वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कोरफड कुंडीत सहज लागते व थोड्याशा पाण्यावरही झपाट्याने वाढते. कोरफडीचा गर रोज सेवन करण्याचे; तसेच बाहेरून लावण्याचे अनेक फायदे आहेत. यकृताची कार्यक्षमता उत्तम राहण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कोरफडीसारखे उत्तम औषध नाही. कोरफडीचा चमचाभर गर छोट्या कढईत मंद आचेवर गरम करून त्यावर चिमूटभर हळद टाकून घेणे यकृतासाठी हितावह असते. याप्रमाणे काही दिवस नियमाने कोरफड घेतल्यास भूक चांगली लागते व शौचास साफ होण्यासही मदत मिळते.
रोज सकाळी कोरफडीचा चमचाभर गर घेण्याने स्त्रियांच्या बाबतीत पाळी नियमित येण्यास मदत मिळते. अंगावरून कमी रक्तयस्राव होत असल्यास किंवा पाळीच्या वेळेला गाठी पडून वेदना होत असल्यास कोरफडीचा गर घेणे उपयोगी ठरते. शरीरावर कोठेही भाजले असता कोरफडीचा गर लावल्याने दाह कमी होतो व फोड वगैरे न येता त्वचा पूर्ववत होते. मूळव्याधीमुळे वेदना होत असल्यास किंवा आग होत असल्यास त्यावर कोरफडीचा नुसता गर ठेवण्याने बरे वाटते.
कोरफडीचा ताजा गर न्हाण्यापूर्वी केसांना लावून ठेवण्याने केस निरोगी राहण्यास मदत मिळते; तसेच कंडिशनिंग होते. त्वचेवरही कोरफडीचा गर लावल्याने त्वचा मऊ व सतेज राहण्यास मदत मिळते.
संगणकावर वा इतर कोणत्याही प्रखर प्रकाशाकडे पाहण्याने डोळे थकले, लाल झाले वा डोळ्यांची आग होऊ लागली, तर कोरफडीच्या गराची चकती बंद पापण्यांवर ठेवण्याने लगेच बरे वाटते. चकती ठेवणे अवघड वाटले, तर गराची पुरचुंडी करून डोळ्यांवर वारंवार फिरविण्याने बरे वाटते. याप्रमाणे कोरफडीचे एकाहून एक उत्तम उपयोग असल्याने आजकाल कोरफडीचा गर बाटलीत भरून विकायला ठेवतात; पण टिकण्याच्या दृष्टीने यात प्रिझर्वेटिव्ह्ज टाकली आहेत का हे बघावे लागेल व कोरफडीतील एखादे तत्त्व नष्ट झाले आहे का हेही पाहावे लागेल. त्यापेक्षा घरी कोरफड लावली, तर घरच्या घरी कोरफडीचा ताजा गर सहज मिळू शकतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे, फास्ट फूड व बेकरीचे पदार्थ खाण्याचं प्रमाण तरुणांमध्ये व मुलांमध्ये वाढलेले दिसते,बरेच पालक मुलांना टिफीन मध्ये जंक फूड देतात व त्यामुळे काय होते:-
१. लठ पणा वाढतो
२. रक्तदाब वाढू शकतो
३. याचा परिणाम किडनी वर होऊ शकतो
४. आजकल काही तरुण मंडळी व्यायाम करतात,जिममध्ये जातात कारण त्यांना आपली शरीरयष्टी बलदंड करावयाची असते,चांगली गोस्ट आहे.
परंतु डॉक्टरांचा सल्ला न घेता प्रोटिन्स सप्लिमेंट व स्टिरॉइड्स चे सेवन करतात.याचा परिणाम किडनी निकामी होण्यावर बेतू शकतो
५. किडनी निकामी होण्याचे मुख्य कारण --- लठ्ठपणा.
६. वजन वाढल्यामुळे किडनीवर ताण पडतो
७. त्यामुळे किडनीविषयक समस्या निर्माण होतात
८. कालांतराने किडनीचे कार्यक्षमता कमी होते
९. मधुमेह आटोक्यात ठेवला नाही तर त्याचा परिणाम किडनीवर होऊ शकतो
१०. गेल्या सात आठ वर्षात लठ्ठपणा व किडनीच्या समस्यांचं प्रमाण दुप्पट झाल्याचे दिसून येते
११. याची प्रमुख कारणे -
व्यायामाचा अभाव
असंतुलित आहार
सुदृढ जीवनशैलीचा अभाव
जंक फूड खाण्याचे वाढलेले प्रमाण
तेव्हा किडनी हा अतिशय महत्वाचा अवयव आहे.किडनी शिवाय आपण जगू शकत नाही.तीला जपा.जपणे तुमच्या हातात आहे.आपल्या किडनिज नॉर्मल आहेत कि नाही त्याची तपासणी करू शकता
प्रा वसंत पाटील
9371629799
९ मार्च,२०१७
पूर्ण विश्रांती हाच साध्या तापावरचा परिणामकारक उपाय आहे. पण आपल्या धावपळीच्या जीवनात आपण ताप घालवायला औषधे वापरू लागलो. आपली प्रतिकारशक्ती कमी होत चालली आणि विषाणू मात्र अधिकाधिक प्रबल होत चालले आहेत. त्यामुळे अँटिबायोटिक्सणचा वापरही वाढला आहे. ताप हा खरे तर तापदायक नाही. तो आपल्याला आजाराविषयी सावध करणारा आहे. त्यामुळेच औषधाने ताप दडपून टाकण्याऐवजी त्यामागची कारणे शोधायला हवीत.
पूर्वी पावसाळ्यात सर्दी-तापाच्या रुग्णांत वाढ व्हायची. सर्दी असली की अंगात थोडी कसकस असायची. काही वेळा तापही अंगात असायचा. पण त्याचे काही वाटायचे नाही. साध्या पॅरासिटामॉलने रुग्ण बरे व्हायचे. तुळशीची पाने टाकून गरम पाण्याचा वाफारा आणि सुंठीचा काढाही सर्दीच्या रुग्णांना पुरायचा. पण गेल्या काही वर्षांत आम्हाला तापही तापदायक वाटू लागलाय. प्रदूषण वाढले आहे. व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहारपद्धती यामुळे आपली प्रतिकारशक्तीही कमी होते आहे. या पार्श्वयभूमीवर विषाणू मात्र दिवसेंदिवस साध्या औषधांना न जुमानण्याची क्षमता मिळवत आहेत. त्यामुळे बहुतेक रुग्णांना साध्या औषधाने बरे वाटले नाही, तर अँटिबायोटिक्स् देण्याची वेळ येते. पूर्वी ताप आल्यावर कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवायला सांगत होतो. आता त्याचबरोबर छातीवर व पोटावरही पट्टी ठेवायला सुचवत आहोत.
वास्तविक ताप हा "आजार' नाही, तर ते केवळ आजाराचे एक लक्षण आहे. बहुतेक आजारांमध्ये कमी-जास्त प्रमाणात ताप येतच असतो. तापामध्ये सगळ्याच शारीरिक व्यवहारांवर बंधन येत असल्यामुळे "काहीही करून प्रथम ताप कमी करा' अशी मागणी केली जाते.
ताप येणे चांगले की वाईट? तापामुळे आपल्या एखाद्या अवयव संस्थेची कायमस्वरूपी हानी होऊ शकते का?
"ताप' येतो म्हणजे काय?
आपल्या शरीराचे तापमान साधारणपणे 36.8 डिग्रीज सेल्सिअस एवढे असते. त्यात थोडा फरक पडत राहतो. हे तापमान आपल्या शरीरातील हजारो रासायनिक क्रिया कार्यक्षमतेने चालण्यासाठी आवश्याक असते. तापमान वाढले तर या क्रिया अधिक वेगाने होतात. तापमान कमी झाले तर त्या संथावतात. हे तापमान शरीरात उष्णता निर्माण होणे आणि शरीरातून उष्णता बाहेर पडणे या दोन गोष्टींवर अवलंबून राहते. उष्णता अधिक निर्माण झाली किंवा बाहेर टाकण्याची क्रिया संथावली की शरीर अधिकाधिक गरम होते. उलटे झाल्यास शरीर थंड होऊ लागते. तापमान 36.8 एवढे ठेवण्याकरिता आपल्या मेंदूतील हायपोथॅलॅमस हा भाग अहोरात्र कार्यरत असतो. आपल्या त्वचेत उष्णता आणि थंडी यांना जाणणारे स्वीकारक असतात. शिवाय हायपोथॅलॅमसला रक्तपुरवठा होत असतो. त्या रक्ताचे तापमानही हायपोथॅलॅमसच्या पेशींवर परिणाम करते. आपण थंड वातावरणात गेलो की त्वचेतील स्वीकारकाकडून ही माहिती हायपोथॅलॅमसकडे जाते. आता शरीर गरम करण्याची वेळ आहे, असा निर्णय मेंदूत घेतला जातो. मेंदूतून सर्व शरीरावरच्या त्वचेकडे संदेश पाठविले जातात. त्वचेतील रक्तवाहिन्यांचे आकुंचन होते व रक्त अंतःस्थ अवयवांकडे वळवले जाते. त्वचेला रक्तपुरवठा कमी झाला की त्वचेतील पेशी गार होतात. हात, पाय, नाक व इतर उघडे भाग गार होतात. ही माहिती परत मेंदूकडे जाते व अधिक उष्णतेची गरज पडते. त्वचेवरील केस उभे केले जातात. त्यामुळे त्वचेभोवती हवा हलत नाही. तेथे हवा स्थिरावते. त्यामुळे हवेचे एक लपेटणे तयार होते. शरीरातून उष्णता बाहेर पडण्याला एक अडथळा निर्माण होतो. एवढ्याने न भागल्यास मेंदूकडून शरीराच्या विविध स्नायूंना इशारा मिळतो. स्नायूंचे आकुंचन-प्रसरण होते. त्यालाच आपण हुडहुडी भरणे असे म्हणतो. जबड्याचे स्नायू कार्यान्वित झाले म्हणजे वरचे दात व खालचे दात एकमेकांवर आपटू लागतात. हाताप
ायांचे स्नायू आलटूनपालटून आकुंचन पावू लागले की अंग कापू लागते. पाठीचे स्नायू कापताना आपल्याला दिसत नाहीत, परंतु ते या प्रक्रियेत मोठा भाग घेतात. ताप येऊन गेल्यावर पाठ दुखत राहते. नाडीची गती वाढते. रक्ताचे अभिसरण अधिकाधिक होते. कवटीच्या आजूबाजूचे स्नायू आकुंचित झाल्याने व रक्तवाहिन्यांचे प्रसरण झाल्याने डोके दुखू लागते. ताप हा आपल्या प्रतिकारशक्तीचा एक महत्त्वाचा भाग असतो. ज्या रासायनिक क्रिया जंतूंना नामोहरम करतात त्या अधिकाधिक वेगाने होऊ लागतात. साधारणपणे दर एक डिग्री सेल्सिअस इतके तापमान वाढल्यास 13 टक्के अधिक कार्यक्षमतेने या रासायनिक क्रिया होऊ लागतात, असा अंदाज आहे. प्रतिकाराचा भाग असल्याने ताप येणे हा युद्ध अथवा पलायन या प्रतिसादात भाग घेतो.
तापमान स्थिर कसे राहते?
शरीराची उष्णता त्वचेद्वारा बाहेर टाकण्याच्या दोन पद्धती अशा-
1) उष्णता वाहून नेणे (संवहन) ः आपल्या त्वचेचा उघडा भाग एखाद्या कमी तापमानाच्या वस्तूच्या संपर्कात असेल तर शरीराकडून त्या वस्तूंकडे उष्णतेचे वहन होते. उदाहरणार्थ, आपण खुर्चीवर बसलेले असू तर शरीरातील उष्णता खुर्चीकडे वाहून जाईल.
2) घाम येणे ः शरीरात उष्णता वाढल्यावर घाम येतो. त्याचे बाष्पीभवन होऊन त्वचेचे तापमान कमी होते. त्वचेचे तापमान कमी झाले की आतली उष्णता रक्ताद्वारा त्वचेपर्यंत आणली जाते. त्वचेतील रक्तवाहिन्यांतला रक्तप्रवाह वाढतो आणि अधिकाधिक रक्त त्वचेपर्यंत पोचून उष्णता बाहेर टाकली जाते. एवढ्या साऱ्या यंत्रणा कार्यरत असताना शरीराचे तापमान वाढून ताप का येतो?
ताप म्हणजे काय?
शरीराचे तापमान एका विशिष्ट मर्यादेच्या बाहेर जाणे म्हणजे ताप होय. साधारणपणे केव्हाही शरीरातील चयापचयाचा वेग वाढला की शरीरात उष्णता वाढते (उदा.- व्यायाम केल्यावर किंवा अति तणावपूर्ण मनःस्थिती, इत्यादी) पण रूढार्थाने ज्याला ताप म्हणतात तो हा नव्हे. कारण यात उष्णता शरीराबाहेर टाकली जात असते आणि तापमाननियंत्रक यंत्रणा योग्य पद्धतीने कार्य करत असते. सर्वसाधारणपणे येणारे ताप विषाणू किंवा जीवाणू यांच्यामुळे येतात. या जीवाणू-विषाणूंचे काही भाग शरीरात गेल्यावर त्यांना नष्ट करण्याची क्रिया सुरू होते. अनेक जीवाणू दूषित रासायनिक रेणू तयार करतात, त्यांना एण्डोटॉक्सिुन्स म्हणतात. या एण्डोटॉक्सिषन्सचा अतिसूक्ष्म डोसदेखील माणसाला ताप आणवू शकतो.
आपल्या शरीरातील प्रतिकारशक्तीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सायटोकाइन्स नावाचे सूक्ष्म प्रथिनांचे रेणू. आपल्या शरीरातील प्रतिकारशक्तीमध्ये हे रेणू महत्त्वाची भूमिका बजावतात. सायटोकाइन्सचे बरेच प्रकार असतात, परंतु शरीरात ताप आणविण्याच्या प्रक्रियेत हे रेणू खूप महत्त्वाची कार्ये करतात. टायपोथॅलॅमसमधील तापमानावर ताबा ठेवणाऱ्या यंत्रणेवर सायटोकाइन्सचा परिणाम होतो व शरीराचे तापमान वाढविले जाते. ताप हा प्रतिकाराचा महत्त्वाचा भाग असल्याने तो काहीही करून उतरविण्याच्या उपचारांचा अधिक विचारपूर्वक वापर करणे इष्ट असते. ताप बहुतेक वेळा विषाणूंमुळे येतो. तो निसर्गक्रमाने आपोआप उतरणारा असतो. दर तापामध्ये ताप उतरवण्यासाठी औषध घेणे आवश्योक नसते, इष्ट नसते. साध्या तापावर तीन दिवस पूर्ण विश्रांती हाच अधिक परिणामकारक उपाय आहे.
ताप उतरवण्यासाठी दिलेल्या औषधाने तापाचा नैसर्गिक चढउतार आखला जातो, त्याप्रमाणे तापाच्या कारणाचे निदान अस्पष्ट केले जाते. या उपचारांनी खूप घाम सुटतो. त्यामुळे शरीरातून पाणी व क्षार यांचा निचरा होतो. थकवा वाढतो. औषधांचा परिणाम उतरला की परत ताप भरतो. दर वेळी ताप भरताना स्नायूंचे आकुंचन होते. ऊर्जा वाया जाते.
स्नायू दुखतात. थकवा पुन्हा वाढतो. आजार जाणे महत्त्वाचे असते, परंतु ताप उतरण्याने आजार तसाच राहिलेला असतो. शिवाय या ताप उतरवण्याच्या औषधांना नको असणारे अनेक परिणाम असतात. बहुतेकांच्या जठराच्या अस्तराचा दाह होतो. आम्लपित्त (ऍसिडिटी) वाढते. काहींना यकृताच्या पेशींवर अपायकारक परिणाम होऊन कावीळ होते. अनेकांचा मूत्रपिंडावर परिणाम होऊन शरीरात सोडिअम क्षार साचू लागतो. परिणामी, रक्तदाब वाढतो. हृदयावर ताण येतो. अंगावर सूज येते. ऍस्पिरीनसारख्या औषधाने रक्तस्राव होण्याचा संभव निर्माण होतो. शिवाय ऍस्पिरीनमुळे लहान मुलांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण धोकादायक पातळीवर उतरू शकते. नेम्युलसीड हे जगभर बंदी असलेले औषध फक्त भारतातच मिळते. भारतात बारा वर्षांखालील मुलांना हे औषध देण्यास बंदी आहे. मात्र खरे तर ते वापरूच नये.
तापामध्ये भरणारी थंडी (चिल)
तापमाननियंत्रक यंत्रणेचा "स्थिरबिंदू' अचानक वर जातो; पण शरीराचे तापमान मात्र हळूहळू वाढते. दरम्यानच्या काळात रक्ताचे तापमान "स्थिरबिंदू'पेक्षा कमी असते. "स्थिरबिंदू'चे तापमान जास्त आणि रक्ताचे कमी, अशा स्थितीमुळे चेतातंतूंना थंडीचा आभास होतो. त्यामुळे रुग्णाला खूप थंडी वाजते. अशी थंडी कोणत्याही तापात वाजू शकते. थंडी वाजून येणारा ताप हा युरीन इन्फेक्शंनचाही असू शकतो.
हुडहुडी (रायगर्स)
कधी कधी- विशेषतः तापामध्ये "स्थिरबिंदू' वाढल्यामुळे ताप येतो. स्थिरबिंदूवर असतानाच घाम येऊन ताप कमी होतो. अचानक तापमान कमी होऊ लागते. मग तापमान एका विशिष्ट मर्यादेखाली जाऊ नये याकरिता स्नायूंवरील तणाव अचानक वाढतो आणि स्नायूमध्ये उष्णता निर्माण होते. शरीरात उष्णता काही प्रमाणात राहावी यासाठी ही क्रिया शरीराकडून वारंवार केली जाते. त्यालाच आपण हुडहुडी म्हणतो.
ताप चांगला की वाईट?
यावरून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे ताप हा रोग नाही, तर रोगाचे एक लक्षण आहे. ते आपल्याला सांगते, की कुठेतरी काहीतरी गडबड आहे. जोपर्यंत ही गडबड, म्हणजे तापाचे कारण सापडत नाही, त्यावर उपचार होत नाहीत, तोपर्यंत फक्त ताप उतरवण्यासाठीच्या औषधांसारखे (उदा.- "क्रोसिन') उपाय म्हणजे फक्त वरवरची मलमपट्टी आहे. (जरी तापामुळे आपल्या शारीरिक दिनक्रमांवर मर्यादा येत असली तरी ताप दडपून टाकण्यासाठी डॉक्टतरांवर दडपण आणणे उपयोगाचे नाही. कारण ताप कमी झाला म्हणजेच रोग कमी झाला, असे नव्हे) किंबहुना कित्येकदा तापाच्या पॅटर्नवरून रोगाचे निदान होण्यास मदत होते. उदाहरणार्थ (1) "संध्याकाळी येणारा ताप' - "लो-ग्रेड फीव्हर' गटात मोडणारा हा ताप क्षयाच्या रुग्णांमध्ये आढळतो. (2) सेकंडरी, टर्शरी, क्वार्टन फीव्हर - म्हणजे दर दुसऱ्या, तिसऱ्या अथवा चौथ्या दिवशी विशिष्ट वेळी येणारा ताप. मलेरियाचा ताप या प्रकारचा असतो. (3) सततचा जादा ताप - न्यूमोनियामुळे येणारा ताप असतो. (4) स्टेप लॅडर पॅटर्न - शिडीच्या पायऱ्यांप्रमाणे हा ताप काही काळ स्थिर राहतो. मग वर चढतो. तेथे काही काळ स्थिर राहतो; मग आणखी वर चढतो. टायफॉईडमध्ये येणारा ताप अशा स्वरूपाचा असतो. ब्लड कल्चर टेस्टमध्ये पहिल्या चार दिवसांत विषमज्वर कळू शकतो. याचा अर्थ असा नव्हे, की ताप आला तर येऊ द्यावा किंवा त्यावर उपाय करू नये. तर तो कशामुळे आला यावर लक्ष केंद्रित करावे. ताप आला की ताबडतोब एखादी गोळी घेऊन कामाला लागणारे, दुखणे अंगावर काढणारे अनेक जण असतात. कित्येकदा ती त्यांची अपरिहार्यता असते. कदाचित अशा दोन-चार गोळ्यांनी ताप थांबेलही; पण तो का आला होता ते कळणार नाही. कुठेतरी काहीतरी गडबड आहे, असंतुलन आहे, असे ताप आपल्याला सांगत असतो. तेव्हा त्याचे सांगणे ऐकून घेणे हेच महत्त्वाचे. ताप अंगावर न काढता सरळ डॉक्टारांची भेट घेणे सर्वोत्तम.
ताप आल्यास काय करावे?
निव्वळ तापाच्या प्रकारावरून म्हणजे केव्हा येतो, किती चढतो या बाबींवरून तापाचे कारण साधारणपणे ओळखता येते. पण हल्ली अनेक डॉक्टचरांशी बोलताना असे जाणवते, की पूर्वी वैद्यकशास्त्रात वर्णन केल्याप्रमाणेच आढळणारा ताप रोगनिदानास साह्यभूत ठरत असे, तसे हल्ली दिसत नाही. हल्ली ताप बऱ्याचदा "टिपिकल' स्वरूपाचा नसतो. (पुस्तकांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे असतोच असे नाही) अशा वेळी तापाबरोबरच असणारी अन्य लक्षणे महत्त्वाची ठरतात. कोणत्या अवयवसंस्थेमध्ये जंतुसंसर्ग झाला आहे ते या अन्य लक्षणांवरून ओळखले की मग रोगनिदान सोपे होते. उदा.- खोकला असेल तर श्वंसनसंस्थेमध्ये संसर्ग, अंग मोडून येत असेल तर विषाणुसंसर्ग किंवा फ्लू इत्यादी.
ताप आल्यामुळे आपल्या शारीरिक व्यवहारांवर मर्यादा येते, एक प्रकारचा अस्वस्थपणा वाटत असतो. म्हणून ताप ताबडतोब कमी व्हावा अशी प्रत्येक पेशंटची इच्छा असते. पण एखादी गोळी वारंवार घेऊन ताप दडपून टाकण्यापेक्षाही काही अधिक योग्य गोष्टी आपण करू शकाल, त्या अशा ...
1) तापाची नोंद ठेवावी - थर्मामीटर किमान एक मिनिट तोंडामध्ये ठेवून तापमानाची नोंद करावी. दिवसातून तीन-चार वेळा पुनःपुन्हा तापमान तपासून त्याची योग्य नोंद केल्यास डॉक्टारांना निदान करण्यास तिचा उपयोग होईल.
2) ताप असताना शक्य तो अधिक कपडे किंवा अधिक चादरी अंगावर घालू नयेत. कपड्यांचे दोन किंवा तीन थर जर असतील तर त्यामध्ये हवेचे थर राहतील. हवा ही उष्णतेची दुर्वाहक आहे. त्यामुळे त्वचेवाटे उष्णता बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेत गतिरोध निर्माण होऊ शकतो. खूप थंडी वाजत असेल तर एकच जाड वस्त्र आणि जाड चादर अंगावर घ्यावी.
3) तापमान नैसर्गिक रीतीने कमी करण्यासाठी डोक्याववर, पोटावर, छातीवर साध्या पाण्यात भिजवलेली पट्टी ठेवावी. ही पट्टी तेवढ्या भागातली उष्णता शोषून घेते. तेवढ्या भागाचे तापमान कमी झाले की मग शरीरातील अन्य भागातील उष्णता रक्ताद्वारा त्या भागात पोचते, ती पुन्हा पट्टी शोषून घेते. हे करताना पट्टी सतत बदलत ठेवावी. म्हणजे पुन्हा पुन्हा पाण्यात भिजवून ठेवत राहावी किंवा ओल्या फडक्याेने संपूर्ण अंग सतत पुसून काढावे.
4) तापामध्ये घाम येईल असे पाहावे. घामाचे बाष्पीभवन झाल्यास तापमान कमी होत असते.
5) शरीरातील पाण्याची पातळी (हायड्रेशन) चांगली राहील याकडे लक्ष पुरवावे. अधूनमधून थोडे थोडे पाणी पीत राहावे.
6) ज्या अवयव संस्थेशी संबंधित लक्षणे असतील, त्या लक्षणांवर उपचार करावेत. उदा.- खोकला असल्यास गरम पाण्याचा वाफारा घ्यावा. याने कफ मोकळा होऊन लवकर पडून जाईल. ताप लवकर कमी होईल. जुलाब असल्यास पाण्यामध्ये मीठ, साखर व लिंबू पिळून ते सतत थोडे थोडे पीत राहावे.
7) ताप जंतुसंसर्गामुळे येत असतो आणि त्यावरील औषधे व प्रतिजैविकांचा कोर्स केल्यानंतरच्या कालावधीत जीवनसत्त्वांच्या (व्हिटॅमिन्स) गोळ्यांचा कोर्सही जरूर करावा. तापामुळे झालेली झीज आणि प्रतिजैविकांनी निर्माण केलेली घट भरून काढण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
खरं तर हा तसा कमी प्रमाणात दिसणारा आजार आहे. तो का होतो, कसा होतो, किती दिवस राहतो याबाबत फार कोणाला माहिती असल्याचे दिसत नाही. असे असताना मग केवळ डॉक्टहरांच्या सल्ल्याने यावर उपचार करत राहणे इतकेच आपल्या हातात उरते. इतकेच नाही तर या आजाराबद्दल सर्वसामान्यांमध्ये अनेक गैरसमज असल्याचेही दिसून आले आहे.
आपल्याकडे नागीण या रोगाविषयी अनेक गैरसमज असल्याचे दिसून येते. असा एक गैरसमज आहे की नागीणने जर शरीराला विळखा घातला तर तो माणूस मरतो. पण हा एक फार मोठा गैरसमज आहे. एकतर हा रोग नेहमी अंगाच्या एकाच बाजुला होतो आणि तो नागिणीसारखा वळणे घेत पसरतो. पण अंगाला पूर्ण वळसा कधीच घालत नाही. क्चणचीत वळसा घातलाच तर मरण कधीच येत नाही.
व्हायरस इन्फेक्श न
हे एक खूप वेदनादायक असे त्वचेच्या ज्ञानतंतुंचे किंवा नर्व्हचे इन्फेक्शिन आहे. हे बहुधा त्वचेपुरतेच मर्यादीत असते. क्वचित डोळयाला किंवा शरीरातील इतर अवयवांना होते. त्वचेतल्या नर्व्हचे हे इन्फेक्श न कांजण्या ज्या व्हायरसमुळे होते त्याच व्हायरसमुळे होते. याचे नाव आहे,हर्पीझव्हायरस व्हेरीसीली किंवा व्हेरीसीला झोस्टर व्हायरस. लहान मुलांना याच व्हायरसमुळे कांजण्या होतात. कांजण्या बऱ्या झाल्यावरसुध्दा सगळेच व्हायरस नष्ट होत नाहीत. काही व्हायरस स्पायनलकॉर्ड किंवा मज्जारज्जुच्या जवळच्या भागात जीवंत असतात. पण ते कित्येक वर्ष पेशंटला काहीच त्रास देत नाहीत. सक्रिय होतात कित्येकवर्ष शांतपणे बसल्यावर पेशंटची प्रतिकारशक्तीप काही कारणांनी किंवा कोणत्याही आजारपणाने कमी झाली तर हे व्हायरस सक्रिय होतात आणि नागीण अंगावर प्रकट होते. हे व्हायरस नर्व्हच्या म्हणजे ज्ञानतंतुच्या मुळापासून वर सरकत जातात. त्या नर्व्हला सूज येते. छाती आणि पाठ या भागात नागीण सहसा दिसते. हे एका नर्व्हचे इन्फेक्श.न असल्यामुळे लाल पुरळ एका ठराविक भागातच दिसतात.अंगाला विळखा क्वचितच घालतात.
लक्षणे
अतिशय वेदना हे या नागिणीचे महत्वाचे लक्षण आहे. ते अगदी सुरवातीचेसुध्दा एकटे लक्षण असते. या वेदनांची तीव्रता व्यक्तीहप्रमाणे वेगवेगळी असते. पण वेदना इतक्याा असतात की वैद्यकीय उपचार करणे अत्यंत आवश्याक असते. ताप,डोकेदुखी आणि थकवा ही लक्षणे सुरवातीला दिसतात. पण त्वचेवर पुरळ उठले की ही लक्षणे नाहीशी होतात. नागीण किंवा हर्पीझ चेहऱ्याच्या किंवा डोळयाभोवतीच्या नर्व्हनासुध्दा होते. त्याजागी वेदना आणि डोकेदुखी अतिशय असह्य असते. कंबरेच्या मणक्यारच्या नर्व्हजपासून सुरवात झाली असेल तर कंबर, नितंब या भागात वेदना होतात आणि त्या पायापर्यंत जातात. त्वचेवर पुरळ त्वचेवर पुरळ अगदी सुरवातीला फिकट लालसर दिसतात. पुरळ पुंजक्यांवच्या स्वरुपात दिसतात. मधली जागा चांगली असते. मग हे पुरळ मोठे होतात. त्याचे फोड होतात. फोडांभोवती लाल रेघ दिसते. काही लहान लहान फोड एकत्र येउन त्यांचा एक मोठा फोड होतो. हे पुरळ पाठीच्या मणक्यारपासून सुरु होउन छातीच्या मध्यापर्यत येतात. नर्व्हजच्या इनफेक्श्नचा प्रवास सहसा वरुन खाली होत असतो आणि तो शरीराच्या एकाच बाजुला असतो. सहसा तो विळखा घालत नाही. दुसऱ्या बाजुच्या नर्व्हला इन्फेक्शयन होत नाही. म्हणूनच पाठीकडून छातीकडे आल्यावर ते तिथेच थांबते. नागीण किंवा हर्पीझ सहसा मुलांना होत नाही. व्हायरस मुलांच्या शरीरात शिरलेच तर कांजण्या होतात. संपूर्ण अंगावर पुरळ उमटतात. अगदी क्वचीत गरोदरपणी आईला कांजण्या झाल्या असतील तर बाळाला नागीण झाल्याची उदाहरणे आहेत.
हर्पीझचा प्रवास
हर्पीझ किंवा नागीण तसा अगदी सामान्य रोग आहे. पण त्यात काही कॉम्प्लाकेशन झाली तर मात्र ताबडतोब उपचार करणेआवश्याक असते.योग्य उपचार केले तर वेदना ताबडतोब नाहीशा होतात. पुरळही दिसेनासे होतात. मोठे फोड फुटतात. खपल्या होतात. काही दिवसात खपल्या पडून जातात. दहा ते चौदा दिवसात क्रण भरुन निघतात. पुरळ बरे झाले तरी त्वचेवर काळी किंवा पांढरी रेघेच्या रुपाने वण राहतो. पण हा डागसुध्दा काहीकाळानं पुसटसा होत जातो. काहीवेळा जखम खोलवर जाते.ती भरुन यायला खूप दिवस लागतात आणि त्याचा व्रण मोठा असतो.
ऍलर्जीक पेशंट
दमा किंवा इतर कारणामुळे ऍलर्जी असेल तर अशा पेशंटना वायसोलोन, डेल्टाकॉर्टील, बेटनेसॉल अशी कॉर्टीझोन औषधे द्यावी लागतात. ही औषधे ऍलर्जीवर अतिशय प्रभावी असतात. पण ती काही दिवसासाठीच द्यायची असतात. पण या औषधांनी बरे वाटते असे लक्षात आल्यावर तीच औषधे पेशंट डॉक्टदरांचा सल्ला न घेता वारंवार घेतात. या औषधांमुळे ऍलर्जी नाहीशी होत नाही तर दबून जाते पण या औषधांमुळे रोगप्रतिकारशक्तीत कमी होते. अशा पेशंला अतिशय तीक्र स्वरुपाची नागिण होउ शकते. अशा स्वरुपाच्या कॉर्टीझोन औषधांचा उपचार चालू असेल आणि नागीण अंगावर दिसली तर ताबडतोब डॉक्टसरांना दाखवा.
कॉम्प्लीकेशन किंवा उपद्रव
नागीणीचे इन्फेक्शकन डोळयाला होऊ शकते. त्याला हर्पीझ झोस्टर ऑपथॅलमिक असे म्हणतात. हे फक्तण एकाच डोळयाला होते. डोळा सुजतो. उघडताही येत नाही. डोळयाच्या भोवतालची आणि पापण्यांची त्वचा लालसर होते. फोडं येतात. पेशंटच्या डोळयावर कुणीतरी ठोसा मारल्याप्रमाणे डोळा दिसतो. लघवीवर आणि शौच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या नर्व्हजना फार क्वचित हे इन्फेक्शुन होते पण झालेच तर लघ्वी करताना अतिशय वेदना होतात. कधीकधी नागिणीचे फोड तोंडामध्येसुध्दा येतात. जीभेवर होतात. घशातही होतात. घास चावताना खूप आग होते. कानाला फार क्वचित नागिण होते. पण झालीच तर कानाच्या बाहेरच्या भागात होते आणि त्याभागात खूप वेदना असतात चेहऱ्यावरच्या एकाच बाजुच्या भागावर नागीण होउ शकते. यावर वेळीच आणि योग्य इलाज केला नाही तर अर्धांगवाताची शक्याता असते
अतिशय वेदना
काहीवेळा नागीणीची पुरळं लगेच नाहीशी होतात पण नंतर नर्व्हजच्या भागात अतिशय वेदना सुरु होतात. पेशंट पन्नाशी किंवा जास्त वयाचा असेल तर या वेदना अतिशय असह्य असतात. यावर ताबडतोब इलाज करायला हवा. याला पोस्ट हर्पिझ न्युराल्जीया असे म्हणतात. या वेदना अगदी सूक्ष्म प्रमाणात ते अगदी असह्य स्वरुपात असतात. काहीवेळा एकदा सुरु झालेल्या वेदना कित्येक तास कमी होत नाहीत. रात्री झोप तर लागतच नाही शिवाय रोजच्या कामातही अडथळा येतो. यासाठी त्वचारोगतज्ञाला दाखवणे आवश्यझक असते. वेदना कमी होण्यासाठी काही मिश्र शामक औषधे द्यावी लागतात. ज्या नर्व्हच्या भागात वेदना होतात त्या जागेला बधीर करण्यासाठी इंजेक्शयनही द्यावे लागते. इतकेही करुन वेदना थांबल्या नाहीत तर त्या नर्व्हजचे मूळ शोधून ती पूर्ण फांदीच शदाक्रिया करुन काढून टाकावी लागते. हर्पीझ हा शब्द बरेचवेळा संभोगाव्दारे होणारा संसर्गजन्यरोगासंबंधी वापरतात. पण हर्पीझ झोस्टर तसा रोग नाही. ते नर्व्हचे व्हायरल इन्फैक्शणन आहे.
उपचार
हर्पीझ झोस्टरमध्ये अतिशय वेदना होत असल्यामुळे पेशंटला संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो. औषधोपचार लवकरात लवकर सुरु केला तर वेदनांचा त्रास कमी होतो आणि कॉमंप्लीकेशन्सही कमी होतात. ब्रुफेन,आयबुजेसीक,आयबुफ्लॅमार अशी वेदनाशामक औषधं देतात. दिवसातून तीनवेळा एकेक गोळी घेतली तर वेदना कमी होतात. नागीण झालेल्या जागेवर कॅलामाईन लोशन लावावे लागते. वेदना अतिशय तीव्र आणि असह्य असतील तर फोर्टविन किंवा फोर्टाजेसिकचे इंजेक्शघन द्यावे लागते.
ऍसिक्लोचव्हीर
इन्फेक्श्न अतिशय तीव्र स्वरुपाचे असेल किंवा पेशंटची प्रतिकारशक्ती कमी असेल तर ऍसिक्लोशव्हीर हे महत्वाचे औषध द्यावे लागते. ऍसिक्लोरव्हीर (झोविरॅक्सि,हर्पेक्सद)या गोळया 200मिग्रॅ.एकावेळेस चार गोळया दिवसातून तीन वेळा घ्याव्या लागतात.या गोळयांचा कोर्स पाच दिवसांचा असतो.पण या गोळया फार महाग असतात.तरी या औषधामुळे वेदना आणि पुरळ फार लवकर नाहीशा होतात.
न्युराल्जीयासाठी
पन्नाशीच्या वयाच्या पेशंटना वायसोलोन किंवा डेल्टाकॉर्टील सारखी कॉर्टीझोन औषधे ताबडतोब द्यावी लागतात. रोज वीस ते चाळीस ग्रॅम देउन हळूहळू डोस कमी करावा लागतो. यामुळे न्युराल्जीयाला आळा बसतो. एकदा का न्युराल्जीया झाला की त्यावर इलाज करणे अतिशय कठीण असते. पेशंटला वेदना सहन कराव्या लागतात. त्या कमी व्हायला बरेच दिवस लागतात. म्हणून प्रतिबंधक उपाय आधीच करावे लागतात. हर्पीझ झोस्टरच्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज नसते. घरच्या घरी इलाज करता येतो. काही कॉम्प्लीकेशन्स झालीच तर ऍडमिट करावे लागते. एडस झालेल्या पेशंटला अतिशय तीव्र स्वरुपाची नागीण होते. किंवा नागीण हे जर एकमेव लक्षण असेल तर अशा पेशंटला एडस झाल्याची शंका घ्यायला हरकत नाही. वैद्यकीय चाचणी आवश्य क आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आपल्याकडे पूर्वी बांगड्या भराययच्या अशी प्रथा होती. स्त्रियांना दर महिन्याला एम् सी म्हणजे पाळी होते. अँक्युप्रेशरमध्ये मनगटावर अंगठ्याचे बाजूला गर्भाशयाचा पाँईंट येतो आणि करंगळीचे बाजूला बीजांड कोशाचा( ओव्हरीचा) पाँईंट आहे. हे दोन्ही हातावर आहेत बांगड्या घातल्या की हे पाँईंटस अपोआप दाबले जातात.
पाळीचे वेळी पोटात दुखणे, पाळीसाफ न होणे, पाळी रेग्युलर न येणे,टाचा दुखणो ह्या त्रासावर फायदा होतो. म्हणून बायकानी बांगड्या घालाव्यात. हल्ली बांगड्या घालणे सोडले असल्याने बायकाना वर सांगितलेले बरेच त्रास आहेत.
अरविंद जोशी
9421948894
अपत्यमार्गातील कोरडेपणा या तक्रारीवर प्रणयाचा कालावधी वाढवणे हा उत्तम उपाय ठरेल. त्याने लाभ न झाल्यास वेळेत वैद्यकीय सल्ला घ्यावा. व्यतिरिक्त क्वचित प्रसंगी ल्युब्रिकंट्स चा उपयोगदेखील करता येईल; मात्र तोदेखील वैद्यकीय सल्ल्यानेच!!
ही परिचित व उपयुक्त काटेरी वेल भारतात सर्वत्र ओलसर जंगलात (दख्खन, कोकण व उ. कारवार, आंध्र प्रदेश, आसाम व बिहार), तसेच चीन, मलाया व म्यानमार या देशांत आढळते. बाजारात ‘शिकेकाई’ या नावाने तिच्या शेंगा मिळतात.
⇨ बाभूळ, ⇨ खैर व ⇨ हिवर इत्यादींशी शिकेकाई समवंशी असल्याने त्यांच्या अनेक शारीरिक लक्षणांत सारखेपणा आढळतो. ह्या वनस्पतींच्याअॅकेशिया ह्या प्रजातीतील एकूण ७०० जातींपैकी भारतात फक्त सु. २५ आढळतात.
शिकेकाईचे खोड जाडजूड असून फांद्यांवर लहान पांढरट ठिपके [छिद्रे; वल्करंध्र] व टोकास वाकडे लहान काटे असतात. पाने एकाआड एक, संयुक्त व पिसासारखी असून मध्यशिरेवर बारीक वाकडे काटे व देठाच्या मध्यभागी खालच्या बाजूस ग्रंथी असतात.
दलांच्या ४-८ जोड्या व दलकांच्या १०-२० जोड्या असतात. फुले गोलसर झुपक्यात [स्तबकासारख्या; → पुष्पबंध] येतात. ती लहान व पिवळी असून मार्च ते मे महिन्यांमध्ये येतात.
फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी कुलात (अथवा शिंबावंत कुलात) व मिमोजॉइडी अथवा शिरीष उपकुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. शुष्क फळ (शेंग) चपटे, जाड, ७·५-१२·५ X २-२·८ सेंमी., लालसर पिंगट, सुरकुतलेले व काहीसे गाठाळ असते. बिया ६-१०, काळ्या व गुळगुळीत असून फळे तडकून त्या बाहेर पडतात.
शिकेकाईची पूड पाण्यात उकळून स्नानाकरिता वापरतात. केसातील दारुणा व उवा यांचा त्यामुळे नाश होतो आणि केसांची वाढ चांगली होते.
त्वचा कोरडी पडत नाही. रेशमी व गरम कपडे आणि डाग पडलेली चांदीची भांडी व उपकरणे धुण्यास ती पूड चांगली असते.
खोडाची साल ही मासे पकडण्याची जाळी व दोर रंगविण्यास आणि त्यांचा टिकाऊपणा वाढविण्यास वापरतात.
हळद व शिकेकाईची पाने यांपासून हिरवा रंग मिळतो.
कोवळ्या पानांची चटणी (मीठ, चिंच व तिखट घालून केलेली) अथवा पाने काळ्या मिरीबरोबर खाण्यास काविळीवर चांगली; पानांचा रस आंबट व सौम्य रेचक आणि हिवतापावर गुणकारी असून शेंगांचा काढा पित्तनाशक, कफोत्सारक (कफ पातळ करून पाडून टाकणारा), वांतिकारक (ओकारी करविणारा) व रेचक (जुलाब करविणारा) असतो.
शिकेकाईची पूड घालून केलेले मलम त्वचारोगांवर लावतात.
चीनमध्ये व जपानात मूत्रपिंडाच्या व मूत्राशयाच्या विकारांवर शेंगा वापरतात.
बिया सुलभ प्रसूतीकरिता देतात.
गुरांना विषबाधा झाल्यास शिकेकाई बियांसह ताकात वाटून पाजावी.
बाजारात शिकेकाईची सुगंधी पूड मिळते.
शिकेकाईचे काही गुणधर्म रिठ्याप्रमाणे असतात [→ रिठा], कारण शेंगात सॅपोनीन हे ग्लायकोसाइड ५% असते. शिकेकाईयुक्त साबण बाजारात उपलब्ध आहेत. ‘सप्तला’ ह्या नावाने सुश्रुतसंहितेत शिकेकाईचा निर्देश शाकवर्गात केलेला आढळतो.
-- सुषमा मोहिते
( आरोग्यदूत व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सौजन्याने )
‘गृहिणी गृहमुच्यते’ अशी घराची व्याख्या केली जाते. ज्या ठिकाणी सर्व व्यक्तींना सांभाळायला, वाढवायला समर्थ अशी स्त्री आहे तिथंच घरपण असतं. कालच महिला दिन झाला .पोषणम शिक्षण आणि रक्षण अशा सर्वच जबाबदाऱ्या प्रत्येक गृहिणीला पार पाडाव्या लागतात. त्यातील आरोग्य रक्षणाची जबाबदारी पार पाडणं तर चालू काळात फारच कठीण होत चालले आहे. आजीबाईचा बटवा ही शोभेची वस्तू नाही. या बटव्यातील चिजांची नीट माहिती करून न घेता बटव्याचा योग्य उपयोग करता येणार नाही. म्हणूनच प्रत्येक गृहिणीनं वरचेवर आढळणाऱ्या रोगांसंबंधी तक्रारींसंबंधी थोडीशी माहिती मिळविली पाहिजे. ‘ताप येणे’ ही अवस्था ! बहुसंख्य गृहिणी ‘अंग गरम वाटतं, ताप पाहिला नाही’ असं सांगतात. प्रत्येक घरात एक थर्मामीटर असणे आवश्यक आहे. कुणाचाही ताप, तो दर चार तासांनी मोजून तापाची नोंद करावी. केवळ तापाचा चढ उतार लक्षात घेऊन ताप टायफॉईडचा आहे, मलेरिआचा आहे किंवा अन्य कोणत्या प्रकारचा आहे हे डॉक्टर बरेचदा ओळ्खू शकतात.
त्रिभुवन कीर्ती हे त्याच्या नावाप्रमाणेच तापावरील एक अत्यंत उपयोगी औषध म्हणून कीर्ती मिळवून आहे. लहान मुलांना त्रिभुवन कीर्तीची पूड देण्यापेक्षा मधात उगाळूनमात्रा द्यावी. इतरांना २ ते ३ गोळ्या दिवसातून ३ वेळा पाण्यातून द्याव्या. विशेषतः सर्दी अंगदुखी किंवा फ्ल्यू ची लक्षणे असतील तर तुळशीच्या रसातून औषध द्यावं. चंद्रकला हेही तापावरील एक गुणकारी औषध. विशेषतः ताप १०३-१०४ फॅ. असा तीव्र असेल किंवा तापाबरोबर अंगाची लाही लाही होणं, डोळ्यांची आग होणं, चेहेरा लालबुंद होणं अशा तक्रारी असतील तर १ ते २ गोळ्या दिवसातून ४ वेळा द्याव्या. गुळवेल सत्त्व या वनस्पतीचं पर्यायी नाव अमृता आहे. खूप दिवस येणाऱ्या तापामध्ये, बरेचदा नेमके कारणही कळत नाही. शरीरात उष्णता कडकी वाढली असं म्हटलं जातं. अशा वेळी गुळवेल सत्त्व खूप दिवस पोटात द्यावे. किंवा गुळवेलीचा काढा द्यावा. ‘संशमनी वटी’ नावाच्या गोळ्याही मिळतात.
याहीपेक्षा तापावरील घरगुती उपचार म्हणजे विडा ! कडुनिंब, तुअळस व बेल यांची प्रत्येकी ७, ७ पाने घालून विडा तयार करावा व तो रोग्यास चावून चावून खाण्यास सांगावा. चव कडू लागते पण म्हणून त्यात साखर घालू नये. याच काढाही करून देतात. महिनेन महिने नवनवीन अँटिबॉयॉटिक्स-कॉर्टिझोन्स तपासण्या या आधुनिक पद्धतीनं बेजार झालेल्यांना तर हा प्रयोग करण्यास काहीच हरकत नाही.
विशेषतः मलेरियावर तर नुसत्या, कडूनिंबाचा विडा ३ दिवस थंडी वाजून ताप आला असता खाण्यास द्यावा. तापाचा प्रकार कोणताही असला तरी रोग्यास तांदुळाची पातळ पेज, तूप,मीठ, मेतकूट असा हलका आहार जरूर द्यावा. रोग्याला थर्मामीटर, शेकण्याची पिशवी, सहाण, लहान खलबत्ता, कात्री, कापूस, बँडेज, चिकटपट्टी व गृहिणीने आपल्याला ज्याची चांगली माहिती आहे अशी १५ ते २० औषधे. या बटव्यात असली पाहिजेत. सर्वांनी हे समजूनं घेतले पाहिजे की आपण जे वापरणार व ज्या तक्रारीसाठी वापरणार त्या दोन्ही गोष्टींची माहिती स्वतः करून घेतली पाहिजे. यादृष्टीनं गृहिणीनं पुढील पुस्तके संग्रही ठेवावीत.
आयुर्वेदीय औषधी गुणधर्मशास्त्र : वैद्य. पं. गंगाधरशास्त्री गुणे.
नित्योपयोगी निवडक औषधे : श्री. म. गो. मोडक.
गृहवैद्य : लेखक डॉ. र. कृ. गर्दे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
आयुर्वेदिक म्हटल्या बरोबर आपल्या मनात प्रथम येतं "परिणाम हळू होत असला तरी साईड-इफेक्ट नसतात". आयुर्वेदामधे अतिशय जलद परिणामकारी औषधे आहेत ह्यावर आपला आता नक्की विश्वास बसेल. वर्षानुवर्ष सतत अभ्यास केल्यावर असा अनुभव येतो की आयुर्वेदात नमूद केलेली औषधे व आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांत हे त्रिकालाबाधित सत्य आहेत. पित्तशमन औषधे व मेदनाशक औषधांची जोडी मेद कमी करण्यासाठी कशी कार्य करते ह्या विषयी थोडक्यात माहीती बघूया. वजन कमी करण्यासाठी दोन महत्वाच्या क्रिया होणे आवश्यक आहे. प्रथम आहारावर नियंत्रण व दुसरे मेद विलयन करून तो शरीरा बाहेर काढणे. ह्याला मेदनाशक औषधांचा (थर्मोजेनिक म्हणजे ऊष्मा वाढविणारी औषधे) उपयोग करावा लागतो. चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. म्हणून मेद नाशक औषधे स्वाभाविकपणे पित्ताची वाढ करतात. त्यामुळे आपोआप भूकही वाढते. म्हणून अशा औषधांमुळे घशाशी आंबट/कडू येणे, छातीत जळजळ होणे अशी लक्षणे होऊ लागतात. शिवाय औषध घेणे बंद केल्यानंतर भूक वाढते व अन्न जास्त प्रमाणात खाल्ले जाते. पित्तशमन औषध जेवणाच्या आधी घेण्यामुळे पित्त स्राव कमी होतो, भूक सौम्य होते शिवाय ऊष्मा वाढविणारी म्हणजेच मेदनाशक औषधांच्या ऊष्ण गुणांपासून आतड्यांच्य नाजुक आवरणाचे संरक्षण होते. ही प्रक्रिया योग्य रीतीने होण्यासाठी पित्तशमन २ गोळ्या जेवणाच्या दोन ते तीन तास आधी घ्याव्यात व मेदनाशक च्या २ गोळ्या जेवणानंतर लगेच घ्याव्यात. आपला आहार-विहार हा शरीरातील सर्व घडामोडींसाठी कारणीभूत असतो. त्यामुळे आहार-विहार आहे तसाच चालू ठेवून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे ठरेल. गोड पदार्थ किंवा तळलेले/तुपकट पदार्थ टाळले पाहिजेत ही बाब अगदी लहान मुलांना पण माहिती असते. आयुर्वेदानुसार आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांतांच्या आधारे काही लहान-सहान गोष्टी अमलात आणल्या तर परिणाम लवकर होतो व प्रकृती उत्तम राहते. ही माहिती वाचतांना आपल्याला काही गोष्टी कदाचित चुकीच्या किंवा प्रवाहाच्या विरुध्द वाटतील, पण ह्या गोष्टी अनेक पिढ्यांच्या अनुभवातून सिध्द झालेल्या आहेत.
गोड पदार्थ जेवणाच्या शेवटी खाण्याची एक प्रथा आहे. आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत, शेवटी खाणे योग्य नाही. अतिरिक्त चरबी वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. हा मुद्दा नीट समजण्यासाठी एक प्रयोग स्वतः करून पहा. एक दिवस नेहमीचे जेवण झाल्यानंतर ठराविक प्रमाणात काही गोड पदार्थ खा. १-२ दिवसांनी तोच गोड पदार्थ तेवढ्याच प्रमाणात जेवणाच्या सुरुवातीला खा. आपल्याला नहमीपेक्षा निम्मे जेवण जाईल. म्हणजेच आपल्याला जवढी खरी भूक आहे तेवढेच अन्न घेतले जाते, अनावश्यक किंवा अवाजवी अन्न घेणे अशा प्रकारे सहज टाळता येऊ शकते. जेवणानंतर पान खाण्याची पध्दत योग्यच नव्हे तर शास्त्रीय आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाने पान खावे असा न घेता, जेवणाचा शेवट गोड पदार्थाने करू नये, एवढा अर्थ नक्कीच घेतला पाहिजे. शरीराला हलकेपणा आणण्याचा हा अगदी सहज सोपा उपाय आहे.
सर्व फळांमधे कमी-जास्त प्रमाणात साखर असते. त्या साखरेला उतारा म्हणून निसर्गाने सोबत कडू-तुरट चवीच्या बिया व साली दिल्या आहेत. बिया व सालींमधे अधिक प्रमाणात जीवनसत्व असतात. आपण फक्त चवीच्या सुखानुभवा पायी ही जीवनसत्व वाया घालवतो. वजन कमी करण्याचा निश्चय केलेल्यांनी सहज शक्य होतील तेवढ्या बिया व साली फेकून देऊ नयेत.
चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. आपल्याला वजन कमी करण्याची खरी इच्छा असेल तर थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स किंवा इतर थंड पदार्थ घेणे वर्ज्य करा. चरबीच्या नियंत्रणासाठी शरीर आपणहून ऊष्ण स्वभावी पाचक-स्राव तयार करीत असते. मेदाच्या नियंत्रणासाठी वर्णन केलेली बहुतेक सर्व औषधे पाचक-स्राव वाढवूनच चरबी कमी करतात. अन्न घेतल्यानंतर लगेच थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स, लस्सी, आईसक्रीम किंवा इतर थंड पदार्थ घेण्यामुळे त्या पाचक-स्रावांचा परिणाम एकदम सौम्य होतो आणि चरबी साठून राहण्यसाठी कारण होते. अन्न पचवणारे पाचक-स्राव विस्तवा सारखे ऊष्ण असतात. त्यावर थंड पदार्थ किंवा थंड पाणी ओतल्यावर काय होईल ह्याचा आपणच विचार करा.
चहा-कॉफी सारखी साखरयुक्त पेय दिवसातून दोन पेक्षा जास्त वेळा घेऊ नयेत. त्याच्या घोटा घोटा बरोबर पोटात जाणारी सखर नकळतपणे चरबी वाढविण्यास कारण होते.
जेवणानंतर कधीही लगेच झोपू नये. शतपावली करणे चांगले. जेवणानंतर येणारी झोप ही खरी झोप नसून ती केवळ सुस्ती असते ज्याने शरीराचा बोजडपणा वाढीस लागतो. वामकुक्षीच्या नावाखाली डाराडूर झोप काढणे म्हणजे वजन वाढीला व एकंदरित रोगराईला आग्रहाचे आमंत्रण देण्यासारखेच आहे.
लवकर झोपून लवकर उठावे, हा नियम आरोग्यासाठी खरोखर लाख मोलाचा आहे. उशीरा झोपून उशीरा उठणारे शेकडा नव्वद टक्के लोक तब्बेतीने जाडजूड असतात असे आढळून येते.
दूध व दुधाचे पदार्थ नियमितपणे घेऊ नयेत. दुधातील पौष्टिक प्रथिनांची किंवा पिष्टमय पदार्थांची गरज भागल्यानंतर हे पदार्थ घेणे चालूच ठेवले तर त्यांचे रूपांतर चरबीत होते. दुधाचे दात पडले की नियमितपणे दूध पिणे आवश्यक नसते हे लक्षात ठेवावे.
निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्य शरीराची रचना ही मांसाहार पचनासाठी केलेलीच नाही . ज्यांना मांसाहार केल्याशिवाय चैन पडत नाही त्यांनी आठवड्यातून एक किंवा जस्तीत जास्त दोन जेवणातच मर्यादित प्रमाणात मांसाहार घ्यावा.
बैठ्या कामामुळे मेद वाढतो. सतत कार्यक्षम राहा, सुस्ती आणि आळशीपणा टाळा. दारावरची बेल वाजली की ‘दुसरा कोणी उठण्याआधी आपण दार उघडण्यासाठी उठा’. अशा साध्या-सोप्या सवयी अंगी बाळगण्यामुळे शारीरिक हालचाली वाढून वजन वाढण्याची सवय कमी होते.
दुपारी झोपण्याची सवय केवळ वजन वाढण्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर एकूण आरोग्या साठी पण अत्यंत हानिकारक आहे. अशी सवय लागली असेल तर ती ताबडतोब सोडावी, चांगल्या मुहूर्ताची वाट बघू नये. सवय मोडतांना काही दिवस त्रास वाटेल पण कालांतराने होणारे चांगले परिणाम अतिशय महत्वाचे आहेत हे विसरून चालणार नाही.
जेवण झाल्यानंतर “आता पोट भरले, आता आणखीन अन्न नको” हा संदेश मेंदूतून निर्माण होतो. पोट भरल्या नंतर १० ते १५ मिनिटां नंतर हा संदेश निर्माण करण्याची यंत्रणा मेंदूतून कार्यरत होते. म्हणून साधारण प्रमाणात अन्न घेऊन झाल्यावर १० ते १५ मिनिटे थांबून मग स्वतःलाच प्रश्न विचारावा, “अजून खरोखर भूक आहे का?” जर उत्तर “नाही” मिळाले तर लगेच पडत्या फळाची आज्ञा समजून बस’ करा.
जास्त जेवण घेण्याची सवय चरबी वाढण्याचे कारण आहे. क्रमाक्रमाने आहार चार घास कमी घेण्याची सवय केली तर थकवा न जाणवता वजन कमी राहून स्वास्थ्य उत्तम राहते.
‘भात खाण्यामुळे वजन वाढते’ असा एक गैरसमज सर्वत्र आढळतो. भात हे दक्षिण भारतीयांचे मुख्य अन्न आहे व गव्हाचे पदार्थ पंजाब किंवा उत्तर भारतीयांचे. अंगकाठीचा विचार केल्यास दक्षिण भारतीयांची एकूण प्रकृती बारीक असते तर उत्तर भारतीयांचे वजन काय किंवा एकंदर शरीर जास्त धडधाकट दिसते. तांदळाच्या शेतीसाठी आणि प्रत्यक्ष भात शिजवण्यासाठी भरपूर पणी लागते. त्यामुळे भात पोटात गेल्यावर पोट लवकर भरल्यासारखे वाटते खरे पण त्यामधून पोषक अंश फार कमी प्रमाणात घेतले जातात. तांदूळ कोरडे भाजून थोडे तांबुस झाल्यावर त्याचा भात करावा. वजन कमी करण्यासाठी हा पचायला हलका भात म्हणून फार उपयोगी होतो. व्यवस्थित जेवण झाल्यानंतर भात खाण्यामुळे मात्र मेद वाढतो कारण पाचक स्त्रावांना थंड करण्याची किमया ह्या ‘शेवटच्या भातामुळे’ होते. केवळ भात खाऊन वजन वाढत नाही हे लक्षात ठेवावे.
दिवसातून किती वेळा आहार घ्यावा ह्या विषयी अनेक मतभेद आढळतात. कोणी सांगतात “थोड्या-थोड्या वेळाने थोडाथोडा आहार घ्यावा” तर कोणाच्या मते “ठराविक वेळी पोटभर जेवावे”. अशा वेळी काय बरोबर व काय नाही अशी शंका आपल्या मनात नक्कीच घर करून राहात असेल. अशा संभ्रमाच्या वेळी ‘आयुर्वेदाची शिकवण योग्य’ असेच मानावे. आयुर्वेदात “याम मध्ये न भोक्तव्यं, याम युग्मं न लंघयेत्” असा श्लोक आहे. ह्याचा अर्थः “चार तासांच्या आधी काही खाऊ नये व आठ तासांपेक्षा जास्त वेळ उपाशी राहू नये.
मद्यपान करण्याची आवड असेल तर त्याविषयी थोडी शास्त्रीय माहीती: मद्यपान करण्याची भारतात पध्दत म्हणजे जेवणाच्या आधी घेऊन नंतरच जेवणाचा कार्यक्रम असतो. मद्यपाना मुळे पाचक-स्राव वाढतात व परिणामी भूक वाढते म्हणून जरुरी पेक्षा जास्त आहार घेतला जातो. जेवणाच्या नंतर मद्यपान करण्यामुळे वाढलेले पाचक-स्राव हे अन्न लवकरात लवकर पचवण्यासाठी उपयोगी पडतात. शिवाय जेवणाच्या आधी केलेल्या मद्यपाना मुळे सर्व अन्नघटक मेदात रूपांतरित होतात असे शास्त्रीय प्रयोगांच्या आधारे सिध्द झाले आहे. म्हणून मद्यपान करण्याची आवड असेलेल्यांनी जेवणानंतरच मद्यपान करावे. ज्यांना चरबी वाढवण्याची इच्छा असेल त्यांनी जेवणाच्या आधी घेऊन चालेल.
कडधान्यां बद्दल थोडक्यात: मोड आलेली कडधान्य स्वास्थ्यासाठी उत्तम असे आपण अनेक ठिकाणी वाचले असेल. काही अंशी हे खरे आहे. त्यातील महत्वाचा मुद्दा असा की ज्या वयात पचन शक्ती उत्तम असेल किंवा नियमित व्यायाम करण्याची सवय असेल तरच मोड आलेली कडधान्य खावीत. वयाच्या ४५-५० नंतर ही कडधान्य त्रासदायक ठरतात. ह्या वया नंतर ‘भर्जित’ म्हणजे भाजलेले धान्यच आहारात वापरावे. भाजलेल्या धान्याला कितीही भिजवले तरी मोड येत नाहीत. मेद किंवा चरबी विषयी जागरूक असलेल्यांनी कडधान्य टाळणे महत्वाचे आहे. ह्या उलट वजन वाढवण्यासाठी कडधान्यांचा वापर आहारात नियमितपणे करावा.
व्यायाम कसा, कोणता व किती करावा: व्यायामाचे फायदे सांगण्याची गरजच नाही. ह्या विषया बद्दल काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे, कोण किती व्यायाम करतो ह्या पक्षा त्यात किती नियमितपणा आहे हे सर्वात महत्वाचे. वजन कमी करण्यासाठी कशा प्रकारचे व्यायाम करावेत? शरीरात मेद कुठे साठतो? चरबीच्या पेशी कुठे जमा होतात? काही प्रकारचे व्यायाम मस्तपैकी भूक वाढवतात तर काही व्यायाम चरबी हटवतात. त्वचा आणि मांसधातू च्या मधे ह्या चरबीच्या पेशी दबा धरून असतात. त्यामुळे मांसपेशींना पीळ पडेल असे व्यायाम चरबी हटवण्यासाठी उत्तम. ओला कपडा लवकर सुकण्यासाठी जी पिळण्याची पध्दत आहे तशी ही व्यायामाची क्रिया करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti