वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मांसाहारी प्राण्यांची आणि शाकाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली. मांसाहारी म्हणजे कार्निवोरस, जे फक्त मांसच खातात. शाकाहारी म्हणजे हर्बीवोरस. ज्यांचे मुख्य अन्न, शाक म्हणजे पालाच आहे.
शाकाहारी प्राण्यांच्या जवळपास जाणारी आणखी एक जमात अस्तित्वात आहे, तिला फ्रूगीवोरस म्हणतात. ही जमात फळे, धान्य, धान्याच्या बीया आणि पाला हे सर्व खाते. पण ज्यांचे मुख्य अन्न, धान्य आणि बीया हे आहे. हे फ्रूगीवोरस हर्बीवोरसच्या जवळचे असतात. पण थोडा फरक असतो.
हर्बीवोरस प्राण्यांचे पचन थोडे वेगळे असते. यांची आतडी ही इतर दोन प्रकारांपेक्षा मोठी असतात. शरीराच्या उंचीच्या किंवा लांबीच्या सर्वसाधारणपणे बावीस ते चौवीस पट मोठी असतात. पाल्यामधे असलेले घटक पचवण्यासाठी ही आतडी मोठी असणे, पचन सावकाश होणे, आवश्यक असते. त्यामुळे या प्राण्यांनी भराभरा खाल्लेले अधिक रेषायुक्त पाल्याचे अन्न सावकाश पुढे सरकते, आणि नंतर पुनः हे अन्न तोंडात आणून रवंथ केले जाते. पाल्यामधे अल्प प्रमाणात असलेला पिष्टमय पदार्थ पचवायला आवश्यक लाळ यांच्या तोंडात तयार होते. यामधे पिट्यूलीन हे एन्झाईम असते.
हे एन्झाईम फ्रूटीवोरस जमातीमधे त्याही पेक्षा जास्त आढळते. यांची आतडी ही हर्बीवोरसपेक्षा थोडी लहान पण कार्निवोरसपेक्षा मोठ्ठी असतात. शरीराच्या तुलनेत आतडी साधारणपणे बारा पट मोठी असतात. आणि कार्निवोरसची आतडी शरीराच्या लांबीच्या तुलनेत फक्त चार पट एवढी लहान असतात. अन्न लवकरात लवकर पचून बाहेर पडून जावे, यासाठीची त्याने केलेली रचना आहे.
यांच्या लाळेमधील पिट्यूलीन मात्र जास्त असते, कारण यांचा मुख्य आहार धान्य, बीया, फळे इ. म्हणजे पिष्टमय पदार्थ आहे.
या फ्रूटीवोरसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, एकदा अन्न चावून, बारीक करून, वरून खाली ढकलले की, पचनाची जबाबदारी संपली. पचनासाठी नंतर विशेष कष्ट घ्यावे लागत नाहीत.
जसे, वाघ सिंहा सारखे मांसाहारी प्राणी खाल्लेले मांस पचवण्यासाठी गडाबडा लोळतात, किंवा अजगर झाडाला विळखा घालून अंगाचे बऱ्याच वेळा आकुंचन प्रसरण करतात. तसे फक्त पाला खाणारे हर्बीवोरस करत नाहीत, पण यांना पचनाला मदत करण्यासाठी रवंथ मात्र करावेच लागते.
ही त्याने स्वतःची बुद्धीमत्ता वापरून केलेली रचना आहे.
बाय डिफाॅल्ट प्रोग्राम ने फिक्स झालेली.
यातील एकही प्राणी आपली जीवनपद्धती बदलत नाही. म्हणून यांचे अस्तित्व आजही टिकून आहे.
या तीनही प्रकारच्या प्राण्यांच्या शरीराचा आतून बाहेरून विचार केल्यास, स्वभावगुणांचा विचार केल्यास, निर्माण होणाऱ्या स्रावांचा विचार केल्यास, बुद्धी नावाची चीज जरा जास्ती दिली आहे, तो माणूस नावाचा प्राणी कोणत्या गटात येतो. हे आपणच ठरवावे.
कोणाला काय आणि किती द्यायचे हे देणारा ठरवित असतो.
त्याच्याकडे जे आहे, त्यापेक्षा अधिक तर कोणीच देऊ शकत नसतो.
देणाऱ्या पेक्षा घेणारा हा जर, स्वतःला जास्ती बुद्धिमान समजायला लागला, तर देणारा,
"भोग आपल्या कर्माची फळे" असे म्हणत असतो.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
30.09.2016
September 30, 2016
मदनलाल याने त्याचा पहिला कसोटी सामना 6 जून 1974 मध्ये इंग्लंडविरुद्ध मॅचेस्टर येथे खेळला होता. ह्या सामन्यात त्याने 31 षटकात 56 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर तो 1977-78 पर्यंत म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या टूरपर्यंत भारतीय संघाचा भाग होता.
September 14, 2021
शकीरा च्या स्पॅनिश गाण्यांची एक डीवीडी आमच्या जहाजाच्या मेस रूम कम स्मोक रूम मध्ये होती. मेस रूम कम स्मोक रूम कारण बहुतेक जहाजांवर या दोन्ही रूम्स वेगवेगळ्या असतात
November 20, 2019
आचार्य अत्रे हे तर संस्थेचे सदैव हितैषी राहिले. संस्थेबद्दल त्यांनी ८ जानेवारी १९६७ रोजी ‘‘ह्य़ाच संस्थेने माझ्या साहित्यिक जीवनाचा पाया घातला. संस्थेचे उपकार मानण्यास मजजवळ शब्द नाहींत. पुण्यातील वाङ्मयप्रेमी तरुणांना स्फूर्ति नि प्रेरणा देण्याचे महान कार्य ह्य़ा संस्थेकडून होवो ही इच्छा!’’ असा अभिप्राय लिहिला आहे.
February 7, 2022
विनायकानं स्वतःच्या मनाला बजावलं आणि पाठून ढकललं गेल्यानं जाणारा तोल सावरला आणि प्राणांतिक यातना हसत सहन करत कसाबसा बोटीतून होडक्यात आणि होडक्यातून हिंदुस्थानच्या दक्षिण भूमीवर उतरला .
कसंबसं स्वतःला सावरत ,खाली वाकून हिंदुस्थानच्या भूमीवरची माती भाळावर लावली .
June 5, 2023
नगटाच्या हाडाजवळ दुखणे ही एक सहजसामान्य तक्रार असते. त्यात हे दुखणे नजरेसमोर असल्याने आणि रोजच्या कामात व्यत्यय आणणारे असल्याने रुग्णांच्या लवकर लक्षात येते. मनगटाचा सांधा पिचल्यानंतर योग्य बसविला न गेल्यास रेडीयस या हाडाची लांबी कायमची कमी होते. सांध्याची हालचाल पूर्वीपेक्षा कमी होते व सांध्याची रचना बदलल्याने होणाऱ्या अयोग्य हालचालीमुळेही हा सांधा दुखू लागतो.
May 8, 2023
आय आय टी पवई ही संस्था तंत्रज्ञान शिक्षण आणि संशोधन ह्या बाबतीत जगामध्ये पथदर्शी म्हणून ओळखली जाते. येथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या अत्यंत प्रतिभाशाली पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांमुळे ह्या संस्थेकडे देशातील उत्तम विध्यार्थी आकर्षित होतात. संस्थेतील संशोधन व क्रमिक अभ्यासक्रम हा दर्जेदार प्राध्यापकांकडून केला जातो. ह्या पैकी बरेच प्राध्यापक हे जागतिक स्तरावर नावाजलेले आहेत.
March 10, 2022
पंडित नेहरूंचे लहान मुलांवर अतिशय प्रेम होते. पडिंत नेहरू यांनी लहानमुलांच्या शिक्षणावर आणि संभाळावर अधिक भर दिला होता. लहान मुले म्हणजे देशाचे भविष्य असे ते म्हणत.
November 14, 2021
सडसडीत व किडकिडीत यामधला फरकही समजून घेणे आवश्योक असते. सर्व बांधा सुदृढ व मनुष्य आकारात असणे, शरीराच्या कुठल्याही भागावर अवाजवी चरबी साठलेली नसून उंची व वजन यांचे प्रमाण उचित असून चालणे, पोहणे, काम करणे वगैरे सर्व क्रियांमध्ये चपळता असणे म्हणजे सडसडीत असणे. पण उंची जास्त व त्यामानाने वजन कमी असणे, शरीरावयवांना योग्य तो आकार नसणे व अशा व्यक्तीसला पाहिल्यावर आपण काडी/काठी पाहतो आहोत असा भाव मनात येणे म्हणजे किडकिडीत असणे.
दिवसातून दोन वेळा व्यवस्थित जेवण, सकाळची न्याहारी, मध्ये एखाद्या वेळी काहीतरी तोंडात टाकणे असे नियमात राहून स्वतःच्या प्रकृतीला मानवणारा आहार घेत राहिले तर सहसा कुठल्याही प्रकारचे आजार येत नाहीत, वजनही बरोबर राहते व शरीरही सडसडीत राहते. परंतु वजन वाढेल अशी भीती मनात असली तरी वजन कमी होते. वजन वाढेल या भीतीपायी शरीराला शक्तीय देण्यास समर्थ असलेले दूध, तूप, लोणी, साखर यांसारखे घटक बंद केले तर नुसतेच वजन उतरत नाही, तर शरीराची शक्तीम कमी होते. शक्तीा कमी व्हायला लागली, शरीराचे एकूणच असंतुलन सुरू झाले की शरीरातील हॉर्मोन्सचे असंतुलन होते व त्याचेही अनेक त्रास होऊ लागतात. त्याउलट अति खाण्याची, अति झोपण्याची, आळसात वेळ घालविण्याची सवय असली तर वजनाचा काटा प्रमाणाबाहेर झुकू लागतो, त्यातही नितंबांवर, मांड्यांवर, दंडावर, पोटावर अशा चुकीच्या ठिकाणी चरबी वाढल्याने वजन वाढू लागते.
न पचणारे नकोच
स्त्रियांचा मासिक धर्म जोपर्यंत व्यवस्थित चालत असतो तोपर्यंत सहसा वजन वाढत नाही, पण मासिक धर्मात काहीही असंतुलन झाले (उदा. एकच दिवस अंगावर जाणे वगैरे) तर त्याचा परिणाम वजन वाढण्यात, त्वचा काळपट व रुक्ष होण्यात होऊ शकतो. वयाच्या एका विशिष्ट मर्यादेनंतर शरीराचे धर्म पाळत असतानासुद्धा पोट व ओटीपोट येथे चरबी वाढण्याकडे प्रवृत्ती असते. याचा संबंध केवळ अन्नसेवनाशीच असतो असे नाही.
आईवडिलांकडून आलेल्या गुणांमुळे ज्यांच्या प्रकृतीचा कल वजन वाढण्याकडे असतो त्यांचे किंवा बुटक्यां व्यक्तीुचे शरीर भरायला लागले तर ते चांगले दिसत नाही. असे वजन कमी करण्याचीच आवश्ययकता असते. पण या उलट मनुष्य फार किडकिडीत झाल्यास (वंशपरंपरेने असो वा इतर कारणांमुळे असो) त्याचे वजन वाढवणे आवश्यिक असते. यासाठी कायम शरीराला सिद्ध तेलाचा अभ्यंग आवश्य्क असतो. स्त्रीने आपला मासिक धर्म व्यवस्थित आहे याकडे लक्ष ठेवावे (तो नीट नसल्यास आयुर्वेदाच्या तज्ज्ञांकडून प्रकृती तपासून घेऊन योग्य ते औषधोपचार सुरू करावेत). शरीर किडकिडीतेकडून सडसडीतेकडे नेण्यास याचा उपयोग होतो. अमुक गोष्ट खाऊन वजन वाढते व तमुक गोष्ट खाऊन वजन कमी होते या वक्त व्याला फारसा अर्थ नसतो. कुठलीही गोष्ट खाऊन अपचन झाले की वजन नक्की वाढते. न पचणाऱ्या गोष्टी खाल्ल्या, सातत्याने रात्री उशिरा जेवले तर मात्र वजन नक्की वाढते. पण असे वाढलेले वजन असंतुलनाला व रोगाला कारणीभूत ठरत असल्यामुळे या वजनाचा काही उपयोग नसतो.
किडकिडीत असणाऱ्या व्यक्तीरला शरीरसौष्ठव प्राप्त व्हावे यासाठी अभ्यंगाचा उपयोग होतो, तसेच स्वतःच्या प्रकृतीला जाणून त्यानुसार योग्य आहार घ्यावा. सकाळी न्याहारीच्या वेळी कुठलातरी गरम ताजा पदार्थ, दुपारच्या वेळी भरपूर जेवण, रात्री अल्पाहार म्हणजे दूध-भात, सूप, एखादी-दुसरी पोळी असा एकूण आहार ठेवल्यास वजन वाढायला मदत होते.
वजन वाढण्यासाठी आवश्य क असणाऱ्या धातूंची पुष्टी होण्यासाठी त्यानुसार धातुवर्धक अन्नसेवन आवश्याक असते, पण त्यासाठी व्यक्ति्गत मार्गदर्शन आयुर्वेदाच्या डॉक्टेरांकडून घेणे व त्यानुसार आहार ठेवणे आवश्यसक असते. याचे मार्गदर्शन आयुर्वेदिक डॉक्टदरांकडून अशासाठी, की आयुर्वेदाचा एकूण आहारासंबंधी दृष्टिकोन संपूर्ण वेगळा असतो, प्रकृतीनुसार तसेच पचनशक्ती्ला साजेसा आहार सुचविलेला असतो.
शरीर किडकिडीत नसावे, सडसडीत असावे अशा दृष्टीने वजन वाढविण्याची इच्छा असणाऱ्यांना व्यायामही आवश्यषक असतो. स्थूल व्यक्तींवना वजन उतरविण्यासाठी व्यायामाची आवश्य कता असते अशी समजूत अनेक वेळा असलेली दिसते. पण वजन वाढविण्यासाठीसुद्धा व्यायामाची गरज असतेच. अशा व्यक्तीं नी योगासने, प्राणायाम करणेही आवश्याक असते. फुफ्फुसांमध्ये प्राणवायू जेवढा अधिक स्वीकारला जाईल तेवढे शरीर सुदृढ व चांगले होते. योग करण्याने शरीरातील संप्रेरकांचे संतुलन व्यवस्थित राहिल्यामुळेही वजन व्यवस्थित वाढते. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून त्यानुसार आचरण केले, तर किडकिडीत न राहता सडसडीत राहायला मदत होईल, शरीराचा आकार व सौष्ठव चांगले राहून शरीर आकर्षक होऊ शकेल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- balaji tambe
January 8, 2017
आयपीएल अर्थात इंडियन प्रिमियर लीगला सुरूवातीला खूप वाहवा मिळाली. पण, ललित मोदी आणि शशी थरूर यांच्यातील वादानंतर आयपीएलचे खरे स्वरूप लोकांसमोर आली. त्या आधी आयपीएलकडे व्यवस्थापन विद्यार्थ्यासाठी आदर्शभूत मॉडेल म्हणून पाहिले जाऊ लागले होते. पण, भ्रष्टाचाराच्या आगीत या व्यवस्थापनाचा बट्ट्याबोळ झाला.
April 21, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti