(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बुध’ ग्रहाचे वेगळे दर्शन अर्थात बुध अधिक्रमण

    बुधाचे निरीक्षण

    बुध ग्रह सूर्यास्तानंतर संध्याकाळी काही वेळ पश्चिम क्षितीजाजवळ दिसतो तर काही महिन्यात हाच बुध ग्रह पूर्व क्षितीजावर पहाटे सूर्योदयापूर्वी दिसतो. बुध हा सूर्यापासून पहिलाच ग्रह आहे. त्यामुळे त्याचे सूर्यापासूनचे अंतर कमी आहे. परिणामी बुध ग्रह सूर्याची पाठ कधीच सोडत नाही. विशिष्ट कालावधीत, सायंकाळी किंवा पहाटे आणि क्षितीजालगत बुध दर्शन होत असल्यामुळे बुध शोधणे म्हटल. तर सोपे आहे म्हटल. तर कठीण आहे.

    बुधाचे आगळे वेगळे दर्शन समजावून घेण्यासाठी सूर्यग्रहणाची घटना डोळ्यासमोर आणू. सूर्यग्रहणात पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये पण त्याच्याच पातळीत चंद्र येतो. यामुळे सूर्यबिंब झाकले जाते आणि चंद्राची अप्रकाशित बाजू (काळी बाजू) आपणास दिसते.

    बुध ग्रहाची कक्षा सूर्य आणि पृथ्वी यांच्यादरम्यान असल्यामुळे बुध ग्रह सुद्धा पृथ्वी आणि सूर्य यांना जोडणाऱ्या रेषेवर या दोघांच्या दरम्यान येऊ शकतो पण... बुध लहान असल्यामुळे तो सूर्याला झाकू शकत नाही. बुधाचा लहान काळा ठिपका सूर्यबिंबावरून सरकत जातो. बुधाच्या लहान बिंबामुळे सूर्याच्या प्रकाश काही अडविला जात नाही. परिणामी बुध ग्रह सूर्यबिंबावरून गेला तरी आपल्याला पत्तासुद्धा लागत नाही.

    सूर्यबिंबाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे सरकत जाण्याच्या या घटनेलाच बुधाचे अधिक्रमण (transit) किंवा पारगमन असे म्हणतात.

    अधिक्रमण कळते कसे?

    गणितशास्त्र हे आश्चर्यकारक आणि अचूक शास्त्र आहे. सूर्य, बुध, पृथ्वी, चंद्र इ. ग्रहांच्या भ्रमणामुळे घडून येणाऱ्या गणिताने अधिक्रमणासारख्या विविध घटना केव्हा होणार ते १०० टक्के बिनचूक शोघता येते. हे शास्त्र भूतकाळातही शिरते आणि भविष्यकाळातही डोकावते. १६०७ ते २३०० या ७०० वर्षाच्या काळात बुधाची १४ अधिक्रमणे आहेत.

    म्हणजे एका शतकात साधारण १२ ते १३ अधिक्रमणे होतात. सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान दर ११६ दिवसांनी बुध ग्रह येतो. या घटनेला अंतर्युती म्हणतात. म्हणजे खरं तर वर्षातून ३ वेळा तरी अधिक्रमण व्हायला हवे होते नाही का? बुध ग्रह पृथ्वी व सूर्य यांच्या पातळीत फिरत नाही. बुधाची परिभ्रमण कक्षा या पातळीला दोन बिंदूत छेदते. या छेदनबिंदूपाशी अंतर्युती झाल्यासच अधिक्रमण होऊ शकते. अंतर्युती होणे आणि पृथ्वी-सूर्य जोडणाऱ्या रेषेत बुध येणे हे सध्या फक्त मे आणि नोव्हेंबर या महिन्याच्या १० तारखेच्या आसपास घडू शकते. तर आता अशी संधी ९ मे २०१६ रोजी, सोमवारी आली आहे. या अधिक्रमणाचे साक्षीदार आपल्याला व्हायचे आहे.

    “मे” महिन्यातील अधिक्रमणाचे वैशिष्ठये

    मे महिन्यात घडून येणाऱ्या अधिक्रमणाच्यावेळी बुध ग्रह सूर्यापासून दूर म्हणजे पृथ्वीला जवळ असतो. त्यामुळे बुध बिंब थोडे मोठे दिसते (त्याचा व्यास सुमारे १२ कला असतो). तरीही सूर्यबिंब त्याच्या सुमारे १५८ पट मोठे असते मग आता सांगा ते सूर्याला कसे झाकेल? उलट बुधाचा काळा ठिपकाच सूर्यबिंबावरून सरकताना दिसेल. बुधाने सूर्यबिंबाला एका टोकाशी स्पर्श केला की, आख्खे सूर्यबिंब पार करून दुसऱ्या टोकाशी बाहेर पडण्याच्या या घटनेला साडेसात तास लागणार आहेत. संध्याकाळी पावणेपाचच्या सुमाराला अधिक्रमण सुरु होईल ते रात्री सव्वाबारापर्यंत चालू राहिल. रात्री ८.३० च्या सुमारास या प्रवासाचा मध्य बुधाने गाठलेला असेल. म्हणजे तेव्हा सूर्यबिंबाच्या केंद्रबिंदूजवळ सूर्य असेल.

    पण हाय? हा सगळा प्रवास आपल्याला पाहता येणार नाही. सूर्य अस्ताला गेला की, ज्या पडद्यावर हा खेळ आपण पाहणार तो पडदाच गायब होणार. नाही कां? तरी सुद्धा संध्याकाळी ४.४५ पासून सूर्यास्तापर्यंत साधारण दोन तास हा खेळ पाहता येईल

    दोन तास तर दोन तास. म्हणतात नां? Something is Better than Nothing....

    अधिक्रमण पाहतांना घ्यायची काळजी

    बुधाचा काळा ठिपका सूर्यबिंबावर पहायचा म्हणजे सूर्याकडे पहाणे आलेच. मग नुसत्या डोळ्यांनी तर नाहीच नाही पण सौर गॉगलमधूनही (नेहमीचा गॉगल नव्हे) हे पाहता येणार नाही. बुधाचा लहान ठिपका दिसणार कसा? मग टेलिस्कोपचा वापर करावा लागेल. पण त्यालाही विशिष्ट असा सुरक्षित फिल्टर बसवला आहे कां याची पक्की खात्री करावी लागेल. द्विनेत्री म्हणजे binocular मुळीच नको. कारण त्याला फिल्टर बसविलेला नसतो. काही संस्था असे अधिक्रमण दाखवतील. तेथे जाता येईल. तरीही डोळ्यांच्या सुरक्षिततेची पक्की खात्री झाल्याशिवाय अशा कोणत्याही उपकरणातून थेट पाहू नये. अन्यथा डोळे कायमचे बिघडतील. अंधत्वही येऊ शकेल.

    पुढील अधिक्रमणे

    बुधाचे यानंतरचे अधिक्रमण ११ नोव्हेंबर २०१९ रोजी आहे. पण त्याचीही सुरुवात संध्याकाळी सहाच्या सुमारास असल्यामुळे न दिसण्याऱ्या अधिक्रमणातच त्याची गणना करावी लागेल. १३ नोव्हेंबर २०३२ चे बुध अधिक्रमण दुपारी १२.१५ ते ४.४० या वेळात दिसेल. मे महिन्यात होणारे यानंतरचे अधिक्रमण ७ मे २०४९ रोजी आहे. त्याची सुरुवातही याचप्रमाणे संध्याकाळी पावणेपाचचे सुमारास आहे? तेव्हा डोळ्यांची योग्य काळजी घेऊन अधिक्रमण निरीक्षणाची हीच संधी घ्यायला हवी.

    - हेमंत मोने
    ९८२०३ १६३१५
    e-mail : hvmone@gmail.com

    आकृतीत बुध अधिक्रमण मार्ग दाखविला आहे. आपण पश्चिमेकडे तोंड करून उभे राहणार. म्हणजे सूर्यबिंबाची उत्तर बाजू साधारण उजवीकडे असेल. सूर्यबिंबाचा पूर्व बिंदू वरच्या बाजूस असेल. हे लक्षात घेऊन बुध अधिक्रमण मार्ग दाखविला आहे.

      May 9, 2016


  • उत्तर सिक्किम मधील गुरडोगमार लेक

    उत्तर सिक्किम मधील गुरडोगमार लेक

    समोर बर्फाचा पसरलेला समुद्र व त्याच्या मध्यात चिंचोळा स्वच्छ निळ्या पाण्याचा ओहोळ, भ्रर दुपारच्या १ वाजताच्या उन्हात चकाकत होता. त्या पाण्यापर्यंत पोहचण्यास बर्फाच्या पायऱ्या. मुंगीच्या पावलाने लेकच्या काठावर येऊन ध्यानस्थपणे १० मिनिटे उभा होतो. मनाला मिळालेल्या अविस्मरणीय शांतीच्या वलयात पूर्णपणे डुबून गेलो होतो. गोठलेल्या बर्फात हे पाणी कसे राहते, हा निसर्ग चमत्कारच.

      May 23, 2019


  • आइसक्रीम खा…पण हे वाचा

    बड्या बड्या कंपन्या आकर्षक आउटलेट्स उघडून खवैय्ये मंडळींना मेजवानी देण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो आहोत.

    परवाच चिपळूण मधेहि बस्किन रॉबिन या आंतरराष्ट्रिय ब्रैंडच आऊटलेट सुरु झालय. पण याच आईस्क्रमच्या पडद्यामागे अनेक गोष्टी आहेत. कदाचित त्या पासून आपण अनभिज्ञच आहोत.

    मागे एकदा रत्नागिरीला मिरजोळे एम आय डी सी मधे एका क्लाएंट बरोबर मिटींगसाठी माझ्या एका सरांबरोबर एका हॉटेलमध्ये गेलो होतो. तेव्हा माझ्या क्लायंटने अजून एका माणसाबरोबर ओळख करुन दिली . तो माणूस मुंबई मधे आईस्क्रीमचे निरनिराळे आणि नवनवीन फ्लेवर्स बनवतो आणि आईस्क्रीम कंपन्यांना विकतो. आता त्याला स्वतःचे माझ्या क्लायंट बरोबर आउटलेट उघडायचे होते त्यासाठी त्याला तिथे किंवा झाड़गाव एम आय डी सी मधे प्लांट सुरु करायचा होता .त्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट करा म्हणून तो मला व सराना पटवत होता. तो जे काही सांगत होता ते ऐकून मी उडालोच.

    त्याच्या म्हणण्यानुसार त्याने अनेक नवीन फ्लेवर्स बनवले आहेत. जे काही कंपन्यांनी विकत घेतली असून सध्या मार्केटमध्ये लोकांना खूप आवडताहेत. तेआवडणाऱ्यात मीही एक होतोच.

    तो म्हणाला ; “आता मी ग्वाहा(पेरू) आणि चॉकलेटआईस्क्रीम मध्ये ४ -४नवीन फ्लेवर्स बनवलेआहेत. जे मला आता कुठल्याच कंपनीला विकायचे नाहीयेत. हे फ्लेवर्स लोकांनाखूप आवडणार आहेत. ज्याचा आपल्याला आउटलेट उघडून फायदाउठवता येईल. ”

    प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करताना आम्हाला उपलब्ध मार्केट त्याची सध्याची परिस्थिति प्रोडक्टचा वाव त्याला उपलब्ध असणारा पर्याय ,लागणारा पैसा, लागणार वेळ ब्रेक ईवन पॉइंट वगैरे गोष्टी विचारात घ्याव्या लागतात म्हणून मी त्याला एक साधा प्रश्न विचारला की ; “समजा आपण आउटलेटउघडलं आणि तुझे फ्लेवर लोकांना आवडले नाही तर तू त्या चॉकलेट किंवा पेरू फ्लेवरचे जे उत्पादन करशील ते किती दिवस राहू शकत? लोकांना ते आवडे पर्यंत जो काळ जाईल तोवर ते आईस्क्रीम वायाजाणार नाही का ? मग ते नुकसान कुणी सोसायच?”. पुढे माझेअनेक प्रश्न होतेच. वीजखर्च, दुध , कच्चा माल वाहतूक इत्यादी.

    त्यावर तो आपले तंत्रज्ञान किती भारी आहे हे सांगताना म्हणाला की ;“त्याची काही काळजी करू नका. मुळात हे आईस्क्रीम कधीच खराब होत नाही.अगदी आठ दिवस लाईट नसले तरीही...”

    आम्ही चकित झालो . सरांनी विचारलं ;“ते कस काय? दुध आहे ते खराब होणारच.”

    तो तत्काळ म्हणाला ; “छे छे. दुधापासूनआईस्क्रीम बनवण्याचे दिवस केव्हाचसंपलेत. ”

    “मग कशापासून बनवतोस बाबा आईस्क्रीम ?”

    “डालडा तुपापासून!”

    “काय डालडा तूऽऽऽऽप?” होय डालडा-वनस्पति तूप दचकलात ना
    पण काय आहे सर
    “आज काळ एखाद दोन कंपन्या सोडल्यातर सगळे डालडाच वापरतात आणित्यामुळेच ते परवडतं. आजकाल आईस्क्रीममध्ये एकही थेंब दुध नसतं. डालडाला थोडी प्रोसेस केली आणि त्यात फ्लेवर्स मिक्स केले की कळतही नाही की ते डालडातूप आहे. शिवाय ते दुधाच्याआईस्क्रीमपेक्षा खाताना जास्त मऊ लागतं.त्यामघे जो दुधाच्या आइसक्रीम मधे बर्फाचा कचकचित पणा काही वेळा येतो तो येत नाही आणि तेच लोकांना आवडतं.दूसर म्हणजे डालडा आईस्क्रीम जिभेवर येताच त्वरित विरघळते आणि गिळले जाते. शिवाय थंडपणा आणि तुपकटपणा यामधून तोंडात जे तयार होते ते नक्की काय आहे हा विचार लोक करीत नाहीत. पण तेच लोकांना आवडते. लोक अशाच स्वादाला पसंती देतात. ”

    तो भरात येऊन त्याच्या तंत्राच मार्केटिंग करत होता आणि आम्ही आमचा इतिहास पोटात ढवळत बसलो होतो.

    पुढे तो सांगत होता; “डालडा आईस्क्रीमचं वैशिष्ट्य असं की ते डालडा सामान्य तापमानात कितीही काळ राहिला तरीही अजिबात खराब होत नाही.हे आपण घरात बघतच असतो याउलट दुधाला मात्र सारखं फ्रीजिंग लागतं. शिवाय दुधाच्या आईस्क्रीमला काही दिवसांनी वास येतो. आणि १०-१२ दिवसात ते खराब होऊन जातं. त्यामुळेखर्च वाढतो. डालडा आईस्क्रीम वर्ष भर जरी फ्रीजच्या बाहेर राहिलं तरी फरक पडत नाही, त्याचे फ्लेवर्सही खराब होत. नाहीत.

    डालडा आईस्क्रीमसाठी लाईटखुपच कमी लागते. १० डिग्रीतापमानातही त्याचा आईस्क्रीम फील येतो. तर दुधाच्या आईस्क्रीमसाठी उणे तापमानाची (नक्की किती ते आत्ता आठवत नाही.) गरज असते. सहाजिकच दुधाच्याआईस्क्रीमच्या विजेचा खर्च वाढतो.

    शिवाय दुधापेक्षा डालडा कच्चामाल म्हणून जास्त स्वस्त आहे. तस ते हाताळणी आणि प्रोसेसलाही खूप सोपेआहे. दुधाचे रोजचे कलेक्शन, त्याचे फ्रीजिंग आणि साठवण याचा विचार करता त्याची जी बेसिक किंमत होते. त्या किंमतीतही लोकांना ते आईस्क्रीम खाण परवडू शकत नाही. डालडा आईस्क्रीममध्ये खूप मोठे प्रोफिट मार्जिन आहे.म्हणूनच आजकाल इतके पॉश आईस्क्रीमआउटलेट निघू शकतात. ”

    “डालडा आईस्क्रीम उत्पादनाचाआणखी एक फायदा असा आहे की एकच प्रोडक्शन युनिट चालवून भारत भर कुठेही आपण याचे वितरण करू शकतो.तेही कमी खर्चात. दुधाच्या आईस्क्रीमला तो बेनिफिट नाही. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रोडक्शन युनिट सुरु करावेलागेल.ह्यामुळेच जर आज तुम्ही मार्केट मधल्या प्रतितयश कंपन्याच्या आइसक्रीम चे प्रोडक्शन ठिकाण बघितल तर ते हरियाणा , मध्यप्रदेश इकडचे दिसेल आता त्याच कारण कळल"

    तो रंगात आला होता. त्याने त्याचे नवीन नुकतेच बाजारात आलेले फ्लेवर टेस्ट करायला दिले.मला डालडा आईस्क्रिम खाल्ल्यामुळे नक्की काय तोटा होतो ते माहीत नाही.पण त्यानंतर आईस्क्रीम खायची मजा निघून गेली इतकं नक्की.

    ह्यापुढे आइसक्रीम खाताना ब्रैंड महत्वाचा नसून त्याचे कंटेंट किंवा इंग्रीडियंट बघा ते महत्वाचे आहे. बाकी तुमचे निर्णय आणि आरोग्य दोन्हीही तुमच्याच हातात आहे ....

    -- व्हॉटसअॅप वरुन

      April 4, 2016


  • आहे हिम्मत आता चले जाव म्हणण्याची!

    या देशाला परकीय आक्रमणांची तशी नवलाई नाही. अगदी शक, हुणांपासून ते इंठाजांपर्यंत ही परंपरा चालत आली आहे. त्यापैकी अनेक आक्रमक नंतर इथलेच होऊन राहिले.

      February 17, 2008


  • आहाररहस्य ९

    आपण आहार का घेतो ?
    …..शरीराचं नीट योग्य पोषण होण्यासाठी.
    कशासाठी व्हायला हवे पुष्टीपोषण ?
    …..शरीरातील धातूंची क्षमता वाढण्यासाठी.
    कशाला हवी धारणक्षमता ?
    ……निरोगी रहाण्यासाठी

      August 30, 2016


  • ठाण्यातील नाट्यसंस्था – आदर्शमित्र मंडळ

    हिंदी नाट्यस्पर्धेत भाग घेऊन पारितोषिके मिळवणे ही आदर्श मित्र मंडळाची खासियतच. गडकरी रंगायतन सुरू झाल्यावर ठाणेकर कलाकारांनी सादर केलेले पहिले नाटक केशवराव मोरे यांनीच दिग्दर्शित केले होते.

      October 17, 2022


  • इंजिन ड्रायव्हर आणि गाडीचा प्रवास

    विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळी अमृतसर येथे झालेल्या मोठ्या रेल्वेअपघातांमध्ये रेल्वेचे जबाबदारी होती का?   इंजिन ड्रायव्हरचा दोष होता का?  रेल्वेने आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला का?  असे अनेक प्रश्न समोर उभे राहिले.  याच संदर्भात रेल्वेचे इंजिन ड्रायव्हर कसा परिस्थितीत काम करतात,  त्यांच्या कामाचे स्वरुप काय असतं,  याचं फार सुंदर विवेचन या लेखात केलेलं आहे. दोन ते तीन हजार प्रवाशांच्या सुखकर प्रवासाच्या नाड्या इंजिनातील दोन कर्तबगार माणसांच्या हातात असतात याची जाणीव प्रवासात एकदा जरी आली तर तो त्यांच्या सचोटीच्या कामाला मानाचा मुजरा ठरेल.

      October 23, 2018


  • नाही म्हणजे नाही !

    पिंक . अलीकडेच प्रदर्शित झालेला हिन्दी सिनेमा . दाहक वास्तवावर आधारित तितकाच वास्तव सिनेमा . आपण व्यक्ति म्हणून , समाज म्हणून जर असन्वेदनशील झालो तर एक संवेदनशील विषय किती ज्वलंत बनू शकतो , नव्हेबनलाच आहे , याचा आरसा म्हणजे हा सिनेमा . करमणूक म्हणून जायचे असेल तर या सिनेमाला जाण्याचा विचार सुद्धा मनात आणू नये असा हा सिनेमा . पण आपल्या आयुष्यात एक व्यक्ति म्हणून , एक समाजाचा घटक म्हणून , एकवडील म्हणून , एक मित्र म्हणून , एक मैत्रीण म्हणून , एक समाज - धुरीण म्हणून , एक सहकारी म्हणून कसे वागतो आणि कसे वागले पाहिजे याबाबत एकदम झनझनित अंजन घालणारा असाच हा सिनेमा आहे . एकदम अस्वस्थ करणारा .

    त्यासाठी या सिनेमाच्या निर्मितीशी संबंधीत सर्वांचे मनापासून अभिनंदन केले पाहिजे . पण निव्वळ अभिनंदन करून आपल्या सगळ्यांच्याच नेहमीच्या सवयीने सोडून देण्यासारखी ही गोष्ट नाहीच .

    हा सिनेमा पाहिल्यापासून माझ्या मनात एकच विचार सतत येत आहे कि सभ्यतेच्या साऱ्या गोष्टी आज अशा पध्दतीने परत एकदा तपासून घेण्याची आज वेळ आली आहे . जर आपल्या लेकी- सुनान्बाबत आपण इतके नादान पणे वागणारअसू , तर आपल्यात आणि " लड़के है , जवानी में तो ऐसा एखाद बर्ताव हो जाता है " असं म्हणणारया आपल्या देशातील एका राजकीय नेत्यांत आणि तशा मनोव्रुत्तीच्या इतरांत काय फरक राहिला ?

    असा फरक राहिला पाहीजे आणि तो प्रकर्षाने सतत जाणवत राहिला पाहीजे असं अगदी मनापासून वाटणार्या सर्वानी हा सिनेमा पाहिलाच पाहिजे . आणि त्याचबरोबर या सिनेमातील तीन तरूण मुलिन्वर जो प्रसंग येतो , तसा प्रसंगकोणावरही येणार नाही याचीही व्यवस्था आपण सगळेच मिळून कार्यरत ठेवणे आवश्यक आहे . ( नुसती सुरू करणे नाही ; सुरू ठेवणे अत्यावश्यक . )

    अर्थात असा विचार , असा व्यवहार केवळ या सिनेमातील घटने बाबत नाही तर आपल्या आयुष्याच्या अनेक पैलूंबाबत करण्याची वेळ आली आहे . आपला देश आर्थिक महासत्ता बनेल किंवा बनणार नाही . पण आर्थिक महासत्ता होणे हाकाही सर्व व्यथा दूर करणारा सार्वकालिक रामबाण उपाय नाही . एकीकडे सांस्कृतिक सम्रुध्धीच्या परंपरेच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे एक देश म्हणून Human Development Index मधे जागतिक क्रमवारीत खालच्या पातळीवरअसायचे हे एक देश म्हणून शरमेचीच बाब आहे . अर्थात त्यासाठी फक्त सरकारला दोषी मानने सर्वथैव गैर आहे .

    मग याबाबतीत कसे वागावे लागेल याचे आदर्श उदाहरण म्हणजे " PINK " सिनेमातील अमिताभ बच्चन यांनी रंगवलेली दीपक सेहगल ही व्यक्तिरेखा . आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटनांची नोंद कशी घेतली पाहिजे , संबंधितव्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यात गैरवाजवी ढवळाढवळ न करता त्यांना कसे सहाय्यकारी झाले पाहिजे , तटस्थता आणि समरसता यात संतुलन कसे राखले पाहीजे , त्याचवेळी असॆ सामाजिक आयुष्य आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातीलजबाबदार्या यांचा तोल कसा सांभाळत राहीले पाहीजे , कायद्यासमोर दोषी व्यक्तींना उघडे पाडत असतानाच एकंदरीतच प्रचलित पध्दतीत कसे - काय - का बदल झाले पाहिजेत याचे दिशा - दिग्दर्शन करणे ( मग ते या सिनेमा प्रमाणेतिरकस , खोचक , कुचकट पणे ही का असेना ) याचे काळानुसार , प्रसन्गानुरूप , स्थितिसापेक्ष असॆ हे उत्कृष्ट उदाहरण आहे .

    या अर्थाने या सिनेमाच्या शेवटी तीन मुलिन्चा वकील म्हणून खटल्यातील Closing Remarks म्हणून अमिताभ बच्चन यांच्या तोंडी जो संवाद आहे तो फार महत्वाचा आहे . तो संवाद असा " No Means No . No हा केवळ एक शब्दनाहि . नाहीच . ते ऐक संपूर्ण वाक्य आहे . त्याला आणखी वेगळ्या व्याख्येची , माहितीची , स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही . "

    तसे या आशयाचे मुद्दे कायद्याचा अभ्यास करतांना शिकवले जातात . विशेषतः Criminal LAW शिकताना . वाढत्या वैयक्तिक वयात , आयुष्यात त्याचे नानाविध पैलू लक्षात येत राहतात .

    अगदी गुंतवणूक क्षेत्राबाबत ही .

    तसेही या सिनेमाचे नाव " पिंक " आणि गुंतवणूक क्षेत्राविषयी जास्त विस्ताराने देणाऱ्या आर्थिक नियतकालिकांना म्हणतात " पिंक पेपर्स " .

    असो .

    आणि मग तसा विचार करत असताना गुंतवणूक आणि हा सिनेमा यांची सांगड घालणारे काही मुद्दे मनात उमटू , उमलू लागले .

    यातला पहिला पैलू म्हणजे NO MEANS NO हे वाक्य . आपल्या गुंतवणूकीचे तंत्र आणि मंत्र मनात घोटवत असताना आपण मोहाला , लोभाला , पुर्वग्रहाना हे म्हणतो का ? कोणतीही परिस्थिती असली तरी आपल्या गुंतवणूकीच्यासातत्याला तात्पुरतीही सोडचिठ्ठी देण्यास पुरेशा क्रुतिशील ठामपणे NO MEANS NO म्हणायला शिकणार् ना ?

    यालाही काही वेगळे स्पष्टीकरण देण्याची थोडीही आवश्यकता नाही .

    याचा असाच ऐक पैलू म्हणजे गुंतवणूक ही सदासर्वकाळ सर्वान्चीच गरज असते . महिला आणि अल्पवयीन यान्च्याबाबत तर असतेच असते . हल्लीच्या काळात महिला त्यांच्या स्वतःच्या गुंतवणुकीबाबत ही खबरदारी , जबाबदारी , काळजीस्वतःच घेउ शकतात . जिथे ही परिस्थिती नसेल तिथे ही भूमिका घरातील इतरांनी निष्ठापूर्वक , नेकिने पार पाडली पाहिजे . घरातील अल्पवयीन व्यकिन्बाबत तर ही गोष्ट घडलीच पाहिजे . जिथे हे होत नसेल तिथे हे त्यांच्या परिचितानीस्वयन्स्फुर्तिने केले पाहिजे . निदान त्याची आवश्यकता आणि प्रक्रिया लक्षात आणून तरी दिली पाहिजे . कारण त्याबाबतची माहिती सर्वाना च असतेच असॆ नाही . आणि अगदी असली तरी काहीवेळा परिस्थितीच्या रेटयात ते सुचतेच असॆनाही . जसे या सिनेमात तीन मुलिन्बाबत अमिताभ बच्चन एक वकील म्हणून करतो . हा संदर्भ केवळ ध्वन्यार्थाने नाही तर सर्वार्थाने लक्षात घेतले कि या सिनेमातील एक संवाद ( जी कायदेशीर तरतूद आहे ) आहे कि " Non - Bailable Warrant असले तरी महिला आणि बालकांना bail मिळतो , मिळू शकतो ." मात्र ही प्रक्रिया योग्य तर्हेने आणि वेळीच सुरू करावी लागते . कारण यातूनच त्यांची निर्भरता निर्माण होत असते . हे आर्थिक , भावनिक , सामाजिक आशाअनेक छ्टांनी खरे आहे .

    पिंक हा सिनेमा आणि गुंतवणूक क्षेत्र यांची सांगड घालताना मला जाणवलेला तिसरा पैलूं म्हणजे या दोन्ही गोष्टींचा एक समान संदेश हा आहे कि जर आपण बरोबर असू , निर्दोष असू तर आजूबाजूच्यानी , ज्यांचा तुमच्या परिस्थितीशीएरवी काहीही संबध नाही , केलेल्या टिप्पणीकडे फार लक्ष देण्याची जरासुध्धा आवश्यकता नाहि . त्यामुळे विचलित होण्याची तर बिलकूल गरज नाही . उलट त्यामुळे स्वतःच्या मनाशी स्वतःच्या मताची , तत्वान्ची , आचरणची तपासणी ,उजळणी करून घ्यावी . या सिनेमात ऐक प्रसंग आहे ज्यात अमिताभ बच्चन तापसी पन्नू च्या overcoat चे hood तिच्या डोक्यावरून काढतो . ते दोघं मॉर्निंग वॉक ला गेलेले असतात . ती नेहमीच्या प्रमाणे चालत असते . तिला पाहून "अरे ही तर ती कोर्ट केस वाली " असॆ एक जण म्हणतो . ते ऐकून सिनेमातील मिनल अरोरा ( तापसी पन्नों ) पटकन हुड डोक्यावर घेतें . अमिताभ बच्चन तें पटकन तिच्या डोक्यावरुन काढतात . हे अनेक अर्थांनी महत्वाचे आहे . निर्दोषव्यक्तीचा स्वाभिमान - आत्म सन्मान म्हणून तर ते महत्वाचे आहेच , पण तितकेच ते कार्यपद्धतीचे निर्देशक आहे . सातत्याने केलेली गुंतवणूक विपरीत परिस्थितीत तुमच्यावर छत्र धरते आणि त्यामुळे सामाजिक टीका - टिप्पणी पासूनस्वतःला लपवण्याची वेळ येत नाही .

    या सिनेमात न्यायाधीश महाराजांचे नाव " सत्यजित दत्त " आहे हेही यासंदर्भात काहीवेळा अतिशय सूचक वाटायला लागते .

    पिंक हा सिनेमा पाहताना जाणवलेली अजून एक गोष्ट म्हणजे या सिनेमात अन्द्रिया या भूमिकेतून तिने केलेले एक वक्तव्य . ती कोर्टात सांगते कि " पुर्वान्चल ( North - East ) मधील मुलींबद्दल निष्कारण वेगळ्या आणि वाईट नजरेनेपाहिले जाते . " गेल्या काही काळात दिल्लीत त्यांच्या बाबत ज्या घटना घडत आहेत त्या हीच गोष्ट सिध्द करत आहेत . काही वर्षांपूर्वी आलेल्या शाहरुखखानच्या " चक दे इंडिया " मधे हॉटेल मधे घडणाऱ्या प्रसंगातही याची झलक होतीचकी ! अशा मुळे त्या निरागस व्यक्तींच्या मनात आपण काय प्रतिमा निर्माण करत असतो ! गेली सहा वर्षे ऑफीस टूर मुळे माझे अनेकदा पुर्वान्चल मधे जाणे होत असते . तेन्व्हाही हे मला प्रकर्षाने जाणवत असते . त्या सात राज्यांच्यावाढत्या विकासाचा भार प्रामुख्याने तिथल्या महिला वाहात असतात हे प्रत्येकाने सतत स्मरणात ठेवणे आवश्यक आहे . मोजक्याच उठवळ , उच्रुन्खल , नादान , हलकट माणसांमुळे संपूर्ण सज्जन सरळमार्गी समाजाला वेठीस धरण कधीचयोग्य नाहि . हा केवळ त्या भूभागातील मुलींना भेडसावत असलेला प्रश्न नाही . हा आपल्या संपूर्ण देशाच्या चारित्र्याचा प्रश्न आहे . विदेशी पर्यटकांना येणारा काहीवेळा अनुभव हा याच मालिकेतील कडी आहे . याला पायबन्द जसाकायद्याने बसेल , तसाच आणि तितकाच आपल्या सगळ्यांच्याच सततच्या सतर्कतेतून बसेल . अशीच संवेदनशीलता काश्मिर बाबतही हवी हे ओघानेच आले .

    हा प्रश्न जसा सामाजिक आहे आणि असतो ; तसाच आणि तितकाच आर्थिक , राजकीय ही असतो हे लक्षात घेतले कि त्याची आपल्या गुंतवणूकीच्या धोरणाबाबतीत असणारी समर्पकता वेगळी सांगण्याची आवश्यकता उरत नाही .

    अशा अनेक अर्थांनी , अनेक क्षेत्रात , अनेकदा . . . .

    No MEANS No .

    -- चंद्रशेखर टिळक
    C - 402 . राज पार्क
    मढवि बंगल्या जवळ, राजाजी पथ .
    डोम्बिवलि ( पूर्व ) ४२१२०१ .
    मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
    E-Mail . . . tilakc@nsdl.co.in

    २३ सप्टेंबर २०१६

    ( गुंतवणूक तुमची माझी ; भाग तेरावा )

      September 30, 2016


  • बिगरशेती कर – जिसके हाथ मे लाठी उसकी भैस!

    ठाण्यामध्ये बिगरशेती कर (Non Agriculture tax) ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत वसूल होतो आहे…हाच कर मुंबई, ठाणे सारख्या मोठ्या शहरात घेतला जाऊ नये या साठी भारतीय जनता पक्ष जेव्हा विरोधी पक्षात होता तेव्हा आघाडी सरकारला धारेवर धरत होता.

      December 15, 2017


  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग एकोणतीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे पस्तीस
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
    निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग एकोणतीस

    बाबा सांगतात...

    गरीब, रोगी आणि शोकाकुल असणाऱ्यांना यथाशक्ती सहाय्य करावे. इथे यथाशक्ती असा शब्द आला आहे, तो महत्त्वाचा आहे.

    यथाशक्ती म्हणजे आपल्याला जे करणे शक्य आहे ते करावे. नियम म्हणून नको. नियम केला की जबरदस्ती आली. सरकारी नियम केला की कायदा झाला आणि भारतात कायदा मोडण्यासाठीच असतो.

    असो. तर आप्त मंडळी जे सांगतात, तेच बाबाही सांगताहेत. गरजूंना यथाशक्ती आणि यथायोग्य मदत करावी. ज्याची जशी गरज तशी ती पुरवावी.
    काहीवेळा कुणाला पैशाची गरज असते, (आपलं राखून हा विवेक जागृत ठेवत ) परतफेडीची अपेक्षा न ठेवता, जरूर मदत करावी.
    काहीवेळा आपली संसाधने गरज म्हणून दुसऱ्याला वापरायला हवी असतात, आपली गाडी हवी असते, आपलं एखादं पुस्तक हवं असतं, आपली गैरसोय होणार नसेल तर जरूर मदत करावी. कारण भविष्यात आपल्याला सुद्धा अशी गरज निर्माण होऊ शकते.

    काही वेळा ही गरज श्रमशक्तीची असते. विशेषतः सार्वजनिक क्षेत्रात काम करताना ही श्रमशक्ती जास्त लागते. ती पण द्यावी.

    तर काहीवेळा मदत ही धीर देणारी हवी असते. "काही घाबरू नकोस, सगळं ठीक होईल. मी आहे ना गरज लागेल तेव्हा!" या अशा शब्दांची ती गरज असते.

    काही वेळा लढण्यासाठी तर काही वेळा रडण्यासाठी सुद्धा एका भक्कम आधाराची गरज पडते.

    तर काही वेळा आजच्या भाषेत केवळ "माॅरल सपोर्ट" म्हणून मदत हवी असते. तुझं स्थूलातून किंवा सूक्ष्मातून असलेले अस्तित्वच मला गरजेचं बनतं.

    अर्जुन उत्तम योद्धा होता. क्षात्रवीर होता. युद्ध कोणतेही असो, मी एकटा ते जिंकेन याचा विश्वास अर्जुनाला होता. अठरा अक्षौहिणी सेना सोडून, अर्जुनाने फक्त श्रीकृष्णांचे सहाय्य एवढ्यासाठीच घेतले की, जर तू माझ्याबरोबर असशील तर माझे आत्मबल वाढणार आहे. मग मला कसलीच भीती नाही. मी नक्कीच जिंकणार आहे.
    आजच्या काळातील कुसुमाग्रजांच्या भाषेत, पाठीवर हात ठेवून, तू फक्त लढ म्हण. या माॅरल सपोर्टची गरज आज वाढली आहे.

    मी करतो आहे ते बरोबर आहे की चुक आहे, हे विश्वासानं सांगणाऱ्या आप्त व्यक्ती देखील कमी होत चालल्या आहेत.
    हा अनुभव या ज्येष्ठ व्यक्तींकडे असतो.

    म्हणून बाबा सांगतात, ते सर्व ऐकलं पाहिजे. असं, आपण बाबा व्हायच्या वयात कळलं, तरी पुष्कळ आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.

      August 24, 2017