(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बाप्पांचे आलय : पद्मालय

    सर्वव्यापी, सर्वसाक्षी परमेश्‍वराचे वास्तव्य तसे चराचराच्या रोमारोमात आहेच. परंतु भक्तांच्या प्रेमळ आग्रहामुळे त्या जगत्पित्याला देवालयांमध्ये मुर्ती रूपात राहून भक्तांना दर्शनाचा लाभ करून द्यावा लागतो असेच सहस्त्रार्जुन व शेषनाग या दोन परमभक्तांच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्रीगणेश अवतरले ते देवालय जळगाव जिल्हयातील एंरडोल तालुक्यात “ पद्मालय” नावाच्या एक छोट्याश्या गावात आहे. हा परिसर दंड कारण्याचाच एक भाग आहे असे म्हटले जाते. श्री गणेशाच्या साडेतीन शक्तीपिठांपैकी पद्मालय हे अर्ध शक्तीपीठ आहे.या देवालयात मुख्य गाभार्‍यात श्री गणेशाच्या दोन स्वयंभू मुर्ती आहेत. त्यापैकी एक मुर्ती उजव्या सोंडीची व एक डाव्या सोंडेची आहे. एकाच मंदिरात अशा दोन मुर्ती असणारे हे एकमेव स्थान आहे. या मुर्ती काशी व महड येथील श्री गणेशमुर्तींच्या प्रतिकृती आहेत.

    गाभार्‍यातील या दोन गणेशमुर्ती व्यतिरिक्‍त सभामंडपात चार ही बाजूना बाहेरील दिशेस तोंड असलेल्या चार गणेशमुर्ती आहेत. तसेच देवालय परिसरात छोटे मोठे असे एकंदरीत 21 गणपती आहेत. त्यामुळे हे क्षेत्र प्रवाळ क्षेत्र ही म्हटले जाते. या मुर्ती काळ्या पाषाणाच्या आहेत. सन 1885 मध्ये श्री गोविंदशास्त्री बर्वे यांनी या मंदिराचा जिर्णोद‍्धार केला. श्री. धोंडू लक्ष्मण कोळी यांनी वास्तुनिर्माणाचे कार्य केले आहे.

    मंदिराच्या भवताली एक मोठ्ठा तलाव आहे. पूर्वी या तलावात पवाड धातू मोठ्या प्रमाणात मिळत होता म्हणून तेव्हा या तलावास पवाड तळे असे म्हणत. नंतर या तलावात कमळांची उत्पत्ती खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागली. कधी तर संपूर्ण जलाशय कमळाच्या फुलांनी गच्च भरले असते. इतके की तलावातील पाणी देखील दिसत नाही.

    महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात व बाप्पाला आपले गार्‍हाणे सांगतात. देवालयात आपल्या ऐपतीप्रमाणे लहान मोठ्या घंटा बांधतात. भाविक श्री गणेशाला नवस करतात व त्यांचा नवस पूर्ण झाला की मंदिरात घंटा बांधतात.

    या देवालयाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की येथे विवाह करावयाचा असल्यास मुहुर्त बघावा लागत नाही.वर्षातील 365 दिवसांत कधीही आणि कुठल्याही वेळेत येथे विवाह करू शकतात.
    पद्मालयापासून काही अंतरावर भीमकुंड आहे. पांडव अज्ञातवासात असतांना ते एक चक्रानगरीत ( आजचे एरंडोल ) वास्तव्यास होते. तेथील बकासुर या राक्षसाचा वध महाबली भीमाने याच ठिकाणी केला अशी अख्यायिका आहे. या जागी भीमाने यथेच्छ भोजन केले व नंतर कोपरखळीने हे तळे निर्माण केले. या तळ्याला आजही पाणी आहे. पद्मालयाला येणारे भाविक या ठिकाणीही आवर्जुन भेट देतात.

    जळगाव शहरापासून साधारण दिड तासात पद्मालय येथे जाता येते. बसेस व खाजगी वाहने उपलब्ध आहेत. एका दिवसाची एक संस्मरणीय सहल होते.

    सौ. मीनल कुलकर्णी
    7249822096

      January 3, 2017


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग बत्तीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक सात

    निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच - भाग सात !

    जमिन एकच. पाणी एकच. मातीतून मिळणारे पोषण एकाच प्रकारचे. पण एकाच वेळी कारले, जांभूळ, चिंच, आंबा, मिरची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बीया रूजत घातल्या, तरी तयार होणारे झाड वेगळेच होते. फक्त बी वेगळी असली की, झाडांचे रूप रंग सगळंच बदलून जातं. यालाच निसर्ग म्हणतात.

    एकाच मातीच्या गोळ्यात या सर्व बीया एकत्र करून ( सीड बॅक करून ) जरी जमिनीत पुरल्या तरी त्या बीयांना आवश्यक ते सर्व पोषण त्याच जमिनीतून घेतले जाते. आणि या बियांतून निर्माण होणाऱ्या प्रत्येक झाडाला गोड आंबट तिखट तुरट फळे लागतात. यालाच निसर्ग म्हणतात.

    तसंच प्रकृतीचं आहे. एकाच आई वडीलांच्या जीन्समधून जन्माला आलेल्या बहिण भावंडांच्या प्रकृती वेगवेगळ्या असतात, विचार वेगळे असतात. पचनशक्ती वेगळी असते, ताकद, प्रतिकारशक्ती सगळंच वेगळं असतं. यालाच निसर्ग म्हणतात.

    प्रकृती म्हणजेच निसर्ग !
    सगळा निसर्ग, अख्खं ब्रह्मांड नाही समजलं तरी चालेल. आपली प्रकृती ओळखता आली तरी पुरेसं आहे. कारण आपली प्रकृती हे विश्वाच छोटंस रूप आहे. या प्रकृतीलाच निसर्ग म्हणतात.

    बीयापासून झाड बनायला प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागतो. प्रत्येक झाडावर कळी यायचा वेळ वेगळा असतो. कळीचं रूपांतर फुलात आणि पुढे फळात व्हायला काळ जावा लागतो. या काळालाच निसर्ग म्हणतात.

    रोगाची सुरवातीला काही लक्षणे निर्माण होतात. या लक्षणांना योग्य वेळी ओळखता आले पाहिजे. नाही तर ती लक्षणे पुढे रोगात रूपांतरीत होतात. ही लक्षणे निसर्ग आपणाला सांगत असतो. निसर्गाशी एकरूप होता आलं, की ही लक्षणे आपणाला सहजपणे कळतात. या जाणीवेला निसर्ग म्हणतात.

    ही जाणीव प्रत्येकाला जन्मापासूनच असते. किंबहुना जन्मापूर्वीपासूनच असते. म्हणून तर जन्माला आल्यावर लगेचच दूध ओढून आत गिळायचे असते, हे बाळाला न शिकवता कळत असते. हे शिकवणाऱ्याला निसर्ग म्हणतात.

    हे सर्व शिकवणारा निसर्ग हा सर्वात मोठा गुरू आहे. शिकण्यासाठी आवश्यक असतील ते सर्व गुण, प्रत्येक शिष्याने योग्य प्रकारे आत्मसात केले की, कोणाही शिष्याला ज्ञानप्राप्तीला वेळ लागत नाही.
    कारण,
    शिकवणारा गुरू सर्वांना एकाच पद्धतीने शिकवत असतो. कारण निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    12.05.2017

      May 12, 2017


  • लढा सीमेचा – लढा अस्मितेचा !! (भाग ८)

    सीमाभागातील मराठी माणूस महाराष्ट्रात जाण्यासाठी लोकशाही मार्गाने लढत होता. कर्नाटकी पोलिसांच्या लठ्या-काठ्या झेलत होता. छातीची ढाल करून अंगावर वार घेत होता. कर्नाटकी अत्याचारांना समर्थपणे तोंड देत होता. मराठा तुटेल, मोडेल पण वाकणार नाही याची पुन्हा, पुन्हा प्रचिती येत होती.

      September 26, 2021


  • अतिरेक्यांच्या धमक्या व ‘ब्रेकिंग इंडिया’ चे भाकीत

    अल् कायदा भारतात दहशतवादी कारवायांच्या मदतीने इस्लामिक राज्य उभे करण्याच्या तयारीत आहे, याची कल्पना ‘ब्रेकिंग इंडिया’ या पुस्तकाचे लेखक राजीव मल्होत्रा यांनी शेकडो पुराव्यानिशी ४ वर्षांपूर्वीच दिली होती. देशात जेहादी दहशतवादी, माओवादी यांनी परस्परांना मदत करून आपल्याला योग्य अशी भूमी वाटून घेतली आहे, असे त्यांनी पुस्तकात नमूद केले होते.

      October 6, 2014


  • ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग ८ – पानझडी जंगलातील फुलांच्या ज्योती – पांगारा वृक्ष

    हा वृक्ष रक्त मंदार; हि. फराद, पांगारी, दादप, मंदार; गु. बांगारो; क. हळीवन, हालिवाळ; सं. मंदार, रक्तपुष्पा, पारिजात, परिभ्रदा; इं. इंडियन कोरल ट्री, इंडियन कोरल बीन, मोची वुड; लॅ. एरिथ्रिना इंडिका, नावांनी ओळखला जातो. हा सुंदर वृक्ष सु. १८ मी. उंच, काटेरी, पानझडी, शिबांवंत (शेंगा येणारा), मध्यम आकारमानाचा व जलद वाढणारा असून समुद्रकिनाऱ्यावरील जंगलात निसर्गतः आढळतो.

    तसेच रस्त्यांच्या दुतर्फा वा बागेत, शोभेकरिता किंवा शेतांच्या कुंपणाकडेने लावलेलाही आढळतो. जावा, ब्रह्मदेश, अंदमान व निकोबार बेटे, पाकिस्तान व भारत इ. प्रदेशांत त्याचा प्रसार विशेषतः पानझडी जंगलांत भरपूर आहे. या वृक्षांची साल गुळगुळीत, पातळ करडी किंवा पिवळट असून पातळ ढलप्यांनी सोलून जाते. लहान फांद्यांवर तीन-चार वर्षे टिकून राहणारे, काळपट, शंकूसारखे काटे येतात. पाने संयुक्त त्रिदली, एकाआड एक, पातळ व झडणारी असून प्रत्येक दल १०-१५ सेंमी. लांब व तितकेच रुंद असते. फेब्रुवारी ते एप्रिल या काळात सु. ५-७ सेंमी. लांब, पतंगरूप, लाल पोवळ्यासारखी (त्यावरून इंग्रजी नाव व लॅटिन वंशनाव ही पाडली आहेत), मोठी, बिनवासाची फुले सु. १०-३० सेंमी. लांब मंजऱ्यांवर फांद्यांच्या टोकास येतात. फुलात भरपूर मध असल्याने अनेक पक्षी व भुंगे व फुलपाखरे त्याभोवती सदैव गर्दी करतात व परागण (पराग एका फुलातून दुसऱ्या नेणे) घडवून आणतात. फुलांची सर्वसाधारण संरचना अगस्त्याच्या किंवा गोकर्णाच्या; गोकर्ण फुलाप्रमाणे अथवा लेग्युमिनोजी कुलातील पॅपिलिऑनेटी उपकुलात वर्णिल्या प्रमाणे असते. संवर्त टोकाशी पंचदंती, महाछदासारखा लालसर परंतु प्रदले (पाकळ्या) तळापर्यंत चिरलेला, गर्द लाल, ५-७ सेंमी. लांब आणि केसरदले दहा व लाल असतात. शिबा (शेंगा) १३-३० सेंमी. लांब गोलसर, गाठाळ, काळी असून मे-जुलैमध्ये पक्व होते; त्यात सु. ६-८ पिंगट किंवा गर्द लाल, आयताकृती गुळगुळीत बिया असतात. पिकलेल्या शेंगा काळ्या पडतात नी त्यात तपकिरी बैंगणी तांबडट रंगाच्या बिया पिकून तयार होतात. पण या बिया विषारी असतात.

    पांगारा वसंत क्रतुत जंगला मद्धे फुलतो तेंव्हा जणू कांही ज्वालाच फुलल्या आहेत असा भास होतो. त्यामुळे याला फ्लेम ऑफ फॉरेस्ट असेही म्हणतात.नवीन लागवड बिया किंवा कलमे (१.८ मी. x ७.५ सेंमी.) लावून करतात.
    महाराष्ट्रात हा वृक्ष कोकण किनारपट्टीवर भरपूर प्रमाणात आढळतो. तसेच पश्चिम घाटात मलबार पर्यंत ही तो दिसतो. दौंड जिह्यात लेकीचे झाड या प्रकपाखाली याची मुद्दाम लागवड केली आहे.

    मूळचा हा वृक्ष भारतीय आहे फुलांच्या रंगांनुसार पांगाऱ्याचे तीन प्रकार आढळतात. लाल, शेंदरी आणि पांढरा. त्यांपैकी पांढरी फुले येणारा पांगारा हा दुर्मिळ असून लाल फुले येणारा पांगारा सर्वत्र आढळून येतो. या वंशातील सुमारे ८ जाती मूळच्या भारतातील असून सु. १० जाती आयात केलेल्या आढळतात.

    ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. यास नाजुक, सुन्दर लाल फुले येतात. पांगारा पर्णसंभार असल्यावर हिरवी शाल पांघरल्यागत वाटणारा हा वृक्ष आपल्या हिशेबी जरी हा फारसा महत्त्वाचा नसला तरी त्याच्या सर्व अंगोपांगाच्या उपयुक्ततेचा विचार केला तर याचे महत्त्व पटते. पर्णसंभार नसताना येणारी लाल सॅटीनसारखी फुले मिरवणारा उघडा-बोडका पांगारा एखाद्या उघड्या अंगाच्या, कपाळावर लाल मळवट भरलेल्या पोतराजासारखा वाटतो. ही लाल फुले फुलपाखरे, पक्षी यांना आपल्याकडील मधामुळे आकर्षून घेतात आणि या पोतराजाचा खेळ पाहायला आपणही नकळत क्षणभर त्याच्या सन्निध थांबतोच थांबतो. आपल्याकडे पांगारा जंगलात खडकातला, शहरातील बागेमध्ये, शेताच्या कुपणाला लावतात. चहाच्या मळ्याला सावलीसाठी लावलेला असतो. या वृक्षाचा प्रसार पश्चिम द्वीपकल्प भागातील कोकण व उत्तर कारवार येथील पानझडी व मिश्र जंगलात विशेषकरून आहे. पांगाऱ्याचा प्रवास तसा निसर्गातच होतो. पक्षी भुंगे फुलातील मध घेताना परागीकरण करतात. त्यातून धरलेल्या शेंगांमधील बी पडूनही रोपे होतात. पांगारा फांद्या लावूनही जगतो. पांगारा याच्यावर एकही पान नसताना लाल मनमोहक फुलांनी बहरतो. याच्या फुलांना गंध नसला तरी आपल्या मनाला त्याचा रंग मोहिनी घालतो. फेब्रुवारी ते एप्रिल या काळात पांगाऱ्याला फुले येतात. फुलांचा लाल रंग आणि मखमली वाटणाऱ्या पाकळ्या कुणालाही आपल्याकडे पाहायला लावतात. अंगावर जरी काटे असली तरी या ५०-६० फुट उंच वृक्षाच्या पानाच्या हिरवाईने त्याचा फुलाच्या लाल रंगाने आसमंत रसरसून उठतो. पांगाऱ्याला फार महत्त्वाचे स्थान आहे.
    हे भारतीय झाड देशात बहुतांश राज्यांमध्ये आढळतं. मात्र लक्षणीय गोष्ट अशी की, समुद्रालगत असलेल्या जंगलांमध्ये याची वाढ जोमाने होते. जर या झाडाला नीट बघितलं तर लक्षात येईल की हे झाड प्रचंड वृक्ष या सदरात मोडत नाही. साधारण मध्यम उंचीचा होणारा पांगारा ६० ते ७० फ़ुटापर्यंत वाढतो. पानझडी सदरात मोडणारा पांगारा दणकट समजला जातो. सुरुवातीस लहान वाटणारं पांगारा, झपाझप वाढतो. पांगाऱ्याच्या खोडावर, झाड लहान असताना अणुकुचीदार काटे असतात. जसजसं झाडं मोठं होत जातं, तसतसे हे काटे नाहीसे होत जातात. बाल्यावस्थेतल्या झाडाचं पशुंपासून संरक्षण होण्यासाठी निसर्गाने केलेली ही सोय असते. हे काटे काळ्या वाघ नखांसारखे असतात व पांगाऱ्याच्या मऊ काळपट हिरवट सालीच्या खोडाचं रक्षण करतात.

    पानगळ होत असतानाच जानेवारीत झाडाच्या निष्पर्ण डहाळ्यांवर भडक शेंदरी फ़ुलं यायला सुरुवात होते. डहाळीच्या अगदी टोकावर कळ्यांचा आणि फ़ुलांचा गुच्छ येतो. हे भडक फ़ुलं पाच पाकळ्यांच असतं नी यातली एकच पाकळी मोठी असते. या भडक रंगाच्या फ़ुलांमुळे पांगारा सुशिभिकरणाचा वृक्ष म्हणुन ओळखला जातो. आपल्याला हा भडक पांगारा माहित आहे पण पांगाऱ्याच्या फ़ुलांना सुगंध अजिबात नसतो. पण त्यात तयार होणाऱ्या मधाकडे अनेक पक्षी आणि किडे आकर्षित होतात.

    उपयोग:

    पांगाऱ्याच्या सालीचा लेप व्रण, सूज व सांधेदुखी यांवर लावतात. साल पित्तरोधक आणि कृमिनाशक आहे. ताज्या पानांचा रस कानदुखी तसेच दातदुखी यांवर वापरतात. कोकणात ताज्या पानांचा रस कृमिनाशक म्हणून वापरतात. लाल पांगाऱ्याच्या पाकळ्यांपासून लाल रंग, तर शेंदरी पांगाऱ्याच्या पाकळ्यांपासून शेंदरी रंग मिळवितात. या वृक्षाचे लाकूड हलके व टिकाऊ असल्यामुळे त्याचा उपयोग खेळणी, हलक्या वस्तू (उदा., फळ्या, खोकी, तक्ते, आगकाड्या, पळ्या, चाळणीच्या चौकटी इ.) बनविण्याकरिता करतात. चहाच्या किंवा कॉफीच्या मळ्यांत आणि बागांमध्ये सावलीसाठी तसेच मिरवेल, नागवेल, द्राक्षवेल इ. वेलींना आधार देण्यासाठी मुद्दाम पांगारा वृक्षाची लागवड करतात.

    विहीर बांधताना विहिराच्या पायाच्या घोळभागाला पांगाऱ्याची फळी वर्तुळाकार बसवतात. सालीतील धाग्यापासून दोर बनवतात. अशा पद्धतीने पांगारा हा अत्यंत महत्त्वाचा वृक्ष आहे. पांगारा हा उष्ण अग्निदीपक व कफ–कृमी-मेद नाशक आहे.

    त्यांच्यापासून हिरवे खतही बनवितात. मुळे, साल व बिया यांपासून कीटकनाशके तयार करतात. काहींची खोड आणि मुळे चेचून मासे गुंगविण्याकरिता वापरतात. ‘हाई तुंग पी’ हे चिनी द्रव्य सर्व जातींच्या सुक्या सालीपासून मिळते; ते स्टॅफिलोकॉकस ऑरियसया सूक्ष्म जंतूविरुद्ध जंतु-वृद्धिरोधक म्हणून उपयुक्त आहे.

    मिरवेल, नागवेल, द्राक्षवेल व जाईजुई इत्यादींवा आधार देण्यास आणि चहा व कॉफीच्या मळ्यांत सावलीकरिता ही झाडे लावतात. पाने सारक (पोट साफ ठेवणारी), मूलत्र (लघवी साफ करणारी), कृमिघ्न (जंत वगैरे मारणारी), सांसर्गिक रोगातील सांधेदुखीवर व गाठीवर पाने बाहेरून लावतात. कानदुखीवर व दातदुखीवर पानांचा ताजा रस गुणकारी असून जखमांतील किडे मारण्यासही उपयुक्त असतो. साल ज्वरनाशक, पित्तनाशक, कृमिघ्न असते; नेत्रदाहात (डोळ्यांची जळजळ होण्यावर) तिचे अंजन घालतात. कच्च्या बिया विषारी असतात; परंतु उकळून व भाजून खातात. लाकूड पांढरे, हलके व टिकाऊ असल्याने पालखीचे दांडे, नक्षीकाम, फळ्या, खेळणी, पेट्या, नौका-बांधणी, तराफे, पडाव इत्यादींसाठी उपयुक्त असते. पोहावयास शिकताना याचे लाकूड वापरतात. साल कातडी कमाविण्यास व रंगविण्यास आणि त्यातील धागे दोऱ्याकरिता वापरतात. फुलांपासून लाल रंग काढतात. हा वृक्ष सुमारे २ मी. उंच वाढल्यापासून फुले येऊ लागतात. याच्या लागवडीमुळे जमीन सुपीक होते. गावाकडे या लाकडाचा मुख्य वापर जळणासाठी करतात.

    पांगाऱ्याची मुळं फ़ार खोल जात नाहीत पण जमिनीचा कस सुधारण्यासाठी हे झाड काम करतं. याची केशमुळे हवेतला नत्र वायु शोषुन जमिनीत पुरवतात. समुद्रसपाटीवरच्या गावांमध्ये रस्त्याच्या सुशोभिकरणासाठी, दागिन्यांच्या आधारात या पांगिऱ्याच्या लाकडाचा वापर करतात. गोव्याकडे पांगिऱ्याच्या कोवळ्या पानांची आमटी केली जाते. याच्या फ़ुलांच्या पाकळ्या उकळून नैसर्गिक लाल रंग केला जातो. पांगारा लावायलाही सोप्पा असतो. ह्याची रोपं बियांमधून येतात. बाळ रोपं कुठेही चटकन रुजतात. रोपं मिळाली नाही तर याच्या फ़ांद्यांमधुन फुटवे येतात. त्यातूनही नवीन झाडं तयार होतात. शोभेसाठी हे झाड अत्युत्तम.

    औषधी उपयोग:
    १. ह्याची पाने साल व फुलांचा उपयोग आयुर्वेदामद्धे केला जातो.
    २. पानांचा उपयोग भूक वाढविण्या करता व मूत्ररोगावर केला जातो.
    ३. गाठ व सांध्याच्या समस्यात सुद्धा याचा उपयोग होतो.
    ४. सालीचा उपयोग यकृताच्या रोगामद्धे व डोळ्याच्या औषधात करतात.
    ५. फुलांचा उपयोग पित्तदोष व कानांच्या समस्यांत होतो.
    ६. आदिवासी लोक ह्याच्या पानाच्या रसात कपडा भिजवून त्याचा शेक सांध्यांना देतात.
    ७. लिंबाच्या रसात ह्याच्या बियांचे चूर्ण एक आठवडा जखमेवर लावतात.
    ८. कोकणात ताज्या पानांचा रस कृमिनाशक म्हणून वापरतात
    ९. आर्तवजनक (विटाळ सुरू करणारी) आणि दुग्धवर्धक असतात.

    मराठी साहित्यातील पांगारा:

    पांगारा म्हणजे बोलायचे काम नाही! एकदा फुलला की, बहराशिवाय झाडावर काही नसते. फुललेल्या पळसाला काही पाने लगडलेली दिसतात. पांगारा आणि काटेसावर यांच्या बाबतीत बहर म्हणजे बहर! पण काटेसावरीपेक्षा पांगाऱ्याचा बहर जास्त गडद असतो. पांगारा म्हणजे केवळ लाल रंगाची एक अपूर्व दंगल असते. लाल रंगात चमकदार भगवा मिसळला की, जी मजा येईल ती या फुलांवर पसरलेली असते.

    उतरत्या उन्हात पांगारा जणू चमकतो आहे असे वाटते. आपण तळवा पसरला आणि त्यावर जर लाल-भगव्या रंगाच्या ज्योती उमलून आल्या, तर जसे दिसेल तशी पांगाऱ्याची फुले दिसतात! एका रांगेत पाच-पाच फुले. तपकिरी, सोनेरी आणि लाल रंगाच्या कळ्यांमधून ती उमलून येतात. फुलांइतकीच या फुलांची बाह्यदले सुंदर असतात. पण, ती बघणाऱ्याच्या पटकन लक्षात येत नाहीत, कारण फुलांच्या ज्योती म्हणजे सौंदर्याची एक दंगल असते, आणि हे बाह्यदलांचे सौंदर्य अतिशय शालीन आणि मृदू असते. तपकिरी, सोनेरी आणि लाल छटा असलेली ही बाह्यदले एखाद्या सुंदर निरंजनासारखी असतात आणि त्यातून या लाल भगव्या ज्योती उमलून आलेल्या असतात.

    पाच फुलांची एक रांग उमलून आली की, पुढच्या कळ्यांची रांग वर येऊ लागते. आधीची फुले पक्व होऊन गळून पडतात आणि त्यांना नाजूक गवारीसारख्या शेंगा लागतात. तोपर्यंत पुढची रांग रसरसून उठते. एकूण रचना फुलांची वेणी करतात तशी असते. अर्धचंद्राकार. एकूण लाल तेज बघता अर्धसूर्याकार म्हणावे लागेल.

    पांगाऱ्याच्या फुलण्याला ‘फुलणे’ हा शब्द कितीही सुंदर असला तरी जरा सौम्य ठरेल. पांगाऱ्याची आतषबाजी असते. संध्याकाळचे सोनेरी ऊन पांगाऱ्याच्या तपकिरी आणि पांढूर फांद्यांवर पडलेले असते. संपूर्ण झाडाला एक सोनेरी छटा आलेली असते. सोनेरी झाड आपल्या सर्वांगावर चमकदार ज्योतींचे तुरे लेवून उभे असते. डोळ्याचे पारणे फिटेल अशी ही आतषबाजी असते.

    रेनर मारिया रिल्केने लिहिले आहे -

    सगळेच फुलते आहे भन्नाट बेपर्वाईने, फुलांवर सजवले गेले असते आवाज जर रंगांऐवजी, तर रात्रीच्या हृदयातून ऐकू आला असता बेफाम कोलाहल!

    रात्री उडणारी फुलांच्या उमलण्याची धांदल ही कविता वाचली की, डोळ्यासमोर येते. रिल्के हा थोर कवी आहे तो त्याच्या या दृष्टीमुळेच!

    किती लगबगीने लाल रंग भगव्या रंगात मिसळला जात असेल. त्यावर अद्भुत चमक कशी जाऊन बसत असेल. स्टेजवर एंट्री घेण्याच्या वेळी एखाद्या सुंदर आणि सेन्सिटिव्ह नटीची धांदल उडते, ती या वेळी माझ्या डोळ्यासमोर येते. तिचे ते ग्रीन रूममधील मेकअप करणे, तिची ते वेशभूषा सावरणे, तिचे ते संवाद आठवणे, तिचे ते आपली एंट्री येण्याची वाट पाहणे. हा सर्व गोंधळ सुरू राहतो आणि मग एंट्रीची वेळ आली की, सगळी धांदल सावरून ती स्टेजवर अवतरते. सगळ्यांना बेभान करते ती आपल्या रूपाने, ‘ग्रेस’ कवीने लिहले आहे.

    रिल्के वाचला की वाटते- सूर्य उगवला की पांगाऱ्याच्या कळ्या रात्रीची सौंदर्यरचनेची धांदल बाजूला ठेवून अशाच अवतरत असतील विश्वाच्या या स्टेजवर लाल-भगव्या चमकदार ग्रेसने उत्फुल्ल होऊन! पांगाऱ्याच्या या सगळ्या आतषबाजीच्या मागील धांदल-नाट्य समजून घ्यायला रिल्केच पाहिजे. येरागबाळ्याचे काम नाही हे! संध्याकाळी पक्षी किलबिलाट करत असतात. नटीच्या अभिनयाला जशी संगीताची पार्श्वभूमी असावी लागते, तशी पांगाऱ्याच्या या आतषबाजीला पक्ष्यांच्या किलबिलाटाची पार्श्वभूमी असावी लागते. आतषबाज पांगरा, सोनेरी ऊन आणि किलबिलाट करणारे पक्षी... संपूर्ण टेकडी आनंदून गेलेली असते. का नाही घेणार?

    यौवन, वसंत आणि सौंदर्य एक आदिम त्रिकुट आहे! पांगाऱ्याची फुले कित्येकांना एखाद्या सुंदर स्त्रीच्या ओठांसारखी दिसतात. योगी अरविंद यांच्या ‘नाईट बाय द सी’ या कवितेतल्या ओळी अशा वेळी आठवतात. पुढे मोठे योगी झालेले श्री अरविंद, फुले, यौवन, स्त्रीत्व, वसंत आणि प्रेम यांना किती सहजपणे एकत्र आणतात हे बघण्यासारखे आहे!

    या फुलांच्या मनमुराद सोहळ्यात, या मुग्ध समयी,
    प्रेमाच्या उगवत्या सूर्यप्रकाशात लाजून चूर होतात मुली;
    ज्यांच्या गालांवर चमकत राहते लज्जेची लाली,
    ज्यांचे ओठ आहेत लाल माणकांसारखे आणि
    ज्यांच्या ओठात भरून राहिला आहे काठोकाठ.
    मध वसंताच्या यौवनाचा.

    या सौंदर्याच्या सानिध्यात राहिले की, मन प्रसन्न होते, शांत होते. अशा वेळी जाणवते की, आपण शहरात राहून कशा कशाला मुकलो आहे. सौंदर्य नसेल तर आयुष्यात बाकी म्हणून फार कमी उरते. उरते ते बेगडी स्थैर्य आणि त्यातून येणारे बेगडी समाधान!यौवन, वसंत आणि प्रेम हे सर्व गोड वादळे तयार करतात. ही वादळांची नशा काढून टाकली आणि सौंदर्याकडे एक तत्त्व म्हणून पाहिले तर सौंदर्य आपल्याला नशेकडून शांततेकडे नेते.

    सौंदर्याचे, फुलांचे, माणसाचे आणि पृथ्वीचे नाते जॉन कीट्सने त्याच्या ‘एन्डिमियन’ या कवितेत फार सुंदर सांगितलेले आहे -
    ‘A thing of beauty is a joy for ever:

    उन्हातान्हात पोळून आणि तावून सुलाखून निघालेला पळस एखाद्या संसारात पोळलेल्या संतासारखा वाटतो. कारण शिशिराने या झाडांची झाडाझडती घेतलेली असते. त्यामुळे पिकली पाने त्याला सोडून जातात व अश्रू ओघळावे तशी पानगळ सुरू होते. पळसाच्या पानसंभाराला अवकळा येते आणि पळस जणू काय जगापासून निवृत्त होतो.

    हिवाळयात घुसमटलेली झाडे उन्हाळयाची चाहूल लागताच मोकळा श्वास घेतात आणि मग तो श्वास लाल, गुलाबी, हिरव्या पालवीच्या रूपाने बाहेर येतो. या हिरव्यागार श्वासामुळे झाडे ताजी व टवटवीत होतात. त्यांच्यामधून एक प्रकारचा जिवंतपणा सळसळत असतो. अशा झाडांपैकी आपल्याच पानांच्या टाळ मृदंगाच्या तालात दंग असतो. तो सालस पळस! उन्हातान्हात पोळून आणि तावून सुलाखून निघालेला पळस एखाद्या संसारात पोळलेल्या संतासारखा वाटतो. पळसाच्या पानसंभाराला अवकळा येते आणि पळस जणू काय जगापासून निवृत्त होतो.

    असा निष्पर्ण वृक्ष संसार त्यागाची तयारी करत असतानाच त्याच्या हिरवट काळया कळया लोंबतात व त्या कळयातून आपला विचार बदलून पळस हळूहळू पालवीबरोबर भगव्या रंगाच्या कळया नि फुले जेव्हा धारण करतो त्यावेळी हा सालस पळस जणू काय खांद्यावर भगव्या पताका घेऊन कुठे तरी वारीला निघालेला वाटतो.

    कोकणात जसे वा-याने झपाटलेले माड सागरकिनारी आपले हिरवे रुमाल डोक्याला बांधत जणू काय मक्केस निघाल्यासारखे ओळीने सागर किना-यावर उभे असतात तसाच हा पळस आपल्या फुलांच्या भगव्या पताका घेऊन पंढरीस निघाल्यासारखा वाटतो.

    नाशिकच्या आदिवासी किंवा खंडाळयाच्या पळस दरीत हा भगवाधारी आपल्याला दर्शन देतो. आदिवासी पोरं ही पळस फुलांचा रंग तयार करून होळीला रंग खेळतात. काही तर भाजीसाठी या फुलांचा वापर करतात. पण यावेळी पळसावरील कावळे मात्र पोट भरून फुलांचा रस अमृतासारखा पित असतात. कोण म्हणतो कावळे घाणच खातात?

    उन्हाळयात झाडे गरम झाली की त्यांची डोकी भडकतात. अशाच झाडांपैकी पांगारा हे झाड फारच भडक आहे. हे पांगारकर वसंत ऋतूची चाहूल लागताच गरम होऊ लागतात, त्यामुळे हिवाळयात यांना पालवी फुटत नाही तर लाल फुलंच फुटतात. उन्हाळयात तर पांगारकराचे डोके भडकते आणि त्यांच्या फांद्यातून लालभडक ज्वाळा निघाव्यात अशी लालभडक फुले उमटतात. त्यामुळे हिवाळयात शिशिर ऋतूत हातापायावर आलेले काटे उन्हाळयातही बोचत असतात. त्यामुळे त्याच्या जवळ पब्लिक जरा कमीच येतात. पण पांगारकर जेव्हा लालभडक निशाणे खांद्यावर घेऊन काटेरी थाटात उभे राहतात तेव्हा रानात आता क्रांती जवळ आली, असे वाटते.

    फुले इतकी लालभडक असतात जणू पांगारकर ज्वाळेसारखा धगधगीत श्वास घेतात. हे जरी खरे असले तरी त्यांची फुलं तेवढीच रसपूर्ण व गोड असतात आणि येथेही कावळे, इतर पक्षी त्यांच्यावर ताव मारतात. पण या पांगारकरांना कसला वंशाचा विधिनिषेध नसतो.

    गंधाच्या बाबतीत हा अरसिक असतो इतर क्रांतिकारका सारख्याच पण नुसते लाल झेंडे खांद्यावर घेऊन क्रांती होत नाही. त्यासाठी माणूस अंतरबाह्य बदलायला हवा. नुसता पांगारकरासारखे नुसते लालभडक झेंडे (फुलांचे) घेऊन उपयोगी नाही. पांगारा वसंत ऋतूत फुलला तरी त्यांच्या अंगावर काटे येतात. हे काटे रोमांचाचे नसतात तर ते क्रांतीचे भाले असतात. म्हणूनच म्हणतात,

    पांगारा फुलला
    लाल लाल बावटा
    परि क्रांतीचा काटा
    देहावरी!

    म्हणूनच पांगाऱ्याला भारतीय पोष्टाच्या तिकिटावर मान मिळाला आहे.

    -- डॉ. दिलीप कुलकर्णी.

    संदर्भ:
    १. मराठी विकिपीडिया
    २. श्रीनिवास जोशी Tue, 13 April 2021
    ३. मिलिंद हळबे यांचे विविध लेख.

    ४. श्रीकांत इंगळहळीकर यांचे विविध लेख.

    ५. April 24, 2016 01:30:36 AM dainik prahar

    ६. गुगल वरील अनेक लेख

      August 31, 2022


  • टाटाचे कराचीहून मुंबईला पहीले हवाई मेल विमान उड्डाण

    १५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटांच्या विमानाने कराचीहून मुंबईला पहीले हवाई मेल उड्डाण केले.

    एअर इंडियाची स्थापना १९३२ मध्ये टाटा एअर सर्व्हिसेस या नावाने झाली होती, भारतीय व्यावसायिक जे आर डी टाटा यांनी ही विमान सेवा सुरू केली होती. एप्रिल १९३२ मध्ये टाटा यांनी इंपिरियल एअरवेज साठी मेल घेऊन जाण्याचा करार मिळवला. यानंतर टाटा सन्सने दोन सिंगल इंजिन विमानांसह आपला हवाई वाहतूक विभाग तयार केला.

    १५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटाने कराचीहून मुंबईला पहीले हवाई मेल विमान उड्डाण केले. हे विमान मद्रासला गेले, ज्याचे पायलट रॉयल फोर्सचे माजी पायलट Neville Vincent यांनी केले, जे टाटाचे मित्रही होते. सुरुवातीला कंपनीने साप्ताहिक हवाई मेल सेवा चालवली, जी कराची आणि मद्रास दरम्यान आणि अहमदाबाद आणि मुंबई मार्गे चालवली. पुढील वर्षात विमान कंपनीने २,६०,००० किलोमीटर उड्डाण केले. यामध्ये पहिल्या वर्षी १५५ प्रवाशांनी प्रवास केला आणि ९.७२ टन मेल आणि ६०,००० रुपयांचा नफा मिळवला.

    टाटा एअर सर्व्हिसेसने मुंबईहून त्रिवेंद्रमला सहा आसनी माईल मर्लिनसह आपले पहिले घरगुती उड्डाण सुरू केले. १९३८ मध्ये त्याचे नाव बदलून टाटा एअरलाईन्स असे करण्यात आले. १९३८ मध्ये कोलंबो आणि दिल्ली जोडले गेले. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान एअरलाईनने रॉयल एअर फोर्सला त्यांच्या सैन्याच्या हालचाली, पुरवठा वाहून नेणे, निर्वासितांची सुटका करणे आणि विमानांची देखभाल करण्यास मदत केली.

    भारत सरकारने १९५३ मध्ये एअर कॉर्पोरेशन कायदा पास करून आणि टाटा सन्सकडून विमान कंपनीची मालकी खरेदी केली.कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड करण्यात आले. जे आर डी टाटा १९७७ पर्यंत अध्यक्ष म्हणून राहिले.

    २१ फेब्रुवारी १९६० रोजी एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेडने ताफ्यात आपले पहिले बोईंग 707-420 समाविष्ट केले. या विमान कंपनीने १४ मे १९६० रोजी मुंबई न्यूयॉर्क सेवा सुरू केली. ८ जून १९६२ मध्ये एअरलाईनचे नाव अधिकृतपणे एअर इंडिया असे बदलण्यात आले. २००० मध्ये एअर इंडियाने चीनच्या शांघायला सेवा सुरू केली.

    २३ मे २००१ रोजी नागरी उड्डयन मंत्रालयाने कंपनीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक मायकेल मास्करेन्हास यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स २००७ मध्ये एअर इंडिया लिमिटेडमध्ये विलीन झाली. नुकतीच एअर इंडिया परत टाटांच्या कडे आली आहे.

      October 15, 2021


  • श्री भ्रमरांबाष्टकम् – १

    चाञ्चल्यारुणलोचनाञ्चितकृपाचन्द्रार्कचूडामणिंचारुस्मेरमुखां चराचरजगत्संरक्षणीं तत्पदाम्।
    चञ्चच्चम्पकनासिकाग्रविलसन्मुक्तामणीरञ्जितां
    श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।१।।

    श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या अकराव्या अध्यायात आई जगदंबेच्या विविध अवतारांचे वर्णन आले आहे. त्यात अरुण नावाच्या राक्षसाचा विनाशासाठी जगदंबेने घेतलेल्या भ्रमरांबा अवतारांचे वर्णन आहे.

    त्याला मारण्यासाठी आईने आपल्या शरीरातून अनेक भ्रमर अर्थात भुंगे निर्माण केले. त्यामुळे तिला हे नाव पडले.

    दक्षिण भारतात श्रीशैल पर्वतावर असणाऱ्या या स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,

    चाञ्चल्यारुणलोचना- भिरभिरणार्‍या लाल डोळ्यांनी युक्त असणारी. डोळ्यांची हालचाल हे सौंदर्याचे प्रतीक आहे तर त्यांचा लाल रंग प्रेमाचे. चितकृपा- अशा नेत्राने कृपा करणारी.

    चन्द्रार्कचूडामणिं- चंद्र आणि सूर्य यांना चुडामणी अर्थात मस्तकावर धारण करणारी. अर्थात तिच्या मस्तकावरील दागिने सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि चंद्राप्रमाणे आल्हाददायक आहेत.

    चारु- सौंदर्यपूर्ण

    स्मेर- किंचित दात दिसणारे सुंदर हास्य.

    मुखां- ज्यांनी युक्त मुख असणारी. चराचरजगत्संरक्षणीं- चर अर्थात हालचाल करणारे आणि अचर अर्थात स्थिर अशा सर्व जगाची संरक्षण कर्ती .

    तत्पदाम्- तत्वमसि महावाक्यात तत् हे पद ईश्वरासाठी वापरले जाते. तशी ईश्वरी स्वरूप असलेली.

    चञ्चल- लोलका प्रमाणे हलत असलेल्या,

    चम्पकनासिका- चाफेकळी प्रमाणे असणारी नासिका.

    अग्रविलसन्मुक्तामणी- त्यांच्या अग्रभागी शोभून दिसणाऱ्या मोत्याच्या मण्याने,

    रञ्जितां- विलसत असलेली.

    श्रीशैलस्थलवासिनीं- श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या, भगवतीं श्रीमातरं- देवी श्री भ्रमराम्बेला भावये- मी ध्यातो. मी अखंड तिचे ध्यान करतो.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      April 3, 2020


  • आदरणीय पारनाईक सर….

    आदरणीय पारनाईक सर….

    खरे तर आमच्या मो. ह. विद्यालयाची तुम्ही शान होता. अहो सगळेच शिक्षकाची नोकरी करतात आणि नोकरी करता करता फालतू राजकारणात गुंतून रहातात तसे तुम्ही केले नाहीत हे महत्वाचे तुम्ही शिक्षक होतात ‘ शिक्षक राजकारणी ‘ नव्हता हे महत्वाचे. कारण शिक्षक म्हटले की त्या छोट्या का होईना विश्वात राजकारण नावाची कीड घुसतेच , आता सगळीकडे घुसते , काळच बदलला आहे .

      July 14, 2020


  • “प्रिय अमुचा ‘एक’ महाराष्ट्र देश हा”

    महाराष्ट्र राज्य निर्मितीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा व अभिनंदन. स्वतंत्र महाराष्ट्र निर्मितीसाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्यांचे स्मरण आपल्या प्रत्येकाला दर वर्षी १मे रोजी होते. परंतू सध्याचे राज्यकर्ते हुतात्म्यांचे बलिदान सार्थकी ठरवून आणि स्मरून साजेशी वागणूक महाराष्ट्रातील जनतेला देतात का ? त्यांच्या प्रश्नांची उकल करतात का ? त्यांच्या प्रश्नांना खरोखरच न्याय मिळतो का ? जर याचे उत्तर ‘होय’ असेल तर हुतात्म्यांच्या आत्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. पण उत्तर ‘नाही’ असेल तर परिस्थिती नक्कीच राजकारणी व जनतेला आत्मचिंतन करणे जरूरीचे ठरेल.

      July 5, 2011


  • “इको व्हिलेज”

    सोमवार, ३० ऑगस्ट, २०१०महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्याकरिता शासनाने ग्रामोत्थानाचा त्रिसूत्री कार्यक्रम राबविण्याचे ठरविले आहे. या योजनेला 'इको व्हिलेज' नाव दिले असून १० हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असणार्‍या ग्रामपंचायतींना प्रत्येकी

    ३६ लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.'इको व्हिलेज' योजनेंतर्गत गावांमध्ये उच्चप्रतीच्या भौतिक व मूलभूत सुविधा तसेच दर्जेदार सामाजिक मूलभूत सोई आणि मूल्यवर्धित स्थनिक रोजगार-स्वयंरोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. • योजना राबविताना ग्रामपंचायतींनाच योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे. • सुरुवातीला तीन वर्षात मिळणारा निधी कामगिरीच्या सातत्यानुसार उपलब्ध करुन दिला जाईल. • राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांची ही संकल्पना असून योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ते राज्यभर दौरेही करीत आहेत. • १० हजारापेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी ३० लाख रुपये (दरवर्षी दहा लाख) दिले जातील. • यापैकी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी असणार्‍या ग्रामपंचायतींना प्रत्येकी ३६ लाख रुपयांचा निधी देण्याचे शासनाने ठरविले आहे. <शासनाकडून लोकसंख्येच्या प्रमाणात ग्रामपंचायतींना देण्यात येणारा निधी पुढीलप्रमाणे -सनाने ठरविले आहे. • १ हजार ते २ हजारापर्यंत लोकसंख्येसाठी ९ लाख (दरवर्षी ३ लाख) रुपयांचा निधी देण्याचे शासनाने ठरविले आहे.• १ हजारापर्यंत लोकसंख्या असणार्‍या ग्रामपंचायतीकरिता प्रत्येकी ६ लाख (दरवर्षी २ लाख) रुपयांचा निधी देण्याचे शासनाने ठरविले आहे. <प्राप्त होणार्‍या निधीतून ग्रामपंचायतींना करता येणारी कामे घनकचर्‍याचे शास्त्रीय व वाणिज्य व्यवस्थापन, • गावातील सांडपाण्याचे शास्त्रीय व पर्यावरण प्रवण व्यवस्थापन, • जलनि:सारण गटारी, • रस्त्यावरील सौर पथदिवे,• सार्वजनिक इमारतीत सौर ऊर्जा वापर, • सौर रस्त्यावरील सौर ऊर्जेव्दारे जल व्यवस्था, • दहन भूमी बांधकाम व त्यासाठी आवश्यक इतर सोईसुविधा पुरविणे,• स्मृती उद्यान, • ग्रामपंचासतीअंतर्गत गावे व वाडयांना जोडणारे लहान रस्ते व बांधकाम,• पांधण रस्त्यांचे बळकटीकरण करणे, • वृक्षारोपण, उद्याने • बसथांबे बांधणे • आणि मुख्यत्वे राजीव गांधी भारत निर्माण ग्राम सुविधा केंद्रामार्फत ६०.४० प्रमाण राखून लागणारा अतिरिक्त निधी आणणे. • पर्यावरणाला संतुलित राखून गावाचा विकास करणे तसेच रोजगार व स्वयंरोजगार गावकर्‍यांना उपलब्ध करुन देण्याचा उद्देश या योजनेमागे आहे.• ५० मॉयक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॉस्टिकच्या पिशव्यांवर कायम बंदीचे सातत्य राखण्यावर आणि वृक्षारोपण करुन वृक्ष जगण्यावर विशेषत: भर योजनेच्या माध्यमातून दिला जाणार आहे. • योजनेच्या अंतलबजावणीसाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि राज्यस्तरावर समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे.• ग्रामपंचायतींनी या योजनेत सहभागी होण्यासाठी निकषांची पूर्तता केल्यानंतर आपला प्रस्ताव संबंधित गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर क तील.• त्यानंतर समितीकडून ग्रामपंचायतीने निश्चित केलेले निकष पाळले काय याची जिल्हा परिषद मतदार संघनिहाय समित्या करुन तपासणी करण्यात येईल.• निकष पूर्ण करणारे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेकडे गट विकास अधिकारी पाठवतील. • प्रत्येक पंचायत समिती क्षेत्रात, शक्यतो १०००० लोकसंख्येच्या वरील ग्रामपंचायत आणि तालुका मुख्यालयी अशी ग्रामपंचायत असल्यास तिला प्राधान्य देऊन, अशी ग्रामपंचायत आदर्श पर्यावरण संतुलित समृध्दी ग्राम म्हणून विकसित करण्यासाठी निवडण्यात येईल.• अशा ग्रामपंचायतीची जबाबदारी, विशेष अधिकारी, शासकीय प्राधिकरण, सेवाभावी संस्था, सामाजिक जबाबदारी घेणारे प्रगतशील उद्योजक, लोकप्रतिनिधी हे घेतील.• ग्रामदत्तक उपअभियान स्वरुपात अशा ग्रामपंचायतीना कृतीशील मार्गदर्शन करुन ती ग्रामपंचायत इतर ग्रामपंचायतीकरीता ज्ञानवर्धन केंद्र म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात येईल.• या योजनेच्या अंमलबजावणीत जी गावे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतील व ज्यातून विज्ञान, तंत्रज्ञान व्यवस्थापकीय व लोकसहभागीय अशा आदर्शकृती इतर गावांना पर्यावरण संतुलित ग्राम विकासाकरिता प्रत्यक्ष राबविण्यास प्रमाणभूत व सहाय्यभूत ठरतील त्यांचे संकलन करण्यात येईल.• अशा गावांसाठी प्रोत्साहनपर व गौरवपर पारितोषिक योजना राबविण्यात येईल.• आदर्श कृतीची माहिती होण्यासाठी अभियानातील यशस्वी गावांना इतर ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी यांच्या आदानप्रदान भेटी आयोजित करण्यात येतील. -- बातमीदार

      August 30, 2010