(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • असं असतं का प्रेम?

    रात्री उशिराचा एक रेडिओ कार्यक्रम ऐकत होते. श्रोत्याने फोनवरुन आपली समस्या सांगणे,त्यावर निवेदकाने सल्ला देणे, मग एक चित्रपट गीत. पुन्हा पुढची समस्या. पुष्कळसे इंग्लिश शब्द मिश्रित असलेल्या हिंदी भाषेतील त्या कार्यक्रमाचे स्वरुप असे होते. फोनवर एका मुलाने सांगितले की त्याची ‘गर्लफ्रेंड’ सतत काही ना काही कारणाने व परत करण्याच्या बोलीवर पैसे मागते.

      March 5, 2025


  • संत तुकारामाची घोंगडी

    अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये भालचंद्र केशव गन्द्रे यांनी लिहिलेला हा लेख


    श्रीकृष्ण परमात्म्यांनी द्रौपदी वस्त्रहरणांत सातत्याने तिला वस्त्रे पुरवून तिची अब्रू वाचविली. संत तुकाराम महाराजांच्या जीवनातही अशाच एका परीक्षेच्या वेळी, तत्सम प्रसंग घडला नि श्रद्धेमुळे ईश्वरी-लीला कशी घडते हे साऱ्यांनाच जाणवले. तुकाराम महाराजांचे गुरुबंधू श्री. गोचर स्वामी! तुकाराम महाराजांवर गुरुकृपेचा वरदहस्त होता. त्यामुळे ते विदेही स्थितीचे सुख अनुभवीत असत. रात्र झाली की ते, क्षुद्राचे घरी जात व तेथेच झोपत. त्यांचा तो जणू नियमच झाला होता. सकाळी घरी जाताना मात्र या क्षुद्राच्या घरचे जे वस्त्र हाती लागेल ते घेऊन ते घरी परतत असत.

    एके रात्री ते एका भंगी समाजाच्या माणसाकडे झोपावयास गेले व सकाळी घरी परत येताना त्याच्या घरची जी घोंगडी हाती लागली ती घेऊन ते गोचर स्वामींकडे गेले. गोचरस्वामी व इतर भक्त जेव्हा जेवायच्या तयारीत होते त्यावेळी स्वामींनी तुकाराम महाराजांस भिक्षा करण्यास सांगितले. ते ऐकून जेवावयास बसलेले ब्राह्मण म्हणाले, "तुकाराम काल रात्री एका भंगी कुटुंबाकडे राहिले होते. त्यांनी त्याच्याकडची ही घोंगडीही बरोबर आणली आहे. त्यामुळे अशा भ्रष्ट माणसास आमच्या बरोबर जेवावयास बसवाल तर आम्ही जेवणार नाही." ते ऐकून दुःखानेच गोचर स्वामी म्हणाले, "तुकाराम महाराज, हे सर्व ब्राह्मण तुम्हाला भ्रष्ट म्हणत आहेत. याकरिता तुम्ही ती घोंगडी टाकून द्या बरे."

    गोचर स्वामींच्या आज्ञेप्रमाणे तुकाराम महाराजांनी त्यांच्या अंगावरची घोंगडी टाकून दिली पण काय आश्चर्य लगेच दुसरी घोंगडी त्यांच्या अंगावर आली. असे करता करता घोंगड्यांचा ढीग झाला. पण घोंगडी टाकली की नवी घोंगडी येणे बंद होईना. ते पाहून गोचरस्वामी ब्राह्मणांना म्हणाले, “काय हो, तुकाराम भ्रष्ट झाले आहेत का ते आता सांगा." पण हा अद्भुत प्रकार पाहून तेथे जमलेले सर्व ब्राह्मण लज्जित झाले व तुकाराम महाराजांचा अधिकार किती महान आहे, हे जाणून त्यांनी त्यांना नमस्कार केला व ते सारे क्षमायाचना करू लागले.

    मग गोचर स्वामी सर्वांना उद्देशून म्हणाले, "तुकाराम महाराजांची योग्यता किती महान आहे हे मी जाणतो. म्हणूनच दररोज आम्ही त्यांची भिक्षेकरिता वाट पहात असतो. साधु पुरुषाचे सद्गुण पाहून ते अंगिकारण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या कार्याला दोष देऊन त्यांना कलंकित करू नये. त्यांचा देहाभिमान नष्ट झाल्याने, त्यांच्या दृष्टीने देह हा कस्पटासमान आहे. त्यामुळे त्यांच्या देहाने केलेले कोणतेही कर्म दुषित वा कलंकित असू शकत नाही हे यापुढे नीट लक्षात ठेवा. देहाचा अभिमान असलेले जीव खरंच अज्ञानी आहेत. सर्व जीव-प्राणीमात्रांवर दया करणारी माणसे थोर अंतःकरणाची व अतुलनीय आदर्शयुक्त आहेत. मात्र त्यांचा अधिकार कळण्यास सामान्यजनांना खूप वेळ लागतो नि तोपर्यंत अशा असामान्यांचा जनतेकडून वृथा छळ होतो. यासाठी सद्गुरु कृपेच्या छायेत रहा. म्हणजे खरा हिरा कोणता हे तुमच्या आपोआप ध्यानी येईल."

    गोचर स्वामींचे हे अमृतबोल ऐकून मग सर्वांनी तुमाराम महाराजांचा जयजयकार केला व कृष्णाच्या द्वापार युगाप्रमाणे कलियुगातही चमत्कार घडतात हे साऱ्यांच्या ध्यानी आले.

    - भालचंद्र केशव गन्द्रे, ठाणे

    (अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)

      September 4, 2022


  • रथसप्तमी

    माघ शुक्ल सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात. या सप्तमीला अचला सप्तमी, जयंती सप्तमी, भास्कर सप्तमी अशी अन्य नांवे सुद्धा आहेत.

      October 1, 2023


  • भारतीय मानसिकता

    पुत्र असावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा, या उक्तीची जाणीव मा. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून जाणवू लागली, व 8 नोव्हेंबरला ती खऱ्या अर्थाने सार्थ ठरली. 125 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात, घडवली जाणारी महत्वाची घटना, फक्त 2 लोकांनी नियोजित करून, रात्री 8 वाजता, लोकांच्या समोर ठेवणे, हि निश्चितच धाडसी कृतीच म्हणावी लागेल.

    आपले नशीब फार चांगले म्हणूनच मोदींना 284 चे स्पष्ट बहुमत मिळाले, आणि एक पांगळे सरकार देशावर लादण्याची नामुष्की टळली. 70 वर्षात वारेमाप काळा पैसा जमावणाऱ्यांची पहिल्यांदा झोप उडाली आहे. कर बुडवून अफाट मालमत्ता गादीखाली, माळ्यावर, भिंतीत, जमिनीत ठेवणारी जमात, खडबडून जागी झाली आहे. मोदींच्या जीवाला ह्याच लोकांचा मोठा धोका आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही.

    या देशाचा हजारो वर्षाचा इतिहास आहे, घरचा भेदी हा देशावर लागलेला शाप आहे, या वेळेस असे भेदी मिळणारच नाहीत याची खात्री देता येणार नाही. रात्र वैऱ्याची आहे, त्यामुळे डोळ्यात तेल घालून जागे राहण्याला पर्याय नाही.

    मोठया प्रमाणात जंगम व स्थावर मालमत्ता करणाऱ्यांच्यावर सुद्धा येणाऱ्या काही दिवसात दणका बसू शकतो. कित्तेक लोक बेनामी संपत्ती करून बसले आहेत, त्याचा हि पर्दाफाश काही दिवसात होऊ शकेल. आजपर्यंत 97 टक्के पैसा फक्त आडव्या वर्तुळात फिरत राहिला ज्याने दुबळ्या अर्थकारणाला जन्म दिला व पैसा फक्त तीन टक्के लोकांच्या हातात राहिला. तो उभ्या वर्तुळात फिरला तरच,तळागाळात मोठया प्रमाणात पैसा पोहोचतो व सुदृढ अर्थव्यवस्था तयार होते.

    भारतीय लोकांना घाईच फार, ट्रेन जरी स्टेशनवर अर्धातास थांबणार असली तरी, आरक्षित डब्यातुन उतरण्यास व चढण्यास घाई करतील, तीच परिस्थिती, उच्च वर्गीय लोक विमानातून उतरताना करतात. पायलट कुर्सी कि पेटी छोड दे असे म्हणताच, लोक तडक उभे राहतात, व वरती ठेवलेल्या ब्यागा काढण्याची घाई करतात. इतके करून बाहेर जाऊन मात्र कनवेअर बेल्टवर समान येण्याची वाट पाहत 20-25 मिनिटे घालवतात. तीच गत पैसे बद्दलणाऱ्यांची बँकेत दिसली. 30 डिसेंबर पर्यंत सवलत असतानाही, पहिले 3-4 दिवस बँकेत झुंबड करण्याची काही आवश्यकता न्हवती. पण आमभारतीयांची मानसिकता प्रत्येक ठिकाणी घाई करण्याची असते, ते इथेही सिद्ध झाले. अशीच घाई मात्र टॅक्स भरण्यासाठी मात्र करताना दिसत नाहीत. थकवलेली वीज, पाणी, यांची बिले जेव्हा कापायची नोटीस येते तेव्हाच भरली जातात हे चित्र कमी अधिक प्रमाणात देशात सगळीकडे सारखेच आहे.

    इंदिराजी नंतर मोदीजी हेच सर्वार्थाने या देशाला धडाडीचे पंतप्रधान म्हणून लाभले, असे आपण म्हणू शकतो. बँकेत लांबच लांब रांगा रहाणे हे मोदींचे अपयश नसून, काही शाखेतील कर्मचाऱ्यांची नियोजनाची बेजबाबदार वृत्ती म्हणू शकतो, हे मी उदाहरणाने सांगू शकतो.

    काही शाखेत 10 तारखेला 10 वाजता नोटा वाटप सुरु झाले, एकूण किती लाखाच्या नोटा त्या शाखेत सरकारने दिल्या आहेत, या वरून तेथील प्रबंधक नोटा बदलीसाठी लागलेल्या रांगेतील अंदाजे किती लोकांना नोटा मिळतील, हे सांगून इतरांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगू शकले असते, व लोकांची ससेहोलपट थांबवू शकले असते. 12.30 ला कॅश संपली व मी प्रबंधकाना 1 वाजता, कधी कॅश येणार असे विचारल्यावर, त्यांनी 4 वाजता येईल असे उत्तर दिले, हेच त्यांनी रांगेतील लोकांना सांगितले असते तर लोक घरी निघून गेले असते. मी केबिन बाहेर येऊन लोकांना असे सांगितले, तशी गर्दी ओसरू लागली. या मुळे फक्त पैसे भरणारे लोकच बँकेत थांबले, आणि गर्दी आटोक्यात राहिली. जे काम व्यवस्थापकाचे होते, ते मला करावे लागले. काही शाखेत दोन चार महिन्यात रिटायर होणारे कर्मचारी नोटा बदलण्यासाठी नियुक्त केले, त्यांना फक्त एक बोटाने किबोर्ड चालवता येत होता, त्यामुळे चार हजार बदलीसाठी प्रती व्यक्ती अंदाजे 5 मिनिटे खर्ची होत होती, जे काम 23-25 वयाच्या व्यक्तीला दिले असते तर अडीच मिनिटात झाले असते, व रांगा लवकर संपल्या असत्या.

    काही मोजक्याच बँक शाखेत खूप चांगले चित्र होते, रांगेतील लोकांना पाणी, चहा वाटप करण्यात आले. कर्मचारी वर्ग अदबीने वागत होता, तसेच जेष्ठ नागरिकांना मदत दिली जात होती. नोटा बदलण्याचा वेग हि अपेक्षित असा चांगलाच होता.

    असे छोटे छोटे निर्णय घेतले असते तर, टीव्ही वर बातम्यात दिसणाऱ्या लांबच लांब रांगा दिसल्या नसत्या, लोकांची छळणूक झाली नसती, व विरोधी नेत्यांची ओरड दिसली नसती. अश्या बाळबोध युक्त्या अमलात आणल्या असत्या तर, नाहक काही लोकांचा बळी गेला नसता.

    -- विजय लिमये

      November 29, 2016


  • हे रुधिर शांत का षंढ थंड हृदयात ?

    हुतात्म्यांनो ! तुमच्यासाठी माझ्याजवळ फक्त शब्द. काळाच्या ओघात उघड होणारे पुरावे , त्यातल्या देशद्रोह्यांच्या नावांना आपणच दिलेलं मोठेपण आणि इतिहासातील चुका जाणवूनसुद्धा न आलेलं शहाणपण. असे आम्ही सगळे हिंदुस्थानवासीय !

      December 12, 2020


  • गुगलीचे बादशहा सुभाष गुप्ते

    सुभाष गुप्ते यांच्या लेगब्रेकमुळे नेहमी खेळणारा फलंदाज खऱ्या अर्थाने गोधळत असे. कारण त्याला सुभाष गुप्ते यांच्या गोलंदाजीवर अत्यंत सावध रहावे लागे. त्यांच्या पटकन वळणाऱ्या चेंडूवर आणि त्यांनी दिलेल्या उंचीवर तो फलंदाज बुचकळ्यात पडायचा आणि सुभाष गुप्ते यांचे ‘ गिऱ्हाईक ‘ व्हायचा .

      December 16, 2021


  • सिंहगड ते रायगड – ट्रेक – भाग १

    काही वर्षांपूर्वी युथ होस्टेल पुणे शाखा सिंहगड ते रायगड अशी शिवदुर्ग दर्शन साहस सहल आयोजित करीत असे. पुण्यातून रोज ३० जणांची तुकडी निघायची ती सर्व भ्रमण पूर्ण करून दहा दिवसांनी परत येत असे. युथ होस्टेल आयोजित हा टेक त्या काळात खूप प्रसिद्ध होता. दहा दिवसाच्या या ट्रेकचे वर्णन तीन भागात देत आहे.

      December 13, 2022


  • शिवधनुष्य प्रशासकीय सुधारणांचे

    आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणावरुन राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य के. लाला यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. त्यानंतर राज्यात मोठे प्रशासकीय फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळाले. वास्तविक प्रशासकीय सुधारणा ही केवळ निवड-नियुक्ती या पुरती मर्यादित बाब नाही. त्यासाठी अनेक गोष्टींचा विविध पातळ्यांवर विचार करावा लागेल. तरच हे शिवधनुष्य पेलणे शक्य होईल.

      January 10, 2011


  • चैत्रांगण : सुंदर रांगोळी

    chaitrangan-rangoli-300चैत्र महिना रखरखत्या उन्हात एक नवी बहार घेऊन येतो.पान गळती होऊन आलेली चैत्रपालवी मनाला आल्हाद देते. लाडक्या माहेरवाशिणीच्या रुपाने चैत्र गौरीचे महिन्याभरासाठी घरोघरी आगमन होते. पुजेमधील अन्नपूर्णा निराळ्या आसनावर बसवून तिची मनोभावे पूजा केली जाते. तिला गोड नैवेद्य दाखवून नातेवाईक, आप्तेष्ट, आजुबाजूच्या सुवासिनींना हळदीकुंकवासाठी निमंत्रण केलं जातं.

    अन्नपूर्णा म्हणजे साक्षात पार्वतीच असून तिचा वास महिनाभर आपल्या घरी असतो. त्यामुळे तिच्या स्वागतासाठी घरापुढील अंगण सारवून त्यावर रांगोळी काढली जाते. त्या वैशिष्ट्यपूर्ण रांगोळीला चैत्रांगण म्हणतात.

    पार्वतीच्या रुपाला शोभेल अशी तिची शस्त्रे म्हणजे शंख, चक्र, गदा, पद्म आणि तिची वाहने म्हणजे गाय, हत्ती, कासव, नाग, गरूड होत.

    तिची सौभाग्याची लेणी म्हणजे फणी, करंडा, आरसा, मंगळसूत्र व सुवासिनींच्या ओटीचे ताट असून दारापुढे तुळशी वृंदावन, ॐ, स्वस्तिक, आंबा, श्रीफळ, उंबर- पिंपळ वगैरे पूजनीय वृक्ष ही हिंदू संस्कृतीची प्रतिके म्हणजेच रंगीत रांगोळी भरून काढलेले चैत्रांगण होय.

    गौरीचा लाडका पुत्र म्हणजे गणराय! त्याचे पण चित्र काढतात, कारण तो आपल्या आईला घरी नेण्यासाठी आलेला असतो.

    अशी ही छान कल्पना या चैत्रांगण रांगोळीमागे आहे. ही रांगोळी काढणाऱ्याचे कौशल्य आहे खरे, पण ही रांगोळी काढल्यानंतर अतिशय सुरेख दिसते.

      April 4, 2016


  • महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ३ – पेरू

    तसे पाहायला गेले तर पेरूंशी आपली मैत्री लहानपणा पासूनची आहे. मग ती पोपट व पेरूची फोड असो किंवा दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत बालपणी शाळेत मित्राबरोबर खाल्लेल्या पेरूच्या आठवणी असोत. पेरू हे आपल्यातील अनेकांचं आवडतं फळ आहे. काहींना कडक तर काहींना अगदी पिकलेले पेरू खायला आवडतात. 
    अशा या पेरूबद्दल आज आपण माहिती करून घेऊया.

      July 4, 2021