वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
त्वदन्यः शरण्यः प्रपन्नस्य नेति
प्रसीद स्मरन्नेव हन्यास्तु दैन्यम् |
न चेत्ते भवेद्भक्तवात्सल्यहानि - स्ततो
मे दयालो सदा सन्निधेहि ‖ १० ‖
भक्ताच्या आणि भगवंताच्या आगळ्यावेगळ्या नात्याचे विवेचन करताना आचार्यश्री म्हणतात,
त्वदन्यः शरण्यः प्रपन्नस्य नेति - माझ्यासारख्या प्रपन्न अर्थात संसारातील दुःखांनी त्रस्तझाल्यानंतर शरण येणाऱ्यांसाठी सुख,शांती, समाधानाच्या प्राप्तीचे आपल्यासारखे अन्य स्थान नाही.
प्रसीद - त्यामुळे आपल्याला शरण आलेल्या माझ्यावर प्रसन्न व्हा.
स्मरन्नेव हन्यास्तु दैन्यम् - मी आपले स्मरण केले असल्याने माझे दैन्य दूर करा. माझ्या दुःखाचे शमन करा.
येथे आचार्य मधील भक्त भगवंतालाच वेगळ्या अर्थाने वेठीला धरतो. तो भगवंताला म्हणतो तुला हे दुःख दूर करणे भाग आहे. कारण त्यात माझाच नाही तुझा देशील फायदा आहे.
न चेत्ते भवेद्भक्तवात्सल्यहानि:- जर तू असे केले नाही तर तुझ्या 'भक्तवात्सल्य' भावाची हानी होईल. लोक तुला यापुढे भक्तवत्सल म्हणणारच नाहीत. त्यामुळे तुझ्या त्या भक्तवत्सल विशेषणाचा आब राखण्यासाठी का होईना, माझे रक्षण कर कारण मी तुझी भक्ती करीत आहे. त्यामुळे भक्ताचे संरक्षण करणे, त्याचे दुःख निवारण करणे हे जणू काही , हे भगवंता तुझे कर्तव्यच आहे.
ततो मे दयालो सदा सन्निधेहि - त्यामुळे हे दयासिंधू मला कायम आपल्याजवळ ठेव.
कारण हे भगवंता तुझ्या चरण कमला पाशी केवळ आणि केवळ आनंद आहे. तिथे माझे दुःख आपोआपच दूर होईल. त्यामुळे मला संनिध म्हणजे चरणकमलां जवळ स्थान दे.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
क्रिकेट म्हटले की माणूस सगळे काही विसरून जातो. परंतु हे क्रिकेट काल कसे होते आणि आज कसे आहे हे आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सागू शकतो. परंतु एका शहराचे आणि क्रिकेटचे काय नाते आहे ह्यासाठी शोध घेण आवश्यक ठरते.
संस्कृत सुभाषिता मध्ये पण म्हटले आहे की मित्रच नसले तर सुख कुठुन मिळणार ? असे प्रतिपादित करून मैत्रीचे महत्व सांगितले आहे.बालपणात ती नकळत होते.गंमत म्हणजे निस्वार्थ भाव असला तरी, त्या वयात कट्टी/ दोस्ती करून ती तोडतां जोडतां येते. नातगोत एखाद्या केळ्यासारखे असते.तुटले तर जोडता येत नाही पण मैत्री एखाद्या लाडु सारखी असते.
चव समजण्यासाठी जीभ हा एक अतिशय महत्वाचा अवयव आपल्याला त्याने दिलेला आहे. त्याचा यथायोग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे.
चव कळण्यासाठी लाळ पण तेवढीच आवश्यक आहे. जेवढा वेळ अन्न तोंडात घोळले जाईल, तेवढी लाळ चांगली मिसळली जाईल, परिणाम पुढे पचन सुलभ होईल. आपल्या पोटात काय जाणार आहे. हे चवी मार्फत त्याला आधीच कळत असते. "त्याला" फसवून काहीही करू नये. चेक पोस्ट वरून नोंद न करता एकही वाहन जाऊ नये. तसंच काहीसं आपल्या अन्नाचं असतं. ही जीभ आणि लाळ म्हणजे जणु काही सीसीटीव्हीच असतात. आत काय येणार आहे. हे त्याला आधीच समजलेले असते.
यासाठी त्याचे डोळे, कान, बोटे, नाक हे अन्य गुप्तहेर पण काम करत असतातच.
किमान 100 वर्ष जर राज्य करायचे असेल तर, केवळ एकाच यंत्रणेवर पूर्णपणे विसंबून, अवलंबून न राहाता, अन्य पूरक यंत्रणेच्या सर्व शक्तींचा पुरेपुर वापर करून घ्यावा. ही चाणक्यनीती ज्या राजाला कळते, त्याला नमो नमो करावेसे वाटते. (उगाच नाही, निवृत्त आयकर अधिकाऱ्यांना परत बोलावून घेतलेय !!! )
कोणत्या चवीला पचवायला, किती प्रमाणात, कोणते द्राव, पोटात पाहिजे, हे आधीच कळल्याने येणाऱ्या अन्नाच्या स्वागताला ही सर्व यंत्रणा कामाला लागलेली असते.
घास इकडून तिकडून फिरवत बत्तीस वेळा चावावा असे म्हटले जाते.
......" तुमचे प्रत्येकाचे इथे वेगवेगळे काम आहे, तुमची प्रत्येकाची आम्हाला गरज आहे, वुई ऑल लव्ह यु, आम्हाला सोडून जाऊ नका." असे या बत्तीस दातांना, सूचक सांगितले तर जात नसावे.?
वाढलेल्या ताटातील सर्व पदार्थ एकत्र करून मिक्सरमधून फिरवून, आचूषकाच्या ( स्ट्राॅ च्या) सहाय्याने ओढुन थेट घश्याखाली ओतले असते तर कॅलरी वाईज चौरस जेवण पूर्ण झालेच असते ना ! स्ट्राॅ ने कॅलरीज मिळतील, पण तृप्ती मिळणार नाही.
आणि अश्या ( बफेलोचं आंबोण ) पद्धतीने जेवण्याची, कल्पना सुद्धा करवत नाही. इथेच वेगवेगळ्या चवीने जेवण्याचे महत्व लक्षात येते.
त्याने दिलेल्या या सर्व यंत्रणेचा योग्य तो सन्मान आपण राखला पाहिजे. ज्याचे काम त्याच्याकडून करवून घेतले पाहिजे.
इसी मे तो मजा है !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
30.11.2016
माननीय पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बांधकाम क्षेत्रात येणारा काळापैसा रोखण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करणे गरजेचे आहे असे दोन दिवसापूर्वी विधान केले होते. परंतु मुद्रांक शुल्कात कपात केल्याने काळापैसा रोखता येईल म्हणणे धाडसाचे होणार तर नाहीच पण हा पर्यायही होऊ शकत नाही. मुळात काळा पैसा कसा निर्माण होतो ह्याच्या मुळाशी जाऊन त्यावर नियंत्रण व निर्बंध घालण्यासाठी काही उपाय योजना कठोरपणे अमलात आणल्या तरच काळ्या पैशाला रोखता येईल अन्यथा हे स्वप्नवत भासेल.
सीताफळ हे मूळचे वेस्ट इंडिज बेटे व दक्षिण अमेरिकेचे. त्यानंतर ते भारतात आले. सीताफळाचे झाड सहजच कुठेही, माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही करतात. याचे शास्त्रीय नाव Annona squamosa आहे. हे उष्णकटिबंधीय अमेरिकेच्या आणि वेस्ट इंडीजच्या काही भागांमधे आढळणारे. खरे तर याचे नांव शीतफळ. नंतर त्याचा अपभ्रंश शिताफळ व मग सीताफळ असा झाला.
इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात होऊन गेलेला हिप्पार्कस हा, ग्रीक राजवटीच्या काळातील एक आघाडीचा खगोलज्ञ होता. हिप्पार्कसनं चंद्र-सूर्याच्या, आकाशाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या भ्रमणाचं गणित अचूकरीत्या मांडलं. पृथ्वीचा अक्ष हा स्थिर नसून तो अंतराळात भोवऱ्यासारखा फिरत असल्याचा शोध हिप्पार्कसनंच लावला.
सचिन पिळगांवकर यांचा चित्रपट म्हणजे सर्वार्थाने वेगळा असतोच, आणि प्रेक्षकांची दाद सुद्धा त्यामुळेच मिळत रहाते हे त्यांनी दिग्दर्शित, निर्मिती केलेल्या चित्रपटांतून लक्षात येतं. नेमकं हेच वैशिष्ट्य हा चित्रपट पहाताना लक्षात येईल.
दिवाळीच्या मंगलमयी पहाटेला अभ्यंग स्नान करतात हे सर्वश्रुत आहे. परंतु आज हा अभ्यंगाचा विधी घरोघरी अक्षरक्षः उरकला जातो. अंगभर तेल लावून घेण्याची ना कुणाला आवड असते ना सवड. त्यामुळे रुढीच्या नावाखाली डोक्यावर तेलाची दोन बोटे टेकवली, अंगाला उटणे चोपडले अन् वरुन फसफस एखादा सुगंधित साबण घासला की झाले दिवाळी चे अभ्यंग स्नान.
खरे तर प्रत्येकाने स्वास्थ टिकविणे ही आज काळाची गरज आहे. आपले सगळे सण वार त्याला जोडुन असणारे रिवाज, सणांना करण्याचे पदार्थ यांची स्वास्थ रक्षणासाठीच रचना केली गेली आहे. परंतु आज ते सर्व नितीनियम गाठोड्यात बांधुन वरच्या माळ्यावर टाकले गेले आहेत. नेमके त्यांच्या पाठीमागचे आरोग्यशास्त्र आपल्याला समजत नाही.
वास्तवीक हे अभ्यंग स्नान केवळ दिवाळीच्या पहिल्या दिवशी करुन थांबायचे नसते, तर त्या दिवसापासून पुढे वर्षभर करायचे असते. दिवाळीला शास्त्र शुध्द पध्दतीने बनविलेले तेल कुण्या प्रेमाच्या व्यक्ती कडुन सर्व अंगाला लावुन नंतर शुध्द वनौषधीच्या चुर्णाचे ऊटणे वापरुन मग गरम गरम पाण्याने आंघोळ करण्याचे स्वर्ग सुख काही अवर्णनीयच असते. तेजोमय दिवाळित भेटलेले हेच विसाव्याचे क्षण , आपुलकीचे क्षण, पुढे वर्षभर धकाधुकीयुक्त जीवनाला स्नेहाचा-प्रेमाचा आधार देतात. प्रत्येक नात्यातला आपलेपणा - आपुलकी पणा टिकवितात.
दिवाळी म्हणजे मुक्त हस्ताने तेजाची उधळण करणारा सण. दिवाळीत असते दिव्याच्या पंक्तीचे तेज, दारात लटकणारया आकाशदिव्याचे तेज, अंगणात मांडलेल्या रांगोळीचे तेज, श्रीलक्ष्मीच्या आराधनेमुळे आलेल्या मांगल्याचे तेज. एकंदरीत दिवाळी हा सण तेजाची लयलुट करणारा आहे, जीवनास तेजोमय बनविणारा आहे.
सर्व शरीराला कोमट केलेले तिळाचे तेल लावून ते जिरे पर्यंत मर्दन करणे किंवा अंग चोळणे या प्रक्रियेला खरे तर अभ्यंग म्हणतात. असा हा अभ्यंग किंवा आजचा प्रचलित शब्द मसाज सगळ्यांनीच घ्यायला हवा. त्यातही वात प्रकृती असणारयांनी आवर्जुन घ्यायला हवा. आजच्या जीवन शैली च्या दृष्टिकोनातून विचार केल्यास अत्याधिक प्रवास करणारयांनी, रात्री कामानिमित्त जागरण करणारयांनी, कामाचा अतिरिक्त ताण असणारयांनी, बौध्दिक शारिरिक परिश्रम करणारयांनी, आरोग्य टिकविण्यासाठी नित्य प्रतिदिन अभ्यंग करावे.
सर्व साधारण ३० ते ४० मिनीटे संपुर्ण मसाज व्हायला हवा. तेल खालून वर चोळून लावावे म्हणजे जिरते. हृदयाच्या दिशेने मालिश करावी. कोपर, गुडघे, मनगट हे सांधे गोल चोळावेत. पाठ, पोट व छाती यावर अभ्यंग करताना मध्य रेषेत दोन्ही हात ठेवून, दोन बाजूला पंखाप्रमाणे चोळावे. अभ्यंग विषेशतः सकाळी आंघोळ आणि व्यायाम करण्यापुर्वी करावा. अभ्यंगा नंतर शरीरास उटणे चोळुन आंघोळ केल्याने शरीरात वाढलेला अतिरिक्त मेद कमी होऊन शरीर दृढ बनते, त्वचेचा टोन सुधारतो, त्वचेचा रंग उजळतो, त्वचेवरील लव कमी होते. उटणे म्हणजे साफ करणाऱ्या, पोषण करणाऱ्या व सुगंधी वनौषधींचे वस्त्रगाळ चूर्ण. उटण्यामुळे अभ्यंगासाठी लावलेल्या तेलाचा ओशटपणा निघून जातो. आंघोळीच्या वेळेस साबणाऐवजी ते दुधात किंवा पाण्यात कालवून त्वचेला चोळून लावावे. साबणातील फेसामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल व आर्द्रताही निघून जाते, तर उटण्यामुळे ती राखली जाते.
शरीरात ज्या ठिकाणी वात हा दोष कार्यरत असतो त्या ठिकाणी तैलादी द्र्व्ये ही वात नाशनाचे काम करतात. वाताचे रुक्ष व खरता हे दोन गुण स्नेहाच्या मार्दवता व स्निग्धता या उलट असल्याने वातविकाराचे शमन होते, त्वचेच्या ठिकाणी स्पर्शानुभव होत असल्याने वाताची रुक्षता नियमित अभ्यंग करणारया लोकांमध्ये नश्ट होऊन वात रोगाची उत्पत्ती टाळली जाते. आयुर्वेदानुसार आठ वेळा तुप खाण्यापेक्शा एकदा तैलाभ्यंग करुन घेणे सरस ठरते. नियमित व तात्रिक दॄष्ट्या योग्य प्रकारे तैलाभ्यंगाने सर्व अंगप्रत्यंग पुष्ट व बलवान होतात. दृष्टि तेजोमय होते व मन समाधानी होऊन निद्रा सुखकर होते.
अभ्यंग म्हणजे वास्तवता शरीरातील वेगवेगळ्या स्नायुंना दिला गेलेला विशिष्ट प्रकारचा व्यायाम होय. या क्रियेमुळे स्नायुंना गती, चालना मिळुन ते अबाधित रित्या काम करु लागतात. अभ्यंगामुळे रक्तवाहिन्या व रक्तात घर्शन क्रियेने उष्णतेची निर्मीती होते. परीणामी रक्ताधीन असलेले विजातीय द्रव्ये तसेच त्वचेखालील अतिरिक्त फॅट वेगवेगळे होऊन विविध मार्गाने शरीराबाहेर फेकले जातात. परीणामी शरीरातील सर्वात महत्वाचा घटक रक्त शुध्द होऊन शरीराची कांती निखळून येते. शरीरात असणारया वेदना, सुज या तैलाभ्यंगाने नष्ट होऊन अस्थी सांध्यांना पुष्टता व दृढता प्राप्त होते. तसेच मणुष्य देखील शक्ती संपन्न होऊन दिर्घायुष्य प्राप्त करतो. नियमितपणे अभ्यंग केल्यास म्हातारपण उशिरा येते. स्नायूंमधील कडकपणा कमी होतो आणि अंग हलके होते. त्वचेवर सुरकुत्या पडणे, केस गळणे यांसारखे विकार होत नाहीत.
अशाप्रकारे शरीराचा लवचिकपणा तसेच कांती थोडक्यात संपुर्ण आरोग्यच जर अभ्यंगा सारख्या सहज सोप्या उपायाने मिळत असेल तर प्रत्येकाने त्याचा अवश्य लाभ घ्यावयासच हवा.
करावे नित्यदिन सर्वांगास अभ्यंग
प्रफुल्लीत मन उत्साही सर्वांग
तारूण्य टिकेल आयुष्य भर
न दुखणार गुडघा अन् कंबर
तेजोमय दिवाळी, सुवर्ण मयी काया
हिच खरी अभ्यंगाची किमया.......
अभ्यंगासाठी तिळाचे तेल सर्वात चांगले आयुर्वेदिक औषधी दुकानामध्ये गंगा कंपनीचे वनौषधींबरोबर प्रक्रिया केलेले तिळाचे तेल मिळते किंवा डाबर कंपनीचे भारीचे धान्वंतर तेल मिळते ते तेल आपण अभ्यंगासाठी वापरु शकतो. त्वचेच्या आरोग्यासाठी अशी ही अभ्यंग चिकित्सा. अगदी दररोज शक्य नसल्यास आठवड्यातून एकदा तरी करावी.
काही शंका असेल तर ०९३२६५११६८१ या व्हॉट्सएप वर मॅसेज करा( कृपया फोन करु नका..इतर मॅसेज पाठवु नका.)
-- डॉ.कविता पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
पद्मा नगर, उदय पेट्रोल पंपामागे, बार्शी रोड, लातूर
फोन ०२३८२ २२१३६४ , ०९३२६५११६८१
-- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन
श्रावण सुरु होतोय,पाठोपाठ गणपती,नवरात्र,दिवाळी अशी सणांची रांगच लागते. या सगळ्यात महत्वाचा असतो तो ‘नैवेद्य’.. फक्त देवाला दाखवायला लागतो म्हणून असतो का हा ‘नैवेद्य?’.. नाही,खरतरं या ‘नैवेद्य’ करण्यामागे अनेक गोष्टींची योजना आपल्या परंपरेत आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti