वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
बेल! शिवाची प्रिय गोष्ट ज्याखेरीज शिवपुजा पुर्णच होत नाही.
अगदी १००% भारतिय असलेला हा मध्यम आकाराचा काटेरी वृक्ष माहित नसलेली व्यक्ती अर्थातच विरळाच. संपुर्ण भारतभर आढळणारं हे मध्यम आकाराचं झाड त्याच्या धार्मिक आणि औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. "बिल्वे शाण्डिल्यशैलूषौ मलूरश्रीफ़लावपि" अशी वर्णनं अमरकोशात या झाडाची केली आहेत. Rutaceae ह्या लिंबू कुळाचा सदस्य असलेलं हे झाड, वनस्पतीशास्त्रात Aegle marmelos असं नाव धारण करतं. यातल ’एइगल’ हे नाव एका पुरातन ग्रीक निसर्गदेवतेच्या नावावरुन तर ’मारमेलॉस’ हे युरोपातल्या ’क्विन्स’ नावाच्या फ़ळाशी असलेल्या सांम्यावरुन ठेवलं गेलय. आजही, स्वातंत्र्यानंतरही आपण परकियांनी दिलेली नाव वापरण्यातच धन्यता मानत असतो. ईंग्रजीत ' गोल्डन अँपल ' किंवा 'बेंगाल क्विन्स' सारखी रुक्ष नावे मिळालेल्या ह्या भारतिय वृक्षाला गंधफ़ल, सदाफ़ल, शैल, महाकपित्थ, ग्रंथिल, कण्टकी, बिल्वम, बेल अशा सुंदर संस्कृत नावांनी गौरवलं गेलय.
बेलाचा वृक्ष पानझडी या सदरात गणला जातो. हा वृक्ष मध्यम आकाराचा असतो असं वरच्या ओळीतच मी लिहिलंय. साधारण १०-१२ मिटर उंची गाठणाऱ्या ह्या वृक्षाची पानं आपल्याला सुपरिचीत असतात. त्रिदल म्हणजेच तीन पर्णिकांची असलेली ही पानं हिरवीगार या सदरात मोडतात. जर नीट निरिक्षण केलं तर सहज दिसून येतं की या त्रिदलातली मधली पर्णिका कायम मोठी असते. या पानांचा देठही मोठा म्हणजे साधारण ४/५ सेमी असतो ज्यामुळे हे बेलपान त्याच्या अंगापासून लांब, एकाआड आलेली दिसतात. या बिल्वपत्रांना स्वत:चा एक खास सुगंध असतो जो त्यांना चुरडल्यावर सहज जाणवतो. या सुगंधाचे कारण म्हणजे या पानांवर सुगंधी तैलग्रंथींचे ठिपके असतात. हे ठिपके पान उजेडाकडे धरल्यास सहज दिसुन येतात. या पानांचे शिवपुजेत अनन्यसाधारण महत्व असल्याने वर्षभर यांना प्रचंड मागणी असते. मात्र धार्मिक उपयोगाखेरीज यां पानांचे आयुर्वेदिक उपयोग आहेतच. या पानांचा उपयोग सर्दीवरील काढा करण्यासाठी अजुनही केला जातो. तसेच ताज्या बेलपानांचा वापर लेप करून जखमांसाठीही करताना मी खेड्यांंमधे पाहिला आहे. साधारण हिवाळा संपत आला की या वृक्षाची पानं गळायला सुरुवात होते. अर्थात, वसंताच्या आगमनाबरोबरच येणारी नविन पालवी त्याच्या फ़ुलण्याची जणू नांदीच असते. साधारण एप्रिल मे च्या सुमारास बेलाला २ ते २.५ सेमी आकाराची हिरवट पांढरी सुवासिक फ़ुलं यायला सुरुवात होते. चार पाकळ्यांच हे फ़ुल अगदी मंद रंगाच असतं ज्यातून फ़लधारणा होवुन पुढे पावसाळ्यात बेलफ़ळं दिसायला लागतात.
पावसाळ्यात बाळसं धरणारी ही बेलफ़ळं बेलाच्या पानापेक्षा जास्त औषधी महत्व बाळगतात. शिवमंदिरांसमोर विकायला ठेवलेली लहानमोठी बेलफ़ळं आपण पाहिलेली असतातच. कठीण सालीचे हे फ़ळ पिकलेल्या स्वरुपापेक्षा कच्चं असतानाच अधीक वापरले जाते. लांबट गोल आकाराची ही फ़ळं पिकायला मात्र पुढचा उन्हाळा यावा लागतो. ही फ़ळं आतून चिक्कट गोडसर असतात. याचा गर चक्क केशरी रंगाचा असतो नी भरपूर बियाळ असतो. बेल मुरंबा खाऊन अनेकांची लहानपणं समृद्ध झाली आहे हे नक्की. याच बेलफ़ळाच्या पिकलेल्या गराचे सरबत तर अगदी अमृततुल्य लागते. याचे अनेक औषधी उपयोग आयुर्वेदात लिहिलेले आहेत. पचनशक्ती सुधारण्यासाठी, पोटाचे आजार दूर व्हायला, मलावरोधावर रेचक, मधुमेहावर साखर कमी करण्यासाठी, काविळीसाठी, वात नाशनासाठी... एक न दोन. अनेकाविध उपयोग ह्या वृक्षाचे आहेत.
अनेकांनी बेलाची पानं पाहिली असतात पण झाड पाहिले नसते. याचं खोड खडबडीत असतं नी साल करडट, पिवळसर रंगाची असते. या झाडाचे लाकूड पिवळट करडट रंगाचे असते. साधारण आपल्याला माहितच नसतं की बेलाचे लाकूड मजबूत समजले जाते. या लाकडाची गम्मत म्हणजे, कापल्यावरही काही काळ ते सुगंधीत रहातं.या लाकडाचा उपयोग बैलगाड्या, , हत्यारांच्या मुठी, शेतकामाची अवजारं बनवायलाही होतो. उत्तरेकडे, या लाकडाचा वापर कोरीव कामाच्या वस्तू बनवायला होतो. खास सांगायचं म्हणजे, या लाकडाचा लगद्याचा उपयोग आवरणाच्या कागदासाठी केला जातो. या झाडाचा डिंक चांगल्या दर्ज्याचा असून अगदी बाभळीच्या डिंकाइतका दर्जा त्यात असतो. रहाता राहीली याची मुळं! यांचाही वापर औषधांमध्ये केला जातो. प्रसिद्ध दशमुलारिष्टात याची मुळे वापरली जातात...
आपल्या पुर्वजांना या औषधी वृक्षाचं महत्व कधीच कळलं होतं. म्हणुनच अथर्व वेदात याला जळणासाठी तोडू नये असे लिहिले आहे. आजही संथाल जमातीत या झाडाला देवता म्हणुन पुजण्यात येतं नी प्राणपणाने जपलं जातं. तास पाहायला गेलं तर बेलाबद्दल लिहावं तितक कमीच. मी आयुर्वेदाच्या द्रुष्टीने मला माहीत असलेल्याच गोष्टी इथे लिहिल्या असून या वृक्षाचे अनेक औषधी गुण मला माहित नाही. जाताजाता सांगायची गोष्ट म्हणजे, बेलाचे झाड सर्व प्रकारच्या जमिनीत लागते नी वाढते. ताज्या बियांपासून , मुळांच्या फ़ुटव्यातून नविन रोपं सहज बनतात. ह्यामुळेच शासनाने वनशेतीसाठी हे झाड पुरस्कृत करायला हल्ली सुरुवात केली आहे.
हे लिखाण थांबवताना बेलाबद्दल सांगायचं वैशिष्ठय म्हणजे, बेल हा एकमेव वृक्ष आहे ज्यावर संस्कृत भाषेत अष्ट्क लिहिलं गेलय.
-- सुषमा मोहिते
( आरोग्यदूत व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सौजन्याने )
माझे वडील वैद्य अरविंद जोशी यांच्या सांगण्यात असे आले की एका वैद्याने एका दमेकरी पेशंटला १५ दिवस पुरणपोळी खायला सांगितली आणि त्याचा दमा गेला. ह्यावर माझा विश्वास बसत नव्हता.
माझे म्हणणे होते की डाळीचे पदार्थ खाल्ले की गॅसेस होतात. मग एवढे दिवस फक्त पुरणपोळी खाल्ली तर किती गॅसेस होतील. त्रास होईल. मात्र बाबा त्यांच्या म्हणण्यावर ठाम होते.
त्यांचे म्हणणे होते की हरबरा डाळीने गॅसेस होत नाहीत तर बाहेर पडतात. आणि आपले पूर्वज काय वेडे होते काय ज्यांनी दिवाळी सोडून इतर सर्व सणांना पुरणपोळी करायची पद्धत पाडली?
मुद्दा विचार करायला लावणारा होता.
मी ठरविले १५ दिवस नाही ७ दिवस करून तर बघू. आपल्याला दमा नाही का इतर त्रास ही नाहीत बघूया काय होते ते. दि. २६ जुलै २०१६ पासून मी पुरणपोळीचा उपवास सुरु केला.
माझे बघून माझ्या पत्नीनेही सुरु केला. तीची कंबर दुखत होती फार वेळ बसवत नव्हते. झोपावे लागत होते.
नाष्ट्या पासून रात्री झोपे पर्यत जे काही खायचे ते फक्त पुरणपोळीच.
पहिले दोन दिवस बरेच गॅसेस सुटले. नंतर थोडे अँसिडीक वाटले म्हणून बाबांशी बोललो. ते म्हणाले काकडी खा. म्हणून दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण झाले की काकडी खायला सुरवात केली. आणि काय गम्मत अँसिडीटी ही नाही आणि गॅसेस ही सुटेनसे झाले.
दर तीन ते चार तासांनी सडकून भूक लागायला लागली. शरीर मागणीच करत होते.
दुसर्याच दिवसापासून शरीर अतिशय हलके वाटायला लागले. पोट साफ व्हायला लागले. भूक वाढली. एनर्जी वाढली. रात्री पर्यत फ्रेश रहायला लागलो. खाल्लेले सगळे पचून जाते असे जाणवायला लागले.
४ थ्या दिवशी मात्र गोडाचा कंटाळा येऊ लागला. पण शरीर इतके हलके वाटत होते की उपवास सोडायची काही इच्छा होत नव्हती.
मला गोड पुरणपोळी खायचा कंटाळा आला होता, इतर पदार्थ खावेसे वाटू लागले होते. पण मन मारले. आपण स्वतः वर प्रयोग करत आहोत तर तो पूर्ण करायलाच पाहिजे. पेशंट असतो आणि एखाद्या वैद्याने सांगितले असते तर मध्येच सोडून चालले असते का? आणि सोडले तर गुण आला नसता तर दोष कोणाचा? माझा की वैद्याचा? अजून तीन दिवसच आहेत करू पूर्ण काय होतंय त्यात.
तिकडे बायाकोने पण पुरणपोळीचा उपवास सुरु केला होता. पण तिचा निग्रह कमी पडला. तिने तिसर्याच दिवशी रात्रीचे जेवण सुरु केले पण ते म्हणजे ज्वारी व डाळीचे पीठ एकत्र करून त्याचे थालीपीठ करून खाऊ लागली . पण तो पर्यत तिलाही फायदा झाला. तीला सहसा गॅसेस सुटत नाहीत. पण तिलाही प्रचंड गॅसेस सुटले. तिची कंबर दुखी ९०% कमी झाली. ती दोनच दिवसांत चार पाच तास बसू लागली. पाच दिवसांनी विचारले तर कंबरदुखी पूर्ण पणे थांबली होती.
भूषण जोशी
व्दारा वैद्य अरविंद जोशी,
६१५ नारायण पेठ नवश्रीमान सोसायटी लोखंडे तालीम जवळ पुणे ३०
सोमवार, गुरुवार, शनी वारी संध्याकाळी ४ ते ६
मोबाईल फोनद्वारे जे Electro magnetic radiation( EMFR) निघतात. त्याचा शरीरावर फार मोठा दुष्परिणाम होतो. विशेषत: लहान मुलांसाठी हे High Frequency Electro Magnetic field (PEMF) मेंदूसाठी व रक्तासाठी फारच हानिकारक असतात. याच्या अतिरेकी वापरामुळे डोकेदुखी, टेंशन, निद्रानाश व कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम होतो.
सुसंवादाची कमी : प्रत्यक्ष संवाद हा सगळ्यात उत्तम! समोरासमोर बसून संवाद साधल्याने संबंध चांगले राहतात,तसेच कुठल्याही समस्येचे निवारण लवकरात लवकर होते. पण, आजकाल मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे संवाद हा फारच कमी झालेला आहे. प्रवासात पण जेव्हा सगळे ग्रुपनी जातात,तेव्हा गप्पागोष्टींपेक्षा सगळेजण मोबाईलवरच व्यस्त असतात.
शारीरिक हालचाली कमी
मोबाईलमुळे सगळ्यांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. तसेच, आळशीपणा पण वाढला आहे. शेजारच्या दुकानातून सामान आणायचे असल्यास फोन करून होमडिलीव्हरी द्वारे सामान मागविल्या जाते. अशा प्रकारे आळशीपणाचे जे दुष्परिणाम असतात, त्याद्वारे नुकसानच होते.
अतिरेक झोपेचे प्रमाण
मोबाईल रेडिएशनचा वेग हा ८८४ Mh २ इतका असतो, त्यामुळे झोपेचे प्रमाण हे वाढतच जातं. जास्त झोपण्यामुळे कामे वेळेवर पूर्ण होत नाही, तसेच संपूर्ण शरीरावर पण घातक परिणाम होतो.
एकाग्रतेचा अभाव
सेलफोनच्या अति वापरामुळे एकाग्रतेचा अभाव आढळून येतो. शारीरिक तसेच मानसिक पण ताण पडतो. मुले अभ्यास करताना सुद्धा मोबाईलवर गेम खेळत असतात व internet चा वापर करतात. त्यामुळे मुलांचे नापास होण्याचे प्रमाण हे वाढतच आहे.
ब्रेन ट्युमर
सेलफोनचे जे electromagnetic रेडिएशन निघतात. त्याचा सर्वात वाईट परिणाम आपल्या ब्रेनवर होतो. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार अतिरेकी वापरामुळे ब्रेन ट्युमर होण्याची शक्यता असतो.
शरीराच्या तापमानात वाढ
मोबाईल फोनमध्ये रेडिओ frequewncies चा बेस स्टेशनशी संवाद साधण्यासाठी वापर केला जातो.या rf रेडिएशनमुळे शरीराच्या तापमानात अतिरिक्त वाढ होते, त्याचा वाईट परिणाम आपल्या ब्रेन व शरीरावर होतो.
अपघाताच्या प्रमाणात वाढ
सेलफोनच्या अतिरेकी वापरामुळे रोड अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. नियम कितीही कडक केले तरीपण लोक ड्रायव्हिंग करताना सेलफोनवर बोलत असतात, त्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होते व अपघाताच्या प्रमाणात वाढ होते.
तोंडाचा ट्युमर वाढण्याची शक्यता
नुकत्याच झालेल्या मेडिकल सर्वेनुसार सेलफोनच्या अतिरेकी वापरामुळे mouth cancer ची शक्यता वाढते. त्यामुळे खूप आवश्यक असेल तेव्हाच फोनचा वापर करावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आपल्याला शाळेत आठवी, नववी मधे शरीर शास्त्रात शिकवलेआहे की--आपल्या पोटात जठर, यकृत म्हणजे मराठीत लिव्हर,प्लीहा,स्वादु पिंड,लहान आंतडे, मोठे आंतडे मुत्र पिंड वगेर अवयव आहेत. ह्यातील लहान आतड्याची लांबी 22 फूट आहे.--
आता विचार करा. देवाने,निसर्गाने एवढ्याशा जागेत एवढे अवयव व 22 फूटाचे आतडे कसे बसविले असेल? 22 फूटाची कमीत कमी व्यासाची एवढ्या लहान जागेत कशी राहते आणि आपण जे अन्न खातो त्याचा व्हाल्युम किती? हे कसे? विचार चालेना!! एक दिवस
फुगेवाला नळीचा फुगा पंपाने हवा भरताना पाहिला आणि कोडे सुटले, आन्नाचा घास जेव्हा येतो तेव्हा आतड्याचा व्यास वाढतो,प्रसरण पावते आणि घास पुढे गेला की अकुंचन पावते. म्हणजे अन्न पुढे पुढे सरकणे व न पचलेले अन्न शरीरा बाहेर पडणे ह्यासाठी आतड्याचे आकुंचन व पसरण होणे आवशक आहे. म्हणजे पोट एकदा दाबले जाणे व ताणले जाणे आवशक आहे. नुसत्या चालण्याने ते होत नाही. पण सुर्यनमस्कारात ते होते.
सुर्यनमस्कारात प्रथम खाली वाकतो, तेव्हा पोट दाबले जाते. नंतर डावा पाय दुमडतो व उजवा पाय मागे नेतो, तेव्हा पोटाचा डावा भाग दाबला जातो व उजवा भाग ताणला जातो. नंतर ओणवे होतो तेव्हा पोट सरळ होते.नंतर ह्या स्थितीत धडाचा भाग वर करून आकाशाकडे पाहतो, तेव्हा पोट ताणले जाते. नंतर उठताना उजवा पाय पुढे घेतो तेव्हा पोटाचा उजवा भाग दाबला जातो व डावा भाग ताणला जातो नंतर वाकलेल्या स्थितीत येतो तेव्हा पोट दाबले जाते. नंतर सरळ होतो तेव्हा पोट सरळ होते. ह्या क्रमाने पोट दाबले व ताणले जाते. पोटातील अवयव व्यवस्थित काम करू लागतात. अन्न नीट पचते, शौचास साफ होते, ह्याचा प्रोस्टेट ग्लॅडला व स्रियाना गर्भाशय व ओव्हरीला फायदा होतो. दिवसभराच्या कामाने संध्याकाळीच आपण दमून जात असू तर सकाळी 5 ते 12 नमस्कार घातले तर दमायला होत नाही. रात्री पर्यंत फ्रेश राहतो व दिवस उत्साहात जातो असा माझा गेल्या 32 वर्षाचा अनुभव आहे.
1985 साली मला एक गृहस्थ भेटले. वय 72 होते. मला म्हणाले--मला दोन दिवस संडासला झाली नव्हती, डायबेटीस,गुडघे दुखी होती. (हे बोटीवर कॅप्टन होते) 69 व्या वर्षी आयुष्यातील पहिला सुर्यनमस्कार घातला आणि संडासला धावलो. जोशी आता किती नमस्कार घालत असेन सांगा. मी म्हणालो २०-२५ घालत असाल. ते म्हणाले- रोज 156 नमस्कार घालतो माझे सर्व त्रास गेले
ह्या गृहस्थाचे पासून मी स्फुर्ती घेतली व नमस्कार चालू केले. माझा अनुभव असा की रोज 5 ते 12 नमस्कार तब्बेत चांगली ठेवायला पुरतात.
नमस्कारासाठी झोपण्या एवढीच जागा लागते. 10 ते 15 मिनीटे लागतात. घरी करणे असल्याने जीमची फी व जाण्या येण्याचा वेळ वाचतो.
फक्त केले पाहिजे रे !!?
अरविंद जोशी B.Sc.
९४२१९४८८९४
तुम्हाला केस विंचरण्याची कल्पना नकोशी वाटते का? खाली नमूद केलेली योगासने करून पहा, नक्की लाभ होईल. पण एक गोष्ट लक्षात असू द्या की केस गळतीवर उपचार करण्यापेक्षा ती सुरु होण्या आधीच खबरदारी घेतलेली जास्त उपयुक्त ठरते. केस गळतीवर प्राचीन उपचार पद्धतींबद्दल अधिक माहितसाठी पुढे वाचा
एका सुप्रसिद्ध मासिकाची पाने चाळताना हा लेख मला दिसला. मला खात्री आहे की या आवृत्तीच्या प्रति शिल्लक राहिल्या नसतील कारण सर्वजण सध्या एकाच अडचणी वर विविध उपचार शोधत आहेत आणि तो म्हणजे केस गळणे. तुमच्या सोयीसाठी मी त्यातला काही भाग इथे प्रसिद्ध करत आहे.
खरं म्हणजे आपले केसांचे आरोग्य आपल्या एकूण आरोग्यचे ध्योतक आहे . सुंदर केस हे तुमच्याकडे असलेला आरोग्याचा अनमोल ठेवाच होय.
केस गळतीचे मुख्य कारण म्हणजे: मानसिक तणाव, खाण्य-पिण्याच्या सवयी, व्याधी, आमली पदार्थांचे सेवन, हेअर-डाय चा वापर, अनुवांशिक विकार आणि धूम्रपान.
योग आणि ध्यान केल्याने फक्त केसांची समस्याच दूर होईल असे नाही तर पूर्ण शरीरालाच त्याचा लाभ होऊ शकतो. शारीरिकच नाही तर मानसिक स्वास्थ्यही ह्यामुळे सुधारेल. योगा केल्याने टाळूच्या त्वचेमध्ये रक्ताभिसरण वाढते, पचन प्रक्रिया सुधारते आणि ताण-तणाव कमी होतो.
केस गळती थांबविण्यासाठी उपयुक्त आसने:
पुढे वाकून केलेली सर्व आसनं डोक्यातील व टाळू कडील भागातील रक्ताभिसरण वाढवतात. ह्या मुळे केसांच्या मुळांना पुष्टी मिळते. हा परिणाम काही दिवसातच लक्षात येईल.
१.अधोमुख श्वानासन
हे आसन केल्याने मस्तकात व्यवस्थित रक्ताभिससरण होते ज्यामुळे सायनसचा व सर्दीचा त्रास कमी होतो. मानसिक थकवा, तणाव आणि निद्रानाश ह्या लक्षणांवार मात करण्यासाठी देखील हे आसन उत्तम आहे.
२. उत्थानासन:
थकवा व शीण घालवण्यासाठी हे आसन उत्तम समजलं जातं. रजोनिवृत्ति काळात ह्या आसनाचा खूप लाभ होतो, पचन शक्तीची वृद्धी होते.
३. वज्रासन
हे एकमेव असे आसन आहे जे जेवल्यानंतर लगेच करता येते. मूत्र यंत्रणेचे विकार, वजन कमी होणे, मंदाग्नी ह्यांच्यावर परिणामकारक असे हे आसन आहे. पोटातील निर्माण झालेला वायू कमी करण्यासाठीही वज्रासन उत्तम समजले जाते.
४. अपानासन:
अपान म्हणजेच आपल्या पचन यंत्रणेतील गरळाचे शुद्धीकरणास जबाबदार असलेली उर्जा. हे आसन केल्याने मनाचे स्थर्य येते, बद्धकोष्ठतेवर मात करता येते.
५ .पवनमुक्तासन:
पवनमुक्तासन केल्याने शरीरातील वायूवर नियंत्रण येते व पचन सुधारते. पाठीच्या खालच्या भागातील स्नायू मजबूत होतात. पोट व कुल्ल्यावरील मेद (चरबी) कमी होते.
६. सर्वांगासन:
हे आसन थायरॉईड ग्रंथीना पुष्टी देते ज्यामुळे श्वसनसंस्था, पचनसंस्था, प्रजननसंस्था व कार्यरत राहतात.
केस गळती थांबविण्यासाठी उपयुक्त प्राणायाम:
१. कपालभाती प्राणायाम:
हा प्राणायाम केल्याने मेंदूला अधिक प्राणवायूचा पुरवठा होतो ज्यामुळे मज्जासंस्था अधिक कार्यरत राहते, विषद्रव्यांचा निचरा नीट प्रकारे होते. स्थूलपणा व मधुमेहावरही अत्यंत प्रभावी.
२. भस्त्रिका प्राणायाम:
ह्यामुळे शरीरातील अतिरिक्त वात, कफ आणि पित्ताचा समतोल राहतो. मज्जासंस्थेचे शुद्धीकरण होते ज्यामुळे शरीर स्वस्थ राहते.
३. नाडी शोधन प्राणायाम:
हे हृदयाच्या समस्या, तसेच दमा आणि संधिवात, नैराश्य व डोळे आणि कानाच्या समस्या दूर ठेवते.
लक्षात ठेवण्यासारख्या आणखी काही गोष्टी:
आसनांबरोबरच आपला आहार नियंत्रित ठेवणे खूप आवश्यक आहे. आहार संतुलित असावा ज्या मध्ये ताजी फळं, पाले भाज्या, डाळी, मोड आलेली कडधान्ये आणि दुधा पासून बनलेली उत्पादने ह्यांचा समावेश असावा. ही केस वाढीसाठी महत्वाचे पोषक देते. अशा आहाराने केसांचे व्यवस्थित पोषण होते.
कडुलिंबाच्या पाणयाने केस धुतल्याने, आठवड्यातून २-३ वेळा धूवून स्वछ ठेवल्याने, नारळाचे तेलाने मालिश केल्याने केसांची वाढ उत्तम प्रकारे होते.
केसांवर कोणतीही उग्र रसायने किंवा केस सजवण्याची बाजारू भंपक उत्पादने वापरणे टाळा.
एक गोष्ट मात्र समजून घेतली पाहिजे की केस गळती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. केस गाळण्याच्या प्रक्रियेची गती कमी करणे शक्य आहे पण गेलेले केस परत येणे सोपे नाही.
मार्च ११, १२ आणि १३ २०१६ रोजी होणारा जागतिक सांस्कृतिक उत्सव (वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा, माणुसकी, अध्यात्म आणि मानवतावादी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होय. हा उत्सव म्हणजे संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडवून आणेल.
-- सुषमा मोहिते
आरोग्यदूत या Whatsapp ग्रुपवरुन
विडय़ातील प्रत्येक पदार्थ आपल्या शरीराला आवश्यक असतो.
१. कात : अतिसार थांबवणे व कंठशुद्धी करणे.
२. जायफळ : तोंडाची दुर्गंधी दूर करणे.
३. ओवा : पोटदुखी थांबणे.
४. सुपारी : दात बळकट होतात.
५. वेलदोडा : अन्नपचन सुधारते.
६. लवंग : दुर्गंधी व कफ कमी होते.
७. बडीशेप : वायुहारक, बुद्धिमत्तावर्धक.
८-९. सुके /ओले खोबरे : बुद्धिवर्धक, त्वचारोग टाळते व घाम येणे कमी होते.
१०. ज्येष्ठमध : आवाज सुधारतो.
११. कापूर : जंतुनाशक.
चुना : कफाचा नाश व उलटी थांबते.
१२. केशर : सर्दी कमी होते.
१३. नागवेलीची पाने : सुवासिक व दुर्गंधीनाशक.
अशा या तेरा पदार्थानी व तेरा गुणांनी युक्त असा त्रयोदशगुणी विडा, बहुगुणी विडा सर्वानी अवश्य खावा, पण नीट चावून चावून खावा.
आता पूर्वीप्रमाणे घरोघरी पानदान दिसत नाही. पण चौकाचौकात पानाचे ठेले दिसतात. तिथे तयार पाने मिळतात. त्यामुळे लोकांना पान, विडा व त्यातील पदार्थ माहितीच नाहीत.
पूर्वीसारखी एकत्र कुटुंबे नाहीत त्यामुळे आजोबा नाहीत व त्यांचा खलबत्ता, पीकदाणी, चंची, अडकित्ते आणि ते शब्दही काळाबरोबर नाहीसे झाले.
श्रीधर कुलकर्णी
ज्ञानामृत मंच ग्रुप
शस्त्र, शास्त्र आणि पाणी हे घेणार्याच्या पात्रतेनुसार गुण आणि दोष उत्पन्न करतात. म्हणून शिकणार्याची बुद्धी शुद्ध करून घ्यावी असे वचन आहे.
खरंच आहे. ब्लेडने पोट फाडू पण शकतो आणि पोटाचे ऑपरशनपण करू शकतो. ब्लेड कुणाच्या हातात आहे, त्यावर परिणाम अवलंबून असतो.
शास्त्रदेखील तसेच युक्तीने वापरावे लागते. कायदा हा लवचिक असावा. नियम हा पाळण्यासाठी असावा, ठरवून उपास करताना कधीतरी चुकुन, जुन्या सवयीमुळे उपासाला न चालणारा पदार्थ पटकन तोंडात गेला, म्हणून फार मोठे आभाळ कोसळणार नाही, की कोणी फाशी देणार नाही, जिथे चुक लक्षात आली तिथून देवाची क्षमा मागून, पुढे उपास सुरू ठेवावा.
आपण सोयीस्कर अर्थ काढून, "नाहीतरी आता उपवास मोडलाच आहे, तर आता वडा भजी ऊसळ मिसळ पण खाऊन घेऊया." असा विचार करणे चुकीचे ठरेल.
उपास कोणासाठी करायचा आहे ? देवासाठी की देहासाठी ?
खाण्यासाठी की देण्यासाठी ? आणि असे केलेले उपवास काही फलदायी होत नाहीत.
उपवास करायचा असेल तर एक विशिष्ट मानसिकता बनवावी लागते. मनाला संयमात ठेवावे लागते, मोहाचा त्याग करावाच लागतो.
जी गोष्ट किंवा वस्तु सोडल्याशिवाय ती मला हितकर होणार नाही, हे आपल्या मनाला आधी पटले पाहिजे.
म्हणजे वैद्याने सांगितलेले पथ्यपालन करणे, हा देखील एक उपासच झाला ना !
ज्याचा हव्यास संपत नाही ते सुख ! आणि सुख जिथे संपते तिथे समाधान सुरू होते, हे जर खरे असेल तर उपास म्हणजे उपभोग घेण्याच्या मानसिकतेतून (यालाच माया असेही म्हणतात) बाहेर येणे. प्रपंचात राहून परमार्थाचा विचार करणे म्हणजे उपवास.
समर्थ म्हणतात,
आपण खातो अन्नासी
अन्न खाते आपणासी ।
सर्व काळ मानसी,
चिंतातुर ।।
आज संकष्टी आहे, पण रविवार बुधवार पण आहे, आता काय धरावे की संकष्टी सोडावी असा प्रश्न जरी मनात निर्माण झाला, तरी अशी कष्टाने केलेली संकष्टी कशी पावणार ? त्याने समाधान कसे मिळणार ?
उपासाला सात्विक अन्न खावे.
नेमकं सात्विक म्हणजे काय ?
जरूर असेल तेव्हाच आणि तेवढेच अन्न खाणे म्हणजे सात्विक होय. मुख्य म्हणजे प्रत्येक घासाला भगवंताची (शास्त्रीची वा वैद्याची सुद्धा ) आठवण राहिली पाहिजे.
नाम घेता ग्रासोग्रासी
तो जेविता राहिला,
उपवासी, असं तुकाराम महाराज पण सांगतातच !
आपल्या प्रकृतीचा विचार न करता, भुकेचा ( अग्निबलाचा ) विचार न करता, आजारांचा विचार न करता, स्वतःच्या मनाने ठरवून केलेला उपास हा फक्त अशक्तपणाच आणतो.
प.पू. गोंदवलेकर महाराज म्हणतात, प्रापंचिक गोष्टींकरीता उपास ही गोष्टच मला मान्य नाही.
आपल्या मनामध्ये काहीतरी मिळावे म्हणून कितीही उपासासारखे कष्ट केलेत तरी, ते पाहून लोक फसतील, पण भगवंत फसणार नाही.
महाराज म्हणतात,
उपासना करा.
उपास ना करा.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आभासी ध्येयांच्या मागे उर फुटेपर्यंत धावताना नको नको ते आजार, व्याधी शरीराला विळखा घालत आहेत, त्यावर बर्याचदा औषधांच्या मात्राही काम करीत नाहीत. संगीतात असणार्या अनोख्या संमोहन शक्तीमुळे सध्या रोगांवर पूरक उपचार म्हणून संगीतोपचार लोकप्रिय होत आहे.
संगीतं श्रवणामृतं !
संगीत हे नेहमीच आनंद देणारं, मनःशांती मिळवून देणारं असत. कोणतही काम करीत असताना एकीकडे गाण चालू असलं कि काम चुटकीसरशी संपत. कामाचा शीण तेव्हढासा जाणवत नाही. सकाळच्या वेळी फिरायला जाताना कानात इयर-प्लग्ज घालून गाण ऐकत गाण्याच्या ह्रिदमबरोबर भराभर चालणारे लोक आजकाल खूप दिसतात. जिममध्ये तालबद्ध गाण्यांच्या साथीने सगळे वर्कआऊट्स होत असतात. वशपींळीं च्या खुर्चीत मोठ्ठा ‘आ’ करून, तोंड बधीर करून बसलेले असताना आणि तिथून कधी एकदा सुटका होतेय त्या क्षणासाठी अधीर झालेले असताना जर का लरलज्ञर्सीपव मध्ये मंद, सुखद वाद्यसंगीत वाजत असलं तर आपलं लक्ष दुखण्यापासून थोडं दूर हटत. अंगाई गीताच्या सुरांनी चुळबुळ करणारी छोटी बाळ चट्कन झोपेच्या आधीन होतात.
संगीत हे मनाला, चित्तवृत्तींना शांत करत हे तर सर्वश्रुत आहे. पण संगीताचा उपयोग रोगनिवारणासाठीदेखील करता येतो याबद्दल मात्र अजून फारशी कुणाला माहिती नाही. आपल्या वेदांपैकी सामवेदात संगीताबद्दल विस्तृत माहिती आहे. संगीत हे आयुर्वेदाचा देखील खूप जुना भाग आहे.
भारतीय शास्त्रीय संगीतात राग-समय चक्राची संकल्पना फार महत्वाची मानली जाते. त्या नुसार दिवसाच्या प्रहराप्रमाणे राग गायले जातात. जसे सकाळी गायचे राग म्हणजे भैरवचे प्रकार, तोडीचे प्रकार इ. दुपारी सारंगचे प्रकार, पटदीप, भीमपलास इ. संध्याकाळच्या रागामध्ये भूप, कामोद, यमनकल्याण वगैरे आणि रात्रीच्या रागामध्ये बागेश्री,मालकौंस, भिन्न षड्ज इ. रागाचा समावेश होतो.
आयुर्वेदात त्रिदोष म्हणजे कफ,पित्त आणि वात ही संकल्पना आहे. हे त्रिदोष आपल्या शरीरात असतात. त्यांचं प्रमाण हे व्यक्तीपरत्वे भिन्न असत. या दोषांच प्रमाण हे नेहमी संतुलित असावं लागत. कोणताही एक दोष वाढला की आजार येतो. या दोषांच्या वेळा ठरलेल्या असतात. दिवसभरात दोन चक्रात त्या वेळा विभागलेल्या असतात. म्हणजे सकाळी 6 ते 10 कफाच प्रमाण जास्त असत. 10 ते 12 पित्त आणि 2 ते 6 वात. दुसर्या सायकलमध्ये 6 ते 10 कफ, 10 ते 2 पित्त आणि 2 ते 6 वात.
ज्या वेळेला त्रिदोषांपैकी जो दोष वाढलेला असतो त्यानुसार रागाची निवड केली जाते (अर्थात तो राग त्या वेळी गायचा राग असतो). मात्र त्यात थोडा बदल करावा लागतो. म्हणजे एखाद्या स्वराची षीशािंrऊशपलू किंवा शपशीसू वाढवून तो राग गायला किंवा वाजविला गेला तर रोग निवारण होण्यास मदत होते. राग विशिष्ट पद्धतीने वाजविला किंवा गायला तरच त्याचा परिणाम होतो एरवी त्याने नुसते मनोरंजन होते. शारंगदेवाच्या ‘संगीत-रत्नाकर’ या ग्रंथात याविषयीचे श्लोक आहेत. त्रिदोषांपैकी प्रत्येक दोषाचे पाच प्रकार आहेत आणि ते शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. त्या नुसार राग बांधलेले आहेत.
आधुनिक वैद्यक शास्त्रात आता संगीतात असलेल्या रोगनिवारक शक्ती (हिलिंग पॉवर) बद्दल नवीन शोध लागत आहेत. संगीताच्या माध्यमा तून उपचार करण्यासाठी आपल्या शरीरातल्या पेशींना कंपनाच्या साह्याने सचेत केलं जात. या कंपनामुळे रोग्याच्या जाणीवेवर (लेपीलर्ळीपशी) परिणाम होतो व त्याला आरोग्याचा लाभ होतो. त्या साठी रोगाचं अचूक निदान करून त्याला ऐकवण्यासाठी नेमक्या रागाची निवड करून तो किती वेळ आणि कोणत्या समयी ऐकायचा हे ठरवावं लागत.
चेन्नईतील राग रिसर्च सेंटर सध्या भारतीय राग आणि त्यांचा रोग- निवारणासाठी कसा उपयोग करून घेता येईल याबद्दल अभ्यास आणि संशोधन करीत आहे. या साठी संगीतज्ञ, डॉक्टर्स, मानसोपचारतज्ञ यांची एक टीम काम करते आहे.
मुंबईत प्रसिद्ध सतारवादक व संगीतकार पं.शशांक कट्टी (शांक-नील फेम )यांनी गेली अनेक वर्ष या संदर्भात अभ्यास व चिंतन करून डॉक्टर्स आणि आयुर्वेदाचार्य यांच्या बरोबर काम करून स्वतःची ‘सूर-संजीवन’ या नावाची एक उपचार पद्धती विकसित केली आहे. इच्छुकांना ते या विषयीच प्रशिक्षणही देतात. रोगनिवारणासाठी विशिष्ट रागांची निवड करून ते विशिष्ट पद्धतीने वाजवून त्यांनी अनेक सीडीजची निर्मिती केली आहे.
डोकेदुखी, पोट दुखी, संधीवात, असिडीटी, मधुमेह, कोलायटिस, यकृताचे विकार, अस्थमा, रक्तदाब, निद्रानाश, फिट्स अशा अनेक विकारावर संगीतोपचार फार उपयुक्त ठरत आहेत. अर्थात चालू असलेली ओषध पूर्णपणे बंद करून चालत नाही. पण त्यांच्या जोडीने पूरक उपाय म्हणून ह्या उपचारांचा खूप फायदा होतो. ओषधांची मात्रा कमीकमी करीत पूर्णपणे बंद करून रोग बरा होऊ शकतो. नुसत करमणूकीच साधन न रहाता आरोग्य सुधारण्यासाठी आता संगीताचा उपयोग करण्यात येतो आहे.
आधुनिक जीवनाचा परिपाक म्हणून निरनिराळ्या प्रकारच्या व्याधी वाढीस लागल्या आहेत. अलोपथिच्या मर्यादा लक्षात आल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून सुजोक, रेकी, प्राणिक हिलिंग, इत्यादी अनेक पूरक वा पर्यायी उपचारपद्धती लोकप्रिय झाल्या आहेत. त्यांच्याच जोडीने आता येणार्या काळात संगीतोपचार पद्धती लोकप्रिय झाली तर त्यात नवल वाटायला नको.
-- सुलोचना देवलकर
9930657226…
WhatsApp वरील संगीत या ग्रुपवरुन..
माणसाच्या ५० टक्के आजाराला त्याचे पोट कारणीभूत असते. पोट नीट असलं की स्वास्थ्य आलबेल राहू शकते. त्यासाठी एक साधी भाजी महत्त्वपूर्ण कार्य करते ती म्हणजे शेंगेसारखी दिसणारी भेंडी ही भाजी होय. भेंडीच्या आत चविष्ट बिया असतात पण जाडसर, पारदर्शक द्रव असतो. काहींना ती आवडत नाही. पण तुमच्या पोटाचे विकार विशेषतः बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीच्या त्रासांवर भेंडी अक्सर इलाज असल्याचे आढळले आहे. या भाजीचा नियमित खुराक पचनेंद्रियांच्या कार्यासाठी लाभदायक ठरतो.
इलिनोईस युनिव्हर्सिटीतील एक संशोधक डॉ. सिल्विया झूक यांच्या नोंदणीनुसार भेंडीची भाजी ही विविध अन्नद्रव्यांचे पॉवर हाऊस आहे. त्यातील अर्धा हिस्सा गम आणि पेक्टिनच्या धाग्याच्या रुपात असतो. त्यातील विद्राव्य तंतूमय अन्नामुळे रक्तातला कोलेस्टरॉल कमी होतो, तसेच हृदयविकार मंदावतात. जो अतिद्राव्य तंतूमय चोथा असतो तो पचनेंद्रियाचा मार्ग मोकळा ठेवण्यास हातभार लावतो. भेंडी सतत खाल्ल्याने आतड्याच्या कर्करोगापासून आपली सुटका होते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठीसुद्धा या भाजीचा हातभार लागतो.
या भाजीत बी-६ हे जीवनसत्त्व तसेच शरीराला उपयुक्त असे फॉलिक आम्लदेखील मुबलक असते. शिजविलेल्या अर्धा कप भाजीत खालीलप्रमाणे अन्नसाठा असतो ः कॅलरीज – २५ तंतूमय अन्न – २ ग्रॅम प्रथिने – १.५ ग्रॅम कार्बोहायड्रेटस् – ५.८ ग्रॅम जीवनसत्त्व अ – ४६९ युनिट जीवनसत्त्व क – १३ मिलीग्रॅम फॉलिक आम्ल – ३६.५ मिलीग्रॅम लोह – ०.४ मिलीग्रॅम पोटॅशियम – २५६ मिलीग्रॅम मॅग्नेशियम – ४६ मिलीग्रॅम भेंडीतील पातळ, चिकट द्रव्यामुळे आतड्यातील साखरेचे शोषण कमी होते व रक्तात वाढणार्या साखरेचे प्रमाण रोखले जाते. भेंडीतली जीव रसायने कोलेस्टरॉलच्या नव्हे तर यकृतरसातील विषारी पदार्थाशी परमाणूशी संयोग पावतात व शरीराबाहेर टाकण्यास सहाय्य करतात. भेंडीतील तंतूमय भाग बद्धकोष्ठता रोखतो. हे तंतू मऊ असल्यामुळे अन्य कठीण वनस्पतीज तंतूप्रमाणे ते आतड्याच्या आतल्या मऊ मांसल थरांना ओरखडे पाडीत नाहीत. त्याच्या घसरट गुणधर्मामुळे न पचलेल्या अन्नाचा घन भाग मोठ्या आतड्यातून सहज निसटत गुदद्वारामार्गे शरीराबाहेर पडतो.
शरीराच्या स्वास्थ्याला पोषक ठरणार्या जीवाणूच्या वाढीस ही भाजी हातभार लावते. अशक्तपणा, थकवा व मानसिक तणाव घालविण्यासाठी ही भाजी उपयोगी पडते. फुफ्फुसाला होणारे संसर्ग, गळ्याचे विकार, खाज यासाठी सुद्धा उपाय म्हणून भेंडीची भाजी लागू पडते. या सर्व प्राप्तीसाठी भेंडीची भाजी अर्धवट उकळवून खाल्लेली बरी असा सल्ला दिला जातो....
|| भेंडी खा निरोगी रहा ||
विशेष चव तसेच चिकट आणि बुळबीळत गुणधर्मामुळे भेंडीची भाजी पाहिली की, अनेकजण नाक मुरडतात. पण, भेडी या फळभाजीत अनेक पोषण तत्वे असून, नियमित भेंजीचे सेवन केल्यास कॅन्सर सारख्या रोगापासून आपला बचाव होतो.
भेंडी ही फळभाजी आरोग्यासाठी खुप लाभदायी आहे. भेंडीमध्ये अनेक प्रकराचे पोषक तत्व आणि प्रोटीन्स असतात. शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त बनवण्यासाठी आवश्यक असलेले वसा, रेशा, कार्बोहाइड्रेट, कैल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम यासारखे जीवनसत्वे भेंडीमध्ये आहेत.
भेंडी कॅन्सर सारख्या रोगापासून आपला बचाव करते. आपल्या शरीरातील विषारी सत्वे नष्ट करण्याचे काम भेंडी करते.
भेंडीत असलेले यूगेनॉलमुळे डायबिटीज या आजारापासून बचाव होतो. तर, यातील फाइबर रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते.
ज्या व्यक्तींना आपले वजन कमी करायचे आहे. त्यांनी नियमीत भेंडीचा आहार घ्यावा. भेंडीत असलेल्या फायबरमुळे आपल्या शरीरातील कॅलरी वाढत नाही आणि आपले वजन कमी होण्यास मदत होते.
भेंडी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यात व्हिटामीन सी हे जीवनस्तव असते. हे आपली इम्यूनीटी सिस्टमला ताकद वाढवून खोकला आणि थंडी पासून बचाव करते. तर, यातील व्हिटामीन ए हे जीवसत्व डोळ्यांना निरोगी ठेवते.
मधुमेहींसाठी औषध
दोन भेंड्या घ्या. त्यांची दोन्ही बाजूंचे शेवटचे तुकडे कापून टाका. मध्ये एक उभा छेद घ्या. एका ग्लासमध्ये पाणी घ्या व त्यात ह्या दोन्ही भेंड्या टाकून रात्रभर ग्लास झाकून ठेवा. सकाळी उठल्यावर भेंड्या काढून टाका व ग्लासमधील पाणी पिऊन टाका. हे पंधरा दिवस करुण पहा तुमच्या साखरेच्या प्रमाणात किती लक्षणीय घट होते ते पहा !.
भेंडीचे १० फायदे
हिरव्या भाज्यांमध्ये आपले एक वेगळे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगरसुध्दा म्हटले जाते. भेंडी ही अनेकांच्या आवडीच्या भाज्यांमधील एक आहे, तर काही लोकांना भेंडी बिलकुल आवडत नाही. परंतु भेंडी खाल्याने कोणते फायदे आणि नुकसान होतात हे तुम्हाला माहीत आहे का? जर माहीत नसतील तर नक्की वाचा हे 10 फायदे,
१. कँसर
भेंडी आपल्या आहारा नियमित घेतल्याने तुम्ही कँसरला दुर ठेवु शकता. कोलन कँसरला दुर ठेवण्यासाठी भेंडी खास फायदेशीर आहे. ही आतड्यांतील विषारी तत्त्व बाहेर काढण्यासाठी मदत करते, ज्यामुळे आतडे स्वस्थ राहतात आणि चांगल्या प्रकारे काम करता.
२. हृदय
भेंडी हृदयाला सुध्दा चांगले ठेवते. यामध्ये असलेले पैक्टिन, कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात, यासोबतच यामध्ये असणारा घुलनशील फायबर, रक्त आणि कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करतो. ज्यामुळे हृदय रोगाचा धोका कमी होतो.
३. डायबिटीज
यामध्ये असणारे यूगेनॉल, डायबिटीजसाठी खुप फायदेशीर ठरते. हे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढण्यापासुन थांबवते, ज्यामुळे डायबिटीजचा धोका कमी होतो.
४. अनीमिया
भेंडी अनिमियासाठी खुप फायदेशीर असते. यामध्ये असलेले आयरन हीमोग्लोबिन निर्माण करण्यात सहायक असतात. हे रक्त स्त्राव थांबवण्याचे काम करते.
५. पचनतंत्र
भेंडी ही भरपुर फायबर असलेली भाजी आहे. यामध्ये असलेले फायबर पचनतंत्रासाठी फायदेशीर आहे. यामुळे गॅस, बध्दकोष्ट आणि पोट दुखी यासारख्या समस्या होत नाही.
६. हाडांना मजबुत बनवते
भेंडीमध्ये असणारे सर्व पदार्थ हाडांसाठी उपयोगी असतात. यामध्ये मिळणारे व्हीटॅमिन के हाडांना मजबुत बनवण्याचे कार्य करते.
७. इम्यून सिस्टम
भेंडीमध्ये व्हिटॅमिन-सी सोबतच अँटीऑक्सीडेंसही मोठ्या प्रमाणात असते. यामुळे हे इम्यून सिस्टमला मजबुत बनवुन शरीरातील आजारांपासुन लढण्यास मदत करते. भेंडीला रोजच्या जेवनात घेतल्याने अनेक आजार जसे की, खोकला, सर्दी यांसारख्या समस्या होत नाही.
८. डोळ्यांचा प्रकाश
भेंडीमध्ये व्हिट्रमिन-ए, बीटा केरोटीन आणि अँटी-ऑक्सीडेंट्स असतात. नेत्रहिनतेसाठी जे कण हानीकारक असतात त्यांना नष्ट करण्याचे काम भेंडी करते. भेंडी मोती बिंदुपासून दुर ठेवते.
९. गर्भावस्था
गर्भावस्थेमध्ये भेंडीचे सेवन फायदेशीर असते. भेंडीमध्ये फोटेल नावाचे एक पोषक तत्त्व असते, जे भ्रूणाच्या मेंदुचा विकास करण्यात महत्त्व पुर्ण भुमिका बजावते. या व्यतिरीक्त भेंडीत अनेक प्रकारचे पोषक तत्त्व असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
१०. वजन कमी करण्यात
भेंडी आपले वजन कमी करण्यासोबत त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करते. भेंडीचा उपयोग केसांना सुंदर, दाट आणि चमकदार करण्यासाठी केला जातो. यामधील पदार्थांना लिंबु सोबत मिसळुन शांपु प्रमाणे वापरता येऊ शकते.
संकलक : प्रमोद तांबे
१२ मिनिटात २८८ योगासने.
सुर्यनमस्काराच्या एका फेरीत १२ योगासने होतात. दोन सूर्यनमस्कारांचा संच म्हणजे एक संपूर्ण सूर्यनमस्कार. पहिल्या फेरीत शरीराची उजवी बाजू ताणणे आणि दुसऱ्या फेरी मध्ये डाव्या बाजूला ताण देणे. म्हणजेच १२ ते १५ मिनिटामध्ये एका सूर्यनमस्काराच्या दोन संचामध्ये १२-१२ योगासनांचे १२ सूर्यनमस्कार, म्हणजेच २८८ योगासने.
सूर्यनमस्कार : कॅलरीज (उष्मांक) घटण्याचा हिशोब.
एका सुर्यनमस्काराच्या फेरीमध्ये सर्वसामान्य व्यक्तींच्या १३.९० कॅलरीज जळतात. हळू-हळू १०८ सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करा.संकल्पापर्यंत पोहोचेपर्यंत तुम्ही सडपातळ, सुडौल झालेले असाल.
३० मिनीटांच्या व्यायामानंतरची कॅलरी मधील घट
३० मिनिटांच्या विविध व्यायाम प्रकारामध्ये कॅलरीज घटण्याचा तुलनात्मक अभ्यास:
वेट लिफ्टिंग= १९९ कॅलरीज , टेनिस= २३२ कॅलरीज, बास्केट बॉल= २६५ कॅलरीज,
बीच व्हॉली बॉल= २६५ कॅलरीज, फुट बॉल=२९८ कॅलरीज, जलद सायकलिंग = ३३१ कॅलरीज,
रॉक क्लाईबींग = ३६४ कॅलरीज, धावणे= ४१४ कॅलरीज, सूर्यनमस्कार= ४१७ कॅलरीज.
वेळ अपुरा आहे? या कमी वेळेत तंदुरुस्त कसे रहावे- जाणून घ्यायचे आहे..?
‘सूर्यनमस्काराच्या दुनियेमध्ये आपले हार्दीक स्वागत.’
कामात अति व्यस्त असणाऱ्या व्यक्तींसाठी, ज्यांची तक्रार असते की, ‘ योगासने करण्यासाठी तेवढा वेळ नसतो,’ अशांसाठी सूर्यनमस्कार अतिउत्तम आहेत. सकाळी- सकाळी जलद गतीने कमीत कमीत बारा सूर्यनमस्कार केल्याने हृदयाला बळकटी प्राप्त होते, तर संथ गतीने केल्याने स्नायू बळकट बनून मन शांत स्थिर होते. शरीर लवचिक बनल्याचा आनंद मिळतो.
इतर व्यायाम प्रकारापेक्षा सूर्यनमस्कार, सुरवातीचे शरीर सैल करणारे व्यायाम आणि योगासने यांच्यामधील दुवा बनू शकतात. म्हणून सकाळी-सकाळी शरीर सैलावणारे व्यायाम प्रकार झाल्यावर काही सूर्य नमस्कार केल्यामुळे शरीर लवचिक होऊन नंतरची योगासने करण्यासाठी शरीर तयार होते.
सूर्यनमस्कार तुमच्या साठी लाभदायक का आहे?
सुर्यनमस्काराचे फक्त वरील लाभच नाहीत तर आणखी बरेच लाभ होतात शरीराच्या सर्व अवयवांना हृदय, यकृत, पचनसंस्था, छाती, अगदी पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत या सूर्यनमस्कारा मध्ये असणाऱ्या योगासनांचा उत्तम परिणाम होतो. रक्त शुद्ध होऊन रक्ताभिसरण सुधारल्याने पोट, आतडी आणि मज्जासंस्थाचे कार्य सुधारते. सूर्यनमस्काराच्या दैनंदिन सरावामुळे वात, पित्त आणि कफ, ज्यांच्यावर आपले आरोग्य अवलंबून आहे, त्यांच्यात समतोल प्राप्त होण्यास मदत होते.सुर्य नमस्काराचे इतर लाभ
सूर्यनमस्कार: योगाद्वारे सूर्याप्रति कृतज्ञता
‘या ग्रहावरील समस्त जीव सृष्टीचे अस्तित्व सूर्यामुळेच आहे’ हा शाळकरी धडा लक्षात आहे ना? या सोनेरी, तळपत्या ताऱ्याची आपल्या जीवनातील अपरिहार्य भूमिका आपण जाणतो - ज्याच्यामुळे अंधकार दूर होऊन जीवन फुलू लागते. यामुळे आत्ता आपले कर्तव्य आहे - या ताऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे. सूर्यनमस्कार आपल्याला ती संधी प्राप्त करून देतात. सूर्य नमस्काराच्या माध्यमातून संपूर्ण शरीराला व्यायाम देताना, त्या जीवन स्त्रोताचा ‘सूर्याचा’ आपण सन्मान करू शकतो.
सूर्यनमस्कार करण्यासाठी उतावळे आहात नां. सूर्य नमस्कार कसे करावेत यावरील सध्या सरळ आणि सोप्या सूचनांचे पालन करा. आपल्या योगा चटई घ्या, प्रसन्न चेहऱ्याने सुर्यनमस्कारातील एकेक योगासनांचा आनंद घ्या. सूर्यनमस्कार आणखी पवित्र आणि आशिर्वचन बनण्यासाठी सुर्याप्रतीची कृतज्ञता त्यामध्ये अनुभवा. ही निरोगी शरीर आणि स्वस्थ मन प्राप्त करण्याची पहिली पायरी आहे.
सुषमा मोहिते
आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन
Copyright © 2025 | Marathisrushti