वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आरोग्याला घातक असलेला हा चायनामधून येणारा तांदूळ. हा चक्क प्लास्टिकपासून बनवलाय.
वेदांतील प्राण्यांची किॅवा अवयवांची नावे ही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची नावे आहेत.
वेदांमध्ये(संहिताभागात) पशुहत्या किॅवा मांसभक्षण आहे असा मिथ्या आरोप करणारे तथाकथित विद्वान नेहमी वेदांतील पशुंची किॅवा त्यांच्या अवयवांची नावे पुढे करतात.
वेदांत ऋषभ, गौ, श्वान, हस्ति, अज असा शब्द आढळला की लगेचच त्याचा बैल,गाय, कुत्रा, हत्ती किॅवा बोकड असा बालिश अर्थ काढून त्याची किॅवा त्याच्या अवयवांची हत्या असा सोयीस्कर अर्थ काढून मोकळे होतात हे लोक. पण ही नावे त्या पशुंची किॅवा त्यांच्या अवयवांची नसून तीच नावे असणार्या आयुर्वैदिक औषधी वनस्पतींची आहेत हे खालील यादीत मी सविस्तर दिलं आहे. ही नावे आले की सर्वसामान्य मनुष्य लगेचच तसा अर्थ घेऊन मोकळा होतो. पण वास्तविक आयुर्वेदाचा अभ्यास केला व त्याचे शब्दकोश अभ्यासले, की जे भावप्रकाश निघण्टु वगैरे नावाने प्रसिद्ध आहेत, त्यात ही नावे औषधी वनस्पतींचीच आहेत हे सिद्ध होते. विशेष म्हणजे पशुंच्या नावाची किॅवा अवयवांची सारखीच नावे असणारी आयुर्वैदक वनस्पती आढळतात व तोच वनस्पती अर्थ त्या वैदिक ऋचेचा घ्यायचा हे उघड आहे. ह्याचे कारण सरळ आहे की
"मा हिॅस्यात सर्वभूतानि"
कोणत्याही प्राण्याची हत्या करु नका
ही वेदांचीच आज्ञा ! तत्पूर्वी
वेदांत मांस शब्दाचा अर्थ
मांस शब्दाचा अर्थ आपण जसा आज घेतो तसा तो नसून मांस म्हणजे फळाच्या आतला जो गर असतो त्यालाच मांस हा शब्द आहे. शतपथ ब्राह्मणांमध्ये सुद्धा मांस शब्दाचा अर्थ "परमान्नं तु पायसम्" असा दुध व तांदळाची खीर किॅवा दुधाचे पदार्थ असा सांगितलाय. पण स्वत:च्या सोयीनुसार अर्थ काढणे ही आजकाल एक फॅशन आहे. असो.
जो वेद साक्षात् परमेश्वराची वाणी तो वेदभगवान यज्ञांमध्ये कोणत्याही प्राणीमात्राच्या हत्येची आज्ञा का बरे देईल???
कारण यज्ञाचं वर्णन ऋग्वेदाच्या पहिल्याच सुक्तांत चोथ्याच ऋचेत खालील प्रकारे आलंय.
अग्ने यं यज्ञमध्वरं विश्वत: परिभूरसि ! स इद्देवेषु गच्छति !
ऋग्वेद - १.१.४
"यज्ञं अध्वरं" ह्या शब्दाचा अर्थ निरुक्तकारांनी दिला आहे
अध्वर इति यज्ञानाम – ध्वरतिहिंसा कर्मा तत्प्रतिषेध: - निरुक्त २।७
ध्वर म्हणजे हिॅसा व त्याचा जिथे निषेध तो अध्वर ! म्हणजे यज्ञ हा "अध्वर" म्हणजे अहिंसक असतो. वेदांमध्ये हा "अध्वर" शब्द अनेकवेळा आलेला आहे. शतपथ ब्राह्नणामध्ये तर तिसरे कांड "अध्वर" नावानेच आहे.
वेदांत "आलंभन" शब्दाचा अर्थ
आलंभन ह्या शब्दाचा विकृत अर्थ वध असा काढणारे लोक त्याच्या वास्तविक अर्थाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतात. एक साधं प्रमाण घेऊयात
पारस्कर गृह्यसुत्रांत सांगितलं आहे की
अथास्य (ब्रह्नचारिण:) दक्षिणासं अधिह्रदयं आलभते ! (२.२.१६)
अर्थ - गुरु त्याच्या शिष्याच्या ह्रदयांस हात लावतो.
उपनयनाच्या वेळी "ह्रदयालम्भन" अशी एक क्रिया असते ज्यात गुरु स्वत:च्या शिष्याच्या म्हणजे त्या बटुच्या ह्रदयांस हात लावतो. इथे "आलंभन" चा अर्थ "स्पर्श" असाच अभिप्रेत आहे व वेदांतही तोच अर्थ आहे. पण पाश्चिमात्यांची टुकार व भिकार वेदानुवाद व विशेषत: मेकडाॅनेल व कीथ ह्यांच्या विकृत अशा "वैदिक इण्डेक्स" ह्या द्विखंडात्मक ग्रंथात , जो आम्ही स्वत: पूर्ण मुळ आंग्लभाषेत व हिंदीतही वाचला आहे व ज्यामध्ये "आलंभन" शब्दाचा "वध" असा विकृत अर्थ केला गेल्याने त्यालाच आपले लोक अंधपणाने प्रमाण मानतात. आता ह्यापेक्षा दुर्दैव कोणते??? हा आंग्लभाषेत व हिंदी भाषेतही पीडीएफ स्वरुपात डिजीटल लायब्ररीवर उपलब्ध आहे.
"आलम्भन" हा शब्दांमध्ये "लभ" ह्या संस्कृत धातुचा पाणिनीनुसार अर्थ "प्राप्त करणे" असा आहे. "लभ्" ह्या धातुचा आणखी अर्थ "प्रेरणा" असाही होतो. हाच अर्थ इतर अनेक व्याकरणकारांनीही घेतला असल्याने म्हणूनच आलंभनचा अर्थ "आ" शब्द अधिक आल्याने "अत्यंत प्राप्ती" असा योग्य आहे. संस्कृतच्या अध्ययनासाठी जी वाराणशीतील संस्कृत पाठशाळा सर्वभारतात व जगातही प्रमाण मानली जाते, त्याच पाठशाळेने "धातुपाठ समीक्षा" नावाचा ग्रंथ प्रकाशित केलाय, त्यातही "लभ्" शब्दाचा अर्थ प्राप्ती असाच घेतला असून त्यात हिॅसा किॅवा वध असा कुठेही घेतला नाही.
तरीही उदाहरणार्थ यजुर्वेदांतली एक ऋचा पाहु
ब्रह्मणे ब्राह्नणमालभते, क्षत्राय राजन्यम् !
नृत्याय सूतं, धर्माय सभाचरम् !
यजुर्वेद - ३०.६
ब्रह्मणे ब्राह्मणं आलभते - ज्ञानासाठी ज्ञानीला प्राप्त करतो.
क्षत्राय राजन्यं आलभते - शौर्यासाठी शूरपुरुषांस प्राप्त करतो.
नृत्ताय सूतं आलभते - नाचण्यासाठी सूतांस प्राप्त करतो किॅवा बोलवितो
धर्माय सभाचरं आलभते - धर्माज्ञानासाठी किॅवा धर्मासाठी धर्मसभेस किॅवा सदस्यास प्राप्त करतो.
त्यामुळे "आलंभन" शब्दाचा अर्थ वध किॅवा हत्या असा घेणं विकृतीचा कळस आहे. ह्याप्रमाणेच "गवालंभ" ह्या शब्दाचा अर्थही गाईस प्राप्त करणे असा असून तिची "हत्या" असा कुठेही होत नाही.
आता वर सांगितलेली ही यादी किती मोठी आहे ते आपण पाहु. मी हिॅदी आयुर्वेदिक कोषातली नावे दिली आहेत, ती खालीलप्रमाणे.
खालील आधी वेदांतील पशुंची नावे व नंतर त्याची तेच नाव असलेली आयुर्वैदिक औषधी दिलेली आहे.
पशुनाम - वनस्पती नाम
१. वृषभ - ऋषभस्कन्द
२. मेष - जीवशाक
३. श्वान - कुत्ताघास, ग्रन्थिपर्ण
४. कुक्कुट - शाल्मलीवृक्ष
५. मार्जार - बिल्लीघास, चित्ता
६. नर - सौगन्धिक तृण
७. मयूर - मयुरशिखा
८. मातुल - घमरा
९. बीछु - बीछुबूटी
१०. मृग - सहदेवी, इन्द्रायण, जटामासी, कपूर(कापूर)
११. सर्प - सर्पिणीबूटी
१२. पशु - अम्बाडा, मोथा
१३. अश्व - अश्वगन्धा, अजमोदा
१४. कुमारी - घीकुमार
१५. हस्ति - हस्तिकन्द
१६. नकुल - नाकुलीबुटी
१७. वपा - झिल्ली अर्थात बक्कल के भीतर का जाला
१८. हंस - हंसपदी
१९. अस्थि - गुठली
२०. मत्स्य - मत्स्याक्षी (मराठीत मत्स्याण्डी) हिचा उल्लेख रामायणात आहे ज्यावरून काही दीडशहाणे रामाला मांसाहारी म्हणतात) ?
२१. मांस - फल का गुदा, जटामासी (थोडक्यांत फळाचा किंवा वनस्पतीतला आतला गर)
२२. मूषक - मूषाकर्णी
२३. चर्म - बक्कल
२४. गो - गौलोमी
२५. स्नायु - रेशा
२६. महाज - बडी अजवायन
२७. नख - नखबूटी
२८. सिॅही - कटेली, वासा
२९. मेद - मेदा
३०. खर - खरपर्णिनी
३१. लोम - जटामासी
३२. काक - काकमाची
३३. ह्रद - दारचीनी
३४. वाराह - वाराहीकन्द
३५. पेशी - जटामासी
३६. महिष - महिषाक्ष, गुग्गुळ
३७. रुधिर - केशर
३८. श्येन - श्येनघंटी(दन्ती)
३९. आलम्भन - स्पर्श
जिज्ञासूंनी आयुर्वैदिक कोष मुंबई, किॅवा भावप्रकाश निघण्टु किॅवा इतर आयुर्वैदिक कोष पहावेत. प्रमाण मिळेल.
हे आहेत वनस्पती ! जर हा अर्थ घेतला नाही तर किती गोंधळ व अनर्थ होतो व झाला आहे, हे वेगळं सांगायची आवश्यकताच नाही.
शेवटी
नोsलुकोsप्यवलोकते दिवा किॅ सूर्यस्य दूषणम् !
तुकाराम चिंचणीकर
#पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
हिमोग्लोबिन हा रक्तातील अतिशय महत्त्वाचा घटक असून, तो ‘आयन’ (लोह) आणि ‘प्रोटीन’ (प्रथिने) यापासून बनलेला असतो. रक्तामध्ये 12 ते 14.5 मिली इतके हिमोग्लोबिनचे प्रमाण आवश्यक असते. मात्र अनेक जणांमध्ये हे प्रमाण कमी असल्याने ते एनिमियाच्या बळी पडतात. मग अनेकदा आयन आणि प्रोटीन वाढवण्यासाठी डॉक्टर गोळ्या देतात , मात्र त्याने तात्पुरते हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. पुन्हा हळूहळू हिमोग्लोबिन खाली जाते, अशावेळी तुमच्या सकस आहारातील काही पदार्थ नैसर्गिकरित्या तुमचे हिमोग्लोबिन वाढवतात पहा कोणते आहेत हे घटक…
१) पालक -
पालकचा तुमच्या आहारात समावेश असणे अत्यंत महत्वाचे आहे. पालकमुळे रक्तातील ‘आयन’ (लोह) वाढवण्यास मदत करते . सुप्स , भाजी ,पालक वडे , आमटी किंवा सलाड अशा कोणत्याही स्वरूपात पालक खाणे हितावह आहे. पालकवर लिंबू पिळल्याने त्यातील आयन (लोह) अधिक चांगल्याप्रकारे ग्रहण होते.
२) संत्र -
संत्र्यामधील व्हिटामिन सी आणि व्हिटामिन बी ६ रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करते . रोज किमान २ ग्लास संत्र्याचा रस प्या मात्र त्यात साखर टाकू नका.
3) दुध आणि दुग्धजन्य पदार्थ -
आहारात नियमित किमान ग्लासभर दुध व दुग्धजन्य पदार्थ असणं फार महत्त्वाचे आहे. दुधात शरीराला पूरक अनेक ‘मिनरल्स’( खनिजं )व ‘व्हिटामिन्स’ असल्याने दुधाला पूर्णान्न म्हणतात. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते.
4) खजूर
काळा आणि लाल अशा दोन स्वरूपात बाजारात खजूर उपलब्ध आहे. खजूर हे आयन (लोह) प्रमाणेच ‘व्हिटामिन सी’ व ‘व्हिटामिन बी’ वाढवण्यास मदत करते. खजुराच्या सेवनाने लाल रक्तपेशींची निर्मिती वाढते , परिणामी हिमोग्लोबिन वाढते.खजूर नुसताच खाण्याबरोबरीने त्यापासून तयार केलेली बर्फी , लाडू किंवा चटणी असे विविध पदार्थांमार्फत तुम्ही खजूर खाऊ शकता .
5) गूळ -
भारतीय स्वयंपाकघरात अगदी सहजतेने गूळाचा वापर केला जातो .आयुर्वेदात गुळाला ‘औषधीय शर्करा’ म्हणून संबोधलं जाते. गूळ लोह्वर्धक असून उत्तम स्वास्थ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. गूळाच्या नियमित सेवनाने रक्तातील हिमोग्लोबिन तर वाढते त्याचबरोबर शरीरात रक्ताचं प्रमाण वाढते आणि त्वरित उर्जा मिळते . दररोजच्या जेवणात साखरेऐवजी गूळ वापरणे अधिक हितावह आहे.
6) डाळींब -
शारीरिक स्वस्थ्याप्रमाणेच सौदर्य खुलवण्यासाठी डाळींबाचा प्रामुख्याने आहारात वापर केला जातो. डाळींबातील लोह्वर्धक व मुबलक प्रमाणात आढळणारे व्हिटामिन सी चे प्रमाण रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते. आठवड्यातून तीन ते चार वेळेस डाळींबाचा रस घेतल्यास तुमचे हिमोग्लोबिन नक्कीच वाढेल .
7) फरसबी
प्रोटीन, कॅल्शियम, आयन (लोह), सल्फर (गंधक), फॉस्फरस तसंच व्हिटामिन ‘ए’ असलेली फरसबी ही पोषकतेच्या दृष्टीने उत्तम भाजी आहे.यामधील फॉलिक अॅसिडमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे योग्य प्रमाण राखण्यास मदत होते. फरसबीची भाजी अथवा कोशिंबिरीत फरसबीचा वापर आठवड्यातून दोनदा केल्याने तुमचे हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात राहील.
8) मांसाहार -
शाकाहाराबरोबरीने मांसाहारानेदेखील तुमचे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवता येते . चिकन , मटण , अंडी , मासे यामधील व्हिटामिन ‘बी १२’ व व्हिटामिन ‘बी ६’ रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात. मात्र मांसाहार करताना ते योग्य प्रकारे शिजवा व योग्य प्रमाणात खा .
9) पिस्ता -
सुक्या मेव्यात व्हिटामिन ‘बी ६’ चे प्रमाण अधिक असते, मात्र विशेषतः ‘पिस्ता’ सर्वाधिक प्रमाणात शरीराला व्हिटामिन पुरवते. त्यामुळे लाडू , शिरा ,हलवा खीर यांसारख्या गोड पदार्थांमध्ये पिस्त्याचा वापर वाढवा. पिस्त्यातील व्हिटामिन ‘बी ६’ रक्तातील हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात राखण्यास मदत करतात.
10) गरम मसाला -
भारतीय खाद्यसंस्कृतीचे खरे वैभव आहे यामध्ये वापरले जाणारे ‘मसाले’ ! तुमच्या जेवणात तमालपत्र , कोथिंबीर , पुदिना , तुळशीची पाने यांचा योग्य वापर ठेवा . हे मसाले आहारातील ‘लोह’ योग्य प्रमाणात ग्रहण करतात त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण राखण्यास मदत होते.
-आरोग्य धनसंपदा
डिप्रेशन ही सध्या झपाट्याने वाढणारी जागतिक समस्या झाली आहे. खरंतर आम्हा भारतीयांच्या मनाला नैराश्याने स्पर्शही करायला नको. नैराश्यावर दोन रामबाण उपाय आपल्याकडे आहेत.
दात स्वच्छ न घासणे.
खाण्याच्या सवयी.
धुम्रपान.
पान मसाला चघळणे.
हिरड्यांचे संक्रमण (इन्फेक्शन).
दात किंवा जबड्याचे हाड मोडणे.
जीवनसत्त्व क आणि ड ची कमतरता.
कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे.
पाण्यात फ्ल्युओरीनचे प्रमाण जास्त असणे.
किडलेले दात.
काळजी.
दिवसातून दोनदा दात स्वच्छ करा - सकाळी (उठल्यावर) आणि रात्री (झोपण्यापुर्वी).
खाऊन झाल्यावर स्वच्छ पाण्याने गुळण्या करा.
योग्य दंतमंजन वापरा.
पौष्टिक अन्नाचे सेवन करा.
धुम्रपान टाळा, तंबाखू खाणे टाळा.
पांढरा ब्रेड वाईट आणि ब्राऊन ब्रेड चांगला ही आपली नेहमीची अंधश्रद्धा.
लवंगेचे तेल उर्फ क्लोव ऑइल हा दातदुखीवरचा सर्वात प्रभावी नैसर्गिक उपाय मानला जातो. लवंगेचे थोडे तेल काळ्या मिर्या्सोबत मिसळा व ते कापसाच्या बोळ्यावर घेऊन दुखणार्या दातावर ठेवा.
मोहरीच्या तेलाने देखील दातदुखी कमी होते. हे तेल व मिठाचे मिश्रण हिरडीच्या दुखर्या भागावर चोळा.
लिंबाच्या रसाच्या थेंबांनी देखील दातदुखी कमी करता येते.
दुखर्या दातावर किंवा हिरडीवर कांद्याचा ताजा कापलेला तुकडा ठेवल्याने ही दातदुखी कमी करता येते.
दातदुखीवर उपयोगी झाडपाल्याचे अर्क वापरून आपणही घरच्याघरी माउथवॉश बनवू शकता – कॅलेंड्युला (कॅलेंड्युला ऑफिसिनालिस), मर्र (कॉमिफोरा मर्रा), सेज (साल्विया ऑफिसिनालिस). बेसिल, मार्जोराम किंवा ऍसाफेटिडासारख्या इतर वनस्पतींचाही वापर ह्यासाठी करता येईल.
दुखर्यान दाताला बाहेरील बाजूने (गालावर) बर्फाचा खडा दाबून धरल्यानेही दातदुखीपासून थोडा आराम मिळू शकतो.
अचानक दातदुखी सुरू झाल्यास अति गरम, अति गार तसेच अति गोड पदार्थ खाणे कटाक्षाने टाळा अन्यथा दुखणे वाढेल.
आहाराच्या सवयी बदलणे, भाज्या तसेच फळे भरपूर प्रमाणात खाणे आणि विशेषतः जंक फूड न खाणे ह्याने दातदुखी टाळता येते.
योगा व प्राणायाम न करण्यासाठी दिली जाणारी कारणं.......
1) जॉब हेक्टिक आहे
( कुणाचा नसतो ?)
2) वेळच मिळत नाही
( सर्वांनाच 24 तास मिळतात !)
3) खूप काम असते
( रिकामटेकडा कोण असतो ?)
4) अभ्यास खूप असतो कॉलेजात
( काय दिवे लावणार आहात ?)
5) घरी जाऊन पण काम असते
( आम्ही पण कामं करतो !)
6) लग्न झालं आता
( मग काय नाचू ? सर्वांचीच होतात !)
7) मुलांच्या मागे धावण्यात वेळ जातो
( तेवढा योगा - प्राणायाम, व्यायाम पुरेसा वाटतो का ?)
8) आता कोण बघतंय आमच्याकडे ?
( मग घराबाहेर पडूच नका !)
9) मला गरजच नाही योगा-प्रणायाम, व्यायामाची
( सर्वात मोठा गैरसमज ...)
10) हे जिम , व्यायाम योगा-प्रणायाम मोठ्या लोकांची थेरं आहेत
( स्वतःला कमी समजायचंच कशाला ?)
11) योगा प्राणायाम क्लास ची फी परवडत नाही
( घरी करायला किती पैसे लागतात ?)
12) खूप ठरवतो , पण काही ना काही आडवं येतं
( अर्धा एक तास काढता येत नाही स्वतःसाठी ?)
13) घरी आल्यावर आराम करायचा की योगा-प्रणायाम करत बसायचं ?
( एक सिरीयल कमी पाहिलीत तर लगेच जीव जाईल का ?)
हुश्श !!!
यापेक्षा मोठी लिस्ट होईल.
मित्रांनो , कारणं खूप देता येतील. पण आज स्वतःमध्ये गुंतवणूक कराल तर पुढचं आयुष्य निरोगी जगाल. नंतर हा पैसा , मालमत्ता , हुशारी , कशाचाच उपयोग होणार नाहीय. तंदुरुस्त शरीर हीच सर्वात मोठि मालमत्ता आहे तेव्हा आतापासूनच स्वतःची काळजी घ्या.
उन्हाळा सुरु होत आहे, थंडगार आईस्क्रिम खाण्याची मजा काही औरच आहे! गार गार मस्तच! हे आईस्क्रीम युरोप मधून भारतात आले. युरोपमध्ये बाहेर बर्फ पडते आणि हे लोक आईस्क्रीम खातात. ह्याचे कारण आईस्क्रीम हे स्पर्शाने थंड असले तरी गुणांनी उष्ण आहे. त्यामुळे ते उष्णता निर्माण करते व थंडीचा त्रास होत नाही.
आपण उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ले की आपल्याला खोकला, घश्याला त्रास, जुलाब होतात. आपण थंडीत आईस्क्रीम खाल्ले तर त्रास होत नाही असा माझा ३० वर्षाचा अनुभव आहे. आम्ही थंडी मध्ये भरपूर आईस्क्रीम खातो. थंडीत दुकानात आईस्क्रीम पटकन मिळत नाही म्हणून मी बासुंदी फ्रिजर मध्ये ठेऊन कुल्फी करून खातो.
ह्या उन्हाळ्यात आईस्क्रीम खाऊच नका असे नाही पण एक पथ्य पाळा. जेवण झाले की लगेच (एक तासाचे आत) खा. म्हणजे त्याची उष्णता अन्न पचायला उपयोगी पडते व बाधत नाही.
अरविंद जोशी
९४२१९४८८९४
रोज वापरले जाणारे खाद्यपदार्थांतील भेसळ ओळखण्यासाठी काही खास टिप्स…
• दुध
दुधातील भेसळीच्या अनेक घटना ठिकठिकाणी घडत असतात. दुधात डिटर्जंट मिसळलं जातं किंवा दुधाच्या नावावर काही जण सिंथेटिक मिल्कही विकतात. ही भेसळ जीवावरही बेतू शकते. म्हणूनच ती ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. १० मिली. दूध तितक्याच पाण्यात एकत्र करा. त्यात फेस झाल्यास ती डिटर्जेंटची भेसळ आहे. तर, सिंथेटिक दूध चवीला वाईट असतं आणि ते उकळवताना त्याला फिक्कट पिवळा रंग येतो.
• लाल तिखट
रोज भाजी-आमटीला फोडणी देताना वापरल्या जाणाऱ्या लाल तिखटात विटेचा चुरा किंवा मीठ मिसळलं जातं. ही भेसळ ओळखणं अगदीच सोपं आहे. एक चमचाभर लाल तिखट ग्लासभर पाण्यात एकत्र करा. हे पाणी जर रंगीत झालं तर त्यात भेसळ आहे, असं समजा.
• पनीर
पनीरची भाजी आपण अगदी चवीनं, बोटं चाटून-पुसून खातो. पण या पनीरमध्ये स्टार्च मिसळून डेअरीवाले आपल्याला उल्लू बनवू शकतात. अशावेळी, पनीर घरी आणल्यानंतर ते थोड्याशा पाण्यात घालून उकळावं आणि थंड झाल्यावर त्यावर आयोडीन सोल्युशनचे काही थेंब टाकून त्याचा रंग तपासावा. पनीर जर निळं झालं, तर ते टाकून द्यावं किंवा दुकानात नेऊन ‘साभार’ परत करावं.
• मध
आपल्याकडचा मध शुद्ध आहे की नाही, हे तपासून पाहायचं असेल, तर कापसाची वात त्यात भिजवून पेटवून पाहावी. ती जर तेवत राहिली तर मध शुद्ध आहे. भेसळयुक्त मधात भिजवलेली वात सहजासहजी जळत नाही. ती तडतडते.
• खोबरेल तेल
खोबरेल तेलात बऱ्याचदा इतर तेलं मिसळून ग्राहकांची फसवणूक केली जाते. ही भेसळ ओळखण्यासाठी खोबरेल तेलाची छोटी डबी फ्रीजमध्ये ठेवावी. जे गोठेल ते खोबऱ्याचं तेल आणि बाकीची भेसळ.
• धने पावडर
आपल्या जेवणाला चव यावी आणि पोटदुखी वगैरे होऊ नये, म्हणून आपण धने पावडर आवर्जून वापरतो. पण त्यात लाकडाचा भुसा असेल तर? घाबरू नका. थोड्याशा पाण्यात धने पावडर शिंपडा. भुसा असेल तर तो पाण्यावर तरंगेल आणि आपल्या शंकेचं निरसन होईल.
• जिरं
जिऱ्यातील भेसळ ओळखायची असेल, तर थोडंसं जिरं तळहातावर घेऊन ते चोळावं. जर जिरं काळ पडलं तर ते भेसळीचे चिन्ह आहे.
• काळी मिरी
भेसळयुक्त काळी मिरी खूप चमकते आणि त्याला हलकासा रॉकेलसारखा वास येतो.
• सफरचंद
‘अॅन अॅपल ए डे, किप्स डॉक्टर अवे’, हे जरी खरं असलं तरी आपण जे चकचकीत सफरचंद खातोय त्याला मेणाने पॉलिश तर केलेलं नाही ना, हे पाहणं आजकाल अत्यावश्यक झालंय. त्यासाठी इतकंच करा की, ब्लेड किंवा पातळ सुरी हलकेच फळाच्या सालावरून फिरवा. पांढऱ्या रंगाचा काही पदार्थ ब्लेड-सुरीला चिकटला तर ते मेण असेल. असं सफरचंद सालं काढून खा किंवा फळवाल्याला परत करून टाका.
• हळद
आपलं रोजचं जेवण हळदीशिवाय होऊच शकत नाही. पण या हळदीत जर मेटानिल येलो हा घटक असेल तर तो कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतो. म्हणूनच हळद तपासून घेतलेली बरी. हळद पावडरमध्ये पाच थेंब हायड्रोक्लोरिक अॅसिड आणि पाच थेंब पाणी घालावं. त्याला जर वांग्याचा रंग आला, तर ही हळद कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते.
• हळकुंड
काही जण हळकुंड आणून, ती कुटून घरीच हळद पावडर तयार करतात. अशावेळी, हळकुंड पॉलिश केलेली नाहीत ना, हे तपासणंही सोपं आहे. एका कागदावर हळकुंड ठेवून त्यावर थंड पाणी ओतावं. हळकुंडाचा रंग गेल्यास ते पॉलिश केलेलं आहे, हे सहज कळू शकेल.
• दालचिनी
दालचिनी असली की नकली हे ओळखणंही कठीण नाही. दालचिनी हातावर रगडल्यानंतर जर तुमच्या हाताला रंग लागला, तर ती अस्सल दालचिनी समजावी.
• फ्रोजन मटार
सध्या फ्रोजन मटारची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. ते स्वस्तही पडतात आणि टिकतातही खूप. पण त्यात मेलाकाइट ग्रीन या घटकाचा समावेश असल्यासं पोटाशी संबंधित काही विकार होऊ शकतो. म्हणून आपण खरेदी केलेल्या मटाराचे थोडे दाणे थोड्याशा पाण्यात घालून ते ढवळावे. साधारण अर्ध्या तासानंतर त्याचा रंग पाहावा. पाणी रंगीत झालं, तर हे मटार न खाणंच श्रेयस्कर.
• चहा पावडर
चहा पावडरमध्ये वापरलेली चहा पावडर बेमालूमपणे मिसळली जाते किंवा अन्यही भेसळ होते. चहापत्ती थंड पाण्यात घातल्यानंतर रंग सोडत असेल तर त्यात भेसळ आहे, हे निश्चित!
Copyright © 2025 | Marathisrushti