते. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किमान गुणवत्ता जोपासणे आवश्यकच असते. .आणि स्पर्धेत आघाडी मिळविण्यासाठी कमाल गुणवत्ता राखणे अपरिहार्यच असते. म्हणजे त्या त्या क्षेत्रातील सेवा, उत्पादनाचा दर्जा राखण्यात आपोआपच ढिलाई येते. आणि समाधान होत नसतानाही नाईलाजाने समाज ती सेवा ते उत्पादन स्वीकारतो. पण संधी मिळताच अशा उत्पादनाकडे पाठ फिरवतो. दूरध्वनी सेवेबाबतचा अनुभव याबाबत पुरेसा बोलका आहेच.
इतरांपेक्षा अधिक चांगले असे काही करून दाखविण्याची भावना स्पर्धेमुळे निर्माण होते. ही भावनाच विकासाची वाट दाखवते. काही जणांना असे वाटते की, स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांवर विपरित परिणाम होतो. त्यांची शक्ती स्पर्धेत अनाठायी खर्च होते. विशेषत: मार्कांची संधी - गुणवत्ता यादी - विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी आहे. असा विचार करणाऱ्यांना स्पर्धेचे तत्व उमगलेले नाही असे मला वाटते. स्पर्धा कोणाबरोबर आणि कशासाठी याचे भान जरुर राखायला हवे. प्रत्येक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येऊ शकणार नाही. पण प्रत्येकाने त्यासाठी मन:पूर्वक प्रयत्न केले तर त्याची कामगिरी निश्चितच सुधारेल. धावण्याच्या स्पर्धेत फक्त तीन खेळाडूच पुरस्कार प्राप्त ठरतात म्हणून इतरांनी स्पर्धेत भाग घ्यायचाच नाही किंवा स्पर्धाच भरवायची नाही हा विचारच अपरिपक्व आहे. स्पर्धेचे दडपण आणि त्यातून येणारा ताण काहीवेळा विद्यार्थ्याच्या बाबतीत अनुभवायला मिळतो खरा पण त्याला पालकांचा दुराग्रह, अवाढव्य अपेक्षा असे इतर घटकच जास्त जबाबदार असतात. आपल्या मुलांची शारीरिक, बौद्धिक क्षमता ओळखण्याची कुवत पालकांमध्ये नसेल तर त्याचा दुष्परिणाम मुलांवर निश्चित होतो. पण दोष मात्र स्पर्धेवर ढकलला जातो.
म्हणून आपली स्पर्धा कोणाबरोबर आहे हे ओळखणे जरुरीचे आहे. तुल्यबळ स्पर्धकांमध्येच खरी स्पर्धा रंगत असते. ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्या क्रिकेट संघात स्पर्धा संभवतच नाही कारण दोन्ही संघाच्या गुणवत्तेत अफाट फरक आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाच्या दृष्टीने बांगला देशचा संघ स्पर्धकच नाही. पण बांगला देशच्या संघासाठी मात्र वेगळया अर्थाने स्पर्धा आहे - ऑस्टेलियाविरुद्ध याआधी केलेल्या खेळापेक्षा जास्त चांगला खेळ करून दाखवण्याची स्पर्धा आणि हीच स्पर्धा त्यांच्या खेळांचा दर्जा उंचावयाला मदत करणारी ठरेल. म्हणजे स्पर्धा नेहमी इतरांशीच असते असे नाहीतर कधीकधी ती स्वत:शी देखील असते. आणि अशी स्वत:शी 'असलेली स्पर्धा हीच सर्वोकृष्ट
स्पर्धा असते. इथे तुम्हाला ज्याच्यावर मात करायची त्याची बलस्थाने आणि कमजोर जागा पूर्ण माहीत असतात. त्यामुळे कमजोर जागा नष्ट करून स्पर्धा जिंकण्याची संधी तुम्हाला सहज उपलब्ध असते. या संधीचा जे फायदा घेतात ते आपोआपच इतरांबरोबरच्या स्पर्धेत पुढे येतात.
स्पर्धा मग ती स्वत:शी असो की इतरांशी, त्यात भाग घ्यायचा तो जिंकण्यासाठीच. पण अपेक्षित यश मिळाले नाही तर नाराज, निराश व्हायचे नाही. मिळालेल्या अनुभवातून शहाणे होऊन अधिक जोमाने पुढल्या स्पर्धेची तयारी करायची. यश मिळण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब मात्र कधीच करू नये. स्टिरॉईड घेऊन एखादा धावपटू सुवर्णपदक मिळवू शकेल किंवा पेपर फोडून विद्यार्थी भरघोस मार्क मिळविलही पण हे यश निर्भेळ नसेल. शिवाय जगाला माहीत नसले तरी, त्यांच्या अंतर्मनाला नक्की माहीत असते की तो या यशाला खऱ्या अर्थाने लायक नाही. अशा फसवणूकीमुळे स्पर्धेचा हेतूच नष्ट होतो. गैरव्यवहार फोफावतात आणि खऱ्या गुणवत्ता धारकांवर अन्याय होतो.अशा अपप्रवृत्तीमुळे स्पर्धा बदनाम होते. ह्या अपप्रवृती दूर करून निकोप स्पर्धा जोपासण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. स्पर्धेची भीती न बाळगता, खुल्या दिल्याने आणि अथक परिश्रमांसह स्पर्धेला सामोरे जायला शिका. तुमच्या प्रगतीची गुरुकिल्ली स्पर्धेतच दडलेली आहे. तुमच्या गुणवत्तेला दाद स्पर्धेमुळेच मिळणार आहे तेव्हा स्पर्धेतील, जीवन जगा आणि जीवनाची स्पर्धा जिंका.
-चिंतामणी कारखानीस
तत्त्व पटवून देताना तत्त्वज्ञाने तर्क लढवले नाहीत, तर ते तत्त्वज्ञान रटाळ होतं. तत्त्वज्ञान अंगिकारण्यास लोक तयार होत नाहीत.
चांगली माणसे आजकाल दुर्मळ झाली आहेत, अशी सगळ्यांची तक्रार असते. अर्थात ही तक्रार करताना आपण तेवढे चांगले आहोत, आणि बाकीचे तेवढे नालायक आहेत, हा भाव मनात अंतर्भूत असतो. चांगल्या माणसांच्या दुर्मिळतेची तक्रार करणारे सगळेच जर चांगले असतील तर मग चांगली माणसे दुर्मिळ झाली आहेत, या तक्रारीत अर्थच उरत नाही.
खते, बियाणे, मजूर अशा प्रत्येक बाबतीत शेतकऱ्याला अपंग करणाऱ्या सरकारनेच आता शेतकऱ्यांना आधार देऊन उभे केले पाहिजे, ही सरकारचीच जबाबदारी आहे. ‘मामा’ला पुढे करून सरकार आपल्या जबाबदारीतून पळ काढू शकत नाही. ‘मामा’ पूर्वीही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे; त्याने कधी शेतकऱ्यांचा जीव घेतला नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti