वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
“यावर्षी महाराष्ट्रात भीषण अतिवृष्टी झाली. आपण नेहमीप्रमाणे हवामान बदलालाच दोष दिला. पण एके दिवशी स्वप्नात नारद मुनी भेटले आणि त्यांनी या अतिवृष्टीमागचं खरं कारण सांगितलं — जे पृथ्वीवर कुणालाही माहीत नव्हतं!” काय घडले ते जाणण्यासाठी थेट इंद्रच्या दरबारात जाऊ या:


डिसेंबर महिना चालू झाला की ‘संकल्पाचे’ वारे सुरू होतात . मी सुद्धा पंधराव्या वर्षापासून काही ना काही संकल्प करायचा ठरवीत असे . पण अनेक वेळा जानेवारी महिना संपण्यापूर्वीच तो मोडलेलाच असायचा. संकल्प करणे म्हणजे काय? संकल्प म्हणजे ‘कृती’ नव्हे. ती गोष्ट प्रत्यक्षात आणता आली पाहिजे.
शाळेत असताना खूप अभ्यास करून खूप खूप गुण मिळवायचे असा माझा संकल्प असे . पण गणपती ,नवरात्र , दिवाळी आणि डिसेंबर मधल्या सहली , स्नेहसंमेलन , क्रीडा स्पर्धा यात मी इतकी गुंतली जात असे की , मी केलेल्या संकल्पाचा मलाच विसर पडत असे .
महाविद्यालयात गेल्यावर इंग्रजी माध्यम असणार , तेव्हा आपल्याला इंग्रजीचे ज्ञान असणं आवश्यकच आहे . म्हणून मी इंग्रजी- मराठी शब्दकोशातून पाच-सहा शब्द , त्यांचा उच्चार आणि अर्थ जाणून लक्षात ठेवत असे . हळू हळू हा संकल्प सुद्धा अर्धवटच सोडला गेला .
आई पोळी भाजी करायला मुद्दाम सांगत असे . पण रोज रोज तेल – मोहरी – हिंग- हळद घालून तीच , तीच फोडणी चार दिवस शिकल्यावर मला अगदी कंटाळा आला . म्हणून स्वयंपाक घरातील कोणत्याही संकल्पाचा विचार करायचाच नाही , असं मी त्याचवेळी ठरविलं.
थोडी मोठी झाल्यावर ‘संकल्प’ म्हणताच , मला १२ जून १९२९ रोजी जन्मलेल्या नेदरलँड्सच्या ‘ॲना फ्रँकची’ आठवण यायची. ॲडॉल्फ हिटलर आणि नाझी पक्षाने जर्मनीवर नियंत्रण मिळवल्यानंतर, ज्यूंचा छळ चालू केला, नाझी सैनिकांच्या अत्याचारापासून स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी ॲन फ्रँकच्या वडिलांनी कुटुंबासह ६ जुलै १९४२ ला अॅम्स्टरडॅममध्ये एका बिल्डींगमधील सिक्रेट खोलीमध्ये लपून बसण्याचा निर्णय घेतला. राहत्या घरात लपून बसलेल्या फ्रॅंक कुटुंबाला भयानक जीवन जगावे लागले.
उंच आणि चष्मिस अंशुमनचा कॉलेजमध्ये असतानाच १७ व्या वर्षी बडोद्याच्या रणजी संघात समावेश झाला. बडोदा आणि पश्चिम विभागासाठी ६ वर्षे धावांच्या राशी ओतल्यावर अखेर डिसेंबर १९७४ मध्ये अंशुमनचा वेस्ट इंडिजविरुद्ध कलकत्ता कसोटीसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला.


एकदा एक शिष्य आपल्या गुरुंना म्हणतो की मला असा एक प्रभावी मंत्र द्या ज्याच्यामुळे आत्मशांती लाभेल. गुरु म्हणतात की रोज तुझ्या आराध्य दैवतेचा नामजप कर आणि दुसरे कोणतेही विचार मनात येणार नाहीत याची काळजी घे. विशेषतः लाल माकडाचा विचार तर अजिबातच करू नकोस. आत्मशांतीचा इतका सोपा मार्ग कळल्यावर शिष्य समाधान पावला. त्याच दिवशी तो जपाला बसला.तेव्हा त्याला आठवले की लाल माकडाचा विचार मनात अजिबात आणायचा नाही.
‘नोव्हेंबर’मध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या ‘क्रीडाशौकीन, निरोगी, विश्वासू, देखण्या व शिस्तप्रिय’ मानल्या जातात. चालू ‘नोव्हेंबर’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.

मी, प्रिया उपासनी, एक भारतीय नागरिक. भारत एक विकसनशील देश आहे. भारतात सद्ध्या खूप बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. रोज आपण पुढे पुढे जात आहोत. दररोज आपण प्रगती करत आहोत. पण खरच आपण प्रगती करत आहोत का? आपला देश कृषिप्रधान देश आहे आणि त्यापासून आपण दूर जात आहोत असे चित्र दिसत आहे. प्रगती, विकास जरूर व्हावा पण प्रकृतीकडे, पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाले नाही पाहीजे. दुर्दैवाने आज परिस्थिती बरोबर विरुद्ध दिसत आहे.
सुपिक शेतजमिनी विकल्या जात आहेत. त्यावर मोठमोठ्या इमारती बांधण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याची, सांडपाण्याची, रस्त्यांची, विजेची व्यवस्था या संबधीत कोणताही विचार केला जात नाही. हे शहरी भागांपूरते मर्यादित नसून गावागावात सुद्धा हे चित्र दिसायला लागले आहे.
‘ऑगस्ट’ महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या नेतृत्वगुण असलेल्या, विचारी, प्रभावी संवादकौशल्य जपणाऱ्या असल्याचे मानले जाते. ‘ऑगस्ट’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.


‘क्रिकेट एक बहाना है, इस बहानेपर आप आते-जाते रहते हो’, असं दहा वर्षांपूर्वी मला सुनावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे आजचे मत काय आहे ते मला माहीत नाही; पण पाकिस्तानात क्रिकेट म्हणजे अफूची गोळी आहे. ती तिथल्या जनतेला धुंदीत ठेवायला काही काळ उपयोगी पडते. ‘तुम्ही इथं येतही जा आणि हरतही जा’, असं लाहोरचा जेमतेम शिकलेला टॅक्सी ड्रायव्हर सर्फराज अली मला म्हणाला. मी त्याच्याकडं प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं तेव्हा त्यानं जे सांगितलं ते पाकिस्तान्यांच्या मानसिकतेचं लक्षण मानावं लागेल.
लग्न-मुंजीचा सोहळा, घरगुती सण समारंभ असो किंवा कॉर्पोरेट मिटींग असो, साडी हा असा पोषाख आहे जो कुठल्याही प्रसंगी परिधान केला तरी चालतो. म्हणूनच वेस्टर्न कल्चरचा कितीही प्रभाव पडला तरी स्त्रियांच्या मनातील आणि कपाटातील आपले स्थान साडीने अजूनही कायम ठेवले आहे. शरीरयष्टी कशीही असली, रंगरुप कसेही असेल तरी प्रत्येक स्त्रीला साडी शोभूनच दिसते.
माझ्या व्यवस्थापकीय जीवनातील अजून एक अनुभव. एके दिवशी माझ्या विभागातील एक अधिकारी, निलयशी गप्पा मारत असताना त्याने मला एक फार इंटरेस्टिंग आणि मस्त प्रश्न विचारला. असा प्रश्न बहुतेक व्यवस्थापकांना कधीनाकधी पडतोच. तो प्रश्न असा “कनिष्ट अधिकाऱ्यांना बहुतेक वेळा एखादी गोष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांना पटवून द्यायला फार त्रास का होतो? त्यांच्या मते तर त्यांचा विचार सरळ सोपा आणि बहुतेक वेळा कंपनीच्या दृष्टीने अतीशय महत्वाचा असतो. तरी सुद्धा त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना एकतर हवे तसे यश येत नाही किंवा ते प्रयत्न पूर्णपणे दुर्लक्षित केले जातात. हा अनुभव खूप वेळा खरोखरच हताश करणारा असतो.”
Copyright © 2025 | Marathisrushti