वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
August 24, 2018
आंबेहळद ही प्रत्येक घरात असतेच. ही अनेक गुणांनी युक्त असते. आंबेहळद काहीशी हळदीसारखी असली तरी थोडी उग्र असते.
September 15, 2017
भगवान श्री उमामहेश्वरांच्या या दिव्य स्तुतीची समापना करताना आचार्य श्री फलश्रुती स्वरूपात म्हणतात..
October 1, 2020
पुण्याच्या एका नामांकित कंपनीत (BSNL) सोनल कामावर होती. खूप हुशार आणि मेहनती मुलगी. वयाच्या बाविसाव्या वर्षी वडिलांचे छत्र हरविले होते. त्यामुळे आईनेच सांभाळ केला. सोबत एक लहान बहीण सुद्धा आहे. सोनल शांत आणि सुस्वभावी होती. तीन वर्षांपूर्वी तिचे लग्न झालेले. तिचा संसार सुखाचा चालू होता.
September 13, 2023
संपूर्ण जगाला स्तन्यपानाचे महत्व सर्वप्रथम सांगितले ते आयुर्वेदाने आणि पर्यायाने हिंदुस्थानाने. आज त्याच देशात #BreastfeedIndia असा ट्रेंड ट्विटरवर सुरु आहे.
August 2, 2016
December 28, 2016
अपेंडिक्सची शस्त्रक्रिया ही नेहमी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांपैकी एक महत्त्वाची शस्त्रक्रिया आहे. आतड्यातील अपेंडिक्स नावाच्या छोट्या शेपटीला सूज आल्यामुळे, पोटात तीव्र दुखणे सुरू झाल्यास शस्त्रक्रिया करून ही शेपटी काढून टाकावी लागते. असे दुखणे होऊन; पण त्याचे योग्य निदान न झाल्याने किंवा भीतीपोटी काही वेळा ही शस्त्रक्रिया वेळेवर केली गेली नाही, तर रुग्णाचा जीव धोक्यानत येतो. जेथे लहान आतडे संपून मोठे आतडे सुरू होते तेथे शेपटीसारखा बाहेर आलेला आतड्याचाच एक भाग मोठ्या आतडीच्या सुरवातीला असतो. त्यालाच अपेंडिक्स अथवा आंत्रपुच्छ म्हणतात. याची लांबी एक ते पाच इंच असू शकते, तसेच हा अवयव जन्मत:च आपल्या पोटात असतो. मात्र माणसाची पूर्ण वाढ झाल्यावर अपेंडिक्सची वाढ होत नाही. हा अवयव उदर-पोकळीत उजवीकडे खाली असतो. अपेंडिक्सला सूज येणे यालाच अपेंडिसायटीस असे म्हणतात व ही सूज नक्कीड कशामुळे येते हे अजूनही समजलेले नाही, त्यामुळे या विकाराचा त्रास न होण्याकरिता काही काळजी घेऊनही हा आजार टाळता येत नाही. जंतुसंसर्गामुळे संपूर्ण आंत्रपुच्छाला सौम्य सूज येऊ शकते. मात्र ती फार झपाट्याने वाढत नाही व बऱ्याच वेळा औषधोपचारांनी कमी होऊ शकते, तसेच वारंवार सौम्य सूज येऊ शकते. यात आंत्रपुच्छ फुटण्याचा धोका तसा कमी असतो, तसेच वरचेवर अपेंडिक्सचे ऍटॅक येऊ शकतात. भूक न लागणे, कधीतरी पोटात दुखणे, पचनक्रिया नीट न होणे, यालाच अपेंडिक्समुळे होणारे अपचन म्हणतात.
अपेंडिक्सची लक्षणे, उपचार आणि शस्त्रक्रिया
1) अचानक पोटात दुखणे, दुखण्याची तीव्रता हळूहळू वाढत जाणे किंवा अनेकांना उलट्या होतात, तसेच भूक न लागणे, अपचन, अन्न खावेसे न वाटणे, मळमळणे, ताप येणे ही या आजाराची लक्षणे होत.
2) सुरवातीला आलेला थोडा ताप, इलाज न केल्यामुळे गुंतागुंत होऊन वाढू शकतो. साधारणपणे पोटाच्या उजव्या खालच्या भागात दाब दिल्यास वेदना होतात व तो भाग कधीकधी कडक होतो. अशा वेळी पोट अजिबात चोळू नये किंवा जुलाबाचे औषध अजिबात घेऊ नये.
3) रोगनिदानासाठी रक्तय तपासणी (पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढले का बघण्यासाठी) तसेच मूत्र तपासणी - जंतुबाधा किंवा मूतखडा नसल्याची खात्री करण्यासाठी शौच तपासणी - आतड्यास जंतुबाधा झाली आहे का हे पाहण्यासाठी; तसेच पोटाची सोनोग्राफी करावी. जास्त सुजलेले अपेंडिक्स असल्यास किंवा त्या-भोवती पू जमा झाला असल्यास व पोटदुखीची इतर कारणे समजण्यास किंवा पोटाची दुर्बिणीतून तपासणी करून 100 टक्के निदान होऊ शकते.
4) उपचारामध्ये काही वेळा तात्पुरता औषधोपचार केला जातो. यात प्रतिजैविके, सूज व वेदना कमी होणारी औषधे, शिरेतून ग्लुकोज - सलाईन देणे आदी इलाज केले जातात. मात्र शस्त्रक्रिया हाच सर्वमान्य व सर्वोत्तम उपाय आहे. कारण शस्त्रक्रिया जितकी लांबणीवर टाकावी तेवढे गुंतागुंतीचे प्रमाण वाढू शकते, तसेच अपेंडिक्स भोवती आतडी चिकटणे व त्याचा गोळा तयार होणे, आंत्रपुच्छ फुटणे, त्याभोवती गळू तयार होणे किंवा पू पोटात सर्वत्र पसरणे आदी गोष्टी होऊ शकतात.
अपेंडिक्स ची शस्त्रक्रिया कशी करतात व त्यानंतर काय काळजी अपेक्षित आहे.
अपेंडिक्सची शस्त्रक्रिया दोन पद्धतीने करता येते
1) पोट उघडून वा 2) दुर्बिणीच्या साहाय्याने.
पोट उघडून शस्त्रक्रिया करताना पोटाच्या उजव्या बाजूला खालच्या भागावर 2 ते 3 इंचाचा तिरका किंवा आडवा छेद घेऊन सुजलेले आंत्रपुच्छ काढले जाते. ही शस्त्रक्रिया अर्धा ते एक तास चालते. इतर गुंतागुंत असल्यास जास्त वेळ लागू शकतो. ही शस्त्रक्रिया पूर्ण भूल देऊन अथवा फक्ते कंबरेखालील भागाला बधीर करून केली जाते. नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे दुर्बिणीच्या साहाय्याने अपेंडिक्स काढता येतो, यामध्ये पोटावर तीन ठिकाणी लहान छेद घेतात व त्यातून दुर्बिण व शस्त्रक्रियेकरिता लागणारी उपकरणे पोटाच्या पोकळीत घालून शस्त्रक्रिया करतात व त्यातूनच अपेंडिक्स बाहेर काढले जाते. सहसा पूर्ण भूल देऊन ही शस्त्रक्रिया करतात. दुर्बिणीतून केलेल्या शस्त्रक्रियेनंतर दुखण्याचे प्रमाण कमी असते व रुग्ण लवकर बरा होतो. अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण 2-3 दिवसांत घरी जाऊ शकतो, तसेच त्यानंतर डॉक्टंरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती व औषधोपचार अत्यंत गरजेचे आहेत; तसेच एकदा काढलेले अपेंडिक्स पुन्हा कधीही वाढत नाही व अन्नपचनावर कायमचा कोणताही परिणाम संभवत नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.सकाळ / डॉ. नितीन उनकुले
January 5, 2017
संपुर्ण रामायण वाचताना आपणास रामायणातील विविध व्यक्ती अगदी सुग्रीव, वाली, अंगद, नल,नील ही वानरसेना ईतकेच काय समुद्रावर सेतू बांधताना मदत करणारी खारोटी, जटायू पक्षी या प्रत्येकाला महत्व दिल्याचे दिसून येते. मात्र रामायण वाचताना कोठेच लक्ष्मण पत्नी ऊर्मिला या व्यक्तीला फारसे महत्व दल्याचे आढळत नाही.त्यामुळे ती कोणाच्याही लक्षात रहात नाही.
September 1, 2018
काही राजकीय पक्ष व नेते दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी रात्री १२ वाजता सुप्रिम कोर्टाचा दरवाजा ठोठतात. आज अनेक सैनिकांविरुद्ध खोटे-नाटे खटले कोर्टात चालू आहेत. पण देशातील राजकीय पक्षांचे हुशार वकील त्यांना मदत करण्यास का पुढे येत नाहीत? सैन्यावर होणार्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी, सैन्याची बदनामी करणारे व्हिडिओ पसरवणार्यांवर कारवाई होण्यासाठी राजकीय पक्ष एकत्र का येत नाहीत?
February 27, 2019
लेखक : शैलेश सो. महाजन (आम्ही साहित्यिक ग्रुप) : दर वर्षी भाद्रपद चतुर्थीला आपण गणपती आणतो. आणि म्हणतो “घरोघरी गणपती आले.” किंवा “आमच्या घरी गणपती आला.” किंवा “आमच्या घरी गणपती असतो.” नक्की काय आहे हे?
September 3, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti