वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
माझ्या व्यवस्थापकीय जीवनातील अजून एक अनुभव. एके दिवशी माझ्या विभागातील एक अधिकारी, निलयशी गप्पा मारत असताना त्याने मला एक फार इंटरेस्टिंग आणि मस्त प्रश्न विचारला. असा प्रश्न बहुतेक व्यवस्थापकांना कधीनाकधी पडतोच. तो प्रश्न असा “कनिष्ट अधिकाऱ्यांना बहुतेक वेळा एखादी गोष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांना पटवून द्यायला फार त्रास का होतो? त्यांच्या मते तर त्यांचा विचार सरळ सोपा आणि बहुतेक वेळा कंपनीच्या दृष्टीने अतीशय महत्वाचा असतो. तरी सुद्धा त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना एकतर हवे तसे यश येत नाही किंवा ते प्रयत्न पूर्णपणे दुर्लक्षित केले जातात. हा अनुभव खूप वेळा खरोखरच हताश करणारा असतो.”
गेल्या ५० वर्षात, वेळोवेळी अनेक सूक्ष्म आणि लघू उद्योजकांच्या सहवासातून जी एक जाणीव प्रकर्षाने निर्माण झाली त्याबद्दलचे हे विचार.
सातत्याने वाजणाऱ्या फोनच्या घंटीमुळे मी जरा त्रासिक पणे जागा झालो. घड्याळाकडे बघितले तर रात्रीचे दोन वाजले होते. जगदीशचा फोन होता हे स्क्रीन वरील नाव आणि चेहेरा बघून समजले. एवढ्या अवेळी फोन आला की नाही म्हंटले तरी पोटात थोडे धस्स होतेच. डोळे चोळत मी विचारले, “कायरे जग्या, तुला झोप येत नाही का? अरे ज्यांना येते त्यांना तरी शांत झोपू दे ना.”
थोड्या विलंबानंतर गंभीर स्वरात आवाज आला, “अरे शर्माची बातमी समजली का?”
“का, काय झाले ? काल संध्याकाळी तो बडोद्याला परत जायच्या आधी तर त्याच्याशी बोललो ”
“अरे, आत्ताच त्याच्या सहकाऱ्याचा फोन आला होता. हायवे वर त्याची मोटार एका ट्रकला धडकून एका क्षणात सर्व काही संपले आहे. तुझे त्याच्याशी घनिष्ट संबंध होते म्हणून एवढ्या अपरात्री कळवतो आहे.”
एका क्षणात खाडकन पूर्ण जागा झालो. शर्माशी माझा संबंध गेल्या सहा महिन्यांचा. डोळ्यासमोर एखाद्या चित्रफीतीप्रमाणे आमच्या भेटी तरळू लागल्या. चाळीशीतला शर्मा एक अत्यंत हुशार आणि कर्तबगार उद्योजक होता. त्याने अक्षरशः शून्यातून जवळपास तीस कोटींचा धंदा उभा केला होता.
“आज आसपास पाहता असे आढळून येते की बहुतांश लोक कुठल्याना कुठल्या तणावामुळे त्रस्त आहेत. या सततच्या तणावामुळे नाना प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक व्याधींचा प्रादुर्भाव वाढत आहे. अर्थात प्रत्येक जण आपापल्या परीने उपाय शोधीत असतो. काही वेळा हे उपाय व्यवहार्य वाटत नाहीत म्हणून सोडून दिले जातात. मी सुद्धा या अनुभवातून गेलो आहे. बरीच वर्षे असा त्रास मी पण सहन केला.
माझ्या सुदैवाने काही चांगली ज्ञानी माणसे मला भेटली. काही चांगले साहित्य वाचनात आले. मग मी “परिपूर्ण आणि तणावमुक्त जीवनासाठी” काय करावे लागेल याचा शोध सुरु केला. मी निश्चय केला की असाच मार्ग शोधायचा की नवीन तणाव न निर्माण होता, जो पूर्णपणे व्यवहार्य असेल. जो माझ्यासारख्या सर्व सामान्य गृहस्थाश्रमी माणसाला सहजपणे आचरणात आणता येईल. जो मला हळूहळू का होईना बऱ्यापैकी “परिपूर्ण, तणावमुक्त आणि आनंदी जीवनाकडे” घेउन जाईल.
राजे फत्तेसिंह भोसले (तिसरे) यांना वेगवेगळी शस्त्रे जमवण्याचा छंद होता. त्यांनी रणांगणावरील पराक्रम गाजवलाच तो पराक्रम गाजवणारी पण त्याबरोबर असंख्य शस्त्रेही जमवली. त्या संग्रहातून अक्कलकोटचे हे शस्त्रागार १९२२ साली आकाराला आले. सुरुवातीची अनेक वर्षे संग्रहालय अक्कलकोटचा जुन्या किल्लेवजा राजवाड्यात होते, ते सुरक्षिततेच्या कारणास्तव २००२ मध्ये नव्या राजवाड्यात हलवण्यात आले. अकराशे तलवारी, दोनशेहून अधिक बंदुका, तेवीस लहानमोठ्या तोफा, बावन्न पिस्तुले; तसेच, कट्यार, गुप्ती, बिचवे, खंजीर, भाले, परशू, अंकुश, वाघनखे, बाण आणि आणखी कितीतरी…. त्या हत्यारांचे वैविध्य आणि संख्याबळच प्रेक्षकाचे डोळे दिपवून टाकते.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मधील महत्त्वाचे मुद्दे.
आज सुरेश भट याचा जन्मदिवस. यांना जाऊन इतकी वर्षे झाली तरीही येणाऱ्या पिढीवर आणि भावी पिढीवर त्याच्या गजलचे गारुड आहेच आणि तसेच राहील यावरून एक प्रसंग आठवला..
आमच्या वाढत्या वयावर प्रभाव होता तो बाबुराव अर्नाळकर आणि चंद्रकांत काकोडकर यांचा , अर्थात आमच्यावेळी ती वयाची गरज होती.
क्रिकेट म्हटले की माणूस सगळे काही विसरून जातो. परंतु हे क्रिकेट काल कसे होते आणि आज कसे आहे हे आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सागू शकतो. परंतु एका शहराचे आणि क्रिकेटचे काय नाते आहे ह्यासाठी शोध घेण आवश्यक ठरते.
आज मी सतीश चाफेकर आहे…..त्याचे श्रेय मिशिगन इंजिनिर्सचे डॉक्टर पटेल याना द्यावे लागेल.
तो दिवस असाच ढगाळलेला होता आणि संध्याकाळी बातमी आली महंमद रफी गेले, सुन्न झाले होते.
Copyright © 2025 | Marathisrushti